Shri Parvati Shankar Educational Society, Uttur

Shri Parvati Shankar Educational Society, Uttur It is our official page. Stay tuned for more update related to Nursery, Primary and Secondary school.

Shri Parvati Shankar Education Society is established in the year 1992 under the guidance of Hon.Shri Shivputra Shankar Karmbali with objective to give quality education at pre-primary, primary, higher primary and secondary level to rural students. This was first time introduced in Uttur with scientific approach in line with the views of Madam Montessary, Tarabai Modak, Gijubhai Badheka, Maisaheb Bawdekar and R.V.Shewade Guruji.

18/08/2026

" पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न ‌. "
संकुलात भावगीत-भक्तिगीत, देशभक्तीपरगीत गायन स्पर्धांचे आयोजन. ‌.
उत्तूर, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ :-
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या संकुलात विविध उपक्रमांनी भारतीय ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बसवराजआण्णा करंबळी यांचे शुभहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भावगीत-भक्तीगीत व देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धांचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी माननीय श्री सुरेश मुरगुडे, कार्यकारी संचालक माननीय प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, संचालक माननीय डॉ. व्ही.एम्. पाकले , माननीय श्री विनायक करंबळी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ ली ते १०वीच्या गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये ४४ विद्यार्थ्यांनी विविधगीते तालासुरात सादर करून तब्बल चार-साडेचार तास गायनाची मैफील सादर करून राष्ट्रभक्ती, ईश्वरभक्ती, मानवी भावभावनांचा आविष्कार करून चैतन्य आणले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मानवंदना, संचलन शिस्तबद्ध होते. गीतमंच पथकाने राष्ट्रगीत ,ध्वजगीत, महाराष्ट्र राज्यगीत वाद्यांच्या तालासुरात सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण जागृत केले. राष्ट्रध्वज प्रतिज्ञा, नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा श्री जी. एन्. भांदुगरे यांनी दिली‌. श्री एम्. एल्. काकडे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात विकसित भारत २०४७ मध्ये आजचे विद्यार्थी व भावी युवापिढीचे योगदान अपेक्षित केले. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती व उद्योगधंदे यांचे देश विकासातील महत्त्व त्यांनी विशद केले ‌.
भावगीत-भक्तीगीत गायन स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
इयत्ता १ ली ते ४ थी गट : - प्रथम- हर्षवर्धन पाटील ; द्वितीय- कु.शरण्या माळवकर ; तृतीय- कु. अनन्या पोवार ‌‌.
इयत्ता ५ वी ते ७ वी गट:- प्रथम- कु. श्रेया गायकवाड; द्वितीय- श्रीरंग बेडगे; तृतीय- कु. सनम बागवान .
इयत्ता ८वी ते १०वी गट :- प्रथम- कु. स्वरांजली कुंभार; द्वितीय- अथर्व कुरणे ; तृतीय-कु. प्रांजल येजरे.
ग्रामपंचायत सार्वजनिक ध्वजारोहणाचे कामकाज श्री बी. बी. पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री पार्वती-शंकर विद्यालय व विद्यामंदिरने सर्व शाळांच्या सहभागातून यशस्वी केले. इयत्ता ९वीच्या दोन पथकांनी श्री पार्वती-शंकर पतसंस्था व भावेश्वरी पतसंस्था, उत्तूर पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागाचे ध्वजारोहण करण्यामध्ये सहभाग घेतला .
गायन स्पर्धेतील सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे संचालक मंडळाच्या वतीने विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्यावतीने बालमंदिर मुलांना , सर्व स्टाफला व योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिलेबीचे वितरण केले.

" पाल्याची शैक्षणिक प्रगती , सुसंस्कार व सुसंवाद यातून विद्यार्थी घडवा "        -----मान. श्रीमंत सौ. नाडगोंडे  .       ...
10/08/2026

