12/01/2022
https://youtu.be/zUloiVMcy48
अबब...भीमथडी जत्रेत महिला बचतगटांनी कमावले ४५ लाख रु. जाणून घ्या भीमथडी जत्रेबद्दल..
सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून भीमथडी जत्रेची सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातील महिला बचतगट, कष्टकरी, सर्....
12/03/2019
प्रश्न-
A. भारताचा आकस्मिक निधी स्थापन करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत.
B. राष्ट्रपतीच्या वतीने हा निधी वित्त सचिव मार्फत धारण केला जातो.
खालीलपैकी कोणते अचूक आहे?
उत्तर-
१. फक्त A
२. फक्त B
३. A आणि B दोन्ही
४. दोन्हीही नाही
05/08/2017
2016 Rajyaseva CPTP BATCH @यशदा
07/05/2017
Inspirational Success Story of Pranil Gilda (Dy.SP) @ Dnyanadeep Academy's MPSC Felicitation 2017.
Inspirational Success Story of Pranil Gilda (Dy.SP) @ Dnyanadeep Academy's MPSC Felicitation 2017.
26/04/2017
Combined STI, PSI, A*O Advt 2017
1008 POSTS
26/04/2017
Booklist for mpsc
MPSC Simplified | For The Empowerment Of MPSC Aspirants
जर तुम्ही पाहिल्यांदाच या वेबसाईट ला भेट देत असाल तर..
04/04/2017
# स्पर्धेने अर्धे झालेल्या सर्वांना अर्पण...
2 एप्रिल 2017 स्पर्धेने ज्यांचा जीव 'अर्धा' केलाय अशा पोस्ट
भक्तांच्या वारीच पहिलं रिंगण पार पडलं. आता या रिंगनातून
पुढच्या रिंगणापर्यंत किती जातात, आणि किती पुन्हा
अपयश पदरात घेऊन पहिल्याच रिंगणाच्या तयारीला पुन्हा लागतात
हा 3 महिने चघळण्याचा विषय आहे.
सदाशिव पेठ म्हणजे "सुशिक्षित" वारकऱयांची
"आळंदी" आहे. इथे भक्तांची कमी
नाही आणि भक्तावर पोसून पोसून फुगलेल्या देवांची
आणि देवालयांची पण. पोथ्यांचा बाजार इथेही जोमात
चालतो. इथे चातुर्वर्ण्य आहे. पोस्ट मिळालेले 'उच्चवर्णीय',
मुलाखत दिलेले 'क्षत्रिय', मुख्य परीक्षा दिलेले 'वैश्य', आणि
फक्त पूर्व परीक्षा च देणारे 'शूद्र'. फक्त हि चातुर्वर्ण्य
व्यवस्था अगदीच लवचिक आहे. आणि दर वर्षी
तुमचा वर्ण तुम्ही बदलू शकता. जस जस तुम्ही
उच्च वर्णात जाल तसतसे तथाकथित देवालये हा आमचा भक्त..हा आमचा
भक्त असा टाहो फोडतात.
इथेही थोडेसे तुकारामांसारखे संत आहेत जे पोस्ट मिळवून या
व्यवस्थेत प्रामाणिकपणे कार्य करतात. आणि भरपूर 'बडवे' पण जे "आईच्या
कुशीत मातीच्या मुशीत" सारख्या
मंत्र पठणाने कित्येक सामान्य जनतेच्या मनावर गारुड घालून, त्यांना
पोस्टरूपी स्वर्गाचे दार मिळेल अशी
अशी भाषणे देत फिरतात. या आळंदीत
वारकऱयांच्या साधनेसाठी कित्येक 'मठ' आहेत. सर्व
वारकरी या मठात दिवसरात्र साधना, मनन, चिंतन करत असतात.
"हेची दान दे गा देवा...
FACTS चा विसर ना व्हावा"
"आम्हा घरी धन तथ्यांचीच रत्ने,
तथ्यांचीच शस्त्रे करू आता"
"भले तरी देऊ संकल्पनेची लंगोटी
प्रश्नाच्या माथी हानु आकडे"
"मागे उभी prelim, पुढे उभी मुलाखत
माझ्याकडे POST माझी पाहते आहे"
या अशा कित्येक ओव्यांनी इथले वातावरण सदैव भारलेले असते.
