19/11/2025
इंदिरा गांधी... बदनाम कोणासाठी आणि का झाल्या?
काँग्रेस कुठे कमी पडली..........?
इंदिरा गांधी म्हटले की आणीबाणी , पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या इतकेच सामान्य लोकांना पटवून देण्यात विरोधक यशस्वी झाले आणि काँग्रेस सत्य सांगण्यात कमी पडली....
या लेखात इंदिरा गांधी कोण होत्या, त्यांनी कोणते निर्णय घेतले, देशाला सर्वच क्षेत्रात कसे समृद्ध करून शेजारी राष्ट्रांना आणि अमेरिकेला कसा शह दिला तो पाहू.
इंग्रज जेव्हा देश सोडून गेले तेव्हा अक्षरशः गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता, इत्यादीने देश ओरबाडून निघाला होता. अमेरिकेतील डुक्कर जे गहू खात होते ते आपण आयात करत होतो. इतकी गरिबी होती देशात.
इंदिरा गांधींनी हरित क्रांतीचा निर्णय घेतला. जास्त उत्पादन देणारी गहू, भाताची वाणे आणली.. थोड्याच काळात जो देश धान्य आयात करत होता त्याला निर्यात करणाऱ्या देशात समाविष्ट केले.
बांगलादेश मुक्ती......1971
अमेरिकेच्या दबावाला न डगमगता पूर्व पाकिस्तान अर्थात आजचा बांगलादेश मुक्त केला आणि पाकिस्तानला कायमचा धडा शिकविला. यावेळी 93000 पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. इतके मोठे आत्मसमर्पण जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आजचे नेते एखादा रॉकेट सोडले तरी सर्जिकल स्ट्राईक च्या नावाखाली स्वतःची स्तुती करून घेतात.
Nuclear Test......1971
अमेरिकेला झुंगारून न्युक्लिअर टेस्ट केल्या आणि जगाला दाखवून दिल्या की भारत अणुशक्ती असलेला राष्ट्र झाला आहे. या अणुशक्तीची ताकद काय असते हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही.
प्रीव्ही पर्स रद्द..........
पूर्वीच्या राजाना भारत सरकारकडून लाखो रुपये द्यावे लागत असे. इंदिरा गांधींनी संविधानात बदल करून सर्व नागरिकांना समान न्याय असे ठणकावून सांगितले आणि अशा राजांना दिली जाणारी प्रीव्हि पर्स देखील रद्द केली.
बँकांचे राष्ट्रीयकरण........1969
भारतातील जवळपास सर्वच बँका उद्योगपतीच्या हातात होत्या. नफा कमावण्यासाठी त्या शहरातच कार्यरत होत्या. इंदिरा गांधींनी 1969 ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले, म्हणजे या सर्व बँका सरकारने विकत घेतल्या. आणि या बँका खेडोपाडी नेल्या.
उद्देश एकच होता शेतकरी, भूमिहीन, आदिवासी आणि दलीत यांना पैसा मिळावा आणि शेती, उद्योग करून देशाची प्रगती करावी.
राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरण...1972
त्याकाळी काही मोजक्या लोकांच्याच मालकीची शेकडो एकर जमिनी होत्या. आणि अख्खा गाव भूमिहीन असायचा .
इंदिरा गांधींनी Land ceilling act,1972 करून त्यांच्या जादा जमीनी सरकारकडे घेतल्या आणि दलीत, आदिवासी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केल्या..
गरिबी हाटाओंचा नारा........
गरीबांना रोजगार, अन्न सुरक्षा, झोपडपट्टी विकास अर्थात गरिबाना घरे बांधून दिले. बँकांच्या सुविधा दिल्या....
राष्ट्रीय आणीबाणी.......
देशात विरोधकांनी आराजकता माजवली होती त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणी लावून देशाला शिस्त शिकवली. आणि अनेक चांगले कायदे केले . या आणीबाणीवर विरोधकांनी रान उठवले. नवीन सरकार आले परंतु 2 वर्षच टिकले. जनता समजून गेली हे कितपत देश चालवू शकतात. या आणीबाणीवर एखादा लेख seperate लिहावा लागेल. सत्य समजण्यासाठी...
ऑपरेशन ब्ल्यू स्टार......
देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या पंजाबच्या अतिरेक्यांना धडा शिकविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देश हीत समोर ठेवून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैनिक घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करून दाखवल्या, अतिरेक्यांचा खात्मा केल्या. पुढे याच कारणामुळे त्यांच्या अंग रक्षकानी त्यांची हत्या केली.
बदनाम कोणासाठी झाल्या...
इंदिरा गांधींना बदनाम करण्यासाठी सर्वात प्रथम उद्योगपती पुढे आले. कारण त्यांच्या बँका गरिबांसाठी इंदिराजींनी विकत घेतल्या. त्यांचे आर्थिक नुकसान केले.
दुसरे बदनाम करणारे कोण तर मोठे जमीनदार. ज्यांच्या शेकडो एकर जमीन दलीत आदिवासी, भूमिहीनाना इंदिराजींनी वाटल्या. गावात यांचे प्रस्थ मोठे होते त्यामुळे गोरगरिब जनतेला वेठीस धरून बदनामीचा कार्यक्रम सुरळीत सुरू झाला.
तिसरे म्हणजे राजे लोकं ज्यांच्या प्रीव्हि पर्स बंद करून इंदिराजींनी त्यांना सामान्य माणसाच्या पंक्तीत बसवले.
या सर्वांनी एकत्र येऊन जनसंघाला मिळाले, अज्ञानी, निरक्षर,सामान्य माणसाला खोट्या गोष्टी सांगून काही अमिषे दाखवून इंदिराजींना बदनाम करण्यात यशस्वी झाले.
विशेष म्हणजे आज ती दलीत, आदिवासी,भूमिहीन जनता ज्यांना इंदिराजींनी न्याय दिला तीच विसरली आहे. म्हणतात ना...
"ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी "
या उक्तीप्रमाणे..
काँग्रेस कुठे कमी पडली ....?
इंदिराजीचे गोरगरीब, आदिवासी, दलिता साठीचे कार्य , देशासाठी घेतलेले धाडसी निर्णय , देशासाठी दिलेले बलिदान समजावण्यास काँग्रेस कमी पडली. जे राजकारणात प्रस्थापित झाले तेच काँग्रेसला आपल्या स्वार्थासाठी बदनाम करून दुसरी चूल मांडू लागले.काही प्रादेशिक पक्ष उदाहरणादाखल अभ्यासू शकता.समजून घेऊ शकता.आणीबाणीची दुसरी बाजू स्पष्ट शब्दात मांडण्यास देखील कमी पडली.
आज इंदिरांजीचा वाढदिवस... या महान दुर्गेस, लोह महिलेस, गरीबासाठी तळमळ असणाऱ्या वात्सल्यरूपी मातेस, देशासाठी आहुती देणाऱ्या थोर आत्म्यास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....
धन्यवाद........🌹👏🌹
लेख आवडल्यास नावासह पुढे पाठवा. इंदिराजीचे सत्य समजण्यासाठी.
सतीश जाधव
संचालक, विजेता IAS अकॅडमी