14/12/2022
सातारा रोड एके काळची भव्य भरभराटीस आलेली उद्योगनगरी आज अवकळा ग्रस्त..
स्वातंत्र्याच्या आधी ज्यां काही ग्रामीण भागानी विकासाची मधुर फळे चाखली त्यात सातारा जिल्ह्यातील सातारां शहरापासून 15 किमी दूर पाडळी हे गाव होय ,त्याच्या अगदी बाजूला सातारा रोड ही उद्योग नगरी शेठ वालचंद उद्योग समूहाने उद्योगातून जनकल्याण आणि तीच राष्ट्रसेवा असे ब्रीद स्वीकारून स्थापन केली आणि भरभराटीस आणली . स्वातंत्र्यपूर्वकालीन सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यात किर्लोस्कर, ओगले यांच्याप्रमाणे धनजीशा कूपर यांचेही योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी १९२२ साली सातारा रोड स्टेशनजवळ पाडळी येथे आपला ‘कूपर इंजिनिअरिंग वर्क्स’ हा कारखाना सुरू केला. त्या कारखान्यात प्रारंभी लोखंडी नांगर, ऊसाचे चरक, शेंगा फोडण्याचे यंत्र, मोटेचे चाक, तेलाचे घाणे इ. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांची निर्मिती होत होती. त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. धनजीशांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची ओढ होती. त्यांनी मोटारीचे नवीन इंजिन बनवून १९२६ साली महाबळेश्वर येथे मुंबईच्या गव्हर्नरला त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. १९३० च्या सुमारास हिंदुस्थानातील उद्योगक्षेत्रावर मंदीचे सावट पडू लागले. त्यावर मात करण्यासाठी डिझेल इंजिनची निर्मिती करण्याचा धनजीशांनी निर्धार केला. त्याप्रमाणे १९३३ पासून कूपर कारखान्यात डिझेल इंजिनची निर्मिती होऊ लागली. या कूपर यांना वालचंद ग्रुपने वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे.
सातारा रोड येथील अतिशय भरभराटीला आलेली उद्योग नगरी खरे तर आता.स्थानिक राजकारण कामगार चळवळीच्या अवास्तव मागण्या , काळाचा ओघ आणि औद्योगिक घराण्यांची उतरती कळा ,बदलते स्थानिक राजकारण हे सर्व जबाबदार आहे. एकेकाळी तीन चार हजार कामगार असलेला कारखाना आता अवघे उनेपुरे पाचशे कामगार ही नाहीत.
या उद्योग नगरीच्या भरभरभरात आणि उतरती कळा यावर अगदी मोठी कादंबरी होईल. साताऱ्यात अशी काय भौ गोलिक परिस्थिती होती की. कूपर यांनी खेडेगाव निवडले असावे .(पश्चिमेला जरंडेश्वर आणि पूर्वेला पारसगड याच्या मध्ये हे सातारारोड वसले आहे , सद्या सातारारोड ल रेल्वे स्टेशन नाही.) बहुधा गांधी यांच्या खेड्याकडे चला या घोषणेनंतर च असावा तर असो.
कूपर यांचा इतिहास ही अगदी समजून घेण्यासारखा आहे धनशा कूपर हे राजकारणात ही नंतर सक्रिय होते. ते व डॉ.आंबेडकर हे 1937 साली मुंबई विधी मंडळात कार्य करत होते. कूपर यांचा प्रं बोधनकर ठाकरे यांच्याशी सुध्दा चांगला स्नेह होता, हे सारे ब्राह्मणेतर गटाचे कार्यकर्ते होते हे आणखी विशेष ..
जाता जाता वाचकांच्या माहितीसाठी म्हणून वालचंद घराणे मूळचे सौराष्ट्र चे जैन दिगंबर पंथीय महाराष्ट्रात आले , आणि कूपर हे पारशी होते . या दोन्ही मोठ्या मनाच्या देशी उद्योजकांचा साताऱ्याच्या राजे घराण्याशी स्नेह होता. असो.
सातारची एक काळ अत्यंत भरभराटीस आलेली ही सातारारोड आता मात्र तसे राहिले नाही आणि मला वाटत नाही की त्याला कुणा मोठ्या भांडवलदारांच्या आर्थिक मदत किंवा ताब्यात गेल्याशिवाय पुनरुज्जीवन होणार नाही.
(आम्ही त्या भागात दि 13 डिसेंबर 22 ला भेट दिली ..)