Dr Mind Hypnosis

Dr Mind Hypnosis

Share

Life Coaching, Psychological Trainings, Hypnosis Training & Services, eBooks & Training Programs We provide Offline & Online Training Programs as Follows,
1.

Creative Visualization
2. Success Psychology
3. Money Mindset
4. Money Wisdom
5. Become Self Hypnotist
6. Become Hypnotist and More.

22/04/2026

मन सांभाळा आणि तुमचं जगणं सुंदर करा..!
मल्हार सर
या लेखात अपान समजून घेणार आहोत कि, प्रत्येक वयोगटात मानसिक आरोग्याची काळजी घेणे का आवश्यक आहे? सध्याच्या काळात ते अधिक महत्वपूर्ण का बनत चालले आहे. आज पहिला लेख त्याच दिशेने पाहिलं पाऊल आहे.
आपण रोज सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, कपडे घालतो इतर बऱ्याच गोष्टी ज्यातून शरीराची काळजी घेतो. पण आपण कधी थांबून स्वतःला विचारलं आहे का? "आज माझं मन कसं आहे?" बहुतेकदा नाही. कारण आपल्या समाजात शारीरिक त्रास झाला की डॉक्टरकडे जाणे नॉर्मल आणि मन दुखलं की लपवणे हे नॉर्मल मानतो नाही का? हीच चूक आपल्याला महागात पडते.
आज एकविसाव्या शतकात जगणं म्हणजे एक प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धा करिअरची, नातेसंबंधांची, सोशल मीडियावरील प्रतिमेची, आर्थिक स्थिरतेची. या धावपळीत माणूस बाहेरून हसतमुख दिसतो, पण आतून कुठेतरी तुटत जात असतो. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ "वेड्यांसाठी" असलेली गोष्ट नाही, ती आपल्या प्रत्येकाची, रोजची, अत्यंत महत्त्वाची गरज आहे.

💡मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे तर माणूस म्हणून स्वतःची क्षमता ओळखून, आयुष्यातील सामान्य तणावाचा सामना करून, उत्पादकपणे काम करून समाजात सकारात्मक योगदान देऊ शकतो, ती मनोशारीरिक अवस्था.
थोडक्यात सांगायचं तर, मानसिक आरोग्य म्हणजे आनंदाने जगण्याची, निर्णय घेण्याची, नातेसंबंध जपण्याची आणि संकटांना धैर्याने तोंड देण्याची ताकद.
शरीर आणि मन एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जेव्हा मन अस्वस्थ असतं, तेव्हा शरीरावरही त्याचा परिणाम होतो जसे कि, झोप उडते, भूक मरते, डोकेदुखी होते, रक्तदाब वाढतो. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे संपूर्ण शरीरालाच धोका आहे नाही का?

📊काही धक्कादायक आकडे :
👉1 अब्ज+:- जगभरात मानसिक आजाराने ग्रस्त लोक आहेत.
👉७.५% :- भारतीय लोकसंख्येला मानसिक विकाराचा त्रास आहे.
👉८०% :- रुग्ण योग्य उपचार न घेता राहतात.
👉१५-२९ :- आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक या वयोगटात आहे.

भारतात दर एक लाख लोकांमागे केवळ ०.३ मानसोपचारतज्ज्ञ आहेत. म्हणजे उपचारांची गरज प्रचंड आहे, पण सुविधा अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत जनजागृती हीच सर्वात मोठी उपाययोजना आहे.

👥 प्रत्येक वयोगटात मानसिक आरोग्याची काळजी का घ्यावी?
मानसिक ताण कोणत्याही एका वयापुरता मर्यादित नसतो. तो जन्मापासून म्हातारपणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या रूपाने येतो.

🧒 बालपण (०–१२ वर्षे) पायाची भक्कम होण्याची वेळ
मुलांच्या मेंदूचा ९०% विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. या काळात घरातील वातावरण, आई-बाबांमधील भांडणे, शाळेतील बुलिंग, शिक्षणाचा अतिरिक्त ताण या सगळ्यांचा खोल परिणाम मुलाच्या मानसिकतेवर होतो. लहानपणात झालेले नकारात्मक आघात ओळखणे, समजून घेणे आणि आधार देणे हे पालकांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे.

🧑 किशोरवय (१३–१७ वर्षे) उमेदीचा काळ
या वयात शरीरात, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये प्रचंड बदल होतात. सोशल मीडियावरील तुलना, परीक्षेचा दबाव, प्रेमसंबंध, स्वतःची ओळख शोधणे या सगळ्यात किशोरवयीन मुलं आतून कोलमडत असतात. भारतात या वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. "थोडं मोठं झालास की सगळं ठीक होईल" असं म्हणणं बंद करा, आज त्यांना ऐका. समजून घ्या. त्यांना बरे करा.

