09/02/2026
If you are in the teaching field (government or private), this is for you.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Habit School, School, Thane.
बॅलेन्स लाइफ का कोई फार्मूला नहीं, लेकिन सही समय पर सही आदतें बच्चों को लगा दी तो मुझे लगता है, उनका भविष्य कुछ हततक हम बचा सकते है। कक्षा ६ से ८ तक के बच्चो में अच्छी आदते लगाना Habit School का मुख्य काम है।
09/02/2026
If you are in the teaching field (government or private), this is for you.
08/03/2025
International Women's Day (March 8th) is a global celebration recognizing women's achievements and advocating for gender equality. It originated in the early 1900s and is now observed worldwide through events, campaigns, and discussions on women's rights, empowerment, and social progress. The day also highlights ongoing challenges such as gender discrimination, pay gaps, and violence against women, encouraging collective action for a more inclusive society.
Happy Women Day 2025 !!!
31/12/2024
Our next calender year is a mathematical wonder.
Interesting 2025
1) 2025, itself is a square
2) It's a product of two squares,
Viz. 9² x 5² = 2025
3) It is the sum of 3-squares,
viz. 40²+ 20²+5²= 2025
4) It's the first square after 1936
5) It's the sum of cubes, of all the single digits, from 1 to 9,
viz. 1³+2³+3³+4³+5³+6³+7³+8³+9³= 2025.
This is going to be our NEXT YEAR the NEW YEAR i.e. 2025.
I wish all our Happy moments and the Success that we achieve gets squared and cubed from 1 to 9 like the cardinal numbers all around the whole year !!!!
03/10/2024
माता का आगमन आप सभी के लिए सुख समृद्धि लेकर आये।
26/09/2024
लेख - ०१४
व्यक्तिमत्व विकास
निश्चय म्हणजे नेमके काय ?
आम्हाला जो मुक्काम गाठायचा आहे, तो तुम्ही गाठू शकता. पण तुमच्याजवळ निश्चयाचे चे बळ हवे. निश्चय असेल तर तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकेल. तुम्हाला तुमचे दोष दूर करता येतील व चुका टाळता येतील. तुम्ही एकांतात बसून जी स्वप्ने पाहिली असतील ती साकार होतील. निश्चय म्हणजे तरी काय? तुमच्या मनात नाना प्रकारच्या इच्छा असतात. त्या इच्छांचे रुपांतर कार्यात करणे यालाच निश्चय म्हणतात. अर्थात ते कार्य करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला लायक बनवले पाहिजे. ही लायकी कठोर निश्चयामुळे मिळेल. हाती घेतलेले काम मी पूर्ण करीनच असा आत्मविश्वास बाळगा. आत्मविश्वासाने निश्चय केल्यास तुमचे पाऊल मागे येणारच नाही. संकटे येतील, त्यांचा सामना करण्यास तुमच्याजवळ सामर्थ्यही असते. त्याची खूणगाठ बांधून ठेवा. संकटाचे काळे ढग दूर होतीलच. तुमच्या शक्तीसामर्थ्यामुळे तुम्ही हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईलच. आत्मविश्वासामुळे कार्य सिद्धीला जाते. त्यामुळे तुमचे सामर्थ्य दुप्पट होते.
निश्चयामुळे विचारात स्थिरपणा येतो. जर विचारच दुर्बळ असतील तर कार्य वाया जाईल. काही लोक आपले विचार स्थिर राखू शकत नाहीत. त्यांच्या मनात सतत तर्क येत राहतात. म्हणून निश्चयाचे सामर्थ्य ओळखा व तुम्ही जे ध्येय ठरवले असेल ते गाठण्यासाठी मेहनत करा. तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतीलच,
थोडेसे धाडस हवे
इच्छेचे रुपांतर कार्यात होते त्यावेळी तुमचा निश्चय वाढतो. तुम्ही जे काम हातात घेतले आहे त्यासाठी आपण लायक आहोत, असा आत्मविश्वास मनात बाळगला पाहिजे, या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुम्ही संकटाशी सामना करून कार्य पूर्ण कराल. आत्मविश्वासामुळे तुमच्यामध्ये जी शक्ती आहे तीही जागृत होते. आत्मविश्वासाबरोबरच तुमच्याजवळ थोडेसे धाडस हवे. प्रतिकूल परिस्थितीसमोर हात-पाय न गाळता त्या परिस्थितीला तोंड द्यायचे धाडस लागते. मनात धैर्य असेल तर कोणताही माणूस मोठीमोठी कामे पार पाडू शकेल. नवनिर्मितीच्या नव्या कल्पना मनात उत्पन्न होतील. ज्याच्या मनात भीती लपलेली असते तो काही करू शकत नाही. उत्साह आणि आशा यांच्या जोरावर महान कार्ये होतात. नित्य नव्या निर्मितीचा ध्यास असेल तर प्रगती का होणार नाही? ज्याच्या मनात उत्साह व आशा नाही, जो नेहमी सर्व गोष्टीसाठी इतरांचे सल्ले घेत बसतो, त्याच्या हातून फारसे काही घडत नाही. तो दुसऱ्याची सावली बनूनच राहील व दुसऱ्याची नक्कल करतच राहील. असा मनुष्य मनाने दुबळा असतो, त्याच्यापाशी रचनात्मक विचार नसतो, त्याला यश मिळणे कठीण जाते.
