GDC ACADEMY

GDC ACADEMY GDC IAS ACADEMY is a One Stop Destination to Crack UPSC & MPSC. Maharashtra's Largest Learning Platform.

We are providing complete caching Offline and Online for UPSC, MPSC & COMBINE Group B & C Competitive Exams

संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करणे  बाबत स...
22/11/2025

संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करणे बाबत स्मरण पत्र!

#दिव्यांग #दिव्यांगकर्मचारी #कर्मचारी #अधिकारी
#प्रमाणपत्र #शिक्षक #महाराष्ट्रपोलीसभरती

बुद्धीप्रामाणियवादी विचारवंत व थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
14/07/2025

बुद्धीप्रामाणियवादी विचारवंत व थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मी नुकतीच रावण ही कादंबरी वाचली. त्यावर माझे मत. रावण – एक असामान्य विद्वान, एक कुशल योद्धा, एक तत्त्वज्ञ राजा. महादेवाल...
09/05/2025

मी नुकतीच रावण ही कादंबरी वाचली. त्यावर माझे मत.

रावण – एक असामान्य विद्वान, एक कुशल योद्धा, एक तत्त्वज्ञ राजा.
महादेवाला प्रसन्न करणारा भक्त, शिवतांडव स्तोत्राचा रचनाकार, आयुर्वेद, राज्यशास्त्र, तंत्र, संगीत, आणि वेदांचा ज्ञाता. त्याच्या अंगी असंख्य गुण होते, ज्यामुळे तो केवळ एक राक्षसराज नव्हता – तो एक संपूर्ण संस्कृतीचा प्रणेता होता.

‘रावण’ ही कादंबरी वाचताना मन सुन्न झालं. शरद तांदळे सरांनी रावणाच्या व्यक्तिमत्त्वाची जी खोल, अभ्यासपूर्ण आणि समतोल मांडणी केली आहे, ती मनावर गारूड करते. रावण फक्त खलनायक नव्हता, तर तो एक तत्त्वज्ञ, ज्ञानी राजा, संस्कृतीचा रक्षक होता.

'रावण' ही केवळ एक कादंबरी नाही, तर ती एक वैचारिक प्रवाह आहे, जो रावण या बहुविध व्यक्तिमत्त्वाच्या छायाचित्रांना उजळवतो. शरद तांदळे यांनी अत्यंत सर्जनशीलतेने आणि प्रगल्भतेने रावणाच्या आयुष्याचा विविध अंगांनी घेतलेला अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. आजवर फक्त खलनायक म्हणून ओळखल्या गेलेल्या रावणाचा एक अभ्यासू, तत्त्वज्ञ, योद्धा, संस्कृतीचे रक्षण करणारा राजा आणि न्यायप्रिय नेता म्हणून उलगडा करण्याचा हा प्रयत्न मनाला चटका लावतो आणि विचारप्रवृत्त करतो.

कथेतील प्रत्येक ओळ ही रावणाच्या अंतर्मनात डोकावण्याची संधी देते. विशेषतः रावणाच्या भावविश्वाची, त्याच्या दु:खाची, संघर्षांची आणि त्याच्या कर्तृत्वाची सजीव मांडणी वाचकाला थक्क करून टाकते. बुद्धिबळ, रुद्रवीणा, आयुर्वेद, तंत्र, राज्यशास्त्र या विविध विषयांतील त्याचे ज्ञान केवळ वर्णनापुरते न राहता, त्या त्या पात्रांच्या संवादांतून प्रभावीपणे समोर येते.

रावणाने लंकेसारखं समृद्ध राज्य उभारलं, जिथे त्याच्या प्रजेला सर्व सुखं लाभत होती. त्याने दैत्य, दानव, आणि उपेक्षित जमातींना एकत्र करून एक स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली व्यवस्था निर्माण केली. त्याच्या प्रत्येक कृतीमागे बुद्धिमत्तेचं, तत्वनिष्ठेचं, आणि स्वाभिमानाचं प्रतिबिंब होतं.

हो, त्याच्याकडून चूक झाली – सीतेचं अपहरण त्याने केलं. पण त्या चुकीची किंमत त्यानेही मोजली. परंतु त्याने कधीच तिचा अपमान केला नाही, हेही तेवढंच खरं.

