Maharashtra Balshikshan Parishad

Maharashtra Balshikshan Parishad

Share

Welcome to the Facebook space for Maharashtra Balshikshan Parishad! Follow us to stay updated.

"We envision a perpetual era of sensible children, understanding parents and a responsible society"
In our country, the tender ages from birth to 8 years have been the most neglected when it comes to effective and holistic education. We have just imposed formal education on the early years, without understanding the consequences. Only in recent times have we realized the importance of research-bac

Photos from Maharashtra Balshikshan Parishad's post 19/06/2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि 'ग्राममंगल' संस्थेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अमूल्य शैक्षणिक कार्यास विनम्र अभिवादन! प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणारे शिक्षणतज्ज्ञ अशी प्रा. रमेश पानसे यांची ओळख आहे. त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून आपले संपूर्ण आयुष्य बालशिक्षण आणि ग्रामीण-आदिवासी भागातील मुलांच्या प्रगतीसाठी वाहून घेतले.

महाराष्ट्र बालशिक्षण परिषद आणि शैक्षणिक योगदान:
प्रा. रमेश पानसे यांनी १९९४ मध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम जोशी यांच्यासोबत 'महाराष्ट्र बालशिक्षण परिषद' (Maharashtra Balshikshan Parishad) ची स्थापना केली. पानसे सरांच्या या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षण (Quality ECE practices) पद्धतींविषयी जनजागृती पसरवण्यास मोठी मदत झाली. इतकेच नव्हे तर, ६ वर्षांखालील मुलांसाठी देशातील कदाचित पहिली शैक्षणिक नीती (Education Policy) तयार करण्यात त्यांचा हा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरला.

'ग्राममंगल' आणि नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती:
'ग्राममंगल' संस्थेच्या माध्यमातून त्यांनी डहाणू, ऐना, विक्रमगड, भामरागड आणि पुणे येथे नावीन्यपूर्ण शाळा सुरू करून शिक्षणाचा एक नवा पॅटर्न रूजवला. त्यांच्या शाळांमध्ये वर्गांवर पहिली, दुसरी अशा पारंपरिक पाट्या नसून विषयानुसार वर्ग असतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते आणि शारीरिक हालचालींमुळे कंटाळा येत नाही.

'कृती, आनंद आणि परिसराशी समरसून असणे म्हणजेच खरे शिक्षण' हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला. शिक्षक केवळ मार्गदर्शक असावेत आणि मुलांनी 'करून शिकावे' यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तंत्रज्ञानाची ओळख आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण याविषयीचे त्यांचे विचार आजही शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे ठरत आहेत.

प्रा. रमेश पानसे यांचे शैक्षणिक विचार, व्याख्याने आणि मार्गदर्शन थेट ऐकण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत Ramesh Panse YouTube Channel ला नक्की भेट द्या. Link : https://www.youtube.com/-hg9qn

Photo credit : MKCL

23/05/2026

It takes a village to raise a Child.

Photos from Maharashtra Balshikshan Parishad's post 16/05/2026

'शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट' काळाच्या पडद्याआड! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन


मानवी मनाची गुंतागुंत, सूक्ष्म बारकावे आणि मानसिक आजार (Mental Illness) याबाबत सामान्यांना समजेल अशा सहजसोप्या शैलीत लिखाण करणारे आणि याच गोष्टीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले. त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व, अथक ऊर्जा आणि माणसांवरील प्रेम कायम स्मरणात राहील. कर्करोगाशी झुंज देतानाही त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांचे कार्य आणि विचार पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फे साश्रू नयनांनी डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Photos from Yashwantrao Chavan Centre's post 12/05/2026
Photos from QUEST's post 01/04/2026

सर्व शिक्षकांसाठी उपयुक्त लेख

22/03/2026

महाराष्ट्र बालशिक्षण परिषद मध्यवर्ती पुणेतर्फे शिक्षकांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य जोमाने चालु आहे. या उपक्रमाअंतर्गत कुमार वि.मं. मौजे सांगाव येथे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पालक कार्यशाळा' उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मौजे सांगाव व परिसर भागातून इयत्ता पहिली ते पाचवीचे पालक सहभागी झाले होते.
" बालकांची बौद‌धिक वाढ, विकास आणि त्यांचे शिक्षण" या विषयावरील कार्यशाळेसाठी श्री. योगेश कोडोलीकर सर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुलांचा अभ्यास कसा घ्यावा ? मुलांचे मोबाईल वेड कमी कसे करावे ? अभ्यासातील लक्ष केंद्रित करणेची वेळ कशी वाढवावी ? माध्यम कोणते असावे ? यासारख्या अनेकविध प्ररश्नांवर त्यांनी सखोल चर्चा घडवून आणली. तसेच श्री. योगेश कोडोलीकर यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधला. यामध्ये जवळपास ९० पालक तसेच शाळेतील शिक्षक व्यवस्थापन समिती सदस्य आवर्जून उपस्थित होते.
दोन सत्रात आयोजित सदर कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक सत्राच्या शेवटी उपस्थित पालकांकडून समाधानकारक अभिप्राय मिळाला. उत्स्फूर्तपणे आनंददायी वातावरणात कार्यशाळा पार पडली.