तुम्ही दुर्दैवी नाही, सुदैवी आहात
तुम्हाला या जगात कोणीतरी मोठे व्हायचे आहे ना? मग 'मी कमनशिबी आहे' असे कधीही म्हणू नका. 'मला हे जमणार नाही' असा विचार मनातून काढून फेकून द्या. आपल्या दुर्दैवाचे विचार मनात येणारंच नाहीत. अशा तन्हेने मनाला खंबीर बनवा. तुमच्याकडे मानसिक, शारीरिक किंवा नैतिक दुबळेपणा असेल त्यावर फार विचार करू नका आणि आहे त्या परिस्थितीत संतोष मानून गप्प बसू नका. मनातील शंका-कुशंका काढून टाका. एखाद्या सापाप्रमाणे तुम्हाला धोक्याच्या आहेत. तुमच्या गरिबीबद्दल, कमनशिबाबद्दल विचारच मनात आणू नका, असे दुबळेपणाचे विचार मुळातूनच उपेटून फेकले पाहिजेत. अशा विचारांमुळे तुमच्या कार्याला मर्यादा पडतात. हे तुमच्यातील दुबळेपण परमेश्वराने निर्माण केलेले नाही, ते तुम्हीच निर्माण केलेले असते व ते दुबळेपण तुम्हीच नष्ट करू शकता. तुम्ही दुबळे राहावे अशी परमेश्वराची कधीच इच्छा असणार नाही. परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला तो तुम्ही प्रसन्न व आनंदी राहावे म्हणून. आपण सर्व परमेश्वराचीच लेकरे आहोत. तुम्ही परिस्थितीवर विजय मिळवावा, अशीच परमेश्वराची इच्छा असणार हे नक्की समजाः
परमेश्वराने तुम्हाला सर्वकाही दिले आहे. तुम्ही दुबळे राहावे ही परमेश्वराची इच्छा नाही ही खूणगाठ बांधा. या जीवनाच्या लढ्यात यश मिळवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला अनेक शस्त्रे बहाल केली आहेत. तुम्ही जर दरवाजे, 'खिडक्या बंदच ठेवल्या तर सूर्यप्रकाश तुमच्या घरात येईलच कसा? खिडक्यावर काळे पडदे लावून उजेड येणार नाही. निराशेचे हे काळे पडदे दूर करा, भरपूर प्रकाश मिळेल, अंतिम विजय न्यायाचा व सत्याचा होत असतो, हे तत्त्व लक्षात ठेवा.
ही परमेश्वराची कृपा असलेला मनुष्य आहे, असे तुम्ही स्वतःला पुनःपुन्हा बजावा. मी योग्यवेळी जन्म घेतला आहे आणि जे काम मी करणार आहे ते दुसरा कोणी करू शकतच नाही अशी भावना मनात बाळगा, काम करण्याची ही संधी मलाच मिळाली आहे, मीच भाग्यवान आहे, असे तुम्ही माना म्हणजेच तुम्ही हातातील कार्य पूर्ण करू शकाल.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "वैभव संपन्न होण्याचे मार्ग" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1
12/09/2024
लेख - १३
व्यक्तिमत्त्व विकास
साथसंगत महत्त्वाची आहे
एखादी व्यक्ती अंगभूत गुणांनी कितीही महान असो, ती व्यक्ती आपल्या भोवतीच्या वातावरणावा प्रभाव टाळू शकत नाही. की स्वतंत्र प्रज्ञा आणि बहुतांची अंतरे राखणारा स्वभाव व प्रबळ निश्चय हा हवा. पण या सर्वांना अनुकूल वातावरण आणि योग्य परिस्थिती यांची जोड हवी न्यूटनसारखा अद्वितीय बुद्धिमतेचा मुलगा इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डच्या परिसरात जन्मला म्हणूनच तो महान संशोधक होऊ शकाला हाच न्यूटन आफ्रिकेच्या वन्य प्रदेशात जन्मला असता तर तो संशोधक झाला असतो का? मुळीच नाही.