" पाल्याची शैक्षणिक प्रगती , सुसंस्कार व सुसंवाद यातून विद्यार्थी घडवा "
-----मान. श्रीमंत सौ. नाडगोंडे . ' पार्वती-शंकरमध्ये ५०० पालकांचा नियोजनबद्ध पालक मेळावा संपन्न '.
उत्तूर , ९ ऑगस्ट २०२६ :-
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयाचा २०२६-२७ चा पालक मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ आण्णा करंबळी हे होते. बसर्गै एज्युकेशन सोसायटी , बसर्गे बुद्रुकच्या चेअरमन व माजी बॅडमिंटनपटू श्रीमंत सौ. वर्षादेवी नाडगोंडे सरकार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. संस्थेचे संचालक तथा कुशल शैक्षणिक मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, मान्यवर पालक प्रतिनिधी माननीय श्री दिगंबर देसाई व माननीय श्री पराग देशमाने यांचीही व्यासपीठावर उपस्थिती लाभली.
सर्वच मान्यवरांना प्रारंभी औक्षण व मानवंदना देण्यात आली. व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. गीतमंच पथकाने स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पानविडा व सन्मानचिन्ह देऊन माता-पालक प्रतिनिधी सौ. कविता देशमाने यांच्याहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले शैक्षणिक अनुभव शेअर करून पालकांचे प्रबोधन करताना सौ. नाडगोंडे म्हणाल्या ,
" पार्वती-शंकर शाळा पाहून खूप समाधान वाटले. येथे पालकांनाही आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते हा वेगळेपणा संस्थेने जोपासला आहे. मुले मुळात हुशार असतातच ; पण त्यांना आई-वडील जे वातावरण देतात त्यातून खरे शिक्षण घडते. पूर्वी गुरुजी बालकांमध्ये जे घडवीत ते कधीच विस्मरण होत नसे. शैक्षणिक प्रगती महत्त्वाची; पण त्याबरोबर सुसंस्कार व पालक-पाल्य सुसंवाद यातून खरे शिक्षण घडते. पूर्वी विद्यार्थ्यांना सर्व काही कष्टातून मिळवावे लागे. आज पालक पाल्यांना सोयीसुविधा पुरवितात. पालकांनी जागरूकपणे मुलं काय करतात हे पाहिले पाहिजे. पाल्यांशी सुसंवाद साधून त्यांच्यात सुसंस्कार करणे आजकाल गरजेचे आहे. संस्कार घडविताना पालक-पाल्य चर्चा घडवून समस्या सोडविता येतात. येथील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन ! "
प्रास्ताविकपर मनोगतात सर्व मान्यवर, माता-पिता पालक ,पुरस्कार प्राप्त विद्यार्थी यांचे संस्थेमार्फत स्वागत करून संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे म्हणाले, " विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पालक मेळावा आयोजित केला जात आहे . पाल्याच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत. अभ्यासाबरोबर अन्य क्षेत्रातही प्रगती व्हावी. कुटुंबात निर्मळ प्रेमाचे वातावरण असावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा .रोज सायंकाळी एक तास पालकांनी पाल्यांशी संवाद साधावा. शालेय शिक्षण हे मूलभूत शिक्षण; ते पक्के व्हायला हवे. तंत्रज्ञान युगात ए-आयचे महत्त्व आहे ; पण त्याच्या आहारी न जाता योग्य तो वापर झाला पाहिजे. जो ज्ञानी तोच टिकणार ; म्हणून पालकांनी दक्ष राहावे. शिक्षक आणि पालक यांच्या चर्चेतून विद्यार्थी घडला पाहिजे. यावयात मुलांनी ज्ञानार्जनी बनावे . शिक्षकांनीही नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. प्रामाणिकपणा व नैतिकता या शाश्वत मूल्यांचा संस्कार आपल्या पाल्यावर घडावा . त्यासाठी पालकांनी वेळ द्यावा. ज्ञानी व सुसंस्कृत समाज शिक्षणातून घडावा. कुटुंबात आई-वडील व ज्येष्ठ यांचे बोलणे ,वागणे यातून विद्यार्थी घडतो ; म्हणून पालकांचे आचरण योग्य हवे . "
या कार्यक्रमात २०२५-२६ चे आदर्श विद्यार्थी व आदर्श पालक पुरस्कार वितरण प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे व उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी यांच्या हस्ते करण्यात आले‌. मानपत्र व गौरवचिन्ह ,रोख पारितोषिक ,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे: आदर्श पालक माध्यमिक : सौ. व श्री सागर नागोजी कुंभार ,राहणार- भादवण ; आदर्श पालक प्राथमिक: सौ. व श्री प्रमोद बाबुराव पाटील, राहणार -उत्तूर;
आदर्श विद्यार्थी माध्यमिक - कु. श्रावणी विकास पाटील, इयत्ता १० वी ; आदर्श विद्यार्थी प्राथमिक - अथर्व संतोष कुंभार इयत्ता -७ वी
याच कार्यक्रमात मार्च २०२६ मधील ९० टक्केहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण १८ विद्यार्थी ; एन्.एम्. एम्. एस्. राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक ९ विद्यार्थी ; पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक १५ विद्यार्थी ; ड्रॉइंग ए ग्रेड प्राप्त ३ विद्यार्थी ; गणित प्रज्ञापात्र- १६ विद्यार्थी ; विज्ञान प्रज्ञापात्र-७ विद्यार्थी ; योगा राज्यस्तरीय स्पर्धेतील रौप्यपदक विजेते-२ ; प्रकल्प स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झालेले- ६ विद्यार्थी ; ज्ञानवर्धनस्पर्धेत राज्यस्तरीय यशस्वी- ३ विद्यार्थी अशा ७९ विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, ग्रंथ, गौरवचिन्ह, पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकांच्या समवेत यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्मरणीय ठरला .
गतवर्षीचा अहवाल रसाळवाणीत सौ.वैशाली पाटील यांनी सादर केला. आदर्श पालक निकष व मानपत्र वाचन श्री बी‌. बी .पाटील यांनी केले.आदर्श विद्यार्थी उद्घोषणा सौ.भारती शिवणे यांनी केली. पारितोषिक वितरणाचे संचलन श्री पंडित वंजारे यांनी केले .प्रभावी सूत्रसंचालन श्री पी. एन्. केसरकर यांनी केले . सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदानातून सदर मेळावा यशस्वी झाला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बसवराज आण्णा करंबळी ,सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे ,संचालक डॉ. व्ही. एम्. पाकले व संचालक श्री विनायक करंबळी यांचेही नियोजनात मौलिक सहकार्य लाभले .सर्व पालकांना संस्थेतर्फे अल्पोपाहार देण्यात आला‌.

