30/09/2024
बोगस क्लास ला वाचवण्यासाठी समान धोरण धोक्यात.
समान धोरण मुळे सरकारच्या पैशांची बचत होत आहे. ज्या काही संस्थांना या समान धोरण मधून बाहेर पडायचे आहे त्यांना त्यांच्या मर्जीतले क्लास ची निवड करायची आहे. कोर्स ची फिस मार्केट मध्ये 25000 हजार असेल तर या संस्थांना त्यांना तिप्पट पैसे देयचे आहेत आणि नंतर टोल वसूल करायचा असतो. समान धोरण मुळे कोणत्याही संस्थांची स्वयत्ता धोक्यात येत नाही. क्लास ची निवड फक्त उपसमिती करणार आहे आणि त्यांनी ती केली आहे. फक्त काही संस्थांच्या मनमानी कारभार मुळे उशीर झाला आहे. क्लास निवडीचे अधिकार स्वतःकडे घेऊन बोगस क्लास ल टेंडर देणे यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे.
आता पर्यंत यांनी जे काही क्लास निवडले ते दर्जेदार होते का हे पण तपासले पाहिजे. नुसत्या मुलाखती घेतल्या म्हणजे तो विद्यार्थी त्या क्लास ला होता असे नाही त्याने तिथे प्रशिक्षण घेतले होते का ते महत्वाचे आहे. MBA कोर्स साठी मागील वर्षी किती तरी कोटींचे टेंडर दिले गेले एक तरी विद्यार्थी असावा त्यांची चांगल्या कॉलेज ला निवड झाली असेल असा. एक ही विद्यार्थी नाहीये सर्व बोगस आणि शासनाची आर्थिक लूट सुरू होती. आता उपसमिती ने चांगले नियम आणि दर्जेदार क्लास ची निवड केली तर यांना यातून बाहेर पडायचे आहे. मंत्री महोदय साहेबांना विनंती आहे कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. उपसमिती चांगले काम करत आहे. संस्थेच्या दबावाला बळी पडू नका ही नम्र विनंती.
Atul Save MahaJyoti