आपण एका खानदानी कुळातील मुलगा घेऊ आणि त्याला प्रयोग म्हणून वन्य जमातीत कायमचा राहायाला पाठवू , त्याच्यात किती खानदानी गुण कायम राहतील? एकही राहाणार नाही तो लहानपणापासूनच शिकार करायला शिकेल य त्याच्या भोवतालच्या इतर आदिवासी मुलांप्रमाणेच बागू लागेल उत्तर भारतातीलच एक गोष्ट आहे. रामू नावाचा एक बालक लांडग्यांतच वाढला तो लांडगीचे दूध पिऊनच मोठा झाला. त्याला बोलताही येत नव्हते. आणि तो लांडग्याप्रमाणेच चार पायांवर बालत असे व कचे भास खात असे.
धोपटमार्ग सोडा
आपल्यातील अनेकांना खूप प्रयत्न करूनही आयुष्याची निश्चित दिशा सापडतच नाही. तुमच्या भोवतीचे वातावरण जसे असते, त्यानुसारच तुमचा जीवनक्रम ठरतो वेगळी वाट काढण्याचा प्रयत्न फार थोडे लोक करतात. बहुतेक लोक धोपटमार्गानेच जाणारे असतात. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे फार कमी. सर्वजण प्रवाहाच्या मुख्य धारेतच वाहत जातात. जो प्रवाहाविरुद्ध पोहतो, काही वेगळी वाट काढतो त्यालाच या जगात अतुलनीय यश मिळते. तुम्ही ज्या माणसांच्या संपर्कात येता, जी भाषणे व किर्तने ऐकता त्याचा तुमच्यावर निश्चित परिणाम होतो. तुमचे व्यक्तिमत्व बदलते. मग तुम्ही पहिले राहात नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपली साथ संगत विचारपूर्वक निवडून घ्यावी. अमेरिकेतील आदिवासी ताम्रांसाठी आता खास विद्यालये काढली आहेत तेथील विद्यार्थ्यांना उत्तम चालीरितींचे व आदर्श नागरिक बनण्याचे शिक्षण दिले जाते. पण हे तरुण शिक्षण संपून आपल्या राखीव क्षेत्रात परत गेले म्हणजे काही काळापर्यंत त्यांच्यावर उच्च नागरी संस्कृतीचा प्रभाव राहतो. पण काही काळातच ते आपल्या जमातीची राहणी स्वीकारतात व त्यांच्यात पूर्ण मिसळून जातात. अर्थात शिक्षण घेतलेल्या या आदिवासी ताम्रात नागरी संस्कृतीचा स्वीकार करणारे काही तरुण आढळतात आणि ते बिकट परिस्थितीतूनही पुढे आलेले आढळतात.
आपल्या जीवनात अयशस्वी झालेले लाखो लोक आहेत. हे अयशस्वी का झाले, याबद्दल तुम्ही त्यांची मुलाखत घेतली तर तुम्हाला आढळेल, की या लोकांनी उत्साहजनक वातावरण कधी अनुभवलंच नव्हतं, त्यांची आकांक्षा कधी जागृत झालीच नव्हती. आपल्या भोवतीचे निरुत्साहाचे कोंदट वातावरण सामना देऊन दूर करण्याचे सामर्थ्यांच त्यांच्याकडे नव्हते. अनेक लोक तुरुंगात खितपत पडतात किंवा अतिशय दरिद्री आयुष्य जगतात, याचे मुख्य कारण त्यांनी नेहमी दुर्गुणांची व वाईट वातावरणाचीच संगत धरली. श्रेष्ठ व आदर्श मानवी मूल्ये त्यांच्यासमोर कधी आलीच नाही
वातावरण व सहवास महत्वाचा
तुम्ही आयुष्यात कोणतेही काम करा, पण नेहमी प्रेरणादायक आणि आकांक्षा जोपासणाऱ्या वातावरणात राहाण्याचा प्रयत्न करा आणि हे साधण्यासाठी जरूर तो त्याग करायला सिद्ध राहा जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, जे तुम्हाला समजून घेतात अशाच माणसांची संगत धरा. त्यांच्या संगतीत तुम्हाला तुमचे खरे स्वरूप व गुण यांची ओळख व्हायला हवी. तुमच्या मित्रांनी आणि साथी-सोबत्यांनी तुमच्या गुणांचा उत्तम उपयोग करण्यात तुम्हाला मदत केली पाहिजे. उत्तेजन दिले पाहिजे. या वातावरणामुळे तुम्ही सर्वसाधारण आयुष्य कंठणार नाही आणि मग तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग दिसू लागेल.
