आपल्या मुलांना शारारिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने मजबूत बनविण्याकरिता बालपण आणि खास करून प्राथमिक शिक्षणाचा काळ अत्यंत महत्वाचा असतो.
त्यांना स्वावलंबी जीवनाचे धडे देणे हे विविध प्रयोगातून आणि दैनंदिन कामकाजातूनच शक्य होते यावर विश्वास ठेवणारे लोक शैक्षणिक क्षेत्रात अधिकारपदी असतात तेव्हा शिकणंही आणि संस्कारही कसे हसत खेळत, गाणं म्हणत होत जातात त्याचं सर्वोत्तम उदाहरण या जपानी शाळेच्या व्हिडीओतून लक्षात येईल. माहितीचा डोंगर मुलांच्या डोक्यावर चढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्या जाणिवा जागृत करण्यासाठी धडपडणं महत्वाचं.
स्वावलंबन, सहकार्य, त्याग, सेवा, समर्पण यांसारख्या गोष्टी करीत करीत शिकणंं आणि शिकत शिकत करणं होत राहिलं तरच, आदर्श चारित्र्य घडविणा-या सवयी अन् संस्कारामध्ये त्यांचं रुपांतर होतं. आपल्याकडे मात्र शिक्षकानं मुलाला एखादं छोटंसं काम जरी सांगितलं तर त्याचा राग येतो... कित्येक ठिकाणी शिक्षकाला बेदम मारहाणही होते. कालच माझ्या लहान मुलाच्या काॅलेजमध्ये असाच एका शिक्षकाला तगडा चोप विद्यार्थ्यांनी दिला.
बेजबाबदार पालकांच्या पोटी आज्ञाधारक मुलं म्हणजे भविष्यकालीन जबाबदार नागरिक कसे पैदा होणार???
कोळशाच्या खाणींमध्ये हिरे बहुसंख्येने कसे मिळणार???
खरंतर सर्वात सुरक्षित अन् संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे शिक्षकांना, तरच सामान्यांतूनही असामान्य व्यक्तिमत्वे घडवण्यासाठी धडपडण्याचा विचार ते करू शकेल. भीती आणि असुरक्षिततेच्या सावटाखाली विचारसुद्धा केला जाऊ शकत नाही.
दुर्दैवानं व्यवस्थेच्या मुळालाच किडीनं खाल्लंय... उपचारसुद्धा तितकाच अवघड आणि कष्टदायी आहे. परंतु तरीही हे शिवधनुष्य उचलण्याची हिंमत कुणीतरी दाखवलीच पाहिजे. विश्वास ठेवा, अशा कर्तृत्वाला जन्म देण्याची शक्ती या मातीत निश्चितच आहे. इतिहास साक्षीला आहे.
मुलांच्या मनात खरोखरीच श्रमप्रतिष्ठा उभी करायची असेल तर अशा प्रकारच्या शैक्षणिक प्रयोगांची आवश्यकता खूप खूप खूप मोठ्या संख्येने आहे. ऐतखाऊ उडाणटप्पू लोक राष्ट्राचा गाडा नाही नीट चालवू शकत.
पहा जरा बारकाईने....याच जगातलं हे वास्तव. कष्टातही आनंद मिळविणारी मुलं पाहिल्यावर वाटतं आपल्याकडंसुद्धा गावोगावी अशा मानवी हि-यांना पैलू पाडणारी, प्रेमाच्याच मजबूत अधिष्ठाणावर उभी असणारी जीवन शिक्षण देणारी विद्यामंदिरं उभी व्हावीत अशी तीव्र इच्छा होते.
पण करणार कोण???
माझा प्रश्न आहे, दुसरं कोण???
चला मित्रांनो, अशी विद्यामंदिरं उभारण्यास आपणच सज्ज होऊया.
तशी मनोभूमिका बहुजनांमध्ये निर्माण करावी अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
- संपत फडतरे, पुणे.
Most Japanese schools do not employ janitors or custodians.
You can watch more about this here - https://goo.gl/8gJWxn (AJ+) and here - https://goo.gl/1pSTt7 (Cafcu)
Sheelsamvardhan Utsav
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sheelsamvardhan Utsav, Education, Building no. A6, Flat no. 3, LIG Colony, Sindhunagar, Nigadi Pradhikaran, Pune.