इथेही तुकारामासारख्या संताना जे तमाम वारकाऱयांचे आशास्थान
असतात त्यांना छळणारे मंबाजी आहेत. "व्यवस्था, सरकार,
आयोग" हि इथल्या मंबाजी चे प्रतीक. ऍड न
काढणे, पोस्ट कमी काढणे, पेपर फॅक्च्युअल काढणे, वेळेवर
निकाल न लावणे अशा विविध कुरापती करून ते वारकऱ्याना छळत
असतात.
पण गम्मत अशी आहे की इथला विठ्ठल असतो
तो आयोगाचा चेअरमन, आणि हा विठ्ठल बदलत राहतो आणि रिटायर पण होतो.
पण सर्व वारकऱयांची या विठ्ठलावर भक्ती
किती आणि त्याच्याबद्दल भीती
किती हा कीर्तनाचा विषय आहे. या विठ्ठलाचा दरारा
असा की........
"आले त्याच्या मना
पोस्ट कुणाची निघेना".
आणि या अशा आळंदीत समस्त वारकरी ,
"तुका म्हणे आता उधार तू होई
मज ठेवी पायी संतांचिया".....
या मागणीच्या तालावर दिवसरात्र,
"लोक म्हणे आता CLEAR तू होई,
मज ठेवी पायी आयोगाच्या"....
या घोषात दिवसरात्र झिंगलेले असतात.
पण खंत एवढीच कि इथे खूप कमी जणांना
"मुक्ती" मिळते. न बाकीच्यांना आयुष्यभर अपयश
डोळ्यात घेऊन जगण्याची "सक्ती"
मिळते......फक्त "सक्ती".
"बोला आयोग वर्दे पोस्ट कधी भेट्टेल.."
17/03/2017
प्रकाश पोळ यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड
ओंड, ता. कराड येथील प्रकाश लालासाहेब पोळ यांची एमपीएससी मधून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. प्रकाश पोळ यांचे शिक्षण एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी आणि एम. ए. राज्यशास्त्र विषयात झाले आहे. त्यानी २०१३ पासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात ते पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र अंतिम गुणवत्ता यादीत त्यांची निवड होवू शकली नाही. मात्र खचून न जाता त्यानी जिद्दीने प्रयत्न सुरु ठेवले. २०१४ आणि २०१५ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत त्यानी मजल मारली. परंतु मुलाखतीसाठी त्यांची निवड होवू शकली नाही. २०१६ च्या राज्यसेवा परीक्षेत मात्र त्यानी पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे तीनही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करुन ४८५ गुणांसह उपमुख्य कार्यकारी हे वर्ग अ चे पद पटकावले. विशेष म्हणजे पोळ याना मुलाखतीमध्ये अव्वल ७० गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सबंध जिल्ह्यातून कौतुक होत आहे. प्रकाश पोळ हे अनेक सामाजिक चळवळीतही कार्यरत असून समाजहितासाठी त्यानी इंटरनेटवर सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालवला आहे. सहा वर्षात जवळपास सव्वासहा लाख वाचकानी पोळ यांच्या ब्लॉगला भेट दिली आहे. आपल्या यशाचे श्रेय पोळ यानी आपले वडील, कुटुंबीय आणि संघर्षाच्या काळात मदत करणाऱ्या मित्राना दिले आहे. प्रकाश पोळ यांचे वडील कै. लालासाहेब पोळ हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या मुलाने प्रशासकीय अधिकारी बनून वंचितांसाठी काम करावे अशी त्यांची इच्छा होती. वडीलांचे स्वप्न पूर्ण करुन मी त्याना खरी श्रद्धांजली वाहिली असे प्रकाश पोळ म्हणाले. चार वर्षे पुण्यात राहून प्रकाश पोळ यानी जिद्दीने अभ्यास केला. आपल्या चार वर्षांच्या कष्टाचे चीज झाल्याची पोळ यांची भावना आहे. यापुढे प्रशासनात अनेक आव्हानाचा सामना करुन लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे पोळ यानी ठरवले आहे. प्रकाश पोळ पुण्यातील कॅ. अमित वर्मा अभ्यासिकेत अभ्यास करत होते. त्यांच्या या यशाबद्दल अभ्यासिकेच्या संचालिका पुणे मनपाच्या महपौर मुक्ता टिळक यानी विशेष अभिनंदन केले आहे.
09/12/2016
स्पर्धा परीक्षेचा चळवळीचे प्रणेते, स्टडी सर्कलचे संचालक डॉ आनंद पाटील आणि आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ना. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने व ना. धनंजय मुंढे यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2016 च्या वयोमर्यादेत वाढ.