25/02/2024
सौर माघ २६ व २७ शके १९४५ अर्थात दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय 'पंचकोश शिक्षण चिंतन परिषद' ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात संपन्न झाली. महाराष्ट्रभरातील या विषयात काम करणारे, रस असणारे शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, संस्था चालक, शासकीय अधिकारी यात सहभागी झाले होते.
पंचकोशाधारित गुरुकुल पद्धती अनेक ठिकाणी रुजविणारे ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. वामनराव तथा भाऊ अभ्यंकर यांनी लिहिलेल्या 'पंचकोश विकसनातून शिक्षण' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन परिषदेत करण्यात आले. प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात चालणाऱ्या गुरुकुलात सध्या काम करत असलेल्या अध्यापक सदस्यांनी त्यांच्या अनुभवांची भर घालून ही नवीन आवृत्ती सिद्ध केली आहे.
दोन दिवस चाललेल्या या चिंतन परिषदेची सुरुवात ज्ञान प्रबोधिनीचे संचालक वाच. गिरीशराव बापट यांच्या 'शिक्षणातील भारतीय तत्त्वविचार' या विषयावरील बीजभाषणाने झाली. शिक्षण क्षेत्रात सध्या काम करत असणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या, तसेच या विषयाशी आस्था असणाऱ्या कोणालाही हे चिंतन मार्गदर्शक ठरेल. परिषदेत सहभागी होऊ न शकलेल्या लोकांपर्यंतही ते पोहचावे या हेतूने भाषणाची चित्रफीत प्रसारित करत आहोत. पुढील दुव्यावर जाऊन ती पाहता येईल.
वक्ते - वाच. गिरीशराव बापटसंचालक, ज्ञान प्रबोधिनीwww.jpnvnigdi.orghttps://www.facebook.com/jpnv.nigdi/