7 Days Residential Workshop
Focussing on Experiencial Learning, Creating sense of responsibility, Creating intellectual love towards our culture, Confidence building, Leadership and Team Work
Selfless Friendship, Value Education
Developing sensibility
शीलसंवर्धन उत्सव... एक अनोखा उत्सव
शीलसंवर्धन उत्सव-२॰१८ चा समारोपाचा दिमाखदार सोहळा परवा गुरुवारी १५ नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता बेलसर येथे मोठ्या हर्षोल्हासात पार पडला.
समारोपाच्या कार्यक्रमाचे आमचे घरचेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक सुह्रुद, संत साहित्याचे युवाभ्यासक तसेच परिवर्तन परिवाराचे प्रवर्तक, वारकरी दर्पण चे संपादक...
आदरणीय श्री. सचिनदादा पवार
यांच्या अत्यंत रसाळ वाणीतून स्त्रवलेले ज्ञानपूर्ण, भावपूर्ण आणि प्रेमपूर्ण मार्गदर्शनाचा व्हिडीओ आपणा सर्व हितचिंतक आणि मित्रमंडळींकरिता अपलोड करीत आहे त्याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच प्रतिक्रियासुद्धा अवश्य नोंदवाव्या अशी नम्र विनंती.
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
*आनंद वार्ता*
*शिलसंवर्धन उत्सव २०१९*
स्थळ : भोसरे ता.खटाव, जिल्हा - सातारा.
"चारित्र्य निर्माणाचे शिक्षण संपवून फक्त पैसे कमविण्याचे अर्थात् केवळ भाकरी कमावण्याचे शिक्षण ज्या देशात सुरू राहील, त्या देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी हाेणार? तिथे अधोगतीसाठी वेगळे काहीही करावयाची गरजच नाही."
प्रगतीची व्याख्या ही बाह्य चमकेशी सबंधित नाही तर नागरिकांच्या चारित्र्यसंपन्न असण्याशी संबंधित आहे.
.... म्हणूनच
*"संकल्प शीलसंवर्धनाचा"*
आत्मविशवासाने रसरसलेली,
निस्वार्थी-निर्व्यसनी,
शांत-स्थिर बुद्धीची,
व्यायाम - वाचनाची आवड असणारी, प्रामाणिक - निर्भीड, तरूण पिढी घडविण्याचा,
त्यांच्यामध्ये शाश्वत नीतिमूल्ये रुजवून जीवन संघर्षात समर्थपणे उभे राहण्यासाठी सक्षम बनविण्याचा संकल्प करून गेल्या पाच वर्षांपासुन शीलसंवर्धनाचा उत्सव अत्यंत परिणामकारक पद्धतीने साजरा करीत आहोत. हे आपणास ठाऊक आहेच.
शीलसंवर्धन उत्सव २०१९ च्या नियोजन बैठकीसाठी काल रविवारी भोसरे येथे नियोजित उत्सव स्थळी शीलसंवर्धिनीचे पदाधिकारी-स्वयंसेवक श्री. राजेशजी कादबाने आणि कालिदासजी शिंदे याच्यां समवेत भोसरे गावास भेट...
त्यावेळी सरपंच श्री. नितीन जाधव, चेअरमन श्री. भिमराव जाधव, माजी चेअरमन महादेव जाधव, काही ग्रामस्थ आणि युवा कीर्तनकार ह.भ.प. कुणाल महाराज जाधव यांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक, महत्त्वाच्या विषयांसंबंधी निर्णय घेण्यात आले....
चला तर शीलसंवर्धन उत्सव जाणून घेऊया...
आणि ३० ऑक्टोबर पासुन सुरु होणाऱ्या शीलसंवर्धन उत्सवात आपल्या पाल्याची जागा निश्चित करुया...
🌹🙏🏻🌹
प्रतिक्षा.....
उत्सुकता....
वर्ष-६वे
शिलसंवर्धन उत्सव २०१९
एक रचनात्मक शिबीर
स्थळ-भोसरे ता.खटाव.जि.सातारा...
३०/१०/२०१९ ते ४/११/२०१९ ......
13/12/2018
फूल मी काट्यातले, मज वेदनेची खंत नाही
गंध माझा अडवणारी, एकसुध्दा भिंत नाही...
शीलसंवर्धन उत्सव-२॰१८ चा तिसरा दिवस. पूजाताई च्या मुलाखतीचा व्हिडीओ क्र.२
शीलसंवर्धन उत्सव... एक अनोखा उत्सव
सोमवार दि. १२ नोव्हेंबर हा शीलसंवर्धन उत्सव-२॰१८ चा तिसरा दिवस.
