Arts & Commerce College, Yeola

Arts & Commerce College, Yeola Arts & Commerce College, Yeola, Nashik

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘हा...
02/01/2026

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘हास्ययोग' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प नाशिक येथील प्रसिद्ध छातीरोग तज्ञ तथा हास्ययोगतज्ज्ञ डॉ. सुषमा दुग्गड यांनी अत्यंत प्रभावीपणे गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. आपल्या व्याख्यानात डॉ. सुषमा दुग्गड यांनी हास्ययोगाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हास्य हे नैसर्गिक औषध असून ते कोणत्याही खर्चाविना शरीर व मनाला आरोग्यदायी लाभ देते. नियमित हास्ययोगामुळे तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात हास्ययोग ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. दुग्गड यांनी केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कृतीतून हास्ययोगाचे विविध प्रकार उपस्थितांना करून दाखवले. हास्य, श्वसन आणि सकारात्मक विचार यांचा संगम म्हणजेच हास्ययोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण नसतानाही हसता आले पाहिजे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आनंदी जीवनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे महत्त्व विशद केले. समाजप्रबोधन, आरोग्यजागर आणि मूल्यसंवर्धन या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते, असे त्यांनी नमूद केले. हास्ययोगामुळे व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो तसेच शैक्षणिक व सामाजिक जीवन अधिक सकारात्मक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. सुषमा दुग्गड यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना हास्ययोगाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे, पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला समन्वयक डॉ. स्वाती सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. के. एस. पगारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #हास्ययोग
#हास्ययोगव्याख्यान #महात्मागांधीविद्यामंदिर
#कला_व_वाणिज्य_महाविद्यालय #आरोग्यजागर #मानसिकआरोग्य
#सकारात्मकजीवन #विद्यार्थीउपक्रम
#शैक्षणिकउपक्रम
#समाजप्रबोधन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर तथा आदिवासी सेवा समिती संस्थेचे स...
01/01/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर तथा आदिवासी सेवा समिती संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पत्नी स्व. रेणुकाआजी हिरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते स्व. रेणुकाआजी हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे म्हणाले की, स्व. रेणुकाआजी हिरे यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. रेणुकाआजी हिरे यांनी अगदी साधेपणाने आपले जीवन व्यतीत केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर मुलांसाठी शिक्षणाची तजवीज करत होते तर रेणुकाआजी या मुलांना मायेची सावली देत होत्या. त्यांनी सगळ्यांशी ममत्वाने संवाद साधला, कष्टकऱ्यांच्या मुलांना मदत केली, कर्मवीर भाऊसाहेबांच्या कामाला विनातक्रार प्रोत्साहन दिले. स्व. आजींचा स्वभाव अतिशय दयाळू होता. आपल्या घरी आलेल्या प्रत्येक गोरगरीब, कष्ट्कऱ्यांशी त्या आस्तेवायिकपणे चर्चा करत. भाऊसाहेब हिरे ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे या प्रवासात स्व. रेणुका आजिंची भक्कम साथ लाभली. त्यांनी एक आदर्श माता बनून आपल्या मुलांचे संगोपन केले. आजी म्हणजे मायेचे घर. आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाची त्या आस्थेवाईकपणे विचारपूस करत. त्यांच्या भक्कम सहकार्यामुळेच कर्मवीर आभाळा येवढं काम उभं करू शकले. त्यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कामाला सतत प्रोत्साहन दिले शिवाय एक आदर्श माता बनून आपल्या मुलांचे संगोपन केले. पालक व मुले यांच्यामधील संवाद कुठेतरी कमी झाल्याचे दिसते. तेव्हा कर्मवीर भाऊसाहेब हिरे व रेणूकाआजी हिरे यांच्या कार्यकर्तत्वातून आयुष्यात चांगला माणूस होण्याची प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे, पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी, डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासहित प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र ठाकरे यांनी मानले.