🧑‍💼 तरुणाई (१८–३५ वर्षे) स्पर्धेचं जग.
नोकरी मिळवणे, करिअर घडवणे, लग्न, स्वतःच घर, तरुण वयात जबाबदाऱ्यांचं ओझं एकाएकी पडतं. "मला सगळं जमलं पाहिजे" हा आत्मदबाव आणि "मी अपयशी ठरलो तर" हा न्यूनगंड, या दोन्हींच्या कात्रीत तरुण पिळला जातो. Anxiety आणि Depression या वयात सर्वाधिक आढळतात, पण मदत मागण्याची लाज याच वयात सर्वाधिक असते. इथे तज्ञांची मदत घेणे वावघे नाही.

👨‍👩‍👧 मध्यमवय (३५–५५ वर्षे) मानसिक पाठरावस्था.
बाहेरून सगळं स्थिर वाटतं. नोकरी, घर, कुटुंब. पण आतून Mid-life Crisis असतो. "मी इतक्या वर्षांत काय मिळवलं?" हा प्रश्न सतावतो. आई-बापाचं वाढतं दुखणं, मुलांचं भविष्य, स्वतःची स्वप्नं,यांचा ताळमेळ घालताना मन थकतं. या वयातील पुरुष तर क्वचितच मदत मागतात आणि इथेच सर्वात मोठा धोका आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही या काळात समस्या असतात.

👴 वृद्धावस्था (५५+) एकट्याचा-उत्तरार्धातील संघर्ष.
निवृत्तीनंतरचा एकटेपणा, जोडीदाराचं जाणं, शारीरिक आजारपण, मुलांपासून दूर राहणं या सगळ्यामुळे वृद्धांमध्ये Depression खूप जास्त आढळतं. पण आपल्या समाजात वृद्धांना "आता काय त्यांना?" असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं. ते जितकं हसतात तितके ते आतून एकटे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

(यापुढील सर्व लेख वाचण्यासाठी आणि सदैव मोटिवेट राहण्यासाठी आमचा "Daily सायकोलॉजी" ग्रुप जॉईन करा. https://www.facebook.com/groups/dailypsychology/)

28/12/2025

Learn Hypnosis & Start Your Career Today, it's So Easy

01/12/2025

Love Yourself, Express your love daily, respect yourself , nothing wrong, it's good for your mental health😊😊

14/10/2025

सहानुभूती हवी वाटते ना? पण त्यामुळे आपलेच खूप मोठे नुकसान होते. त्यापेक्षा या भावनेतून बाहेर पडले पाहिजे.

11/08/2025

संमोहन उपचार (HYPNOTHERAPY) का घ्यावेत? एक वैज्ञानिक समर्थित दृष्टीकोन




आजच्या तणावजन्य जीवनात मानसिक आणि शारीरिक समस्या सतत वाढतात. अशा वेळी अनेक उपचार पद्धतीने स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न व्यक्ती करतो. त्यात वैदयकीय, मानसशास्त्रीय, होमिओपॅथीक, आयुर्वेदिक तसेच इतर अल्टरनेटिव्ह उपचार पद्धतींची मदत घेतो. अशापैकी एक मानसशास्त्रीय चिकीत्सा पद्धती म्हणजे संमोहन उपचार (Hypnotherapy) एक प्रभावी पर्याय म्हणून उभा राहतो. विशेषतः विविध तज्ज्ञांनी अभ्यास करून सादर केलेल्या Meta-analytic evidence on the efficacy of hypnosis for mental and somatic health issues: a 20-year perspective या अभ्यासामध्ये संमोहनाच्या सकारात्मक परिणामाचे वैज्ञानिक पुरावे सादर केल्याने, संमोहन उपचार का घ्यावे याचं सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण मिळते.

कोणत्या संशोधनाचा आधार आहे?
Rosendahl et al. (2024) यांच्या meta-analysis ने संमोहनावर आधारित 49 meta-studies आणि 261 RCTs (Randomized Controlled Trials) ची समीक्षा केली. त्यातून स्पष्टपणे दिसून आलं की विविध मानसिक आणि शारीरिक समस्या उपचारात संमोहनाची उपचार शक्ति सिद्ध झाली आहे. हे स्पष्ट झाले आहे की संमोहन उपचारांनी प्रभावी आणि दीर्घकालीन सुधारणा मिळू शकते.

संमोहन उपचार का प्रभावी आहेत :
या अभ्यासात संमोहन उपचारांना प्रभावी उपचार पद्धती मानले आहे कारण त्यांना या उपचारांचे पुढील अनेक फायदे दिसून येतात.
1. जूनी प्रवृत्ती बदलून अपेक्षित बदल मनात रुजवणे. :
संमोहन मनाच्या अवचेतन (सब-कॉन्सिअसं माईंड) स्तरावर काम करते, जिथे भीती, चिंता आणि व्यसनात्मक प्रवृत्तीची मुळे असतात. संमोहन उपचारांनी ती मूळ कारणे समजून घेऊन,त्यांना दूर करून परिपूर्ण उपचार केले जातात.

