GMV School Khokar .

GMV School Khokar .

Share

The one place that no 1 want to leave, whose study inside in this school .now we on Facebook .

27/10/2017

*आय_ए_एस_तुकाराम_मुंडे सर यांनी एका कार्यक्रमात मांडलेले मत* #स्वतःला_पुढे_जायचे_असेल_तर...!
स्वतःआई-वडीलांपासून दूर व्हा....!
किव्हा
पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः #पाल्यांना_दूर_करा...!

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.

त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'
हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.
शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!

त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"

तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!

मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...
🏵 ▬▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬▬ 🏵
पोस्ट शेअर करायला विसरु नका कारण आपल्या प्रिय
व्यक्ती सुधारण्यास वैचारिक हातभार मिळेल.
#धन्यवाद..!
🌱🏵🌱🏵🌱🏵🌱🏵🌱🏵🌱🏵🌱🏵🌱🏵🌱

केनफ़ोलिओज़ - KenFolios Hindi 19/07/2017

महज़ 21 वर्ष की उम्र में इस लड़के ने खुद की कंपनी खोल दुनिया भर के 50 फॉर्च्यून और 500 से ज्यादा कंपनियों को अपना क्लाइंट बना सालाना करोड़ों रूपये की कमाई कर रहा है
8वीं फेल होने के बाद शौक को ही बनाया कैरियर, आज सीबीआई से लेकर रिलायंस तक चलती है इनके इशारे पर
hindi.kenfolios.com

केनफ़ोलिओज़ - KenFolios Hindi केनफ़ोलिओज़ का हिंदी संस्करण

इस नए साल को अपनी जिंदगी का श्रेष्ठ साल कैसे बनाया जाये? 31/12/2016

इस नए साल को अपनी जिंदगी का श्रेष्ठ साल कैसे बनाया जाये? | How to Make this New Year Best
जिंदगी की किताब में एक और पेज जुड़ गया जी हाँ दोस्तों 2016 जा रहा है कुछ यादें, सीख,और अनुभव देकर ।
यह साल कुछ ऐसे लम्हें देकर जा रहा है जो हमेशा याद रहेंगे कुछ उपलब्धियां, सफलताएँ, असफलताएं, खट्टे – मीठे अनेक रूप है इन लम्हों के । क्या सोच रहे है आप भी याद करने लगे अपने बीते हुए साल को ।
यह तो तय है की यह साल हम सब की जिंदगी को नए अनुभव देकर जा रहा है फर्क सिर्फ इतना है की हमारा नजरिया कैसा है इन सब अनुभवों को देखने का, यह नजरिया ही तय करेगा की आने वाला साल कैसा होगा क्योंकि यह सिर्फ आप तय कर सकते है की आने वाले साल को बाकी बीते हुए सालों की तरह जीया जाये या फिर ऐसे की पूरी जिंदगी इसी में समा जाये ।
आप क्या चाहते है? मुझे पूरा विश्वास है आप दूसरे वाला विकल्प चुनेंगे तो फिर तैयार हो जाये कुछ छोटी - छोटी मगर जरूरी बातें करने के लिए क्योंकि जिंदगी खूबसूरत बनती है छोटी - छोटी बातों से ।
http://www.aasaanhai.net/best-new-year-2017/

इस नए साल को अपनी जिंदगी का श्रेष्ठ साल कैसे बनाया जाये? How to Make this 2017 New Year Best in Our Life and Get Achieve Huge Success? जियो कुछ इस तरह से इस साल को की हर दिन मिसाल बन जाये जिंदादिली का

