तंत्रज्ञानातील बदलासाठी नवसंशोधकांनी पुढे यावे - भूषण अगलगट्टी
MPC NEWS ठळक बातम्या
तंत्रज्ञानातील बदल या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद
एमपीसी न्यूज - तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होत आहेत. मानवाचे जीवनमान उंचावण्यासाठी या बदलाचा जास्तीत-जास्त उपयोग करून घेणे आवश्यक आहे. हे बदल सहज आणि सोपे करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी नवसंशोधकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत पुणे येथील एनविद्या कंपनीचे संचालक भूषण अगलगट्टी यांनी व्यक्त केले.
तंत्रज्ञानांतील बदल या विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर कनव्हर्जन्स इन टेक्नालॉजी (आय2सीटी) 2017 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुणे स्टेशन येथे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील आयईईई आणि सुदुंबरे (जि. पुणे) येथील सिध्दांत इंजिनियरींग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद प्रायोजित करण्यात आली आहे. सिध्दांत इंजिनियरींग कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. चाणक्यकुमार झा यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. शुक्रवार (दि. 7) ते रविवार (दि. 9) दरम्यान तीन दिवस ही परिषद होणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्राचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी भूषण अगलगट्टी बोलत होते. यावेळी बँकॉक येथील एशियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजीचे संशोधक प्रा. वीराकोर्न ओंगासुकुल, मुंबई येथील आयईईईचे सचिव डॉ. विनित कोटक, संशोधक डॉ. प्रा. विरेंद्र भवसार, सिध्दांत इंजिनियरींग कॉलेजचे कार्यकारी संचालक जी. एम. देशमुख, सिध्दांत इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम शिरसाठ, सिध्दांत इंजिनियरींग कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. चाणक्यकुमार झा आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत देशातील विविध राज्यांतील संशोधकांसह बांगलादेश, म्यानमार, बँकॉक, मॉरिशस आदी 29 देशांतील संशोधक सहभागी झाले आहेत. परिषदेत तीन दिवसांत 414 संशोधकांकडून शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. यातील 120 संशोधकांनी शुक्रवारी शोधनिबंध सादर केले.
भूषण अगलगट्टी या वेळी म्हणाले की, तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होत आहेत. मोबाईल फोन सुरुवातीला केवळ बोलणे आणि ऐकणे इतक्यापुरता मर्यादित होता. आता त्याचे नानाविध उपयोग आहेत. खिशातील कॉम्प्युटर म्हणून त्याचा वापर होत आहे. अजूनही त्याच्यातील तंत्रज्ञानात बदलाची गरज आहे. सेटटॉप बॉक्सचेही तसेच आहे. आपण घरात प्रवेश केल्यावर सेटटॉप बॉक्सने विचारले पाहिजे की, कोणते चॅनेल पाहणार आहात, कोणत्या चॅनेलवरील चित्रपट रेकॉर्ड करून ठेवू की, जो तुम्हाला नंतर सवडीनुसार बघता येईल. भारतात घराघरात टिव्ही आहे. मात्र घराघरात कम्प्युटर नाही. हे सर्व टिव्ही ब्रॉडबॅण्डशी जोडल्यास त्याचा वापर संगणक म्हणून करता येईल. त्यामुळे तंत्रज्ञान घराघरात पोहचण्यास मदत होईल. कारचेही तसेच आहे. चालकविरहित कार प्रत्यक्षात रस्त्यावर धावल्या पाहिजेत. जेणेकरून अपघात टळतील. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे. मानवी चुकांमुळे अपघात घडतात, वाहतूक कोंडी होते. त्यासाठी चालकविरहित कार असल्यास हे सर्व टाळता येईल. मात्र हे सर्व सहज शक्य नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे. नवसंशोधकांनी या संधी ओळखून देशाचे नाव उज्वल केले पाहिजे.
डॉ. विनित कोटक यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. विरेंद्र भावसार आणि दिल्ली येथील आयआयटीचे माजी संचालक डी. पी. कोठारी यांनी या वेळी नवसंशोधकांना मार्गदर्शन केले. डॉ. चाणक्यकुमार झा यांनी प्रास्ताविक केले. रश्मी यादव यांनी सूत्रसंचालन केले.
IEEE's I2CT 2014 Conference PUNE
This the very awesome IEEE's i2ct 2014 conference wich is in APRIL 6th to 8th 2014 period at Courtyard By Marriott Hotel Pune India
04/12/2014
04/12/2014
I2CT Conference member who make successful event
Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Website
Address
Pune