2. अगदी काही दिवसांत सकारात्मक परिणाम :
मनोशारीरीक विकारांनी त्रस्त व्यक्तींना जलद परिणाम मिळण्याची शक्यता अधिक असते. चिंताजनक विचार, भीती, नैराश्य, झोपेच्या समस्या, मानसिक-शारीरिक त्रास आणि औषधांवर अवलंबून राहणे कमी होतात. त्यांना या उपचारांद्वारे लवकर चांगले बदल अनुभवायला मिळतात. हे बदल कायमस्वरुपी असतात.

3. शारीरिक वेदना नियंत्रित करणे :
विशेषतः acute pain (जसे की शस्त्रक्रिया, दुखापत) मध्ये संमोहन उपचार प्रभावी ठरतात. एक Meta-Analysis दर्शवते की अगदी लहान शारीरिक वेदना ते अगदी Chronic Pain मध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

4. झोपेच्या समस्या आणि चिंता सुधारण्यात सहायक :
संमोहन उपचारांनी झोपेची गुणवत्ता वाढते, झोपेची अडचण कमी होते आणि insomnia जसे विकारांवर उपयुक्त ठरू शकते. सतत मनात वाटणाऱ्या चिंता, भीती किंवा काळजी अगदी सहजतेने कमी होतात.

5. विविध मानसिक आजारांवर उपचारात्मक प्रभाव :
Anxiety, Phobia, PTSD, IBS (पचन विकार) अशा आजारांवर संमोहन उपचारांनी सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. व्यक्तीच्या मनातून समस्या निराकरण केले जाते. हे उपचार अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मानले जातात.

साईस्नेह वेलनेस : संमोहन उपचार केंद्र :
साई स्नेह माईंड हिलींग आणि वेलनेस सेंटरमध्ये आतापर्यंत अनेक व्यक्तींनी संमोहन उपचार घेतले आहेत. अद्यापही घेत आहेत. इथे व्यक्तीला समजुन घेतले जाते. त्यांचे त्रास समजून घेतले जातात. त्या त्रासांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातो. समुपदेशन, वैयक्तिक प्रशिक्षण,मार्गदर्शन आणि प्रभावी संमोहन उपचरांद्वारे त्यांना बरे केले जाते. कसलीही गडबड न करता, स्टेप बाय स्टेप उपचार प्रक्रिया केली जाते.

🧠 वैज्ञानिक विचारधारा आणि अनुमोदन :
American Psychological Association (APA) आणि Royal College of Psychiatrists यांनी संमोहन उपचाराला विविध मानसिक आजारांवर उपयुक्त पूरक ट्रीटमेंट म्हणून मान्यता दिली आहे. हे उपचार केवळ तात्पुरत्या स्वरूपाचं नसतात तर त्याने व्यक्तीची उपचारक्षमता (रोगप्रतिकारक शक्ती) वाढते तसेच मनोबल वाढते त्यामुळे दीर्घकालीन मानसिक स्थैर्य निर्माण करता येते.

महत्त्वाचं: संमोहन उपचार कोणासाठी योग्य?
▪️रोजच्या जीवनात ताणतणावाने ग्रस्त प्रत्येक व्यक्तीची प्रभावी.
▪️औषधांवर अवलंबून असाल तर लवकर बरे वाटावे यासाठी.
▪️मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या असलेल्या प्रत्येक व्यक्तींसाठी.
▪️10 वर्षावरील मुलं, किशोर, प्रौढ आणि अगदी वृद्धांना योग्य प्रमाणात संमोहन उपचार प्रभावी आहेत.
संमोहन उपचार हे अनुभवी आणि म्हणून प्रशिक्षित तज्ज्ञांकडूनच घ्यावेत हे ही लक्षात घ्या.

संमोहन उपचारांचे फायदे जीवनातील प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षेत्रात होतात. या अभ्यासात सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडला आहे. हे लक्षात घ्यायला हवे की कोणताही मनोशारीरीक आजार बरे करण्याची क्षमता संमोहन उपचारात आहे. साई स्नेह माईंड हिलींग आणि वेलनेस मध्ये आम्ही अधिक प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने संमोहन उपचार देतो. म्हणून कदाचित इतरत्र प्रयत्न करूनही जर तुमच्या समस्या जात नसतील तर तर इथे त्या समस्या दूर होण्याच्या शक्यता अधिक आहेत.
मी स्वतः मल्हार शिंगाडे, एक सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट म्हणून कार्य करताना अनेकांना विविध त्रासातून सहज बरे करत आहे. यामध्ये साई स्नेह हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुनील जगताप सर, डॉ. सुमित जगताप यांचेही सहकार्य मोलाचे आहे. त्यामुळे मानसिक त्रासांना कवटाळून बसू नका, ते दूर करा. आम्ही तुम्हाला सहकार्य नक्की करू.
जीवन जगताना, तुमचे मन निरोगी, तर तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे. तणाव व्यवस्थापन, समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.
डॉ माइंड हिप्नॉसिस पुणे , पी.एम.टी. बस डेपोसमोर, कात्रज,पुणे. 099606 31066