11/12/2016

Forwarded post


उच्च वर्णीयांची मुले कधीही सकाळ संध्याकाळ नामस्मरण करीत नाहीत
मनाचे श्लोक पाठ करत नाहीत
अभंग तर कधीच पाठ करत नाहीत.
पारायणे करत बसत नाहीत.
पंढरीची वारी करत नाहीत
लक्ष्मण शक्ती त पोतडे घालून फिरत नाहीत.
देवीची मशाल घेवून रस्त्याने धावत नाहीत.
गणपती बसवत नाहीत. बसविलाच तर एक दीवसांचा !
सत्यनारायण पुजा घरी कधी करत नाही.
दुर्गा माता बसवत नाहीत.
कोणत्याही मिरवणूकीत नाचत नाहीत.
नारायण नागबळी त्रिपिंडी अभिषेक
शांती घालत नाहीत.
ते फक्त एकच करतात
अहोरात्र अभ्यास करतात व नौकरी कशी मिळवता येईल एवढेच पहातात.
त्यांना माहीत आहे स्पर्धा परिक्षेत अभंग विचारत नाहीत मनाचे श्लोक विचारत नाहीत.
तिथे विचारतात फक्त
जनरल नाॅलेज, विज्ञान, संगणक.
म्हणून ते सर्व क्षेत्रात आहेत.
ते परदेशात आहेत.
ते सनदी अधिकारी आहेत.
ते न्यायालयात आहेत.
आम्ही मात्र देवदेवात व कर्मकांडाते भटकत आहे.
टर्नर फिटर पेन्टर क्लिनर हमाल ड्रायव्हर वेल्डर शिपाई, शेळया मेंढ्या आपल्या कडे आहे
काहीच नाही जमले तर दिंडीत नक्कीच आहे.
शेतीत आहे शेती परवडत नाही.
गाडीवर आहे गाडी परवडत नाही.
आरक्षण नाही नौकरी नाही.
नौकरी नाही तर छोकरी नाही.
अलख निरंजन व्हायची वेळ आली.
जमीन एकरा दोन एकरावर आली
माळवद दोन खण वाट्याला आलं
गावात घर नाही दारात रोजगार नाही.
तरी हरीनाम सप्ताह घालायला जोर काही कमी नाही...........!
पण आता...
शिक्षण व आरक्षण हाच एक मार्ग उरला आहे उन्नतीचा.
देव देव करण्यापेक्षा देवघेव (व्यवसाय ) करा.
सत्यशोधक बना.
*जया नाही शिक्षण त्याचे होईल भक्षण*

13/09/2016

अंधारात कसा चढणार डोंगर?’
तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....
इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.
'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.
शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''
म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''
''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''
म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं?
जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

24/07/2016

रजनीकांत माणूस म्हणून कसा आहे हे सांगणारी, ही कदाचित खरी, कदाचित जास्त रंगवलेली गोष्ट..
काही वर्षांपूर्वी म्हैसूरला शूटिंग करत होतो. आमचा प्रोडक्शन मॅनेजर CVK SHASTRI नावाचा होता. त्याने काही रजनीचे चित्रपट केले होते. त्याने सांगितलेली ही गोष्ट.. रजनी जेव्हा बस कंडक्टर म्हणून काम करायचा त्यावेळी त्याच्या चित्रपटाच्या नादापायी अनेक वेळा त्याला ड्युटीवर जायला उशीर व्हायचा, दांड्या पडायच्या.. पण त्याचा जो साहेब होता तो या सगळ्याकडे जमेल तितक दुर्लक्ष्य करून रजनीला सांभाळून घ्यायचा.. पुढे जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा त्याने रजनीला सांगितलं की "बाबा तू आता नोकरी सोड, नाहीतर माझी नोकरी जाईल!" रजनीने पण समजून नोकरी सोडली.. काही वर्षानंतर तो आज जे आहे ते म्हणजे सुपरस्टार झाला.. नंतर बऱ्याच वर्षांनी एकदा त्या साहेबाच्या गावात तो शूटिंग साठी गेला असताना त्याला पूर्वीची आठवण आली आणि रात्री शूटिंग संपल्यावर, तो पत्ता शोधून साहेबाला भेटायला गेला.
साहेब बिचारा कानकोंडला झाला.. हा मोठा सुपर स्टार झालेला.. पण पूर्वी इतक्याच साधेपणाने, आदराने बोलत होता.. साहेबाच्या मुलीचं लग्न ठरत होतं. हे समजल्यावर रजनीने त्याला 'काय वाट्टेल ती मदत सांगा' असे सांगितले. साहेब म्हणाला 'मला तुझी काय मदत लागणार? आम्ही साधी माणसं बाबा, तू एव्हडा मोठा माणूस.. तू ओळख ठेवलीस हेच खूप आहे आमच्या साठी!'.. तिथून परत येताना रजनीने प्रॉडक्शनच्या माणसाला मुलीच्या मुलाकडचे लोक बघायला येण्याची तारीख विचारून घेतली..
ठरलेल्या दिवशी मुलाकडचे सगळे साहेबाच्या घरी मुलगी बघायला आले.. कार्यक्रमाला सुरवात झाली आणि स्वयंपाक घरातून स्वतः रजनीने पाहुण्यांसाठी चहाचा ट्रे घेऊन एंट्री घेतली .. समोरचे फक्त बेशुद्ध पडायचे बाकी राहिले होते.. दक्षिणेत अजूनही बऱ्याच परंपरा, खर्चिक लग्न, हुंडा हे चालतं.. एका क्षणात हे सगळं टाळून मुलीचं लग्न जमलं.. रजनीने जाताना मुलीच्या हातात ५ लाख रुपयांचा चेक दिला आणि मुला कडच्यांना सांगितलं की "काहीही लागलं तरी हिच्या वडिलांच्या आधी मला कळवायचं.." रजनीचे किती तरी असे किस्से त्याने सांगितले.. हे जर खरे असतील तर ह्या स्टारला माणूस म्हणून साष्टांग नमस्कार घालावा !!!