" हरिनामाचा गजर आणि अभंग यात तल्लीन पार्वती-शंकरची दिंडी "उत्तूर, दिनांक २५ जुलै २०२६            श्री शिवपुत्र शंकर करंब...
26/07/2026

" हरिनामाचा गजर आणि अभंग यात तल्लीन पार्वती-शंकरची दिंडी "
उत्तूर, दिनांक २५ जुलै २०२६
श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या बालमंदिर व विद्यामंदिरात यंदाची आषाढी एकादशी विद्यार्थी वारकरी दिंडी नुकतीच श्री विठ्ठलाच्या भावभक्तीने संपन्न झाली. शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी , उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, संचालक डॉ. व्ही. एम्. पाकले, श्री विनायक करंबळी यांचा विद्यार्थी सुसंस्कारांचा दृष्टिकोन त्यांच्या कुशल मार्गदर्शनातून गेली वीस वर्षे अव्याहतपणे अशा दिंडीच्या माध्यमातून आकाराला येत आहे .
या दिंडीस बामणे , तालुका- भुदरगड येथील श्री विठ्ठल भजनी मंडळाचा मोलाचा सहभाग होता.तसेच महागोंड येथील २ वारकरी , ७ महिला भक्त यांचाही मोलाचा सहभाग मिळाला. मंडळाचे प्रमुख श्री रघुनाथ भिकाजी बोटे, वीणाधारक श्री केशव बोरणाक, मृदंग वादक श्री मारुती बोटे व श्री चंद्रकांत डावरे यांच्यासह २७ भक्तगणांनी अभंग ,पदे ,आरत्या, भजने,हरिनामघोष सादर करून शालेय विद्यार्थ्यांना भक्तीरसात भावचिंब केले.
दिंडीच्या प्रारंभी सर्व भक्तगण व प्रमुख निमंत्रित पाहुणे यांना औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ,वारकरी संप्रदायाचे मुख्य संत श्री ज्ञानेश्वर माऊली व ज्ञानेश्वरीग्रंथ यांचे पूजन व दिंडीचा शुभारंभ प्रमुख पाहुणे वारकरी मान. श्री सुनील शंकर कुसा, काळम्मा बेलेवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन मान.सौ.रेश्मा सुनील कुसा यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाले .दीपप्रज्वलानात श्री रघुनाथ बोटे व अन्य भक्तगणांनी सहभाग दिला.
' सुंदरते ध्यान ' ; ' ये ग ये ग विठाबाई ' ; 'विठ्ठल-विठ्ठल जय हरी विठ्ठल ' ; 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ' ' बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ' आदी अभंग, नामघोष ,भजने, पदे ,आरत्या सादर झाल्या .टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर ताल घेत ही दिंडी ३७० विद्यार्थी , सर्व २५ शिक्षक,शिक्षकेतरासह उत्तूरमधून विठ्ठल मंदिर ,हनुमान मंदिर , महादेव मंदिर, भावेश्वरी मंदिर,बाजारपेठ, एस्.टी. स्टँड अशी पायी वारी करून शाळेत परतली.या दिंडीने उत्तूर पंढरीमय झाले .
शेवटी दिंडी शाळेत तब्बल अडीच तासांनी परतली. शाळेत पसायदानाने दिंडीची सांगता करण्यात आली. विठ्ठल, रुक्मिणी ,संत तुकाराम ,मुक्ताई ,एकनाथ, नामदेव अशा विविध वेशभूषा; पारंपरिक वारकरी पेहरावातील विद्यार्थी, प्रत्येकाच्या कपाळी गंधटिळा, हातात टाळ ,भगवी पताका ,संतवचनांचे घोष फलक ,दिंडीचे मुख्य बोलके व आकर्षक बॅनर या सर्वांतून भक्तीचा मळाच फुलला .
सर्व पुरुष भक्तगणांना उपरणे व टोपी आणि महिला भक्तगणांना ब्लाऊज पीस व श्रीफळ देऊन उचित सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. सर्व भक्तगणांना उपवासाचा फराळ व दूध देण्यात आले .
संचालक मंडळाच्यावतीने उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी व संचालक प्राचार्य डॉ.दिनकर घेवडे यांनी बामणे भजनी मंडळाचे मनापासून आभार मानले आहेत.त्यांनी आषाढी एकादशीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन वारकरी संप्रदायातील श्रद्धा व भक्ती यांची जोपासना उत्तम अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी करावी , असे आवाहन केले आहे ‌.
श्री बी .के. जाधव, सौ. जी .टी. चाळक, श्री एम्.एल्. काकडे यांनी दिंडीसाठी विशेष परिश्रम घेतले. श्री विश्वास यादव यांनी सर्वांच्या दुधाची उत्तम व्यवस्था केली. श्री चोथे बंधू , श्री उत्तम बर्डे, श्री शिवाजी भाईगडे, श्री जगन्नाथ रणनवरे आदी समाजशील उदार व्यक्तींनी मुलांना राजिगरे लाडू, गोड खाऊ देऊन दिंडीस प्रोत्साहन दिले. संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.

मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज मार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान कथाकथन स्पर्धेमध्ये आमच्या श्री पार्वती शंकर विद्यालयातील इ...
18/07/2026

मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज मार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान कथाकथन स्पर्धेमध्ये आमच्या श्री पार्वती शंकर विद्यालयातील इयत्ता नववीच्या कुमारी जान्हवी कुसा या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक मिळविला.