लेखक : मल्हार शिंगाडे(सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 9960631066

Photos from Dr Mind Hypnosis's post 23/06/2025

संमोहन उपचार : मनाच्या खोल अवस्थेत बदल घडवणारी उपचारपद्धती

आजच्या काळात मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपीज उपलब्ध आहेत. वाढत्या मनोशरीरीक आजारांचे प्रमाण आणि विविध मानसशास्त्रीय उपचारपद्धती याबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामध्ये संमोहन उपचार (Hypnotherapy) ही एक अशी उपचारपद्धती आहे जी विशेषतः मनाच्या अवचेतन पातळीवर काम करते. इतर उपचारांप्रमाणे संमोहन केवळ वरच्या पातळीवरील विचारांवर लक्ष देत नाही, तर त्या विचारांच्या मूळ जडणघडणीवर प्रभाव टाकते. त्यामुळे उपचारानंतर होणारे सकारात्मक बदल हे अधिक खोलवर आणि वेगाने घडू शकतात. मानसिक त्रास असतानाच संमोहन उपचार घ्यावेत असे नाही तर आपले जीवन अधिक समृद्ध,आरोग्यदायी व्हावे यासाठीही संमोहन उपचार घेता येतात. इतर मानसशास्त्रीय उपचारपद्धतीपेक्षा संमोहन उपचार कसे प्रभावी आहेत,हे आज जाणून घेऊयात.

१. अवचेतन मनाशी थेट संवाद :
संमोहन उपचार दरम्यान थेट अवचेतन मनाशी संवाद साधता येतो. आपल्या सवयी, भावना, आपली विचारप्रणाली आणि वर्तनांची मुळे या अवचेतनात दडलेली असतात. त्यामुळे, या थेरपीमुळे ज्या समस्या आपण जाणीवपूर्वक सोडवू शकत नाही त्या सहजपणे समजून दूर करता येतात. त्याजागी अपेक्षित सवयी आपण प्रोग्रॅम करू शकतो. ज्यामुळे आरोग्य तर सुधारते सोबत जीवनात प्रगती साधता येते.

२. जलद परिणाम मिळतात :
संमोहन उपचार हे बहुतेकदा लवकर परिणाम देणारे मानले जातात. जसे की भीती, चिंता, वाईट सवयी,झोपेच्या समस्या, नैराश्य, मनोशरीरीक त्रास यासाठी संमोहन थेरपीचे परिणाम लवकर दिसतात. पारंपरिक थेरपींमध्ये जे बदल घडायला अनेक आठवडे लागतात, ते संमोहनात काही सत्रांमध्येच होऊ शकतात. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते.

३. समस्यांच्या मूळ कारणांवर उपचार :
CBT किंवा इतर वर्तनात्मक उपचार पद्धती मुख्यतः व्यक्तीची विचारसरणी आणि वर्तनामध्ये बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, संमोहन उपचार पूर्वीच्या नकारात्मक अनुभवांपासून तयार झालेल्या भीती, गैरसमज किंवा नकारात्मक अपराधी मानसिकता यांसारख्या मूळ मानसिक कारणांवर थेट परिणाम करते. मूळ कारणे मनातून नाहीशी केली जातात. परिणाम स्वरूप विचारसरणी आणि वर्तन बदल सहज शक्य होतात.

४. इतर उपचारांबरोबर पूरक म्हणून वापर :
संमोहन उपचार इतर उपचार पद्धतींबरोबर पूरक म्हणून वापरता येतो. औषधोपचार, समुपदेशन, मानसोपचार यासोबत संमोहन उपचार केल्यास व्यक्तीला अधिक सकारात्मक मदत होते. व्यक्ती सकारात्मक विचारांना स्वीकारते, योग्य आणि अपेक्षित प्रतिसाद देते. इतर उपचारप्रक्रिया अधिक प्रभावी बनतात.

५. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते :
संमोहनाच्या वेळी व्यक्ती एक गहन विश्रांतीची अवस्थेत असतो. ही अवस्थेत शरीर आणि मन शांत, एकसंध असते. अशा वेळी व्यक्तीचे लक्ष पूर्णपणे त्याच्या आंतरिक जगाकडे वळते, ज्यामुळे सकारात्मक सूचना मनात खोलवर परिणाम करतात. या अवस्थेत व्यक्तीची सुचणीयता वाढते.

६. स्वसंमोहनातून स्वयंउपचार :
संमोहन उपचारतज्ज्ञ रुग्ण व्यक्तीला स्वसंमोहन (Self-Hypnosis) शिकवू शकतो. यामुळे व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मनावर सकारात्मक परिणाम घडवण्यास सक्षम होते. म्हणजेच थेरपीची ताकद पुढेही टिकून राहते. याधारे व्यक्ती स्वतःवर स्वतःच स्वयं-उपचार करते. ही उल्लेखनीय बाब आहे.
असे अनेक फायदे संमोहन उपचार पद्धतीचे सांगता येतील. अशी चर्चा आपण पुढेसुद्धा करू पण जगभरात असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी संमोहन अवस्था अनुभवली पाहिजे, तसे एकदा करून पहा.