10/07/2016

उंडगाळ पोरगं ते यु पी एस सी परीक्षेत सुधीर शंकर जाधव महाराष्ट्रात नववा......थक्क करणारा प्रवास 👌 नक्की वाचा..
शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं.

शंकरने गावी फोन केला. "मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. सगळा पसारा बांधलाय. तिथं पोहोचल्यावर फोन करतो. सुधीर कुठं आहे? अभ्यास कसा आहे? सुजाता कुठं आहे? तिचा अभ्यास कसा आहे? ऊस कसा आहे? अाण्णा शेताकडे जातात का? त्यांची तब्बेत कशी आहे? आई आता चालतीय का? म्हादू ट्रॅक्टर वर जातोय का?

शंकर मिलिट्रीत भरती होऊन 15 वर्ष झालेली. आता चार पाच वर्षात रिटायरमेंट. नंतर गावाकडं कायमचं जायाचं. वर्षात दोन दोन बदल्या. प्रमोशने. कुठंच स्थिर नाही. म्हणून शंकरने बायका पोरं गावाकडं ठेवलेली. शेताकडे लक्ष राहतयं. पोरांना दूध दुभतं मिळतंय. चांगलं शिक्षण मिळतंय.

सुधीर यंदा 12 वीत होता. सुजाता 10 वीत. त्यांची परीक्षा जवळ आलेली. मालन त्यांना काही कमी पडू देत नव्हती. सुधीर कधीतरी हट्ट करायचा. मालन तो पूर्ण करायची. शंकर मालनला म्हणायचा, "दोन पोरं हीच आपली प्रॉप्रर्टी. दोन पोरं हीच आपली जायदाद. म्हातारपणाची काठी. रिटायर होऊन मी गावाकडं आलो कि निवांत राहणार. माझा वाघ तोपर्यंत नोकरीला लागल. त्यानं कलेक्टर व्हावं हे आपलं स्वप्न तो पूर करणारच. तो नोकरीला लागला कि आपल्या दोघांना एकच काम. चांगली सून आणि चांगला जावाय बघायचा".

मालन हसायची. म्हणायची, "तुमाला स्वप्नं बघायची लई सवय. पण असं झालंच नाही तर" ?? शंकर म्हणायचा, "अशुभ बोलू नकोस. आपण आपल्या पोरांसाठी केलेलं कष्ट वाया नाही जाणार. ती आपल्याच रक्तामांसाची आहेत."

तुला आठवतय? सुधीर तिसरीत होता. तुम्ही सगळी सुट्टीला एर्नाकुलमला आला. आठ दिवसांनी तुम्हाला परत पाठवलं. गावी आल्यावर त्याला कावीळ झाली. मी रजा टाकून आलो. डॉ. वडवेकरांच्यात अँडमिट केेलं. डॉक्टर म्हणाले, "कावीळ मेंदूपर्यत गेली तर अवघड आहे. मी प्रयत्न करतोय. परंतू......
मी हबकलोच. पण तरी डॉक्टरना सांगितलं, "कितीही पैसा लागू दे. नोकरीचा सगळा पैसा खर्चीन. माझ्या वाट्याची सगळी जमीन विकीन. पण माझ्या पोराला वाचावा". मालु.. तुला कधी बोललो नाही. पण त्या आठ दिवसात मी रात्रभर जागा असायचो. पोराच्या काळजीनं राञी उशी ओलि व्हायची...आणि तू म्हणतेस तस घडलंच नाही तर ?