03/07/2026
03/07/2026

" दूरदृष्टीचे लोककल्याणकारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज "
------------श्री व्ही.एस्. नाईक
' श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहूंची १५२वी जयंती संपन्न '
उत्तूर , दि.२६ जून २०२६ :
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्था संचलित बालमंदिर , विद्यामंदिर व विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती प्रतिमा पूजन , शिक्षक व विद्यार्थी मनोगते, निबंधस्पर्धा, पोवाडा सादरीकरण, कुस्ती सादरीकरण आदी उपक्रमांतून संपन्न झाली.
प्रतिमापूजन मुख्याध्यापकांचे हस्ते करण्यात आले. शाहू महाराजांच्या विषयी श्री बी. बी. पाटील, श्री व्ही‌. एस्. नाईक, सौ पुंडपळ , सौ .मोरवाडकर या शिक्षकांनी शाहूंचा जीवनपट व त्यांचे अलौकिक कार्य विशद केले. शाहू महाराजांबद्दल श्री व्ही. एस्. नाईक यांनी छत्रपतींचे सामाजिक, शैक्षणिक, कृषी विषयक कार्याचा आढावा घेतला. मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मागासांना नोकरीत ५०% आरक्षण ,सक्तीचे प्राथमिक शिक्षण, आंतरजातीय विवाह, विधवाविवाह अशा अनेक सुधारणा कायद्याने करून नव्या युगाचा त्यांनी प्रारंभ केला . उक्ती आणि कृती यात एकवाक्यता असणारे राजे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी व लोककल्याणकारी ठरले. त्यांच्या या कार्यास अभिवादन करूया , असे विचार मांडले .
प्राथमिक व माध्यमिक विभागात मराठी व इंग्रजी माध्यमातून "शाहू राजे " या विषयावर इयत्ता ३ री-४थी सबज्युनिअर ग्रुप , इयत्ता ५ वी ते ७ वी ज्युनियर ग्रुप, इयत्ता ८वी ते १० वी सीनियर ग्रुप अशा तीन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बालमंदिरात छोट्या मुलांनी राजे शाहू महाराज यांचे जीवन व कार्य सोप्या शब्दांत व्यक्त केले .बालवाटिका -३ व २ मधील अमय हातकर व देवांश कापसे, अधिराज लोकरे, ओवी नरवडकर या मुलांनी भाषणे केली. अमय हातकर व आरुष हासबे या छोट्यांची नमुनेदार कुस्ती शाहूंच्या कुस्ती प्रेमाची ओळख लहानांना करून गेली.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवणे यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराजआण्णा करंबळी ,उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी , सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे , कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, संचालक डॉ. व्ही. एम्. पाकले, श्री विनायक करंबळी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने कार्यक्रम संपन्न झाला.

03/07/2026

" यशाकडे नेणारी मन केंद्रीकरणाची शक्ती योगातून लाभते "
- श्री बी. बी. पाटील
' श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात योग प्रात्यक्षिकांतून योगदिन संपन्न '

उत्तूर , दिनांक २१ जून २०२६ -
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक संकुलात शिस्तबद्ध योग प्रात्यक्षिकांतून १२ वा आंतरराष्ट्रीय योगदिन वैविध्यपूर्ण कृतीतून संपन्न झाला . ३५० विद्यार्थी व शिक्षक योगासन प्रात्यक्षिकांत सहभागी झाले .