#रेणुकाआजी_हिरे #रेणुकाआजी_जयंती
#कर्मवीर_भाऊसाहेब_हिरे
#महात्मा_गांधी_विद्यामंदिर #आदिवासी_सेवा_समिती #कला_व_वाणिज्य_महाविद्यालय

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘ताराबाई ...
01/01/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘ताराबाई शिंदे : विचार आणि लेखन’ या विषयावर संपन्न झाले. या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प नाशिक येथील प्रा. आदिती घारकर यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. प्रा. आदिती आघारकर यांनी आपल्या व्याख्यानातून ताराबाई शिंदे यांच्या जीवनकार्याचा, विचारसरणीचा आणि त्यांच्या लेखनातील क्रांतिकारक दृष्टिकोनाचा ऊहापोह करताना सांगितले की, ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ताराबाईंच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रीविषयक अन्याय, दुजाभाव व पुरुषसत्ताक मानसिकतेवर निर्भीडपणे प्रहार केले. ताराबाई शिंदे या आधुनिक स्त्रीवादी विचारांच्या अग्रदूत असून स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य व आत्मसन्मान याविषयी त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. समाजपरिवर्तनासाठी लेखणी ही प्रभावी शस्त्र ठरू शकते, हे ताराबाई शिंदे यांच्या लेखनातून दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ताराबाई शिंदे यांच्या विचारांचा अभ्यास करून चिकित्सक दृष्टी विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी ताराबाई शिंदे यांच्या विचारांचे महत्व विशद केले. त्यांनी सांगितले की, समाजातील रूढी-परंपरांना प्रश्न विचारण्याचे धाडस ताराबाई शिंदे यांनी केले. त्यामुळेच त्या काळाच्या पुढे जाणाऱ्या विचारवंत ठरल्या. स्त्री-पुरुष समानतेचा विचार केवळ चर्चेपुरता न राहता प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा व्याख्यानमालांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मानवतावादी दृष्टिकोन आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे, पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. स्वाती सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रीती वाघ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार प्रा. एस. एस. गाढे यांनी मानले. सदरील व्याख्यानास प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_व्याख्यानमाला #ताराबाई_शिंदे
#स्त्रीवादी_विचार #स्त्री_सशक्तीकरण
#स्त्री_पुरुष_समानता #समाजप्रबोधन
#वैचारिक_प्रबोधन #महात्मा_गांधी_विद्यामंदिर

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्ग...
01/01/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत ʼपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेʼच्या प्रथम पुष्पप्रसंगी डॉ. प्रतिभा जाधव (लासलगाव) या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. यावेळी बोलताना डॉ. प्रतिभा जाधव यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. पतीच्या निधनानंतर सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनात अहिल्यादेवी एक उत्तम स्त्री शासक म्हणून घडल्या. न्यायप्रिय शासन आणि लोककल्याणकारी कार्यामुळे एक आदर्श स्त्री राज्यकर्ती ठरल्या. तत्कालीन जागतिक इतिहासकार, कवी अहिल्यादेवींना जगातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ती म्हणतात. आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतभर अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, विहिरी खोदल्या, तलाव खोदले, रस्ते तयार केलेत, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र चालवलेत. लहान लहान राज्ये, संस्थाने यात विभागलेला देश जोडून ठेवण्याचे काम अहिल्यादेवींनी त्या काळात केले. अहिल्याबाई होळकर यांचे स्वतःचे ग्रंथालय होते. आज ज्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या तो मंत्री आपल्याच मतदारसंघात काम करतो, निधी वाटण्याची धमकी देतो, अशा आजच्या मंत्र्यांनी, शासनाने अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाची व देश हिताची कामे करायला हवीत असे मत त्यांनी व्यक्त केले. तत्त्वज्ञ महाराणी म्हणून जागतिक किर्तीच्या स्त्री शासकांमध्ये अहिल्यादेवी होळकरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते असेही त्या म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी अहिल्यादेवींच्या भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेतला. अहिल्यादेवींना त्यांच्या कार्यामुळे 'लोकमाता' व 'पुण्यश्लोक' म्हटले जाते ते सार्थ असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल विभागाने ही व्याख्यानमाला नव्याने सुरू केली असल्याची माहिती व्याख्यानमालेच्या समन्वयक डॉ. स्वाती सोनवणे यांनी दिली. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रविंद्र ठाकरे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिलाषा शिंदे यांनी केले, वक्त्यांचा परिचय प्रा. प्रिती वाघ यांनी करून दिला, तर आभार प्रा. कैलास चौधरी यांनी मानले.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर
#अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_जयंती

