01/05/2026
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या संस्कृतीतून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या रक्तातून
मी जपलंय माझं मराठीपण छत्रपतींच्या विचारांतून
मी जपलंय माझं मराठीपण ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी सांप्रदायातून
मी जपलंय माझं मराठीपण पेहराव भाषा अन सणावारातून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या शिक्षणातून वाचनातून लेखणीतून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या वागण्या-बोलण्यातून
होय मी जपलंय माझं मराठीपण माझ्या हट्टी स्वभावांतून
होय मी जपलंय माझं मराठीपण माझ्या मराठी गर्वातून
म्हणून सांगतोय...
दगड झालो तर सह्याद्रीचा होईल
माती झालो तर महाराष्ट्राची होईल
तलवार झालो तर शिवबाची होईल
अन मानव जन्म पुन्हा मिळाला तर आई शपथ !
मराठीच होईल .
अन होय म्हणून माझं आव्हान आहे त्या प्रत्येक प्रांतवादी षंड विचारसरणीने बरबटलेल्या लोकांना, धमक असेल तर माझ्यासारखं जगा मराठी अन वागा मराठी ..
डॉ दिनेश ललवाणी
लीड इंडिया
23/04/2026
“अपघात…नियतीने मला भेट दिलेलं जिवंत पुस्तक”
21 एप्रिल 2025 हा दिवस माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट ठरला. रोजच्यासारखा सुरू झालेला दिवस एका अपघाताने पूर्णपणे बदलून गेला. त्या क्षणी जाणवलं आपण कितीही नियोजन केलं, तरी आयुष्य आपल्याला कधीही थांबवू शकतं.
23 एप्रिलला छोटी शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर सुरू झाला रिकव्हरी चा प्रवास. या प्रवासात सर्वात कठीण गोष्ट शारीरिक वेदना नव्हती, तर स्वतःवर अवलंबून राहता न येणं हे होतं. चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागणं, साध्या गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागणं , प्रत्येक गरजेसाठी इतरांवर अवलंबून राहणं या अनुभवांनी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली .
आज, एक वर्षानंतर मागे वळून पाहताना जाणवतं की, या एका घटनेने आयुष्य अक्षरशः 360 अंशांनी बदललं. आखलेले प्लॅन बदलले, काही स्वप्नं थांबवावी लागली, तर काही नव्याने घडवावी लागली. या काळात एक गोष्ट प्रकर्षाने समजली कि आपलं कोण आणि परकं कोण . आणि हे ओळखायला वेळ लागत नाही, फक्त परिस्थिती लागते.
योगायोग असा की, 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बसून विचार करताना एक गोष्ट स्पष्ट झाली कि आपण कितीही पुस्तकं वाचली, तरी काही गोष्टी फक्त अनुभवच शिकवतो.
हा अपघात माझ्यासाठी एक “जिवंत पुस्तक” ठरला.
या पुस्तकात वेदना होत्या, असहायता होती, पण त्याचबरोबर संयम, आत्मविश्वास आणि पुनरागमनाची शिकवणही होती.
आज मी पूर्णपणे बरा नाही, पण योग्य दिशेने चाललो आहे. वॉकरवरून काठीवर आलो आहे आणि आता लवकरच दोन्ही पायांवर सुरळीत चालू शकेन, असा विश्वास निर्माण झाला आहे. ही प्रगती लहान वाटू शकते, पण माझ्यासाठी ती मोठी आहे.
या संपूर्ण प्रवासातून एकच ठाम निष्कर्ष समोर आला आणि तो म्हणजे जीवनाला कधीच गृहीत धरू नये.
आपण अनेक गोष्टी पुन्हा मिळवू शकतो, पण स्वतःला नाही. म्हणूनच आरोग्य आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष करता येत नाही. विशेषतः रस्त्यावर एक क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराचा विपरीत परिणाम देऊ शकतो.
शेवटी, एवढंच सांगेन कि आपण पुस्तकांमधून ज्ञान घेतो, पण आयुष्य आपल्याला वास्तव शिकवतं.
आणि कधी कधी, ते वास्तवच आपलं सर्वात मोठं पुस्तक ठरतं.
मित्रांनो काळजी घ्या, हसतखेळत आनंदी जगा, आयुष्य खूप सुंदर आहे .
डॉ.दिनेश ललवाणी
07/04/2026
On 28th Feb, I had pointed out that in politics, attention is managed, not random.
Raghav Chadha’s rise through popular questioning was a phase, not the destination.
Now the pause proves the pattern.
Narratives change, but unanswered questions stay.
ये तो होना ही था😉
31/03/2026
“War Outside, Stress Inside: In a World of Noise and Conflict, Why Bhagwan Mahaveer Matters More Than Ever”
- Dr Dinesh Lalwani
29/03/2026
H₂O म्हणजे विज्ञान आणि ‘पाणी’ म्हणजे अंधश्रद्धा ?
असं कुठं असतंय व्हय राव 😉
BBC News Marathi Divya Marathi News18 Marathi
27/03/2026
Shambhuraj Desai
Devendra Fadnavis
Maharashtra Police Headquarter
महालक्ष्मी न्युज सातारा महाराष्ट्र
26/03/2026
जनसामान्यांचा आवाज सभागृहात पोहोचवायचा असेल तर आजच लीड इंडिया मध्ये सहभागी व्हा !