अत्यंत महत्वाची गोष्ट :
संमोहन उपचारासाठी प्रशिक्षित आणि योग्य संमोहन उपचारतज्ज्ञांची निवड करणे आवश्यक असते. योग्य व अनुभवी संमोहनतज्ज्ञाची निवड केल्यासच योग्य उपचार मिळतो.
संमोहन उपचार ही एक अशा प्रकारची शास्त्रीय पद्धत आहे जी मनाच्या खोल पातळीवर काम करत असल्यामुळे बदल अधिक वेगाने आणि खोलवर घडवू शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात, त्यानुसार संमोहन उपचार कसे योग्य ठरतील, हे ठरवताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि योग्य निर्णय घ्या.

तुम्हाला अशा समस्या सतावत आहेत का?
▪️रोज सकाळी उठल्यापासूनच अस्वस्थ वाटणे.
▪️मनात स्पष्ट कारण नसतानाही अनामिक भीती वाटणे.
▪️रात्री झोप लागायला खूप वेळ लागणे किंवा मधूनच जाग येणे.
▪️छातीवर दडपण किंवा हृदयावर भार असल्यासारखं वाटणे.
▪️सतत वेगळे शारीरिक त्रास जाणवणे पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असणे.
▪️मनात सतत नकारात्मक विचार येणे, आत्महत्येचे विचार येणे.
▪️लहानसहान गोष्टींवर चिडचिड होणे किंवा राग अनावर होणे.
▪️कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे – गर्दी, आवाज, फोन, भविष्य.
▪️श्वास घ्यायला त्रास होणे किंवा दम लागल्यासारखं वाटणे.
▪️अचानक थंडी जाणवणे, अंग थरथरणे, कंप असणे,अंग थंड पडणे.
▪️कामावर, अभ्यासावर किंवा संवादात लक्ष न लागणे.
सर्व तपासण्या करून रिपोर्ट नॉर्मल आहेत पण असे विविध मनोशरीरीक त्रास होत आहेत, तर तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी संमोहन उपचार एक राजमार्ग ठरेल हे नक्की.
लक्षात घ्या, तुमचे मन निरोगी, तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे.
समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.
साई स्नेह माइंड हींलिंग अँड वेलनेस सेंटर, पी.एम.टी. बस डेपोसमोर, कात्रज,पुणे.
सम्पर्क : 8888150101

लेखक : मल्हार शिंगाडे (सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 9960631066

Photos from Dr Mind Hypnosis's post 31/05/2025

🙆SOCIAL ANXIETY- तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरत आहे का?

मुकेश, वय २७. एक हुशार, शिकलेला आणि मनातून संवेदनशील तरुण आहे. पण पूर्वी समाजात वावरताना तो गोंधळायचा, घाबरायचा. लोकांमध्ये बोलायला गेलं की हात थरथरायचे, तोंड कोरडं पडायचं. त्याला सतत वाटायचं कि, “लोक माझ्याकडे बघून हसत आहेत”, “मी काही बोललो तर चूक होईल”, “ते मला नापसंत करतील.” "माझी चेष्टा होईल, हसू होईल". या भीतीमुळे तो मैत्री, करिअर संधी, व्यावसायिक संवाद या सगळ्यांपासून स्वतःला दूरच करत गेला. मुकेशला होणारा हा त्रास होता, Social Anxiety Disorder हा एक मानसिक विकार आहे, जो आजच्या काळात अनेक तरुणांमध्ये दिसत आहे.

🙆Social Anxiety म्हणजे काय?
Social Anxiety Disorder म्हणजे सामाजिक परिस्थितीत किंवा इतरांच्या समोर वावरताना भीती, संकोच, अस्वस्थता आणि तणाव जाणवणे. हे केवळ लाजाळूपणा नाही, तर मानसिक आरोग्याशी संबंधित एक सखोल समस्या आहे. यात व्यक्तीला वाटतं की इतर लोक आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहेत, आपण चुकीचं काही केलं तर ते आपल्यावर हसतील, आपली खिल्ली उडवतील. आपला अपमान होईल.ही भीती वाढत जाते आणि व्यक्तीच्या एकंदरीत सर्वच क्षेत्रातील जीवनावर वाईट परिणाम दिसून येतात.