प्रारंभी प्रास्ताविकपर मनोगतात योगासन विभाग प्रमुख श्री बी. बी. पाटील यांनी योगाचे महत्त्व व त्यातील कृतींचे नियम सुलभ भाषेत सांगितले . योगा ही भारतीय प्राचीन संस्कृतीची देणगी असून संतुलित आणि निरोगी जीवन देते . ठरविलेल्या ध्येयावर मन केंद्रित करण्याची शक्ती नियमित योगांतून लाभते . ही शक्ती ध्येयाच्या यशास कारणीभूत ठरते. योगातून अभ्यासावरील मनाची पकड मजबूत होऊन शांत मनाचा लाभ होतो . धावपळीच्या जगात येणारे ताण कमी करता येतात. शरीराची स्थूलता टाळता येते .शरीर ही निसर्गदत्त देणगी असून त्याची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. ती योगाभ्यासातून घडते . योग शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकासाचे साधन आहे . संयम, विवेक योगातूनच येतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते .शरीर व मन यांना दैनंदिन व्यवहारात लागणारी ऊर्जा योगातून लाभते . योगातून सकारात्मक वृत्ती वाढते .यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच योगाची सवय लावून घ्यावी, असे विचार श्री बी.बी. पाटील यांनी मांडले.
त्यानंतर " योगेन चित्तस्य पदेन वाचां " ही योगाची प्रार्थना सादर करण्यात आली. सर्व विद्यार्थी त्यावेळी ज्ञानस्थ मुद्रेत होते . त्यानंतर ओमकारची ५ आवर्तने घेण्यात आली ओम शांती हा श्लोक घेण्यात आला . त्यावेळी हॉलमधील ३५० विद्यार्थी एका विशिष्ट भावतरल अवस्थेत होते .
हात, मनगट, मान, कंबर, पाय यांच्या उत्तेजित हालचाली ; वृक्षासन, ताडासन, अर्धचंद्रासन, धनुरासन , पश्चिमोताणासन, वज्रासन, नौकासन ,हलासन, भुजंगासन , मकरासन ,शवासन, ध्यानमुद्रा आदी प्रकारच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. एकूण दोन तासांचा हा कार्यक्रम प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना भावला. दंडस्थिती ,बैठकस्थिती , शयनस्थिती , विपरित शयनस्थिती या चारही प्रकारांचा समावेश नियोजनपूर्वक करण्यात आला होता .सूर्यनमस्कारही घेण्यात आले.
कु.नव्या देवर्डे -इयत्ता १०वी , कु. स्वरा गोडसे इयत्ता -७वी , कु. ज्ञानेश्वरी गुरव - इयत्ता -८वी, चिन्मय पाटील, अधिराज मांडे , श्री चव्हाण, घनश्याम लोखंडे सर्व इयत्ता ९वी या विद्यार्थ्यांनी शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिकांचे दिग्दर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराजआण्णा करंबळी ,उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी ,सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही .एम. पाकले ,संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे , श्री विनायक करंबळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनांचा दैनंदिन सराव करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.
बालमंदिर वाटिकेतील सर्व मुलांना कु. श्रीशा करंबळी व विराज आमणगी या बाल नेतृत्वाखाली सहज सोप्या कृतीतून सहभाग घेतला. बालगीतांच्या मधुर सुरावटीमुळे त्या प्रात्यक्षिकांमध्ये विलक्षण परिणामकारकता जाणवली .
सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या योगदानातून योगदिन उत्साहात संपन्न झाला . विद्यार्थ्यांना एक वेगळी अनुभूती देऊन गेला .