गावी आलं कि शंकर दोन्ही पोरांना घेऊन शेतात जायचा. जाताना सुधीरला ट्रॅक्टर चालवायला द्यायचा. कधी पंढरपूर तर कधी म्हाळसोबाला जायचा. कधी पिक्चरला न्यायचा.

रजा संपली कि शंकरला भरून यायचं. बायका पोरं सोडून जायाला नको वाटायचं. सुधीरला म्हणायचा, तू शिकून कोण होणार? तो म्हणायचा, कलेक्टर. शंकरची छाती फुगायची. सुधीरला जवळ घेवून म्हणायचा, अभ्यास कर. खूप मोठा हो. आमचं नाव काढ. मी आणि तुझ्या मायनं उभा केलेल्या जायदादीचा तूच मालक होणार आहेस. तुझ्या आणि सुजाताच्या शिक्षणासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. कायबी कमी पडू देणार नाही. सुजाताच्या पाठीवर, तोंडावर हात फिरवायचा. सुधीरला मीठीत घेऊन डोकं कुरवाळायचा. काळजावर दगड ठेवून सगळ्यांचा निरोप घ्यायचा..

सुधीरची 12 वीची परीक्षा सुरु झाली. शंकर सकाळ संध्याकाळ फोन करायचा. पेपर कसा गेला? सगळा लिहिला का? वाचलेलं सगळं आलतं का? जीवाला एकच घोर, सुधीरला चांगले मार्क्स पडायला पाहिजेत.

बुधवारी सुधीरचा शेवटचा पेपर होता. दुपारी 2 वाजता पेपर सुटला. 3 वाजले तरी सुधीर घरी घरी आला नव्हता. मालन वाट बघत होती....आणि अचानक त्याच्या मित्राचा फोन आला. तुमच्या सुधीरला पोरांनी मारलय. लवकर या. शिवाजी चौकात तो पडलाय. मालनला धस्स झालं. ताबडतोब त्या उठल्या. शिवाजी चौकात गेल्या. सुधीर खाली पडलेला. कापडं फाटलेली. सायकल गटारात पडलेली. दफ़्तर विस्कटलेलं. मालननं त्याला उठवलं. बरीच माणसं जमलेली. वह्या, पुस्तकं, सायकल सगळं घेऊन मालनने गर्दीतून वाट काढली.

घरी आल्यावर मालनने शंकरला फोन केला. सुधीर सायकलवरनं पडलाय. लवकर या. दुसऱ्या दिवशी शंकर रजा टाकून आला. विचारपूस करायला लागला. एवढ्यात दोन पोलीस आले. सुधीरला स्टेशनात घेऊन गेले. पाठोपाठ शंकर आणि मालनही गेले.

पोलिस स्टेशनात 10-12 पोरं. त्यांची चौकशी चाललेली. दोन तासांनी पोलिसांनी शंकरला आत बोलावलं. हा मुलींच्या भानगडीतला सारा प्रकार आहे. यावेळी त्याला सोडतोय.
तुमचं लक्ष नाही पोरावर. पुन्हा सापडला तर गुन्हा नोंद होईल. करियर बरबाद झाले तर कोण जबाबदार?

शंकर सुधीरला घेऊन घरी आला. काळीज फाटलेलं. स्वप्नांचा चुराडा झालेला. ज्याच्या जीवावर म्हातारपण घालवायच ते उंडगाळ निघालं. त्याला उंडगा नाद लागला. वाटलं होतं नाव काढल. 12 वीला जिल्ह्यात पहिलां येईल. पुढं मागं कलेक्टर होईल. लाल दिव्याची गाडी. मागं पुढं शिपाई. भोंग्याच्या गाड्या. गावात घरापुढं गाड्या लागतील. आमची जिंदगी सार्थकी होईल. ऊन म्हणलं न्हाई, तहान म्हणली न्हाई. राबतच राहिलो. मालन शेतावर आणि मी सीमेवर.

