Educational height

Educational height English Speaking, Personality Development and Motivational Videos and Study Material. By Jagdish Wandile

11/04/2026

*✦ जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आत्मपरीक्षणाची संधी ✦*

आज आपण एका महान व्यक्तीची जयंती साजरी करत आहोत. परंतु, मला वाटते की ही केवळ जयंती नसून, त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि त्यांच्या अधुर्या स्वप्नांचा मागोवा घेण्याची ही संधी आहे.
कोणताही महापुरुष केवळ आपल्यासाठी जगत नाही. तो संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित करतो. त्यांच्या विचारांत एक दूरदृष्टी असते – समाज परिवर्तनाची, शिक्षणाची, समता-सामाजिक न्यायाची आणि आत्मगौरवाची म्हणूनच, जयंती साजरी करताना आपल्याला हे बघावं लागतं की:
त्यांनी दिलेले विचार आपण कितपत अमलात आणले?
त्यांनी सुरू केलेलं कार्य कुठे पोहोचलंय?
त्यांचं अधुरं स्वप्न आपण पूर्ण करत आहोत का?
बहुजन समाज आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक रुपया आणि प्रत्येक क्षण समाजाच्या विकासासाठी वापरणं गरजेचं आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जर आम्ही: शिक्षणविषयक मार्गदर्शन शिबिरे घेतली,बेरोजगार तरुणांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण दिलं,आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे भरवली,
त्यांच्या विचारांवर परिसंवाद, चर्चासत्र घेतली,..तर मग त्यांचा खरा सन्मान आणि उपयोग समाजासाठी होईल.
महापुरुषांची जयंती म्हणजे भूतकाळात डोकावणं नाही, तर भविष्यासाठी दिशा ठरवणं आहे.
त्यामुळे, पुढे जाऊन आपण प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला "सामाजिक जागृती पर्व" म्हणून साजरी करूया.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं:
“जयंती फक्त साजरी नको, ती समाजाला जागं करणारी ठरली पाहिजे.”

लेखक : जगदीश वांदीले सर
8788538544,9860690063

10/11/2025

*मूळ व्यक्तिमत्त्व आणि राजकारण*

राजकीय नेता हा खरं तर एक अभिनेता असतो. कोणत्या क्षणी कोणती भूमिका वठवायची, कोणते बोल बोलायचे, कोणती मुद्रा ठेवायची याचं अचूक भान त्याच्याकडे असतं. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला कसं वागावं हे ठरवता येतं. जनतेच्या भावना, मागण्या, अपेक्षा यांचा त्याला सखोल अभ्यास असतो. त्यामुळे कोणत्या गटाला कोणतं “चॉकलेट” देऊन कोणता परिणाम साधता येईल, हे त्याला ठाऊक असतं.

पण यापलीकडे एक गोष्ट कधीच लपून राहत नाही.
नेता कितीही अभिनय करतो, तरी त्याचा मूळ स्वभाव त्याच्यासोबत कायम राहतो.

मूळ स्वभाव सहज घडत नाही. बालपणातील संस्कार, घरातील वातावरण, मित्रपरिवार, आयुष्यातले अनुभव, आलेल्या संकटांचा परिणाम, मनाची संवेदनशीलता आणि निरीक्षणाची धडपड या सगळ्यांनी व्यक्तिमत्त्व तयार होतं.

राजकारणात अनेकजण केवळ व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन प्रवेश करतात. पण ज्याच्या मूळ स्वभावातच सामाजिक जाणीव आणि सेवा या मूल्यांची खोल रुजवण असते, तोच खऱ्या अर्थाने जनमानसाचा नेता बनतो.

प्रत्येक व्यक्तीचं मूळ व्यक्तिमत्त्व वेगळं असतंच.
कोणाचा केंद्रबिंदू स्वतःची प्रगती, कोणाचा सत्ता, तर कोणाचा समाजहित.

एखादा नेता अहंकाराची पूजा करतो की समाजासाठी स्वतःला वाहून घेतो, हे ओळखणं सर्वात महत्त्वाचं.