अटल टँकरिंग लॅब अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय श्री मनीष झोरे.
19/06/2026

अटल टँकरिंग लॅब अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्या
र्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय श्री मनीष झोरे.

' श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात नवागतांचे जोशपूर्ण स्वागत ' उत्तूर ,दिनांक १५जून २०२६-         येथील श्री शिवपुत्र ...
19/06/2026

' श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात नवागतांचे जोशपूर्ण स्वागत '
उत्तूर ,दिनांक १५जून २०२६-
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या संकुलात नवीन प्रवेशित १३८ विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला . सर्व नवीन दाखल इयत्ता पहिली , बाल- वाटिका तसेच दुसरी ते नववी नव्याने शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत इयत्ता दहावी मुलींनी औक्षण शाळेच्या प्रवेशद्वारा वर केले . कुंकुमतिलक लावून उत्साहित झालेल्या विद्यार्थ्यांना ढोलड्रम बँड पथकाने वाजत गाजत शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये आणले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून नव्या विद्यार्थ्यांना आनंदाची अनुभूती दिली .
सभागृहात सर्व नव्याने दाखल विद्यार्थ्यांना पेढे भरवण्यात आले . शासनाच्या मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री बी.के. जाधव यांनी स्वागतपर मनोगतात शिक्षण हे आपल्या विकासाचे महत्त्वाचे अंग असून हसत-खेळत शिका. शिकून मोठे झाला, तर आई-वडिलांना मिळणारा आनंद हेच त्यांचे समाधान ठरते. या शाळेत दाखल झालात हे आमचे भाग्य आहे, असे विचार मांडले.
शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा श्री पंडित वंजारे यांनी घेऊन या उपक्रमातून आपले व्यक्तिमत्व फुलवा. सर्व उपक्रम ,स्पर्धा ,स्पर्धा-परीक्षा यात हिरीरीने सहभागी होऊन ज्ञान व कौशल्य त्यांचा विकास करा. अभ्यासाबरोबर उपक्रमातून आपण घडतो. व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे उपक्रम या शाळेत आयोजित होतात . विज्ञान, गणित, इंग्रजी, लेखन, वक्तृत्व, कला, चित्र व रांगोळी ,नृत्यनाट्य असे सर्व उपक्रम होतात. आम्ही शिक्षक आपल्या पाठीशी आहोत. घाबरू नका. चिंता करू नका. खुशाल झोकून द्या ,असे विचार व्यक्त केले.श्री बी .बी. पाटील यांनी " नशामुक्त समाज " यावर प्रतिज्ञा सांगितली.
शालेय परंपरा, शिस्त ,शालेयसंस्कार याबाबत श्री पी. एन्. केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. नियमितपणा, वेळेचे पालन, अभ्यास ,खेळ ,उत्तम आरोग्य, आहार ,योगाभ्यास ,सुंदर लेखन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात उन्हाळी सुट्टीत संपन्न झालेल्या बेसिक व ॲडव्हान्स इंग्लिश इंग्रजी कोर्समधील " इंग्रजी स्पीच कॉम्पिटिशन " मधील यशस्
वी झालेल्या ज्युनियर व सिनिअर ग्रुपमधील यशस्वी दहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले .
हा कार्यक्रम सर्वच मुलांना आंतरिक प्रेरणा व गोडी निर्माण करणारा ठरला. कार्यक्रम सूत्रसंचालन पहिली वर्गशिक्षिका