शरद तांदळे यांची ही कलाकृती एक ऐतिहासिक दृष्टिकोनातून नवी मांडणी करते आणि पारंपरिक दृष्टिकोनाला आव्हान देते. ही कादंबरी रावणला समजून घेण्यासाठी आणि पूर्वग्रहमुक्त दृष्टीने पाहण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरते.

रावणदहन करताना रावणाचे दुर्गुण जाळा, पण त्याच्या गुणांची राख उडवू नका.
कारण इतिहास हा फक्त विजेत्यांनी लिहिलेला असतो, पण सत्य त्या राखेमध्ये दडलेलं असतं...

"रावण" ही कादंबरी वाचल्यावर तुमच्या मनात एकच प्रश्न उरतो — रावण खरोखरच खलनायक होता की misunderstood नायक?

‘रावण’ ही केवळ एक कथा नाही, तर रावणाला नव्याने समजून घेण्याची संधी आहे. वाचायलाच हवी, मनात घर करेल अशी कादंबरी!

गणेश चव्हाण (GDC Sir)
संचालक: GDC IAS ACADEMY

GDC ACADEMY
#मीरावण #रावणदहनपूर्वीचा_विचार #खलनायककीमहानायक ूर्वीचा_प्रश्न #संस्कृतीचा_रक्षक Sharad Tandale - Voice Of Youth

🌺 महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक वंदन! 🙏संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण जीवन समाज...
23/02/2025

🌺 महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक वंदन! 🙏
संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अशिक्षितपणा आणि अस्वच्छतेविरुद्ध लढा देण्यासाठी समर्पित केले. त्यांनी स्वच्छता, शिक्षण आणि परोपकार हे समाजाच्या विकासाचे मुख्य घटक असल्याचे सांगितले.

🔹 संत गाडगेबाबांचे समाजप्रती विचार:
✅ अंधश्रद्धा निर्मूलन: त्यांनी लोकांना अंधश्रद्धा, जातीयता आणि रूढी-परंपरांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.

✅ शिक्षणाचा प्रसार: "शिका आणि शिक्षण द्या" हा त्यांचा महत्त्वाचा संदेश होता. 🎓 शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, यावर त्यांनी भर दिला.

✅ स्वच्छता आणि आरोग्य: त्यांनी गावोगाव फिरून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवले आणि स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली. 🧹

✅ समाजसेवा व परोपकार: गरिबांची सेवा, उपासमार झालेल्यांना अन्नदान 🍛 आणि अनाथांसाठी मदत हे त्यांचे जीवनकार्य होते.

✅ श्रमप्रतिष्ठा: श्रमाला प्रतिष्ठा देऊन परिश्रमातून समाजनिर्मिती करण्याचा संदेश त्यांनी दिला. 💪

आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना आणि कार्याला स्मरून समाजसेवेची प्रेरणा घेऊया. ✨

🙏 जय गाडगे बाबा! 🙏


♦️लेखा कोषागारे भरती 2024..        पद - कनिष्ठ लेखापाल                   pay scale S10अर्ज करायची लिंक👇👇👉 नाशिक विभाग लि...
22/02/2025

♦️लेखा कोषागारे भरती 2024..

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇👇

👉 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

👉 अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

👉 कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो केव्हाही "शत्रूंच्या अथवा मुस्लिम स्त्रिया" शिवरायांच्या हाती सापडल्या व त्यांचे रक्षण करण...
22/02/2025

मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो केव्हाही "शत्रूंच्या अथवा मुस्लिम स्त्रिया" शिवरायांच्या हाती सापडल्या व त्यांचे रक्षण करणारा कुणी जवळचा व्यक्ती नसेल, तर त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येई पर्यंत शिवराय स्वतः त्यांच रक्षण करत असत. संदर्भ- पराक्रमापलीकडले शिवराय...