खरा नेता तोच जो समाजाची मनोवृत्ती समजून, समाजहित हेच आपलं व्रत मानून काम करतो.

जगदिश वांदिले सर
8788538544 / 9860690063

01/11/2025

✦ OBC साहित्य संमेलनाची गरज

OBC म्हणजेच इतर मागासवर्ग — हा समाज मुख्यत्वे शेतकरी, कामगार, मजूर, कारागीर, सेवा देणारा वर्ग आहे. या समाजाचे प्रश्न, त्यांची वेदना आणि जीवनसंघर्ष साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणे आवश्यक आहे. हाच या साहित्य संमेलनामागचा मूलभूत हेतू आहे.

शेतकरी आणि कामगारांच्या आयुष्यातील असंख्य समस्या शासनापर्यंत, समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या समस्यांचा आवाज साहित्याच्या भाषेतून उठला, तर तो अधिक प्रभावी ठरतो. म्हणूनच, गावखेड्यातील लेखक, कवी, विचारवंत यांनी पुढे यावे, त्यांच्या लेखणीतून समाजाची व्यथा आणि आशा व्यक्त व्हावी, हीच या संमेलनाची प्रेरणा आहे.

जाणिवेतून आणि वेदनेतूनच खरा साहित्यिक जन्म घेतो. म्हणूनच शेतकरी-कामगार वर्गाने आपली जाणीव लेखनात उतरवली, तर OBC साहित्याचा नवा प्रवाह निर्माण होईल. या प्रवाहातून OBC समाजाची अस्मिता, अभिमान, आणि स्वाभिमान जागृत होईल.

✦ आत्मसन्मानाची आणि ओळखीची गरज

ज्या प्रकारे दलित साहित्य चळवळीने दलितांची अस्मिता जागृत केली, आदिवासी साहित्याने आदिवासींच्या ओळखीला स्वर दिला, त्याचप्रमाणे OBC समाजालाही स्वतःचा साहित्यिक आवाज मिळायला हवा.
OBC समाज हा या देशातील 60 ते 65 टक्के लोकसंख्या असलेला मोठा घटक आहे. तरीही त्याचे स्वतंत्र साहित्यिक प्रतिनिधित्व फारसे दिसत नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी OBC साहित्य संमेलनाची गरज आहे.

✦ साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट

या साहित्य संमेलनात गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर, कारागीर या सर्व घटकांना आपले विचार मांडण्याची, आपली अस्मिता जागृत करण्याची संधी मिळते. हे संमेलन त्यांच्या आत्मसन्मान, हक्क, अधिकार, आणि समानतेसाठीच्या संघर्षाला दिशा देईल.

हे केवळ साहित्याचे नव्हे, तर विचाराचे, विद्रोहाचे आणि परिवर्तनाचे संमेलन आहे.
ज्या समाजाने हजारो वर्षे श्रम करूनही ओळख मिळवली नाही, त्या समाजाला हे संमेलन आवाज देईल.

✦ समाजरक्षण आणि सामूहिक जबाबदारी

जसे दूध गरम केले की त्यावर साय येते आणि ती साय दूधाचे रक्षण करते, तसेच समाजातील सजग, जागरूक लोकांनी समाजाचे रक्षण करणे आवश्यक आहे.
जेव्हा OBC समाजातील विचारवंत, लेखक, कवी एकत्र येतात, तेव्हा ती सामूहिक जाणीव समाजाचे रक्षण करते — अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देते.

✦ निष्कर्ष

OBC साहित्य संमेलन ही फक्त सभा नाही — ती एक जाणीव आहे, एक चळवळ आहे, जी शेतकरी, कामगार, कारागीर, मजूर यांच्या अस्मितेला साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त करते.
ही चळवळ समाजाला आपला आवाज, ओळख, आणि अभिमान परत देईल.

जगदीश वांदीले सर
(इंग्लिश स्पीकिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास)
8788538544,9860690063

23/10/2025

Address

Bidkar Ward
Wardha
07153

Telephone

+919860690063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Educational height posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share