Marathi Dept. Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya, Phulambri

Marathi Dept. Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya, Phulambri MARATHI DEPARTMENT, Shri Sant Savta College Phulambri.

अनुभवापेक्षा कोणत्याही लेखक कवीला अनुभूती महत्वाची असते-प्रिया धारूरकर फुलंब्री दिनांक ०५ मार्च २०२५रोजी मराठी भाषा गौरव...
11/03/2025

अनुभवापेक्षा कोणत्याही लेखक कवीला अनुभूती महत्वाची असते-प्रिया धारूरकर

फुलंब्री दिनांक ०५ मार्च २०२५
रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक, कवयित्री, प्रिया धारूरकर उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख, डॉ. राजश्री पवार यांनी केले.
यावेळी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
बोलत असतांना प्रिया धारूरकर म्हणाल्या की, अवतीभोवतीच्या सहितत्वाचा शोध साहित्यिक, कवी घेत असतो. विद्यार्थ्यांनी या अवती -भोवतीच्या वातावरणात रममान होऊन समाजाच्या व माणसांच्या वेदनांचा हुंकार बनले पाहिजे. हा हुंकार साहित्यिक, कवी होताना दिसतात. तसेच वेदनांच्या जाणीवा लेखक, कवी आपल्या साहित्यकृतीतून पेरत असतो. पुढे बोलताना धारूरकर विद्यार्थ्यांना म्हणाल्या की, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तसेच जाणीवा समृद्ध करायच्या असतील तर अभ्यास करावा. कारण अनुभवापेक्षा कोणत्याही लेखक कवीला अनुभूती महत्वाची असते. या अनुभूतीतूनच साहित्याचा जन्म होतो. त्यासाठी जाणीवा वृंद्धीगत कराव्या लागतात. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी केला.
तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. संदीप जगताप यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

26/02/2025

विद्यार्थ्यांनी कवितांची रचना करत साहित्याच्या वाचनाची गोडी लावून घ्यावी-प्रा. डॉ. प्रभाकर बागले

अभिजात भाषा गौरव सोहळा संपन्न
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ शनिवार अभिजात भाषा गौरव सोहळा व वांग्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. ज्येष्ठ समीक्षक सो. प्रभाकर बागले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस.आर. टकले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.राजश्री पवार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय वाड.मय मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.अश्विन रांजणीकर यांनी करून दिला. प्रा. प्रभाकर बागले यांनी मराठी व पाली भाषेला अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. व शुभेच्छाही दिल्या. मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपली मातृभाषा म्हणजे आपल्याला अस्तित्वाची जाण करून देणारी आणि आपला स्वाभिमान जागवणारी आपली जननी आहे. त्यामुळे आपली भाषा जगण्यासाठी व वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी भाषेचा वापर हा जीवनाच्या सर्वच स्तरांवर करणे क्रमप्राप्त असल्याचे बोलत असताना डॉ. प्रभाकर बागले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेत व्यक्त व्हावे. विद्यार्थ्यांनी कवितांची रचना करावी कवी हा संवेदनशील असतो. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्याची कला त्याच्या अंगी असते. त्यायोगे व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले विचार मातृभाषेत मांडण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन प्रा. डॉ. प्रभाकर बागले यांनी केले. पाली भाषेच्या अभ्यासक प्राध्यापक डॉ. भारत शिरसाट यांनी पाली भाषेचा इतिहास याप्रसंगी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य, डॉ. एक. आर. टकले यांनी केला.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. त्याबरोबरच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार -संत साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा फुलंब्री दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध...
26/02/2025

एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार -संत साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा

फुलंब्री दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचालित, श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री व यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड आणि प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने 'संत साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी वेबिनारचे उदघाटन अमरावती विभागाचे सहसंचालक, प्रो.डॉ. केशव तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बीजभाषक म्हणून नाशिक येथील संत साहित्याचे अभ्यासक, प्रो. डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संचालक, डॉ. सर्जेराव ठोंबरे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव, मा.श्री निवृत्ती गावंडे उपस्थित होते.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी केले. तर वेबिनारची भूमिका मराठी विभागप्रमुख, डॉ. राजश्री पवार यांनी मांडली.
उदघाटनप्रसंगी बोलत असताना प्रो. डॉ. केशव तुपे म्हणाले की, संत साहित्य हा एक विचार आहे. या विचारात एका प्रकारची भाषिक मूल्यता दडलेली आहे. म्हणून हा विचार समाजात रुजावा हा प्रयत्न संत साहित्य करतांना दिसते. तसेच आजच्या शैक्षणिक बदलासंदर्भात विवेचन करत असताना भारतीय व पाश्च्यात शैक्षणिक परंपरेविषयी विवेचन केले. तसेच संतांची परंपरा ही भारतीय ज्ञान देणारी परंपरा आहे. याचा आवर्जून अभ्यासक, संशोधकांनी विचार करावा. असे मत व्यक्त केले.
बीजभाषाण प्रसंगी बोलत असताना प्रो. डॉ. दिलीप धोंगडे म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती ही वारकऱ्यांची संस्कृती आहे. ही एक प्रकारची परंपरा आहे. संतांचे कार्य हे क्रांती घडविणारे आहे. आणि ही क्रांती संत विचारांनी त्या त्या वेळी घडवून आणलेली सुद्धा आहे. हे आपणास विसरता येणार नाही. पुढे बोलताना डॉ. धोंडगे म्हणाले की, वेद, उपनिषदांची जागा संत साहित्याने घेतली. परंतु वेद हे संपन्न आहेत पण कृपन आहेत असेही मत व्यक्त केले. यासोबतच वेदाला पर्याय म्हणून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यामधून संत साहित्याची निर्मितीप्रक्रिया झालेली दिसते. संत साहित्याचे मूल्य समजमनात आजच्या घडीला महत्त्वाचे वाटते आहे. असेही मत व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीत डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी उपस्थित अभ्यासक, संशोधक यांना समाज घडणीत संत विचारांचे योगदान कसे महत्त्वाचे राहिले आहे. याअनुषंगाने विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप मा. श्री निवृत्ती गावंडे यांनी केला. बोलत असताना श्री गावंडे यांनी नालंदा विद्यापीठाची आठवण करून दिली. वारकरी संप्रदायातील लोकांना कुठल्याच प्रकारचा अभिमान असत नाही. त्यांचा अभिमान भक्तीतून गळून पडलेला असतो. ही माणसे जीवनमूल्ये जगत असतात. त्यांची सामाजिकता दृढ बनत असते. या संदर्भाने आपले मत व्यक्त केले.
वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात मराठी भाषा विभागप्रमुख, व भाषा संशोधन केंद्र संचालक, विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी भेदा भेद भ्रम अमंगळ ही परंपरा निर्माण करण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. तसेच या समाजाला संत विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. ही खरी आमची मुळातली परंपरा आहे. ही संत विचारांची परंपरा आपल्याला जपावी लागणार आहे. याच परंपरेतून संस्कृती संवर्धन आणि ज्ञान जतन करता येईल. हे ज्ञान जतन करताना आमची देणगी अयुर्वेद आहेत. हेही विसरता येणार नाही. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथील प्राचार्य, डॉ. अशोक पंडित यांनी केला. त्यांनी वैदिक काळापासून असलेली ज्ञानाची परंपरा सांगितली. पुढे ते असेही म्हणाले की, आपण पश्चिमात्यीकरणाच्या स्वीकारामुळे आपण भारतीय ज्ञान परंपरेपासून दूर गेलो आहोत. असे होऊ नये. तर अध्यात्म, विज्ञान आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची आपणास सांगड घालावी लागेल. म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा काय? आहे याचाही शोध यामध्यमातून घ्यावा लागेल. असे प्रतिपादन केले.
वेबिनारच्या तिसऱ्या सत्रात महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील मराठी विभागप्रमुख, प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे उपस्थित राहिले. यांनी 'संत तुकाराम यांचे साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावर बोलत असताना भारतीय तत्वज्ञानाचा धांडोळा घेतला. तुकारामांनी खऱ्या अर्थाने आपल्या साहित्य निर्मितीतून समृद्ध अशी भारतीय ज्ञान परंपरा पुढे नेहलेली आढळते. संत तुकाराम यांनी त्यांच्या लेखनातून अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली. याबरोबरच संत तुकाराम यांचे तत्वज्ञान हे जनकल्याणासाठी असलेले दिसून येते. मुळात तुकाराम महाराजांचा पिंड हा भावनाप्रदान राहिलेला आहे. नवीन पिढीला त्यांचे विचार आणि तत्वज्ञान आजही लागू पडताना दिसते आहे. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रो. डॉ. कैलास इंगळे यांनी केला.
वेबिनारच्या समारोप सत्रात प्रो. डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सुप्रसिद्ध कीर्तनकार, मंचर, पुणे यांनी बोलत असताना सांगितले की, भारतीय परंपरेचा मुलस्रोत वेद आहेत. परंतु, व्यक्ती, कालपरत्वे स्थित्यंतरे निर्माण झाली. पुढे ते असेही म्हणाले की, नामस्मरण, सदाचार हा वारकऱ्याचा आचारधर्म आहे. संत साहित्यात विज्ञान आहे. ते विज्ञान आपणास जगता आले पाहिजे. कारण संत साहित्य हे कालग्राह्य आहे. हे विवेचन करत असताना संत साहित्याची ज्ञान प्रबोधन परंपरा व आधुनिक परंपरा सांगितली.
या समारोप सत्राचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे पालक संचालक, डॉ. प्रदीप जब्दे यांनी केला. बोलत असताना डॉ. जब्दे म्हणाले की, संत म्हणजे काय? याचा अर्थ समजावून सांगितला. संत साहित्य हे माणसांच्या व समाजाच्या विकाराची मशागत करते. कारण संत साहित्याचा पाया नैतिकता आहे. संत साहित्य हे माणसांचे विचार, आचार व संस्कार बदलण्याचे काम करते. तसेच जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन संत विचार समाजात काम करतो. ही आजच्या काळात महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. त्यामुळे या विचारांचा अंगीकार प्रत्येकाने करावा. असे सूचित केले.
उपस्थित सर्व मान्यवर, अभ्यासक, संशोधक यांचे आभार प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी मानले.
प्रस्तुत वेबिनारचे सूत्रसंचलन अनुक्रमे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजूळ, प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी केले. प्रस्तुत वेबिनारसाठी साधारणतः ७५ ते ८० अभ्यासकांची आभासी पद्धतीने उपस्थिती होती.