#शिवराय_असे_शक्तिदाता 🙏❤️🙏
Ganesh D Chavan

१ फेब्रुवारी १६८९:- संभाजी राजांना संगमेश्वर येथे मोगलांकडुन छापा घालून कैद करण्यात आले.१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख न...
18/02/2025

१ फेब्रुवारी १६८९:- संभाजी राजांना संगमेश्वर येथे मोगलांकडुन छापा घालून कैद करण्यात आले.
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्‍वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्‍वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका, जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या सरदारांनी घेतली होती, तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी महाराजांचीही औरंगजेब व त्याच्या पराक्रमी म्हणवल्या जाणा-या सेनापती व सरदारांनीही घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठयांचे राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकतो. असे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते. त्यासाठी इ.स. १६८२ मध्ये मोठया इर्षेने ७ लाखांची फौज घेऊन तो महाराष्ट्रात आला होता. या लढयात त्याने आपले तीनही मुलगे शाहजादा मुअज्जम, शाहजादा आज्जम,सुल्ताना कामबक्ष,नातू तसेच अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते. त्यावेळी केवळ ५० हजाराचे सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीने मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिली, ती अतुलनीय अशीच होती. संभाजी राजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी योजना आखण्यासाठी औरंगजेबाने शाही दरबार बोलवला. त्या दरबारात औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे संभाजी राजांच्या विरोधात लढण्याची मोहिम त्या सरदारांकडून कोणीतरी स्वीकारावी यासाठी प्रस्ताव ठेवला. परंतु महापराक्रमी संभाजी राजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही.त्यावेळी संताप अनावर झाल्याने औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉश (पगडी) काढून फेकून दिला आणि संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर किमॉश चढविणार नाही अशा प्रतिज्ञा केली. ८ वर्षे ८ महिने छत्रपती संभाजी राजे कायम रणांगणावर मुघलांच्या सैन्याशी लढत होते. एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता. त्याकाळात ७ वर्षे औरंगजेब आपल्या दरबारात डोक्यावर किमॉश न घालता बोडका होऊन बसत असे. त्याकारणाने त्याच्या मनातील छत्रपती संभाजी राजांबद्दलचा द्वेष खदखदत होता.

इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड, वादुस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुंभ, दौंड मार्गे पेडगाव, ता.श्रीगोंदा येथील किल्ल्यावर आणले. त्याच दरम्यान औरंगजेबाची छावाणीही अकलूज वरून ती किल्ल्या जवळील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली या छावणीत सुमारे आठ लाख सैनिक व जनावरे असा लवाजमा संगती होता.औरंगझेबाला ही खबर देण्यात आली,”हुजुर,संभा कैद हो गया”
मात्र प्रथम औरंगझेब भडकला आणि आल्या हेराला औरंगझेब म्हणाला,”क्या बकते हो? पीके तो नहीं आये? संभा गिरफ्तार हो गया?”
“हां हुजुर,संगमेश्वरी मुकर्रबखानने दस्त कर लिया उन्हें……”
त्याच क्षणी औरंगझेबने फरमान सोडले,” लाया जाय उसे शानो शौकत से…..त्याला पोलादी साखल दंडानी जखडवा,उन्टाला बांधा,विदुशकी झबली घाला,घुंगर असलेली टोपी अड़कवा त्याच्या डोक्यात……आणि वाजत-गाजत धिंड काढा त्याची..! समजू द्या या महाराष्ट्राला की औरंगझेबाने कैद केलाय संभाजीला….! “

त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला’ म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल’, असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.

संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या’, असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते.शिवाजीराजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी काशीवरुन गागा भट्टांना आणुन राज्याभिषेक पार पडला. सहाजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकुन त्यांना बदनाम करण्याची मोहिम सातत्याने चालुच ठेवली.संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते.संभाजी राजांवर जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कवी कलशांवर करायचा जेणेकरुन कवी कलशांचे हाल पाहुन संभाजी राजे गहीवरुन शरण येतील परंतु जीवलग मित्रांना वेगळे करुन पाहिले, आमिषे दाखविली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्‍या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील.

संदर्भ – विनीत यांच्या ब्लॉगवरून काही भाग घेतला आहे.