🙆Social Anxiety होण्याची कारणे.:
Social Anxiety म्हणजे केवळ लोकांसमोर बोलण्याची भीती नाही, तर ती एक खोल मानसिक अवस्था आहे, जिथे व्यक्तीला सतत असुरक्षित वाटतं, इतरांच्या प्रतिक्रियांविषयी चिंता वाटते आणि समाजात वावरताना अडचण होते. ही स्थिती अचानक निर्माण होत नाही, तर या विकाराचे मूळ अगदी बालपणापासून मनात खोलवर रुजलेल्या असतात. विविध मानसशास्त्रीय व जैविक कारणांमुळे ही भीती अधिक तीव्र बनते. हा विकार निर्माण होण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
बालपणीचे अनुभव : लहानपणी वारंवार टोचणारी टीका, वर्गात किंवा समाजात झालेला अपमान, सततचं भावनिक दुर्लक्ष ही Social Anxiety चा पाया मजबूत करणारी कारणं ठरू शकतात. अशा अनुभवांमुळे आत्ममूल्य आणि आत्मविश्वास खचतो.
कुटुंबातील संवादशैली : घरातील कठोर, दोषारोप करणारी संवाद पद्धती किंवा अयोग्य संवाद व्यक्तीच्या समाजाशी संवाद साधण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. सततची तुलना, चूक दाखवणं, बोलताना अडवणे, हसणे किंवा अपमान करणे या गोष्टी मनात भीतीची मुळं घट्ट करतात.
अपयशाची भीती :"मी इतरांपेक्षा कमी पडतो" हा भाव आणि सतत स्वतःची इतरांशी तुलना केल्याने मनात न्यूनगंड निर्माण होतो, जो समाजासमोर आत्मविश्वासाने उभं राहण्यास अडथळा ठरतो.
जनमताची चिंता : "लोक काय म्हणतील?", "माझ्यावर लोक हसतील का?" "मी चुकीचं तर बोलत नाही ना?" यासारख्या विचारांमुळे व्यक्ती सतत स्वतःबद्दल जागरूक असते आणि इतरांच्या नजरेत स्वतःला परिपूर्ण दाखवण्याचा अतिरेक होतो. त्यातून अधिक चूका घडतात. परिणामी भीती मनात रुजत जाते.
जैविक कारणं : Neuroscience संशोधनानुसार, काही लोकांमध्ये मेंदूमधील Amygdala हे केंद्र अधिक संवेदनशील असतं, जे भीती व तणावाशी संबंधित भावना नियंत्रित करतं. त्यामुळे या लोकांना सामाजिक परिस्थितीत अधिक तीव्र भीतीचा अनुभव येतो.

🧑‍💼Social Anxiety वर संमोहन उपचार कसे प्रभावी आहेत?
संमोहन उपचाराच्या माध्यमातून Social Anxiety च्या मुळाशी पोहोचता येतं, जिथे भीती, न्यूनगंड आणि अपयशाची कारणे दडलेली असते. या उपचारादरम्यान मन शांत, ग्रहणशील अवस्थेत जातं, आणि नकारात्मक विश्वास सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित केले जातात. "लोक काय म्हणतील" यासारख्या भीतीचा भावनांवर होणारा प्रभाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक परिस्थितींत वावरताना मन अधिक स्थिर राहतं. यामुळे व्यक्ती भीतीऐवजी संयम आणि निर्धाराने लोकांसमोर वागत असते.

✍️संमोहन उपचार यावर आधारित संशोधन काय सांगतं?
Hammond (2005) यांच्या अभ्यासानुसार, संमोहन उपचारामुळे Social Anxiety व तणावाची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी होते. शारीरिक लक्षणे जसे की धडधड, घाम येणे, थरथर यावरही सकारात्मक परिणाम होतो. थेरपीसोबत संमोहन उपचार दिल्यास रुग्णांमध्ये जलद आणि दीर्घकालीन सुधारणा दिसून आली.
Barabasz et al. (2013) यांच्या अभ्यासात संमोहन उपचार Social Phobia आणि Generalized Anxiety Disorder वर औषधांइतकेच प्रभावी ठरले. या उपचारांनी रुग्णांची आत्मप्रतिमा सुधारली आणि सार्वजनिक बोलण्याची भीती लक्षणीयरीत्या कमी झाली. यामुळे रुग्णांचा सामाजिक सहभाग वाढला आणि आत्मविश्वास मजबूत झाला.

💁‍♂️एक केस स्टडी: मुकेशचं परिवर्तन
मुकेश आमच्याकडे साई स्नेह माइंड हिलींग अँड वेलनेस सेंटर, कात्रज येथे आला, तेव्हा तो पूर्णपणे खचलेला होता. मुलाखतीला जाऊ शकत नव्हता, मित्रांना टाळायचा, नातेवाईकांकडे दुर्लक्ष करायचा, कौटुंबिक- सामाजिक कार्यक्रमापासून दूर रहायचा. पण त्याला हे समजत होते की हे वारंवार होत असल्याने लोक दुरावले जात आहेत. आपलीच चर्चा होत आहे. कामाच्या याठिकाणी योग्य परफॉर्मन्स होत नव्हता. गुगल सर्चच्या माध्यमातून तो आमच्या पर्यंत पोचला आणि त्याला या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला.
त्याने एकूण सहा संमोहन सेशन्स घेतले. पहिल्याच सेशनमध्ये त्याच्या मनातील जुनी शाळेतील अपमानाची आठवण बाहेर आली, जिथे संपूर्ण वर्गासमोर एका शिक्षकांनी त्याची चेष्टा केली होती. त्याने ती आठवण मनात साठवून ठेवली होती. त्याच भीतीची तीव्रता पूढे हा विकार वाढवणारी कारण ठरत होती.
संमोहन उपचारातून त्याला त्या आठवणींचा पुनर्दृष्टीकोन दिला गेला. त्याचं मन शांत झालं, संवादात आत्मविश्वास वाढला. तो धाडसाने आपली मतं मांडू लागला. लोकांत मिसळू लागला. तीन महिन्यांनंतर जेव्हा तो आमच्याकडे भेटायला आला तेव्हा त्याने एका कंपनीत इंटरव्ह्यू कसा धाडसाने दिला आणि सिलेक्ट हे आनंदाने सांगत होता.
माझं मनचं माझं शत्रू आहे म्हणणारा मुकेश माझे मन माझा सामर्थ्यशाली मित्र आहे असे म्हणतो.