सुधीर 6 वीत होता. बाटुक काढताना मालनच्या पायात सड घुसला. रक्तबंबाळ पाय घेऊन दिवसभर राबत होती. का तर सुधीरच्या शाळेचा खर्च. 12 वी नंतर पुण्याला यू पी एस सी ला पाठवायचा. जरूर तर मुंबईला. पण कलेक्टर करायचा...आणि ....पोरगं पोरींच्या मागं लागलेलं..शंकरचं मस्तकच उठलं. जीवनात राम उरला नाही. स्वप्नांचा कोळसा झाला. आता राबण्यात काय अर्थं आहे?? झिजायचं तरी कशाला? शंकर काहीच बोलला नाही. बरोबरीला आलेलं पोरगं. मारून तर काय उपयोग? रात्री झोप लागली नाही. दोन मोठे पेग मारले. फॅनकडे बघत तसाच पडून राहीला.

दुसऱ्या दिवशी पोराला घेऊन शंकर शेतात गेला. पोरगं घाबरून गेलेलं. आता मार खावा लागणार. मिलटरीतला बाप. हतोड्यासारखा हात. शाळापण बंद होणार. नुसत्या विचारानं थरथर कापायला लागलं.

नारळी आंब्याखाली दोघेजण बसली. अर्धा तास शंकर काहीच बोलला नाही. नंतर त्याने मुलाला जवळ घेतलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाला, या वयात अशा चूका होतात. पण तू करशील असं वाटलं नव्हतं. तू तर कलेक्टर व्हायचं ठरवलयस. लाईन मारत मारत कोण कलेक्टर झालेलं ऐकीवात नाही,,पोरा...या वयातलं प्रेम झूठ असतं. वासनेचा खेळ असतो सारा.. भादव्यात एका कुत्रीमागं 10-12 कुत्री लागतात. कळवंड करतात. त्यात काही मरतात. काय फरक त्यांच्यात आणि आपल्यात? मरायचं तर देशासाठी मर. मार खायचा तर आई बापाच्या नावासाठी खा. अभ्यासासाठी जेवण कमी केलस. खेळ बंद केलास. मित्रांकडे जाणं बंद केलस. पिक्चर बंद केलास. तसा ह्यो नादपन 5-7 वर्ष बंद केलास तर खूप मोठा होशील. तू फक्त ठरवलं पाहिजेस. एकदा ठरवलं कि डोक्यात तोच विषय राहतो.. शेवटी तो नाद हा दोन मांड्यांच्या मध्ये नसतो तर डोक्यातच असतो.
18 ते 25 वयातल्या वासनेला सिनेमावल्यानी प्रेम म्हणलं. प्रेम ब्रिम खोटं सारं... हे वय सोडून राहिलेल्या आयुष्यात प्रेम असतं कि नसतं? दोन्हीत फरक काय? आंधळ करतं ते प्रेम नसतं. आंधळं करतं ती वासना असते. ज्यांना आई बाप नाहीत, ज्यांना कुणी बघणारं नाही. त्यांनी साथीदार स्वतः शोधणं ठीक आहे. पण तुझ्यासारख्यानं...आम्ही कुठं गेलोय काय? आम्हाला तुझ्या साथीदाराबद्दल कळणार नाही का? करिअर केलस तर पोरी मागं लागतील. नाहीतर तुलाच मागं लागावं लागेल. तू ठरव काय करायचं ते. नंतर शंकर काहीच बोलला नाही. अबोला धरून दोघेही घरी आले.

12 वीचा निकाल लागला. सुधीरला 64% मार्क्स पडले. त्याने शंकरला फोन केला. निकाल लागला. पुण्याला जाऊ का ? शंकर कोरडेपणानं म्हणाला "बघ तुझ्या बेतानं......."

मालनला वाटायचं सुधीरने इथच कुठंतरी अँडमिशन घ्यावं. अभ्यास करावा. पण त्याची इच्छा पुण्याला जायची होती. सुधीर पुण्याला गेला.

पोराला पुण्याला जाऊन 2 वर्ष झाली. शंकरने स्वेछानिवृती घ्यायचं ठरवलं. नोकरीत मन रमत नव्हतं. घराकडं जायला पण पूर्वीसारखं भरून येत नव्हतं. वाटायचं मालुला घेऊन दूर कुठतरी जावावं.

शंकर कायमचा गावी आला. शेतातील कामे करू लागला. कधीतरी पोराचा फोन यायचा. फी भरायची आहे . पैसे पाठवा. बाकी काही विचारपूस नाही. शंकर जास्तच उदास व्हायचा.