18/03/2026

पद्मश्री अनुताई वाघ :
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी.
अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९२० रोजी मोरगाव येथे झाला. पुण्यामधील मोरगाव येथील त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आईचे नाव यमुनाबाई असे होते. त्या सोनोरी येथील पानसे राजघराण्यातील होत्या. त्यांचे वडील सुधारकी आणि उदारमतवादी होते. त्याचप्रमाणे ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ होते. अनुताईंचे शिक्षण तसे सरळ झाले नाही. त्यामध्ये भर की काय म्हणून की काय १९२३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु त्यांना सासरचे दर्शन फक्त वरातीमध्येच झाले कारण लग्नात त्यांचे वय लहान असल्यामुळे त्या लग्नानंतर आपल्या वडिलांकडेच होत्या. त्यांचे पती मनमाड रेल्वे लाईनवर फिरत असतांचाच त्यांच्या पतीचे म्हणजे जातेगावकर यांचे सहा महिन्यांतच अपघाती निधन झाले आणि त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे किंवा पतीचे दर्शनही त्यांना झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले.
अनुताई यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. त्यानंतर १९२५ मध्ये इगतपुरीमध्ये व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास होऊन त्यात त्या पहिल्या आल्या. पुढे त्यानंतरची तीन वर्षे झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या 'वुमेन्स ट्रेनिग्ज कॉलेज' मधून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यामध्ये त्या पहिल्या आल्या. त्या शिवणकामात आणि मोडी लिपीमध्ये अव्वल झाल्या. १९२७ मध्ये त्या व्हर्नाक्यूलर अंतिम परिक्षेत नासिक जिल्ह्यात प्रथम आल्या. मराठी सातवी झाल्यावर १९२९ मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीस नासिक विभागातील चांदवड (पिंपळगाव) या खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९३३ मध्ये त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन १९३७ मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. तेथे त्यांनी तेरा वर्षे शिकवले. हुजुरपागेत त्यांच्या विद्यार्थिनी होत्या शिरीष पै, डॉ. तारा बनारसे, सिंधू परांजपे, डॉ. सुशीला आगा, मृणालिनी देसाई आणि अन्य विद्यार्थिनींबद्दल त्यांना खूप अभिमान होता.
अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर' सुराज्य' निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. अनुताई ताराबाईबद्दल म्हणतात, “त्या नसत्या तर त्यांचे आयुष्य आज आहे त्यापेक्षा वेगळे झाले असते. म्हणून कृतज्ञता व्यक्त करते”. १९४५ मध्ये ताराबाई यांनी अनुताई यांना' आघाडीचा सैनिक' म्हणून बोर्डी येथे पाठवले आणि तेथेच अनुताई वाघ यांना आयुष्याचा सूर 'सापडला. खेडेगावातील बालवाड्या शास्त्रीय रितीने पण कमी खर्चात कशा चालवाव्यात हा प्रयोग करायचा होता. . १९३३–१९४४ या काळात बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व १९४५–१९७३ या काळात कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात अनुताईंनी अध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर १९७४-७५ मध्ये कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस, १९७६–१९७९ या काळात राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या, अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षणसंस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. स्वाभिमानी, कष्टाळू, प्रामाणिक असणारा, बरेच दिवस डोंगराळ भागात राहिल्याने शहरी सुधारणांपासून वचित असलेला, शहरी संस्कृतीला काहीसा घाबरलेला, व्यसनी असलेला आदिवासी सुधारणे हे काही सोप काम नव्हते पण अनुताईनी ते मोठ्या जिद्दीने, चिकाटीने केले. आणि त्यांच्या अथक परिश्रमाने कोसबाड भागातील आदिवासी पुरता बदलून गेला. आदिवासी भागात ताराबाई आणि अनुताई या दोघीनी भारतातील ग्रामीण बालशिक्षणाच्या इतिहासात कुणी कधी केले नाही असे प्रयोग त्यांनी केले. ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली अनुताईनी मुंबईजवळ कोसबाड येथील आदिवासी वस्तीत पहिल्या बालवाडीची सुरुवात केली. या भागातल खर शिक्षण म्हणजे मुलांना माणसात आणणे, ते काम अनुताईनी अगदी नाक न मुरडता हौसेने केले त्यांना स्वतःला मूल नव्हतेच पण या आदिवासी मुलांच्या त्या आई बनल्या. केवळ अक्षर ओळख न शिकवता त्याना न्हाऊ माखू घालणे, त्यांच्या डोक्यातील उवा काढणे, त्यांच्या खरजेला औषध लावणे, त्यांना संडास मुताऱ्यांचा वापर कसा करायचा ते दाखवणे, इत्यादि अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्या बालशिक्षणाचा संदेश ज्या ज्या मार्गानने पोहचवता येईल तो तो मार्ग त्यांनी अवलंबिला. विशेष म्हणजे हे सारे शिक्षण देत असताना त्यांनी एकही शहरी वस्तू वापरली नाही. तेथील परिस्थितीत जे जे मिळेल त्याचा उपयोग त्यांनी शिक्षणासाठी केला. भिंती म्हणजे फळा, कोळसा म्हणजे खडू तेथे मिळणारे शंखशिंपले, पानेफुले, यांच्या सहाय्याने हसतखेळत गाणी, गोष्टी, सहली यातून शिक्षण देण्याची अभिनव पद्धत त्यांनी सुरू केली. अशा रितीने स्वतंत्र बुद्धिमत्ता, समर्पित वृत्ती, स्त्रीचा भावूकपणा, पुरुषाचा कणखरपणा, अशा विविध स्वभाव पैलूंच्या सहाय्याने अनुताईंनी निराकार अशा आदिवासी समाजाला आकार देण्याचे मौलिक कार्य केले. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि त्यातून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली. तसेच त्यांचा विस्तारही केला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपांत शैक्षणिक साधने तयार करावयाची; त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोचल्या अनुताईंनी तेथे एक नविन सृष्टी निर्माण केली. अनुताईंचं कार्य फक्त शिक्षण विषयाशीच निगडीत नव्हतं. मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाळणाघरे काढली दारुबंदी, विधवा विवाह अशा अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल जवळच्या पाड्यांवर जाऊन तेथील लोकांचं प्रबोधन केलं. आदिवासी जोडप्यांची सामुदायिक लग्ने लावून दिली. केवळ या परिसरात त्यांनी दहा पाळणाघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था, रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, मूकबधिर संस्था, आरोग्यकेंद्रे अशी अनेक संस्था स्थापन केल्या. तिथे गरीब मुलांची राहण्याची, जेवणाची सोय केली, स्वावलंबी व्हावे म्हणून उद्योगाचे शिक्षण दिले. कोसबाडला शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना, उद्योगवर्ग सुरू करण्यासाठी अनुताईंनी अथक परिश्रम घेतले. शिक्षणपत्रिका व सावित्री ही मासिके, तसेच बालवाडी कशी चालवावी, विकासाच्या मार्गावर, कुरणशाळा, सहज शिक्षण ही पुस्तके यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचाराचा प्रसार केला. “कोसबाडच्या टेकडीवरून” हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.
त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर कोसबाडच्या टेकडीवरून, कुरणशाळा, टिल्लूची करामत, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले. अनुताई ७० व्या वर्षीही त्या तरुणाईच्या उमेदीने काम करत होत्या. या वयात त्यांनी दुर्गम आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली आणि ग्राममंगलचे रोपटे लावले, दुर्गम भागात शिक्षणाचे आणि सांस्कृतिक विकासाचे काम अंगावर घेतले आणि सहज शिक्षणाचा एक नवाच प्रयोग केला. अनुताई स्वतः प्रसिद्धीपराङमुख असल्या, तरी त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदूर गेली.
अनुताई वाघ यांना त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने १९७२ साली ‘आदर्श शिक्षिका’ व १९७५ साली ‘दलित मित्र’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना १९७८ साली इचलकरंजीचा ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’, १९८० साली ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ व ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, १९८५ साली ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, १९९२ साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी सन्मानित केले. १९८५ साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले. अनुताईंचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल, असेच आहे.
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ती अशा अनुताई वाघ यांचे १७ सप्टेंबर १९९२ रोजी कोसबाड येथे निधन झाले.