🙋‍♂️लक्षात घ्या :
तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही लोकांमध्ये सहज वावरू शकत नाही.संवाद करताना छातीत धडधडते, तोंड कोरडं पडतं, पाय थरथरतात, स्वतःची मतं स्पष्ट स्वरुपात मांडता येत नाही. तर Social Anxiety ही अडचण आहे आणि त्यावर संमोहन उपचार ही निश्चित संधी आहे.
तुमचे मन निरोगी, तर तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे. तणाव व्यवस्थापन, समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.
Dr Mind Hypnosis & Training Institute Pune
www.drmindhypnosis.com
www.drmindhypnosis.in
लेखक : मल्हार शिंगाडे (सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 099606 31066

Photos from Dr Mind Hypnosis's post 20/05/2025

🤳मोबाईलमुळे मानसिक स्वास्थ्य हरवलयं🧠? वेळीच सावध व्हा..!🙏
👉हे तुमच्यासोबत, तुमच्या मुलांसोबत घडत असेल तर,आताच यावर सिरियसली विचार करा.👨‍👦‍👦

स्मार्टफोन, आधुनिक जगातला एक क्रांतिकारी शोध. तसे पाहता आपले मानवी जीवन अधिक सोयीस्कर होण्यासाठी त्याचा शोध लागला पण हाच स्मार्टफोन सध्या अनेकांच्या आयुष्याचा शत्रू ठरत आहे. विद्यार्थ्यांपासून उच्च पदस्थ व्यावसायिकांपर्यंत आज प्रत्येकजण इलेक्ट्रॉनिक स्मार्ट गॅझेटच्या आहारी गेला आहे. तासंतास रील्स, गेम्स, सोशल मीडियावर स्क्रोलिंग, अनावश्यक चॅटिंग यामुळे मनाची एकाग्रता हरवते आहे, वेळ वाया जात आहे, आणि आरोग्यावर अत्यंत वाईट आणि भरून न निघणारे परिणाम होत आहे.

📢संशोधन काय सांगतं?
2023 मध्ये Harvard Medical School आणि Indian Council of Medical Research यांच्या संयुक्त अहवालानुसार, भारतातील 16 ते 35 वयोगटातील 68% तरुण दररोज किमान 5 ते 7 तास मोबाईलवर घालवतात, ज्यात केवळ 20% वेळच शिक्षण किंवा कामासाठी वापरला जातो. उर्वरित वेळ व्यर्थ सोशल मीडिया, गेमिंग, आणि मनोरंजनात खर्च केला जातो. हा डेटा धोक्याचा इशारा देतो.यातून कळते की आपण आपला वेळ आपल्याच जीवनातील समस्या वाढवण्यासाठी करत आहोत.

🎭मानसशास्त्रीय परिणाम:
मोबाईलचा अतिवापर हा मेंदूच्या dopamine cycle ला बिघडवतो. थोडक्याच शब्दात सांगायचं तर, सततच्या स्क्रीन वापरामुळे आपल्या मेंदूला कृत्रिम आनंदाची सवय लागते. यामुळे…
▪️लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
▪️मन सतत अस्थिर राहते.
▪️झोपेचा दर्जा खालावतो.
▪️आत्मविश्वास आणि आत्मसमाधान घटते.
▪️विविध मनोशारीरीक त्रास होत जातात.
▪️स्मरणशक्ती कमकुवत होते.
▪️अभ्यासात,कामात लक्ष केंद्रित होत नाही.
ही स्थिती Digital Burnout म्हणून ओळखली जाते.

🙆मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम :
मोबाईल अ‍ॅडिक्शनमुळे Anxiety, नैराश्य, एकाकीपणा, चिडचिड, आणि Low Self-Esteem वाढू लागतो. सतत तुलना, सोशल मीडियावर “परफेक्ट” दिसण्याची इच्छा, आणि व्हर्च्युअल जगाशी जुळवून घेण्याची जबरदस्ती यामुळे मेंदूवरील ताण वाढतो. विशेषतः युवकांमध्ये FOMO (Fear of Missing Out) आणि Nomophobia (फोनपासून दूर राहण्याची भीती) ही मानसिक स्थिती वाढीस लागली आहे.