बुधवारी उसाची लागण करायची होती. शंकर शेतात सार्टी सोडत होता. ट्रँक्टरमागं गडी तन वेचित होता.... आणि लांबून सुजाता येताना दिसली..धापा टाकत...पळत...शंकरच्या काळजाचं पाणी झालं. मालनला काही झालं का काय? शंकरने ट्रँक्टर बंद केला. खाली उतरला. तोवर सुजी जवळ आलेली. तिला बोलता येत नव्हतं. घामाघुम झालेली. धाप लागलेली.

शंकरने विचारलं, काय झालं? सुजाताने हातातली पिशवी शंकरपुढं टाकली आणि गप्पकन खाली बसली...शंकरने पिशवी बघितली...त्यात पेपर होता...पेपरात पहिल्या पानावर ठळक बातमी होती...यु पी एस सी परीक्षेत सुधीर शंकर जाधव महाराष्ट्रात नववा...... शंकरनं पेपरासहित पोरगिला गच्चं मिठीत घेतलं. वादळात मोठं झाड हालावं तसा तो गदगदायला लागला. आनंदाला पारा उरला नाही. शंकरच्या दोन्ही डोळ्यातल्या पाण्यानं पोरगीचं डोकं ओलचिम्ब झालं.....!!!!!...........................🌹विचार कराच🌹.....................................मुलांचे आयुष्य घडवायचे असेल तर अशा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपल्या मुलांना सांगा. कारण आपण शिक्षक आहोत सैराट सारखी उदाहरणे देऊन मुलांची आयुष्य उध्वस्त करू नका....आयुष्यात काही तरी चांगले नाव कमवा ,आई वडिलांना आनंद दया...

27/06/2016

.
.एक काळा ठिपका.

कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले की., "आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे."
असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले, "आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत."

मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्याचे लिहून झाल्यावर प्राध्यापकाने पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तर पत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौगोलिक रित्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा
वगैरे वगैरे !!!
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले, "दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेला आहात."
सर्वजण दचकले. मग प्राध्यापक सांगू लागले.
"सर्वानी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वाचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्या भोवती खूप मोठा "पांढरा" पेपर आहे हे मात्र कुणीच लिहिले नाही आणि आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्या कडे पाहतो. जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात. आपण त्यावर फोकस करतो आणि "खूप मोठा पांढरा" पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो. खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लीक्षित राहतो. म्हणून यापुढे एक लक्षात ठेवा. काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका !! खूप समाधानी व्हाल"

हे ऐकून सगळा वर्ग पिन ड्रॉप सायलेन्स मोड वर जातो !!

नका पाहू काळा ठिपका, जीवन आहे झक्कास,
नवीन काहीतरी देत जाईन, जीवनाचा हा कँनव्हॉस !
🙏🙏

21/06/2016

विश्वास नांगरे पाटील म्हणतात,

परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , *"मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ."*
चहा कडवट लागला . नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई *कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे .* काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
सैराट करमणूक म्हणून पहा पण *आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .*
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .

केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत
1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.

आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!

15/04/2016

नाना पाटेकर: दोन गुरू (अपमान आणि भूक)
वयाच्या तेराव्या वर्षी,1963 ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं.रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती.
कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई- वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो
वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी. नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही. भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा
जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई- वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता. मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की
संशय येतो. अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे. माझी सगळयात गोड मैत्रीण भूक काय नाही दिलं या मैत्रिणीनं? त्या वयातला तो अप्रतिम प्रवास. पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं! सारी शिकवण पोटातून. माझ्या पौडांगवस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात. खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती. गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव
उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले. डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं
लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती. माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला
गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव. हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा. त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही. खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं. रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम. मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम. या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क. माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला. (भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ- संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले. ‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च
शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्याला सुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली. प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला. अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला. उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं. उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान. आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय. ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर. आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय. अजून पुढचा तीर असेल कदाचित. आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.
....- नाना पाटेकर...

