21/08/2026
दि. 21 ऑगस्ट 2026
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस मृद व जलसंधारण दिन म्हणून साजरा....................................................
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि 'जलसंधारणाचे प्रणेते' स्व. सुधाकरराव नाईक यांची जयंती २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' म्हणून साजरी केली जाते. याच उद्देशाने मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस मृद व जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एस.कुबडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बी.आर.तनपुरे व डॉ. डी.एन.लांजेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकेत डॉ. विष्णू लांडे यांनी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत, त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाची ओळख करून दिली. डॉ. डी.एन.लांजेवार यांनी सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार आज कृतीत आणणे गरज झाल्याचे सांगितले. मृदसंधारण व जलसंधारण हे शेती, पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पीढीसाठी त्यांचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. बी.आर.तनपुरे यांनी मातीसंवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे यासारख्या योजना राबवून, हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी युवकांनी वृक्षारोपण करावे. एवढेच नव्हे तर आजचे जलसंवर्धन हे उद्याचे सुरक्षित भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. जी.एस.कुबडे यांनी जलसंधारणासाठी एक महाविद्यालय एक शोषखड्डा हा उपक्रम राबविणे हिताचे असल्याचे सांगितले. पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश देत, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी जिथे जिथे पाणी वाचविता येईल, तिथे तिथे त्यांनी पाण्याची बचत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज ठाकरे यांने केले, तर उपस्थितांचे आभार गणेश कर्डिले यांनी मानले.