खरोखर ज्यांनी या जगात काही करून दाखविले आहे, काही वेगळी वाट काढली आहे. त्यांच्या संपर्कात राहाण्यावा प्रयत्न करा. त्यांच्या सहवासामुळे तुम्हीही तुमचे ध्येय ठरवाल, तुमच्या आकांक्षा उंचावतील. जे आपले काम सर्वं मन ओतून करतात त्यांची साथ मिळवा व ती सोडू नका कारण आशा आणि उत्साह हा सांसर्गिक असतो. त्यांचा उत्साह तुमच्याही अंतरंगात संचारेल. तुमच्या चहुबाजुला जर ध्येयासाठी धडपडणारे लोक असतील तर त्यांच्या उदाहरणांमुळे तुम्हीही अधिक प्रयत्नशील व्हाल. उच ध्येयाने प्रेरित झालेले हे लोक तुम्हालाही उत्साह व प्रेरणा देतील.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "ध्येयापुढती गगन ठेंगणे" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1
10/09/2024
लेख - १२
व्यक्तिमत्त्व आणि विकास
निराश माणसाचे भवितव्य काळेकुट्ट
अनेक लोक कळत-नकळत अधोगतीचा व अपकर्षाचा मार्ग स्वीकारतात. विकाराचा पगडा त्यांच्या मनावर इतका बसलेला असतो, की आपण विनाशाच्या रस्त्याला लागलो आहोत हे त्यांना समजतही नाही. त्यांना आपला मार्गच योग्य वाटतो मग ते निराशेने व्याम होतात. दारिद्रयाचा अनुभव त्यांना घ्यावा लागतो निराशाग्रस्त मानसाचे भवितव्य नेहमीच काळेकुट्ट असते निराशेमुळे दैनंदिन जीवनातील लहानलहान अडचणी त्यांना मेरुपर्वताप्रमाणे वाटू लागतात व्यक्तिगत आयुष्यातील निराशेपाटी त्यांना देशाचे व लोकशाहीचे भवितव्यही भेसूर दिसू लागते. ज्यावेळी जबाबदारी नव्हती, ते लहानपणच त्यांना उत्तम वाटू लागते. या भरात त्यांना इंग्रजांचे साम्राज्यशाही राज्यसुद्धा उत्तम वाटते. कशात काही अर्थ नाही, अशी त्यांची भावना होऊन जाते. ही माणसे आपल्याभोवतीही निराशाच पसरवतात.
अशा निराश माणसाने पत्र जरी लिहिले तरी त्यात निराशेचे सूर उमटलेले असतात. त्यांच्या मनाच्या आकाशात सतत काळे ढग दाटून आलेले असतात. मनाने संपूर्ण निराश झालेली माणसे निराशाच पसरवत असल्यामुळे लोकांना त्यांचे दर्शनही तापदायक वाटते. अशा माणसांसंबंधी मराठीत एक छान म्हण आहे. त्यांना चांगले बोलायला सांगितले तरी वाईटच बोलतील. 'शुभ बोल रे नाऱ्या, तर म्हणे मांडवाला आग लागली. डोक्यावर पान पडले तरी आभाळ कोसळले म्हणून सर्वांना सांगत जाणाऱ्या सशाच्या गोष्टीप्रमाणे यांची मानसिक स्थिती झालेली असते. स्वतः होऊनच निराशेच्या कचाट्यात सापडलेल्या अशा माणसापासून दूर राहावे हेच उत्तम, कारण जीवनाची काळी बाजूच हे लोक पहातात व आपल्या बरोबर इतरांनाही निराशेच्या गर्तेत ओढतात.
आशावाद व उत्साह
अर्थात या जगात सर्वच माणसे निराशावादी नाहीत ही उत्तम गोष्ट आहे. आशावादी व उत्साही माणसे सर्वत्र उत्साहच पसरवतात. नवनिर्मितीकडे त्यांचा ओढा असतो. अशी माणसे गरीब असली तरी त्यातून लवकरच समृद्धी मिळवतात. या जगात मानवी संस्कृतीची उभारणी अशा आशावादी व उत्साही माणसांनीच केली आहे.