10/02/2016

सियाचीन… जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी. बर्फाळ पर्वतरांगा, ऑक्सिजनची कमतरता, गोठवणारं तापमान आणि पावलापावलांवर खडतर आव्हानं असतानाही भारतीय लष्कर गेली कित्येक वर्ष या युद्धभूमीचं संरक्षण करतं आहे.
काश्मीरच्याही तोडीस तोड एक सुंदर जागा भारतात आहे आणि ती म्हणजे लडाख. लडाखचं हे सौंदर्य आजपर्यंत अनेक बॉलीवूडपटांत आपण पाहिलं आहे. या लडाखच्या पुढेच सुरू होतं. सियाचीन. बर्फ आणि केवळ बर्फच असलेला हा प्रदेश दिसायला जितका सुंदर. तितकंच तिथं जगणं कठीण.
जगातली सर्वात उंचीवरील ही युद्धभूमी ७० किलोमीटर लांब आहे. वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस २४ तास इथे बर्फच बर्फ असतो. याच्या एका बाजूला भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला तितकाच धोकादायक चीन आहे आणि त्यांच्यापासून रक्षण करण्याकरता देशाचे हे हिम जवान सदैव इथं सज्ज आहेत. पण २४ हजार फूट उंचीवर असलेली ही युद्धभूमी भारतासाठी एवढी महत्त्वाची का?
१९८४च्या एप्रिलमध्ये हा बर्फाळ भाग ओसाड आणि वैराण होता. पाकिस्तानची त्यावर नजर पडली आणि सुरू झाल्या हालचाली. पाकिस्ताननं युरोपच्या बर्फाळ प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या विशेष कपड्यांची आणि शस्त्रांची मोठी ऑर्डर दिली होती. या ऑर्डरनं भारताला कुणकुण लागली आणि जन्म झाला ऑपरेशन मेघदूतचा.
१३ एप्रिल १९८४ रोजी ऑपरेशन मेघदूत सुरू करण्यात आलं. बर्फाळ प्रदेशासाठी लागणारे कपडे आणि शस्त्र भारतीय सैन्याकडे १२ तारखेलाच पोहचली होती. आता भारताला पाकिस्तानच्या आधी सियाचीनमध्ये पोहचायचं होतं. शिवाय दुर्गम असे सेला पास, बेलाफोंडला पास आणि ग्योंगला पासही आपल्या ताब्यात घ्यायचे होते.
मेजर बहुगुणा यांनी सेला पासचं नेतृत्व स्वीकारलं. तर कॅप्टन संजय कुलकर्णींकडे बेलाफोंडलाची जबाबदारी देण्यात आली. लेफ्टनेंट कमांडर पुष्कर चांद यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहीमेचं पहिलं लक्ष्य होतं. समोमा पास.
१३ एप्रिलला सकाळी कॅप्टन संजय कुलकर्णी आणि एक सैनिक चिता हेलिकॉप्टरनं बेस कँपला पोहचले. आता जरी रस्ता बनला असला तरी तेव्हा या ठिकाणी पोहचणं इतकं सोपं नव्हतं. बेलाफोंडला पासवर कॅप्टन कुलकर्णींनी ताबा मिळवला आणि भारताचा तिरंगा फडकवत आपला विजय साजरा केला.
भारताकडून सियाचीनकडे जायचं झाल्यास सरळ उभी चढण आहे तर पाकिस्तानसाठी मात्र सियाचीन थोडं कमी उंचावर आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार मात दिली. म्हणूनच जगभरातल्या यशस्वी युद्धांमध्ये ऑपरेशन मेघदूतचं नाव आवर्जून घेतलं जातं.
उणे ६० ते उणे ७० इतक्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं सर्वांत उंच अशा युद्धभूमीवर विजय मिळवला होता. पाकिस्तानसाठी ही शरमेची बाब होती.
१९८४ ते २००२ म्हणजे तब्बल १८ वर्ष भारत आणि पाकिस्तानची सियाचीनसाठीची लढाई सुरू होती. मात्र, विजय भारताचाच झाला. या मोहीमेत भारताचे जवळपास एक हजार जवान शहीद झाले आहेत.
आजही सियाचीनच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान असल्यानं सियाचीन भारतासाठी महत्त्वाचं ठरलं आहे. जर पाकिस्ताननं सियाचीनवर कब्जा मिळवून चीनशी हातमिळवणी केली असती तर ते भारतासाठी धोकादायक होतं. एवढ्या उंचावरुन या दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष देणं भारतासाठी सोपं आहे.
२००३ मध्ये भारत-पाकिस्तानात युद्धबंदी करार झाला आणि तेव्हापासून या परिसरात गोळीबार झालेला नाही.

Want your school to be the top-listed School/college in Shrirampur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Shrirampur
413739