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमाला सुरू...
19/12/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमाला सुरू आहे. मालेगाव येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अभिमन बिरारी यांनी 'महात्मा फुले' या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. यावेळी बोलताना फुले दांपत्याचे कार्य इतके महान आहे की, त्यांच्या कार्याची थोरवी आचंद्रसूर्य निनादत राहील असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कृष्णा शिंदे उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. अभिमन बिरारी आपल्या भाषणात म्हणाले की, स्त्री उद्धाराचा पाया महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घातला. फुल्यांनी मानवी समताहक्काची जाणीव करून दिली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे मूळ आडनाव गोरे असून फुले हे नाव व्यवसायावरून पडले. तत्कालीन काळात अनेक अमानवी प्रथा होत्या. शिक्षणासंदर्भात गैरसमज होते. ज्योतिबा फुले यांनी अशा परिस्थितीत शिक्षण घेतले. जागतिक कीर्तीच्या विचारवंतांची, क्रांतिकारकांची चरित्रे वाचली. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी क्रांतिकार्य केले. धर्ममार्तंडांच्या विरोधाला झुंगारून स्त्री शिक्षणाचे आणि अस्पृश्य उद्धाराचे काम हाती घेतले. त्यांनी कुठल्याही जातीला विरोध केला नाही तर मानवीमूल्यांच्या आड येणाऱ्या जातीय प्रथांना त्यांनी विरोध केला. त्यांनी जातीय भेदभावाविरुद्ध बंड पुकारले. फुले आपल्या पत्नीला शिक्षित करत आहेत म्हणून त्यांना बेघर व्हावं लागलं. परंतु त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाला खंड पडू दिला नाही. पुढे त्याच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. फुले दांपत्य काही केल्या ऐकत नाहीत म्हणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला होता. स्त्री शिक्षणाचा आणि समाज उद्धाराचा दृश्य परिणाम आज मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. सामाजिक सुधारणांची गरज ओळखून फुल्यांनी विधवापूनर्विवाहासाठी कायदेशीर प्रयत्न केले. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना करून मनुष्यत्व अंतिम मानणाऱ्या लोकांसाठी एक पर्याय उभा केला. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी ग्रंथ लिहून सामाजिक जागृती केली, असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर अध्यक्ष कृष्णा शिंदे, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे गुरुजी, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री वाणी, पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कला व वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक ...
16/12/2025

कला व वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रसिद्ध योगाभ्यासक अशोक यादव पाटील यांनी ‘सर्वांसाठी योग' या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब दाभाडे गुरुजी होते. आपल्या मनोगतात नाशिक येथील योगाभ्यासक अशोक यादव पाटील म्हणाले की, योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न होते आणि विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठीही योग अत्यंत आवश्यक आहे. प्राणायाम, ध्यान व साध्या योगासनांच्या माध्यमातून अनेक आजारांपासून दूर राहता येते. योगामुळे औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन नैसर्गिक आरोग्य साधता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगा हा धर्मातीत, प्रांतातीत आहे. योग हा व्यापक विषय असून त्याद्वारे आत्मशोध घेता येतो. योगिक व्यायामाने शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते व आयुर्मान वाढते. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग, प्राणायाम आणि विपश्यना उपयुक्त ठरते, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी प्राणायाम व विपश्यनेची काही प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करून घेतली. अध्यक्षीय भाषणात रावसाहेब दाभाडे गुरुजी म्हणाले की, संत गाडगेबाबांनी स्वच्छता, साधेपणा व समाजजागृतीचा संदेश दिला. त्याच विचारधारेतून ही व्याख्यानमाला ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. योगासारख्या विषयावरून या मालिकेची सुरुवात होणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. सदरील कार्यक्रम प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी मंचावर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी, श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. स्वाती सोनवणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार प्रा. सीताराम निकुंभ यांनी मानले. कार्यक्रमास श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ व स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तथा सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#संतगाडगेबाबा_ज्येष्ठनागरिक_व्याख्यानमाला