तुम्ही कोणता ना कोणता व्यवसाय करीत असाल व त्यात अडचणीही असतील, त्या अडचणी तुमच्या हास्याच्या पडद्यामागे लपवून टाका. तुमच्यावर आलेल्या संकटाचा व बिकट परिस्थितीचा पाढा इतरांसमोर वाचू नका. तुमच्या अडचणी जितके कमी लोक समजतील, तितके उत्तम आणि खरं सांगायचं म्हणजे दुसऱ्याचे रडगाणे ऐकून घ्यायला कुणाला आवडते? तुम्ही संकटांचा पाढा जितक्या वेळा वाचाल, तितक्या वेळा संकटाचे ते चीत्र तुमच्या मनाच्या पडद्यावर कायमचे कोरले जाते. पुढे पुढे ते पुसून काढणे अशक्य होते जीवनाची उजळ बाजूच पाहण्याचे शिक्षण लहानपणापासूनच दिले पाहिजे जे आईबाप लहानपणापासूनच मुलांना आशावाद शिकवतात, त्यांचीच मुले पुढच्या आयुष्यात वैभव मिळवतात
उत्साह आणि आशावाद या दोन शब्दांतच सिद्धीचे सामर्थ्य आहे. आशावाद व उत्साह यामुळे तुमचे नवनिर्मितीचे सामर्थ्य वाढेल. प्रत्येक माणूस गतायुष्याचा विचार करत असतो त्यावेळी तुम्ही मागच्या आयुष्यात घडलेल्या यशदायी गोष्टींची व चांगल्या घटनांची आठवण करा. जे अनिष्ट घडले असेल ते विसरून जा. या लहानशा गोष्टीनेही तुमचे पाऊल पुढे पडेल आणि समृद्धीचे सुख माझ्या दारी आले, असे तुम्ही नक्की म्हणू लागाल.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "उद्योग-व्यापारातून समृद्धी" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1
08/09/2024
लेख - ११
व्यक्तिमत्त्व विकास
उत्साह कायम ठेवा
'मी हे कार्य पूर्ण करीन,' असा निश्चय करून त्या कार्याची पूर्ती करून दाखवणानी माणसे पार विरळ आढळतात, भावनेच्या भगत माणूस पुष्कळ बोलून जातो, पण प्रत्यक्ष कार्याची वेळ आली की मार्ग सरतो त्यामुळे कार्याची बढाई मारणारे खूप असतात, याबाबत म्हणीही पुष्कळ आहेत. जो गर्जेल ती पडेल काय, जो भुकेल तो चावेल काय, रिकाम्या भांड्याचा आवाज मोठा असतो, भरलेल्या भांड्याचा आवाज होत नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा अनेक म्हणी आहेत. महर्षी कर्व्यांनी स्वीमुक्तीसाठी प्रचंड कार्य केले पण ते फार कमी बोलत असत. उगीच भाषणेही देत नासत कारण त्यांना कार्य करायचे होते. म्हणून बहुसंख्य लोकांच्या बोलण्या-चालण्यात मेळ नसतो ते मोठमोठ्या गोष्टी बोलतात व करत काहीच नाहीत,
असे का बरे होते? तात्पुरता उत्साह अंगी संचारतो आणि त्या उत्साहाच्या भरात तो कामाची घोषणा करून टाकतो आणि नंतर मात्र कामाला हात घालीत नाही. जेव्हा एखादा शेजारी मृत्यू पावतो त्यावेळी सर्वांना मृत्यूचा अटळपणा सुचतो यालाच स्मशानवैराग्य म्हणतात. हे स्मशानवैराग्य स्मशानातून घरी जाईपर्यंत टिकते घरी पोहोचताच तो सर्व विसरतो. हीच स्थिती उत्साहाच्या बाबतीत असते त्याला तात्पुरता उत्साह भरपूर येतो. तो म्हणतो, 'व चने कि दरिद्रता।' परंतु जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते, तोपर्यंत सर्व उत्साह ओसरलेला असतो. तो टाळाटाळ करू लागतो. तो म्हणतो, 'आताच काय अडले आहे? मी नंतर कामाला लागेन,' असे म्हणून तो काम न करण्याची लाख कारणे शोधून काढतो. आजचे काम उद्यावर टाकू लागतो व वेळ काढू लागतो. दिवस संपल्यावर आपण एखादे काम सुरू केले होते, ही गोष्टसुद्धा तो विसरून जातो अशाप्रकारे कार्याचा सर्व खेळ संपतोच. म्हणून कार्य सुरू करून पुरे न करणे, कामाची नुसती बडबड करणे हा माणसाचा स्वभावच बनून गेला आहे. असा मानसिक दुबळेपणा बहुसंख्य माणसात आढळतो. म्हणूनच 'बोलतील ते करतील' अशी माणसे दुर्मिळ असतात. म्हटलेच आहे की, 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले'
बोलणे सोपे असते
एखाद्या गोष्टीवर विचार करणे व बोलणे सोपे असते. पण हाती घेतलेले काम तडीस नेणे फार अवघड असते. याचे मुख्य कारण निश्चयाचा अभाव हे असते. ज्या कामाचा विचार केला आहे, ते काम पूर्ण करायला निश्चयाची जरूर असते. नुसता मनात विचार आणून एखाद्या कामाची रूपरेखा ठरवून फक्त हवेत किल्ले बांधणे होते. ते काम साकार करायला निश्चय हवा असतो. आपल्या समाजातील बहुसंख्य माणसे अशी हवेत किल्ले बांधणारीच आहेत. बहुसंख्य माणसांना वैभवाची आशा असते. ते मनात म्हणत असतात, 'एक दिवस मी ही वैभव मिळवीनच.' काम मात्र करीत नाहीत. मग करतात काय? लॉटरी केंद्राभोवती गर्दी करतात व जवळचे असलेले थोडेसे पैसे घालवून बसतात.