🤦काम आणि अभ्यासातील उत्पादकतेवर परिणाम :
मोबाईल अ‍ॅडिक्शनमुळे विद्यार्थी अभ्यासात एकाग्र राहू शकत नाहीत. सतत नोटिफिकेशन, गेम्सची ओढ, रील्स पाहणं यामुळे लक्ष विचलित होतं आणि शैक्षणिक प्रगती घसरते. प्रोफेशनल्ससाठी ही नशा अधिक धोकादायक आहे. मीटिंगमध्ये लक्ष नसणे, कामात अर्धवटपणा, वेळेचं नियोजन नसणं हे सगळं त्याच्या कारकीर्दीवर गंभीर परिणाम करतं. व्यावसायिक आणि वैयक्तिक नुकसान सातत्याने होत राहते.

💆यावर उपाय : संमोहन उपचार (Hypnotherapy)🧘:
मोबाईल अ‍ॅडिक्शन ही केवळ सवय नसून Mentally Conditioned Dependency आहे. संमोहन उपचाराद्वारे मनाच्या खोल पातळीवर पोहोचून, त्या सवयीच्या मुळांवर काम करता येतं.
संमोहन उपचारांनी,
▪️मेंदूला शांत आणि एकाग्र करता येते. मोबाईलमुळे आलेली चंचलता काढून टाकता येते.
▪️नकारात्मक सवयींचं दूर करून चांगल्या सवयी रुजवता येतात.
▪️स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
▪️एकाग्रता आणि आत्मसंयम वाढवता येतो
असे बरेच फायदे संमोहन उपचारांनी जलद आणि कायमस्वरूपी होतात.

💁अंकुश आणि प्रताप : दोन वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती पण समस्या एकच :
अंकुश, १९ वर्षांचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, दिवसभर गेम्स खेळत बसायचा. अभ्यासाकडे दुर्लक्ष, परीक्षांमध्ये अपयश, आणि त्यामुळे आत्मविश्वास हरवलेला. सतत मोबाईल हातात, झोप उशिरा, आणि उठल्यावर पुन्हा फोन. यामुळे शिक्षणात नुकसान होत होतेच पण त्याची आक्रमकता वाढत होती. राग-चिडचिडेपणा वाढला होता. वर्तन उद्धट बनले होते. आई-वडिलांनी साई स्नेह माइंड हिलींग आणि वेलनेस सेंटर, कात्रज येथे, आमच्याकडे त्याला आणले. आमच्या संमोहन सेशन्समुळे अंकुशच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल,ध्येयाबद्दल जाणिवा वाढल्या. त्याने मोबाईल वापराचं वेळापत्रक ठरवलं, एकाग्रतेसाठी ध्यान आणि स्वसंमोहनाचा सराव केला. काही आठवड्यांत तो बदलला. आज तो अभ्यासात रस घेतो, शांतपणे झोपतो, आणि आता सोशल मीडियाला 'ब्रेक' देतो. तो मोबाईलचा अत्यंत माफक आणि योग्य वापर करत आहे.
प्रताप, २९ वर्षांचा HR मॅनेजर. ऑफिसमध्ये सतत इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब यावर वेळ घालवायचा. परिणाम काय झाले तर, कामाचा दर्जा खालावला, वरिष्ठांच्या तक्रारी, आणि शेवटी ‘वार्निंग लेटर’. त्याच्या मनात सतत अस्वस्थता, चिडचिड, झोपेच्या समस्या निर्माण झाल्या. नोकरी धोक्यात आली. आमच्या साई स्नेह सेंटरमध्ये झालेल्या संमोहन उपचारांनी त्याला स्वतःचं मानसिक रूपांतर अनुभवायला मिळालं. आज तो मोबाईलकडे नाही, तर स्वतःकडे जास्त लक्ष देतो.
अगदी मनापासून एक आवाहन करू इच्छितो. मोबाईलचा वापर आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक तुम्हावर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही मोबाईलच्या आहारी गेला आहात, तर वेळ वाया घालवू नका. साई स्नेह माइंड हिलींग आणि वेलनेस सेंटर, कात्रज येथे संपर्क करा. संमोहन उपचाराच्या मदतीने मोबाईल अ‍ॅडिक्शनमधून बाहेर पडा आणि नव्या जीवनशैलीची सुरुवात करा!

😊तुमचे मन निरोगी, तर तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे. तणाव व्यवस्थापन, समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.🏥
🏨साई स्नेह माइंड हींलिंग अँड वेलनेस सेंटर, पी.एम.टी. बस डेपोसमोर, कात्रज,पुणे.
सम्पर्क : 8888150101📲

लेखक :
मल्हार रा. शिंगाडे (एम.ए. बी. एड.)
(सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 9960631066
(लेख कात्रज परिसर या साप्ताहिक पत्रात प्रकाशित झाला आहे.)

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Pune