Maharashtra balshikshan parishad

05/02/2026

https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-child-education

बालशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🎓✨ यशवंतराव चव्हाण सेंटर घेऊन आले आहे 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. अधिक माहितीसाठी आजच वेबसाईटला भेट द्या. ही महत्त्वाची बातमी आपल्या शिक्षक मित्रांना आणि गरजू व्यक्तींना नक्की शेअर करा! 📢🤝💡🏫✍️

16/01/2026

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण),
यशवंतराव चव्हाण सेंटर.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बालशिक्षणामध्ये काम करणार्‍या व्यक्तीसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे.

🌀 एकूण १२ फेलोशिप

🕹फेलोशिप कोणासाठी असेल?
महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी व्यक्ती
🔹अंगणवाडी सेविका,
🔹पर्यवेक्षिका (सुपरवायझर)
🔹 बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO)
🔹बालशिक्षणात काम करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्ते
🔹अनुदानित शाळांतील बालशिक्षक
🔹बालशिक्षण विभागप्रमुख
(खाजगी स्वतंत्र शाळा, बालशाळा येथे काम करणाऱ्यांना ही फेलोशिप नसेल)

✅ सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील वेबसाईटवरती क्लिक करावे.
🔗 https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-child-education

➡️ अर्ज करण्याची अंतिम मुदत - १६ फेब्रुवारी २०२६

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Woodland Harmony, Gandhi Bhavan Road, Kothrud
Pune
411038