मग तुम्ही म्हणाल, लॉटऱ्या बंद करून टाका. पण अचानक धनलाभाच्या मागे लागणे ही माणसाची सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. लॉटरी नव्हती तेव्हा मटका होता, अमेरिकन कॉटनचे आकडे होते आणि हे सर्व अवैध रितीने चालत असे. म्हणून लॉटरीवर बदी आणून काही साधणार नाही. माणसाच्या मूलभूत मनोरचनेत बदल हवा. ज्यांना लॉटरीच्या मागे लागायचे आहे, त्यांना लागू द्या. निदान तुम्ही तरी तुमच्यापुरता धडा घ्या. अचानक धनलाभ तुमच्या नशिबात नाही, हे सत्य प्रथम मान्य करा व लॉटरीत जवळचे पैसे घालवू नका.
-अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या वेळचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी २२ सप्टेंबर १८६२ रोजी गुलामांच्या स्वातंत्र्याची घोषणा तयार केली. त्यादिवशी त्यांनी डायरीत लिहिले, 'मी ईश्वराची शपथ घेऊन निश्चय करतो की मी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करीनच त्याप्रमाणे ती घोषणा त्यांनी अंमलात आणून दाखवली अर्थात् अशी उदाहरणे फार थोडी असतात.
मनात एकदा निश्चय केला की तो सतत मनात बाळगायला हवा. एक क्षणही त्या विचारापासून ढळता कामा नये. तरच तो मनुष्य आपले कार्य पूर्ण करू शकेल. अर्थात हाती घेतलेल्या कामावर वेळप्रसंगी मी प्राणही वेचेन, असा त्याचा निश्चय हवा. जेव्हा असा टोकाचा निश्चय माणूस पुनःपुन्हा करतो. त्यावेळी त्याला अपूर्व शक्ती प्राप्त होते. त्याचा निश्चय पक्का होतो. त्याला आत्मविश्वास मिळतो आणि काम करण्याची त्याची लायकी अनेक पटींनी वाढते. या योग्यतेच्या जोरावर तो आपले कार्य यशस्वी करतो. तोफेतून गोळा सुटतो, तो लांब जाऊन पडतो, त्या गोळ्याला स्वतःची शक्ती नसते. तोफ त्याला फेकते. त्याप्रमाणेच माणसाजवळ जी आत्मिक शक्ती असते ती त्याला आपल्या ध्येयाजवळ पोहोचवते. या शक्तीचे नाव निश्चय असे आहे.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "वैभव संपन्न होण्याचे मार्ग'" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1
07/09/2024
"This Ganesh Chaturthi, may Lord Ganesha grant you the wisdom to achieve all your dreams and the strength to overcome every challenge. Habit School Wishing you happiness and peace on this auspicious day!"
06/09/2024
लेख - १०
व्यक्तिमत्त्व विकास
विचारांची 'बंदुक'
जर माणसाने स्वतःच आपले जीवन दुर्दैवी बनवले असेल तर दुसरा माणूस त्याबाबत काय करू शकेल? जर माणूस अल्पसंतुष्ट असेल तर तो वैभवाचा अधिकारी होणार नाही समजा, तुमच्याजवळ स्वतःघ्या रक्षणासाठी बंदूक दिली आहे. तुमच्यावर शत्रू चाल करून आला आहे, अशावेळी तुम्ही जर बंदूक वापरली नाही आणि शत्रूच्या फटक्याने जखमी झाला तर यात दोष कुणाचा? तुमच्याजवळ विचारांची बंदूक आहे, ही बंदूक जर तुम्ही वापरली नाही तर तुमच्याजवळ कुबेराचा खजिना असला तरीही शत्रू तो लुटून नेईल आणि तुम्ही दरिद्रीच राहाल.
ज्या वेळेला मनात आत्मविश्वास उत्पन्न होतो, तेव्हा तो मनुष्य स्वतःला परमेश्वराचा अंश समजतो आणि वैभव मिळविण्यासाठीच माझा जन्म झाला आहे असे मानतो. अशी भावना उत्पन्न हे झाल्यास जादू होते आणि खरोखरच त्याला हवे ते सर्व काही मिळते. म्हणूनच मनातून शंका, भीती काळजी या भावनांची हकलपट्टी करा. वैभव मिळवण्याचा मला अधिकार आहेच असे समजून अथक प्रयत्न सुरू करा सर्व काही मिळेल. जोपर्यंत ही गोष्ट तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. जर दुसरा एखादा माणूस वैभव मिळवू शकतो, तर तुम्हीसुद्धा वैभव हस्तगत कुरू शकाल. तुम्ही तुमची लायकी कमी का समजता? वैभव मिळवण्यांसाठी तुमच्याजवळ परमेश्वराने सर्व काही दिले आहे. जरूर आहे ती कार्याची.