सायंकाळी ६:३० वाजता मुलाखतीसाठी फारच जगावेगळं, अफलातून व्यक्तिमत्व शिबीरार्थीं समोर व्यासपीठावर विराजमान होतं. कु. पूजा घनसरवाड (वय वर्षे जेमतेम १९) आणि तिचे वडील श्री. लक्ष्मण घनसरवाड हे बीडहून आलेले आजचे पाहुणे. हे तसे मसानजोगी समाजातील म्हणजे स्मशानाची देखभाल अन् व्यवस्था स्मशानातच राहून सांभाळणारा हा समाज, भटक्या विमुक्त जाती मध्ये गणला जातो.
गरिबीची साथ आणि शिक्षणाचा अभाव वंश परंपरेनं चालत आलेला. पण लक्ष्मणरावांच्या वडिलांवर शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी मुलाला शिकविण्याचा जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न लक्ष्मणरावही जिद्दीने आपल्या मुलांसाठी करत आहेत.
त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना लागलेलं अतिसुंदर फळ म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीनं पूजाने मिळविलेले असामान्य, दैदिप्यमान यश. अगदी टीव्ही चॅनलवाल्यांनी घरी येऊन पूजाबरोबरच तिच्या गरीब आई वडीलांच्याही मुलाखती घेणं, त्या TV वर प्रसारित होणं हे सारं काही त्यांच्यासाठी स्वप्नवत होतं.
पूजाच्या घरी स्मशानात लाईट कुठली असणार? गावातील कुणी गेलं तर रात्री जळती चिता हक्काची. रात्रीचा अभ्यास आशा पेटत्या चितांच्या प्रकाशात करुन तिने दहावीला ९१ टक्के गुण मिळविले होते. सर्व लक्झरीयस सुखसोयी घरी असतानाच शाळेबरोबरच वेगवेगळे महागडे क्लास लावलेले असतानाही कित्येक मुले धड पासही होत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर चितेच्या प्रकाशात अभ्यास करून असं उत्तुंग यश प्राप्त करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ते या मुलीने शक्य करून दाखवले. अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याने डोक्यात लागलेली आग एखाद्याला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकते त्याचे हे आदर्श उदाहरण. ही सर्व चित्तथरारक अन तितकीच प्रेरक कहाणी ऐकूया तिचाच शब्दात.
कृपया निवांतपणे पहा. खूप ऊर्जा देणारी ही मुलाखत आहे. १९ वर्षे वयाची मुलगी ८० वर्षांच्या अनुभवी तंत्त्वज्ञान्यासारखी प्रगल्भतेने उत्तरे देताना आश्चर्याचे अनेक धक्के देऊन जाते. सिरियसली आणि तितक्याच सिंसीयरली ऐकाल तर खुश व्हाल याची खात्री...
दोन व्हिडीओ आहेत ते एका पाठोपाठ एक पोस्ट करीत आहे.
डॉ .सुकुमार मुंजे
M.D(Adv. Hypno & NLP)
*पडो..... झडो.........मूल वाढो..*
आजकालच्या आया मुलांच्याबद्दल अतिदक्ष असतात. त्यांचे लहान निर्णय सुद्धा स्वतःच घेतात यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत.
उदाहरणच द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांनासुद्धा आया आज हात धरून रस्ता ओलांडून देतात. त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे किंवा अतिवर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यांवरसुद्धा हीच स्थिती दिसते. ही वर्तणूक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.
मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला - "स्वराली" हिला - तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो. गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली होती. ती गाडीतून उतरून रस्ता ओलांडून जाण्याच्या तयारीत राहिली, पण हा रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास ५ ते ७ मिनिटे लागली. रस्ता ओलांडणे तिला का जमत नव्हते? निरीक्षण करताना असे दिसले की, समोरून येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत नव्हता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात तिच्या जवळून जाईल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.
एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला अतिशय जपते, इतके की, सायकलसुद्धा बिल्डिंगच्या आवारातच फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेलेसुद्धा तिच्या आईला चालत नाही, लगेच डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते... यामुळे स्वराली सायकलवरून पडली किंवा घरात तिला थोडेही लागले तरी जोरजोरात रडते. ह्याचे कारण तिच्यात सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई किंवा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरातील वातावरण गंभीर होते. या सर्व उदाहरणावरून आपण येणारी पिढी पंगू तर करत नाही ना? याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
लहानपणी मुले खेळताना पडलीच पाहिजेत. त्यातून त्यांची सहनशीलता वाढते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होऊ लागतेे, तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा यामुळे ही नाजुक मुले भविष्यात नाऊमेद किवा अपयशी होण्याची शक्यता अधिक असते. तसेच संघर्षशक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो. याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते आणि धाडसी निर्णय घेताना मन कचरते.
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत. साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढताना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणाला तरी बोलावून करूया", असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हँनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते.
आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते?
पाश्चिमात्य देशांत मुले आपली सायकल (पंक्चर काढणे इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते, यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात.
नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किंवा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर घालणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे. लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहेत.
स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा. आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा. दोन कप चहासाठी किती चहा साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही. हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे!, ही जखम दोन दिवसांची असते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. या व अशा कामांतून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते, तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते.
आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते,
"मला जे कष्ट करावे लागले ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत" इतकी मी धन दौलत करून, त्यांची सोय करून ठेवणार आहे." मुळात हा विचारच अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे हे पालक विसरले आहेत. तुम्ही अपार कष्ट उपसले म्हणून धन संचय करू शकलात. तेच कष्ट तुमच्या मुलांना शिकवले नाहीत तर तुम्ही मिळवलेले ते धन तुमच्या नंतर संपून जाईल हेच यांना समजत नाही.
याच्या उलट अभ्यासासाठी मात्र मुलांवर हे पालक अतोनात जबरदस्ती करताना दिसतात, म्हणजे तुम्हाला बौद्धिक पातळी वाढवायची आहे, पण शारीरिक क्षमता घालवायची आहे हेच दिसून येते.
लक्षात ठेवा, हे सर्व शिकवले नाही तर नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे,
पडो, झडो, मूल वाढो, हे त्रिवार सत्य आहे.
शीलसंवर्धन उत्सव... एक अनोखा उत्सव
शीलसंवर्धन उत्सव-२॰१८ चा उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा शनिवार दि. १० नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता बेलसर येथे मोठ्या हर्षोल्हासात पार पडला.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक सुह्रुद राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाशिकचे आयुर्वेदाचार्य डाॅ. राजन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. डाॅ. राजन पाटील यांचं फारसं कुठेही न सांगितलेलं जीवन हे सर्वांसाठी अखंड प्रेरणेचा झरा आहे. निरागस शिबीरार्थी बालकांसमोर जीवनपट उलगडत असताना कित्येकांच्या जीवनात सुखशांती पोहचविणारा हा देवमाणूस हळवा भावूक झालेला दिसतो.
स्वत:ला झालेल्या कॅन्सर सारख्या असाध्य रोगाबरोबर दोन हात करून केवळ कॅन्सरवर विजय मिळविला इतकंच नाही तर त्यानंतर केलेल्या संशोधनातून आज त्यांच्या नावावर २३ पेटेंटस् ची अधिकृत नोंद झालेली आहे. त्यांच्यापुढे म्हणजे आयुर्वेदातील त्यांच्यापेक्षा जास्त पेटंटची संख्या असलेली फक्त डाबर ही एकच कंपनी आहे. Nobody else.
त्यांच्या २३ पेटेंटेड औषधांपैकी व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त असलेल्या एका औषधाच्या सहाय्याने मोफत ३८ हजार लोकांच्या जीवनातून व्यसने कायमस्वरूपी हद्दपार केलेली आहेत.
आजवर १०५ पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या अवलिया नाशिकभूषण डाॅक्टरची अंगावर शहारे उभी करणारी अन् प्रेरणादायी अशी untold जीवन कहाणी अन् अनेक ह्रृदयद्रावक उलथापालथींनी भरलेली यशोगाथा शीलसंवर्धन उत्सव-२॰१८ च्या निमित्ताने आपणा सर्वांशी शेअर करताना मला खूप खूप आनंद होत आहे. एकूण तीन व्हिडीओ आहेत. हा व्हिडीओ क्र.१ अवश्य ऐका, निवांत वेळ काढून.
26/11/2018
शीलसंवर्धन उत्सव-२०१८
उद्घाटन कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Building No. A6, Flat No. 3, LIG Colony, Sindhunagar, Nigadi Pradhikaran
Pune
411044