#बहि:शालशिक्षणमंडळ
#सर्वांसाठीयोग 🧘‍♂️🧘‍♀️

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात 'शांतता, येवलेकर वाचत आहेत' हा उपक्रम संपन्न झाला. झाडे ऑक्...
11/12/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात 'शांतता, येवलेकर वाचत आहेत' हा उपक्रम संपन्न झाला. झाडे ऑक्सिजन देतात तर, पुस्तकातील ज्ञानाने बुद्धी विकसित होते. जिवंत राहण्यासाठी व जीवनमान सुधारण्यासाठी झाड आणि पुस्तक दोन्ही अत्यावश्यक आहे. ज्ञानार्जन आणि वृक्षसंवर्धन अशा संयुक्त भावनेतून विद्यार्थ्यांनी सदरील उपक्रमाचा आनंद घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार सदरील उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. डॉ. भाऊसाहेब गमे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, डिजिटल युगात विद्यार्थ्यांचे वाचनाकडे लक्ष कमी होत चालले आहे. अशा उपक्रमांमधून पुस्तकांशी नवी नाळ जुळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शांततेत केलेले वाचन हे केवळ ज्ञान वाढवत नाही तर मनाला स्थिरता देते, विचारांना आकार देते. मोबाईल आणि सोशलमीडियाने मेंदूचे लक्ष वेधून घेणारी स्पर्धा निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत पुस्तक हेच आपल्या विचारांचे, कल्पनांचे आणि सर्जनशीलतेचे खरे मित्र आहेत. नियमित वाचन केले तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीणपणे घडते, असेही ते म्हणाले. उपक्रमात विद्यार्थ्यांनी कथा, कविता, चरित्रे, माहितीपर पुस्तके तसेच अभ्यासक्रमाबाहेरील विविध विषयांचे लेखन वाचून मनन केले. अनेकांनी पहिल्यांदाच हा अनुभव घेतल्याचे सांगत अशा उपक्रमांची सातत्याने आवृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सदरील कार्यक्रम. विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला होता. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले. तर आभार डॉ. अजिंक्य पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. कैलास चौधरी, डॉ. नानासाहेब दाभाडे, प्रा. वैभव सोनवणे ,प्रा धनंजय पेहेरकर, यांच्यासहित प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#शांतता_यवलकर_वाचतआहेत






महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्...
11/12/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्धी व परीक्षा विभागप्रमुख डाॅ. धनराज धनगर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी हे होते.
यावेळी बोलताना डॉ. धनराज धनगर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. हजारो वर्षे समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या सर्वच दलित, आदिवासी, वंचित, भटके-विमुक्त, ओबीसी, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय पोहचविण्यासाठी डाॅ. आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना कटिबद्ध आहे. जोपर्यंत ही राज्यघटना सुरक्षित आहे व या राज्यघटनेनूसार देश चालेल तोपर्यंत देश सुरक्षित राहील. देशाची एकात्मता, अखंडता टिकून राहील. आपल्या या देशात अराजकता माजणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. जगातील सर्व मोठ्या राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्कृष्ट तत्त्वे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत आणली. डाॅ. आंबेडकरांचे वाचन, व्यासंग हा विद्यार्थ्यांसह सर्वांनाच प्रेरणादायी आहे. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषा व साहित्य, पत्रकारीता, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र अशा सर्वच क्षेत्रातील सखोल ज्ञान असलेले बाबासाहेब म्हणूनच ज्ञानाचे प्रतिक (सिंम्बल ऑफ नाॅलेज) ठरतात. सार्वकालिक महान व्यक्तींमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. कवी, लेखक, शाहीर यांच्या लेखणीतून बाबासाहेबांविषयीचा आदर ओथंबून वाहताना दिसतो असेही ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. कैलास चौधरी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष मोठा असल्याचे सांगून समाज व राष्ट्रप्रेम त्यांच्यात ठासून भरलेले होते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप ढमाले यांनी केले तर आभार डाॅ. स्वाती सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी जेष्ठ प्राध्यापक डाॅ. राजेंद्र भोसले, प्रा. मोहन सोनवणे, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. जी.सी.जाधव, प्रा. शंकर शिंदे, प्रा. निलेश नाईक, प्रा. धनंजय पेहेरकर, प्रा. सुरेखा राजवळ, प्रा. अभिलाषा शिंदे, प्रा. प्रीती वाघ, प्रा. साक्षी गाढे, प्रा. सलमा अन्सारी, प्रवीण कुर्हाडे यांचेसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण करंजकर, श्री प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर, अन्वर शेख यांनी परिश्रम घेतले.