लक्ष्मीची खरी उपासना
जो माणूस विचारपूर्वक आणि संपूर्ण आत्मविश्वासाने वैभव मिळवण्यासाठी एकाग्र वित्त करतो त्याच्या घरी लक्ष्मी निवास करायला पळत येतेच. आपण भारतीय धनाला लक्ष्मी समजून तिची पूजा करतो व लक्ष्मी माहात्म्यासारख्या पोथ्यांची पारायणे करीत बसतो. अशा पूजा व पारायणाने काही होत नाही कठोर मेहनत आणि योग्य विचार व कार्य हीच लक्ष्मीची खरी पूजा आहे.
या जगाचे एक सोपे तत्त्व आहे. 'जे पेराल ते उगवेल' जात्यात जेवढे धान्य चालाल तेवढेच पीठ मिळेल. त्यापेक्षा जास्त पीठ मिळणार नाही. हे तत्त्व कोणालाही समजण्यासारखे आहे. तुम्ही जितकी मेहनत कराल त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळेल हे तत्त्व निसर्गाचे तत्त्व आहे. ते बदलता येणार नाही. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे. म्हणून 'पेराल ते उगवेल' हे तत्त्व माणसालाही लागू आहे. निसर्गाने माणसासमोर सर्व खजिना पसरून ठेवला आहे. यातला किती उचलायचा व कसा उचलायचा हे तुमच्या सामर्थ्यांवर अवलंबून आहे. तुम्ही तुमचे मन मोठे करा. प्रयत्नांना कोणतीच सीमा ठेवू नका. तुमच्या कार्यालाच परमेश्वर माना, तुमच्या मनात वैभव मिळवण्याचा विचार सतत राहू दे. तुम्हाला वैभव मिळेलच.
एखाद्या कार्याच्या पूर्ततेसाठी मजजवळ द्रव्य नाही म्हणून ते कार्य होत नाही, असे मानू नका अशा विचारामुळे तुम्ही दुबळे होत असता. अशा विचारात गुंतल्यामुळेच बहुसंख्य लोकांची प्रगती होत नाही सर्वसाधारणपणे लोक म्हणतात की, 'मला कुठूनतरी (बहुधा लॉटरीतून) द्रव्यप्राप्ती झाली म्हणजे मी कामाला लागेन.' या विचाराने हजारो माणसे लॉटरीची तिकीटे घेत राहतात आणि लॉटरी लागण्याची वाट बघत बसतात. (वैभव मिळते ते तिकिटे विकणाऱ्याला, लॉटरी चालवणाऱ्याला) लॉटरी लागत नाही आणि कामाला सुरवात होत नाही. आयुष्याची वर्षेच्या वर्षे अशी निघून जातात. एक व्यापारी म्हणतो, 'पैसे घालून व्यापार सुरू केला हा काय व्यापार झाला? बँकेत पैसे ठेवूनही व्याज मिळतेच की. समजा व्यापारात बुडाला, त्याचे दिवाळे निघाले तर तो पार बुडतोच. म्हणून अशा तऱ्हेने व्यापारात पैसे घालणे चुकीचे आहे.' प्रत्येक यशस्वी व्यापाऱ्याचे उदाहरण पहा. जवळ द्रव्य नसताना त्याने व्यवसाय सुरू केला होता आणि त्यातूनच वैभव मिळवले होते, असे आढळेल.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "वैभव संपन्न होण्याचे मार्ग'" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1
04/09/2024
लेख - ०९
व्यक्तिमत्त्व विकास
क्रोधावर विजय मिळवा
काही व्यक्तीत असे काही दोष असतात, की ते त्यांना स्वतःला समजतच नाहीत माणसामध्ये एक प्रकारची घाई असते. या घाईमुळेच त्याचे नुकसान होते. माणूस महत्वाचा निर्णय घाईगर्दीने घेतो आणि त्यामुळे तो स्वतःच आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतो या घाईमुळेच पूर्ण होत आलेले कामही बिघडून जाते म्हणून उगीचच्या उगीच घाई न करता शांतपणे निर्णय घ्या एकांतात बसून तुमच्या समोरील प्रश्नांचा सर्व बाजूने विचार करा, म्हणजेच तुमचे निर्णय योग्य ठरतील