गोपाळ हरी देशमुख (1823-1892) हे एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना 'लोकहितवादी' या टोपणनावाने ओळखले जात...
18/02/2025

गोपाळ हरी देशमुख (1823-1892) हे एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना 'लोकहितवादी' या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी 1848 पासून 'प्रभाकर' या वृत्तपत्रात *'लोकहितवादींच्या 108 पत्रां'*च्या माध्यमातून समाजसुधारणा, स्त्री-शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि विज्ञानवादी दृष्टिकोन याविषयी लेखन केले. ✍️📖

कार्य:

1. सामाजिक सुधारणा: समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता याविरोधात लेखन आणि जनजागृती. 🚫🌍

2. स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार: त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला आणि बालविवाह, सतीप्रथा याविरोधात आवाज उठवला. 📚👩‍🎓💡

3. शेती सुधारणा: त्यांनी आधुनिक शेतीचे महत्त्व सांगितले आणि शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. 🌾🚜

4. पत्रकारिता आणि लेखन: त्यांनी 'प्रभाकर', 'ज्ञानोदय', 'इंडिक टाइम्स' यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये सामाजिक विषयांवर लेखन केले. 📰✒️

5. प्रार्थना समाज: ते महादेव गोविंद रानडे आणि इतर समाजसुधारकांसोबत प्रार्थना समाजाशी संबंधित होते. 🙏🌟

गोपाळ हरी देशमुख यांनी समाजसुधारक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आणि महाराष्ट्राच्या विचारसरणीवर अमीट छाप सोडली.

- GDC Sir

स्वामी रामानंद परमहंस – महान संत आणि भक्ती चळवळीचे प्रणेते 🙏🔹 परिचय:स्वामी रामानंद परमहंस हे १४व्या-१५व्या शतकातील एक मह...
18/02/2025

स्वामी रामानंद परमहंस – महान संत आणि भक्ती चळवळीचे प्रणेते 🙏
🔹 परिचय:
स्वामी रामानंद परमहंस हे १४व्या-१५व्या शतकातील एक महान संत, भक्ती चळवळीचे प्रचारक आणि समाजसुधारक होते. त्यांनी उत्तर भारतात रामभक्तीचा प्रचार केला आणि जातिभेदाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांच्या शिकवणींमुळे अनेक भक्त संत जन्माला आले, ज्यांनी भारतीय समाजाला भक्तीमार्गाच्या दिशेने प्रेरित केले.
🔹 जन्म व प्रारंभिक जीवन:
🕉 स्वामी रामानंद यांचा जन्म अंदाजे १३६० च्या सुमारास वाराणसी (काशी) येथे झाला.
📚 लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची ओढ होती आणि त्यांनी गुरु राघवानंद यांच्याकडून वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतली.
🏯 त्यांनी रामभक्तीचा प्रसार केला आणि "रामनाम" हा मोक्षाचा मार्ग आहे, असा प्रचार केला.
🔹 कार्य आणि शिकवण:
✅ जातिभेदाच्या विरोधात आवाज: स्वामी रामानंद यांनी जातीव्यवस्थेच्या अडथळ्यांना न जुमानता भक्तीसाठी सर्वांना समान संधी दिली.
✅ सर्वसमावेशक भक्तीमार्ग: त्यांनी शिकवले की, ईश्वरप्राप्तीसाठी जन्म किंवा जातीपेक्षा भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे.
✅ रामनामाचा प्रसार: त्यांनी रामनामाचा जप करण्यास सांगितले आणि रामभक्तीमार्फत मोक्षाचा मार्ग दाखवला.
✅ संवाद आणि कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश: लोकांना त्यांनी सोप्या भाषेत उपदेश दिले, ज्यामुळे सर्वसामान्य लोक त्यांची शिकवण आत्मसात करू शकले.
🔹 प्रसिद्ध शिष्य:
स्वामी रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महान संत निर्माण झाले, जसे की –
👤 संत कबीर – समाजसुधारक आणि निर्गुण भक्तीचे प्रचारक
👤 संत रविदास – सामाजिक समता आणि प्रेमाच्या शिकवणी देणारे संत
👤 भक्त धन्ना – शुद्ध भक्तीचा आदर्श
👤 भक्त पीपा – राजवाडा सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारलेले राजा
🔹 योगदान आणि प्रभाव:
🌍 भक्ती चळवळीचे अग्रदूत – त्यांच्या विचारांमुळे समाजात धार्मिक समरसता निर्माण झाली.
🔆 जातिभेदविरहित भक्ति परंपरा – त्यांचा संदेश होता की, ईश्वरप्रेमात कोणताही भेदभाव असू नये.
📖 साध्या भाषेत उपदेश – त्यांनी संस्कृत ऐवजी लोकभाषेत शिकवणी दिल्या, ज्यामुळे सामान्य लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचले.
🔹 महासमाधी:
स्वामी रामानंद यांनी १४७० च्या सुमारास महासमाधी घेतली.
🔹 त्यांच्या जयंती निमित्त आपण काय शिकावे?
🎯 भक्तीमध्ये समर्पण आणि श्रद्धा हवी, जात-पात नव्हे.
🎯 सर्वधर्म समभाव आणि समानतेचा स्वीकार.
🎯 रामनाम जप करून आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग अनुसरणे.
🎯 स्वतःमध्ये चांगले बदल घडवून समाजात सकारात्मकता पसरवणे.
🚩 स्वामी रामानंद परमहंस जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏
"रामभक्ती हाच सर्वोच्च मार्ग, प्रेम आणि समतेचा संदेश पसरवा!" 🌿

