13/06/2017
दहावी बारावी झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे EduTech Tutorials कडून हार्दिक अभिनंदन..
दहावी बारावी नंतर काय.?
मित्रानो दहावी आणि बारावीचा निकाल लागला आता
पुढे काय करायचे हा प्रश्न सर्व विध्यार्थाना त्यांचा
पालकांना आहे
माझी सर्व पालकांना विनंती आहे कि तुम्ही भविष्याचा मार्ग दाखवा पण तू डॉक्टरच किव्वा इंजिनिअर हो असे सक्तीचे करू नका. आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करू निर्णय घ्या .
दहावी नंतर करायचे कोर्स
१. बारावी (कला विज्ञान वाणिज्य )
२ . डिप्लोमा इंजिनिरिंग
३. सैन्य व नौदल स्पर्धा परीक्षा तयारी
४. औद्योगिक प्रशिक्षण ( वेल्डर, फिटर, मशिनीस्ट, डीजेल मेकानिक.)
५. रेल्वे तिकीट काउंटरर
६. संगीत आणि नृत्य डिप्लोमा
७.फार्म व्यवस्थापन डिप्लोमा
८.इतर डिप्लोमा कोर्सेस ( interior design , stenography, beauty culture , hair dresser ,fashion designing ,)
९.वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
१०.बिल्डींग पर्यवेक्षक इ .
●दहावी नंतर डिप्लोमा इंजिनिरिंग करण्याकडे सध्या जास्त कल आहे इंजिनिरिंग व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत तुम्ही चांगले भविष्य बनवू शकता पालकांमध्ये एक गैरसमज आहे कि इंजिनिरिंग म्हणजे चांगला जॉब भरपूर पैसा हे चुकीच आहे इतर कोर्सेस ला सुद्धा नोकरी आणि बिजनेस मध्ये संधी आहे.
●दहावी नंतर बारावी करणे नेहमी फायद्याचे ठरते कारण बारावी नंतर खूप क्षेत्र आहेत दहावी नंतर बारावी करताना तीन शाखा आहेत (कला, विज्ञान ,वाणिज्य ) आपली आवड आणि बौद्धिक क्षमतेनुसार एक शाखेची निवड करावी..
बारावी नंतर खूप कोर्सेस उपलब्ध आहेत फोटो मध्ये सर्व नमूद केलेले आहेत..
कला शाखेत बारावी केली असेल तर
पत्रकारिता, कार्यक्रम (Event) व्यवस्थापन, डीझायनिंग डिप्लोमा, जाहिरात आणि animation डिप्लोमा , हॉटेल व्यवस्थापन यात चांगली संधी मिळेल..
कॉमर्स मध्ये बारावी केली तर
बँकिंग क्षेत्र , एम.बी.ए , बी.सी.ए, architecture ,कॉम्पुटर कोर्सेस(Tally) यात संधी आहे
विज्ञान शाखेत बारावी केल्या नंतर
प्रवेश परीक्षा देऊन इंजिनिरिंग, डॉक्टरेट पदवी मिळवता येते . फार्मसी, architecture , agriculture हॉटेल व्यवस्थापन पदवी. या सारख्या अनेक क्षेत्रांत वाव आहे कोणतीही पदवी झाल्यानंतर MPSC , UPSC परीक्षा देऊ शकतो .
विचार करा खूप काही करण्यासारखे आहे शक्यतो
तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा.
तुमचा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..
तुमचा ओळखीच्या दहावी व बारावीच्या विध्यार्थांपर्यंत हा मेसेज पोहचवा.