काही लोक विनाकारण क्रोधाच्या आहारी जांतात. क्रोध हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अनेक गुन्हे क्रोधाच्या भरात होतात. अनेक लोकांची मोठी योग्यता असली, तरीही क्रोधामुळे त्यांचे जीवन दुःखमय होते. अशा लोकांचा क्रोध एका ठिकाणी टिकत नाही. असे लोक आपल्या मित्रांनाही शत्रू बनवतात. क्रोधाच्या भरात स्वतः चे नुकसानही करून घेतात व्यापारी व्यवहारात आणि समाजात वावरतांना तुमचे रागलोभ बाजूलाच ठेवले पाहिजेत. क्रोधाच्या आहारी गेल्यास यशाचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होण्याचा संभव असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत क्रोधावर काबू ठेवायलाच हवा. ज्या माणसामुळे किंवा ज्या परिस्थितीमुळे राग आला असेल, त्या माणसापासून किंवा त्या परिस्थितीतून दूर निघून जा आणि तुमचा क्रोध शांत करा. क्रोध ज्यालामुखी किंया भूकंपासारखा असतो. क्रोधाच्या सपाट्यात जे सापडेल ते नष्ट होते. तुम्ही एका गोष्टीबद्दल रागावाल व त्याबरोबर पन्नास जुन्या गोष्टी उकरून काढाल आणि तुमच्या रागाच्या मुंग्या मेरूपर्वत गिळून टाकतील. सर्व काम बिघडेल क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. क्रोध फार मोठा नाश करणारा असतो. तुम्ही जर क्रोधाच्या आहारी जाल तर तुमची लायकी असूनही आणि कठोर मेहनत घेऊनही तुम्हाला काही मिळणार नाही.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधी रागावूच नये. तुमच्या क्रोधाला निश्चित अशी मर्यादा असली पाहिजे. शिवाय कारण नसताना रागावताच कामा नये. आणि रागाला कारण जी घटना झाली असेल, तेवढ्यापुरताच तुमचा राग मर्यादित ठेवा. क्रोध एखादा बॉम्बप्रमाणे एकाएकी फुटता कामा नये. क्रोधाला मर्यादितच ठेवा. क्रोध तुमचे सामर्थ्य क्षीण करतोच. रागावल्यानंतर माणसाला पश्चाताप होतो आपण उगीच रागावलो असे नंतर वाटते. म्हणून राग आणणाऱ्या परिस्थितीतून दूर निघून जा.
बहुसंख्य माणसामध्ये अनेक प्रकारचे स्वभावदोष असतात. हे स्वभावदोष माणसाच्या प्रगतीला बाधक ठरतात. माणसाचे जे स्वभावदोष असतात तेच त्याच्या प्रगतीच्या मार्गात काटे बनतात. स्वभावदोषाचा काटा बोचला तर प्रगतीच्या मार्गावर तुमचे एक पाऊलही पुढे पडत नाही. स्वभावदोषामुळे कितीतरी यशस्वी माणसांचेही जीवन दुःखी झाले आहे. स्वभावदोष हा नुकसानकारकच ठरतो. स्वभावदोष हा जन्मजात असल्यामुळे त्यातून सुटणे सोपे नाही. स्वभावदोष माणसाला लवकर समजतही नाहीत यासाठीच आत्मपरीक्षण करण्याची जरूर असते. तुम्हाला स्वतःचे स्वभावदोष समजले तरच, तुम्ही त्यावर विजय मिळवाल. आपल्या कोणत्या दोषामुळे आपले सामर्थ्य कमी होते याचा ते सतत विचार करा. ज्या कारणामुळे तुमचा उत्साह कमी होतो, ज्या कारणामुळे मन स्वस्थ राहात नाही, त्या कारणांचा विचार करा, ज्यामुळे दुबळेपणा येतो. कार्यहानी होते, मन ताब्यात राहात नाही, ती कारणे समजून घ्या आणि ती कारणे दूर करण्याचा निश्चय करा अनेक लोकांची प्रगती तुमच्यापेक्षा जास्त झाली असेल त्यांचा मत्सर न करता ते पुढे का गेले व आपण मागे का राहिलो याचा विचार करा आणि आपला दुबळेपणा झटकून टाकण्याचा निश्चय करा.
या निश्चयाचे दररोज स्मरण ठेवा आपले स्वभावदोष उफाळून येऊ नयेत म्हणून तुमच्या भोवतालचे वातावरणच बदला. असे केल्यास तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. तुमच्या हातून चुकीचे व वाईट कृत्य होणार नाही. सतत आत्मपरीक्षण करा व तुमच्या ध्येयाची प्रतीक्षा जागृत ठेवा. तुमच्यामध्ये जे स्वभावदोष असतील ते विचारपूर्वक दूर केलेच पाहिजेत. तुमच्या मनातील शंकाकुशंका दूर करा. अशाप्रकारे जे जे लोक स्वतःचे मूल्यमापन करू शकतात, त्यांना यश मिळतेच. तुम्ही स्वतःशीच संवाद करा. तुम्हाला हे कदाचित चमत्कारिक वाटेल पण स्वतःशी बोलल्यासच तुमचे स्वभावदोष तुम्हाला समजतील.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "वैभव संपन्न होण्याचे मार्ग'" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1