- GDC Sir

🚩
🙏
🌿
❤️
🕉

📖
🌍
🚩


माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐माता रमाबाई आंबेडकर (1897-1935) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
07/02/2025

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐

माता रमाबाई आंबेडकर (1897-1935) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या त्यागामुळे आणि सहकार्यामुळेच बाबासाहेबांनी आपले शिक्षण आणि सामाजिक क्रांतीचे कार्य पुढे नेऊ शकले. त्यांचे संपूर्ण जीवन हे कठीण परिस्थितीशी झगडत व्यतीत झाले, पण तरीही त्यांनी बाबासाहेबांना अखंड पाठिंबा दिला.

बालपण आणि विवाह

- रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी मुंबईतील वडाळा येथे एका गरीब कुटुंबात झाला.
त्यांचे वडील भिकू धनपाळ हे कधी नाविक, तर कधी मजूर म्हणून काम करत असत.

- 1906 मध्ये केवळ 9 वर्षांच्या रमाबाईंचा विवाह 15 वर्षीय भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला.

संघर्षमय संसार

- बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी विदेशात असताना रमाईंनी प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. गरिबी, अन्नाचा तुटवडा, आर्थिक अडचणी असूनही त्यांनी संसाराचा गाडा नेटाने चालवला.

- रमाईंमुळेच बाबासाहेब आपले शिक्षण पूर्ण करू शकले.

- माता रमाईने बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा दिला.

- GDC Sir
-------
Join: https://t.me/GDCAcademy

#माता_रमाबाई_आंबेडकर
#रमाई_स्मरण
#महिला_सशक्तीकरण
#आदर्श_त्यागमूर्ती
#भीमराय
#डॉआंबेडकर
#सामाजिक_क्रांती
#जयभीम

🔥 पंडित मोतीलाल नेहरू 🔥----------------जन्म: 6 मे 1861, आग्रा, उत्तर प्रदेशनिधन: 6 फेब्रुवारी 1931, लखनऊव्यवसाय: वकील, स...
06/02/2025

🔥 पंडित मोतीलाल नेहरू 🔥
----------------
जन्म: 6 मे 1861, आग्रा, उत्तर प्रदेश
निधन: 6 फेब्रुवारी 1931, लखनऊ
व्यवसाय: वकील, स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महत्त्वाचे योगदान:

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष (1919, 1928)
- नेहरू रिपोर्ट (1928) तयार करणारे प्रमुख नेते

स्वराज पक्षाची स्थापना (1923)
असहकार आंदोलनात (1920-22) सक्रीय सहभाग

ब्रिटिश सरकारविरोधात संघर्ष करून स्वातंत्र्यलढ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली

पंडित मोतीलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

- GDC Sir
-------------------------
Join: https://t.me/GDCAcademy










Address

GDC ACADEMY, Opt. Bhagini Nivedita Bank, Anand Nagar, Old Sangvi
Pune University
411027

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919960187595

Alerts

Be the first to know and let us send you an email when GDC ACADEMY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to GDC ACADEMY:

Shortcuts

Share

Category