#महापरिनिर्वाणदिन #डॉबाबासाहेबआंबेडक #भारताचा_संविधानकर्ता
#ज्ञानाचेप्रतिक


08/12/2025
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त व...
06/11/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजिन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते तर कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. रामदास चव्हाण हे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व वंदन करून करण्यात आली.
आपल्या मनोगतातून डॉ. भाऊसाहेब गमे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समग्र कार्याविषयी बोलताना असे सांगितले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते' आणि 'सहकार महर्षी' म्हणून कर्मवीरांना ओळखले जाते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले आणि अनेक मंत्रिपदे भूषविली.
आदिवासी, दुर्लक्षित, दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सन १९४५ मध्ये आदिवासी सेवा समिती, तर सन १९५२ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे माध्यम आहे, असे त्यांचे ठाम मत होते.भारताच्या गुलामगिरीचे व पारतंत्र्याचे मुळ अज्ञानात व गरीबीत आहे, हे ओळखून त्यांनी १५०० व्हालंटरी शाळा स्वप्रयत्नातुन कोणत्याही शासकीय मदतीविना सुरू केल्या. ज्ञानाची ही गंगा अगदी येवला येथील संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय रूपाने पोहोचली. कर्मवीर हे दूरदृष्टी विचाराचे होते. त्यांनी केलेल्या स्वतंत्रता संग्राम, सहकारिता, शिक्षण, कृषि, अर्थ, व्यापार, उद्योग, आदिवासी कल्याण तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात श्रेष्ठत्तम योगदानाबद्दल अवघा समाज ‘‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’’ ह्या समर्पित नेतृत्वाप्रती अत्यंत कृतज्ञ आहे.त्यांच्या पश्चात हिरे परिवाराने देखील समाजकारण, शिक्षण, सहकार, राजकारण क्षेत्रातील हे भगीरथ कार्य आजही अविरतपणे चालू ठेवले आहे. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा रामदास चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की कर्मवीर यांचे जीवन खऱ्या अर्थाने ऋषितुल्य असे होते. अगदी सर्वसामान्य परिवारातून पुढे येऊन त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी संपूर्ण हयात गोरगरीब, कष्टकरी, वंचित यांच्यासाठी कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रमुख शिल्पकार, कुळ कायद्याचे जनक म्हणून त्यांचे कार्य आजही स्मरले जाते. याशिवाय शिक्षण, सहकार, समाजकारण ,राजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात कर्मवीरांनी भरीव कार्य केले. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती त्यांनी स्थापन करून शिक्षणाची ज्ञान गंगा सर्वसामान्यांसाठी खुली केली. आज महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून या संस्थेची ख्याती आहे. असे बहुमोल मार्गदर्शन प्रा.रामदास चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर मांडले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. वैभव सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. धनंजय पेहेरकर यांनी केले. अतिथी परिचय प्रा. धनराज चव्हाण यांनी करून दिला तर आभार प्रा. सौ. सुरेखा राजवाळ यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रवींद्र ठाकरे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनराज धनगर, कार्यालय अधीक्षक भालचंद्र पेंढारकर, प्रा. मोहन सोनवणे, प्रा. शंकर शिंदे, डॉ. स्वाती लवंगे, डॉ. अजिंक्य पाटील, प्रा. संजय करंजकर, श्री सोमनाथ कुवर, श्री प्रल्हाद जाधव. यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#कर्मवीरभाऊसाहेबहिरे #पुण्यतिथी #आदरांजली #सहकारमहर्षी #शिक्षणमहर्षी #कुळकायद्याचेजनक

Address

Arts & Commerce College, Vinchur Road, Tal: Yeola, Dist: Nashik
Yeola
423401

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts & Commerce College, Yeola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category