सौ माधुरी कुंभार यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराजआण्णा करंबळी,
उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी , सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे,संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, डॉ . व्ही. एम्. पाकले, ,श्री विनायक करंबळी यांनी नवोदित विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे हार्दिक स्वागत करून पाल्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करुया, असे आवाहन केले आहे .नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व सुसज्ज भौतिक सुविधा दिल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा असेही संचालकांनी सूचित केले आहे .

09/05/2026

एस्.एस्.सी. परीक्षेत पार्वती-शंकरची अनुष्का पोटे आजरा तालुक्यात प्रथम
" उत्तूर केंद्रातील पहिले पाच याच शाळेचे "
उत्तूर, दिनांक ८ मे २०२६ ---
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्था संचलित श्री पार्वती-शंकर विद्यालयाची सेमी इंग्रजी माध्यमातून १०० टक्के निकालाची अखंडित १७ वर्षाची परंपरा यंदाही कायम राहिली. कु.अनुष्का सुनील पोटे या विद्यार्थिनीने ९८. २० % गुण घेऊन आजरा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला ; तर आदित्य जगदीश आळवे- गुण ९६.८० % ; अथर्व पांडुरंग भाटले-गुण ९६ . २० % ; कु.गौरी संजय भिऊंगडे व ओम दत्तात्रय सुतार- गुण ९६% ; कु. तनिष्का गजानन सरमळकर गुण- ९५.८०% घेऊन उत्तूर केंद्रात गुणानुक्रमे पहिला ,दुसरा, तिसरा ,चौथा व पाचवा क्रमांक घेऊन एस .एस.सी निकालाची शाळेची यशाची परंपरा कायम राखली .
या शाळेच्या कु.अनुष्का ,आदित्य, अथर्व, आणि कु. गौरी यांनी गणितात पैकीच्यापैकी गुण घेऊन गणित निकालाची आजपर्यंतची परंपरा अबाधित ठेवली. ६५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १८ विद्यार्थी ९० % पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. ४३ विद्यार्थी डिस्टिंक्शन , १६ विद्यार्थी प्रथमश्रेणी ,४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाने शाळेच्या उज्वल यशाचा लौकिक कायम राहिला आहे .
शाळेचे मुख्याध्यापक श्री एम् . यु.शिकलगार, वर्गशिक्षक श्री पी. एन. केसरकर, शिक्षक सौ. वैशाली पाटील ,श्री पंडित वंजारे ,श्री बी .बी. पाटील यांच्या विशेष व अनुभवी मार्गदर्शन व योगदानातून ही परंपरा टिकून आहे . संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी ,उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी , सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही .एम्. पाकले , प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, श्री विनायक करंबळी यांचे सुयोग्य व सुनियंत्रित नियोजन या यशास कारणीभूत आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थी ,त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Address

Shri Parvati Shankar Vidyalay, Indiranagar
Uttur
416220

Opening Hours

Monday 8:30am - 5:45pm
Tuesday 8:30am - 5:45pm
Wednesday 8:30am - 5:45pm
Thursday 8:30am - 5:45pm
Friday 8:30am - 5:45pm
Saturday 6:30am - 12pm

Telephone

+919404714908

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Parvati Shankar Educational Society, Uttur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Parvati Shankar Educational Society, Uttur:

Shortcuts

Share

Category