लेखक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले वाचन आणि अनुभवविश्व् समृद्ध करणे महत्त्वाचे-प्रोफेसर डॉ. जिगे फुलंब्री दिनांक ११ जा...
26/02/2025

लेखक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले वाचन आणि अनुभवविश्व् समृद्ध करणे महत्त्वाचे-प्रोफेसर डॉ. जिगे

फुलंब्री दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकदिवसीय नवोदित लेखकांसाठीच्या कार्यशाळे'चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, प्रो. डॉ. सर्जेराव जिगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बीजभाषक म्हणून प्रसिद्ध समीक्षक तथा विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख, प्रो. डॉ. महेश खरात उपस्थित होते. कार्यशाळेच्या उदघाटन सत्रात अध्यक्ष म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे पालक संचालक, डॉ. प्रदीप जब्दे तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे प्रास्ताविक, मराठी विभागप्रमुख, प्रो. डॉ. राजश्री पवार यांनी केले.
उदघाटनप्रसंगी बोलत असताना डॉ. सर्जेराव जिगे म्हणाले की, शब्दाला अर्थ असतो का? तर शब्दाला अर्थ असत नाही असे माझे मत आहे. कारण शब्दाची निर्मिती ही वस्तु निर्मितीच्या नंतरची असते. शब्दाला अर्थ समाज देत असतो, अर्थात आपण अर्थ देत असतो. प्रत्येक माणूस लिहू शकतो परंतु, प्रत्येक माणूस लेखक होऊ शकेलच असे नाही. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी वेगळं असायला पाहिजे. ते काय? तर प्रत्येक माणसाला व्यक्त होता आले पाहिजे. व्यक्त होता येणं म्हणजे लिहिणं असे मी समजतो. हे करत असताना शब्दांना विशिष्ट वळण देणं, त्या शब्दांना विशिष्ट ठिकाणी बसवणं या बाबी जमल्या की, कुणालाही लेखक होता येतं. म्हणून विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना ज्यांना लेखक व्हावे असे वाटते त्यांनी आपले वाचन आणि अनुभवविश्व् समृद्ध करणे महत्त्वाचे आहे. आणि ते आपण करावं असे मत व्यक्त केले.
बिजभाषक म्हणून बोलत असताना डॉ. महेश खरात म्हणाले की, कोणतेही लेखन हे विनाअर्थाचं असत नाही. तर साहित्याची सर्व रचना ही अर्थावर व साहित्याच्या सहितत्वावर अवलंबून असते. पुढे ते असेही म्हणाले की, माणूस जन्माला येत असताना समज घेऊन येतो. आणि हीच समज आपल्याला साहित्यातून मांडावी लागते. तसेच विविध साहित्य प्रकारांवरील चिंतन मांडले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे पालक संचालक, डॉ. प्रदीप जब्दे यांनी केला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात एम. जी. एम. विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागप्रमुख, डॉ. राजू सोनवणे व त्यांचा चमू यांनी नाटक व नाट्यसंहिता लेखन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नाटकाची संहिता म्हणजे काय? तिचे लेखन कसे करावे यासंबंधी विवेचन केले. व दोन विनोदी प्रहसन करूनही दाखविले.
या सत्राचा अध्यक्षीय समारोप राजर्षी शाहू महाविद्यालय, पाथ्री येथील डॉ. युवराज गहेराव यांनी केला.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात कविता लेखन व कथालेखन या विषयावर प्रा. डॉ. वीरा राठोड यांनी कविता ही आपल्या आतून आली पाहिजे. काळाच्या कुठल्याही टप्प्यावर गेलं तरी माणसाच्या भल्यासाठी माणसाने गायलेले जे जे गाणे आहे, ती म्हणजे कविता. आणि म्हणून त्यात जे सत्व दडलेलं असतं ते मानवी कल्याणाचं सूत्र असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यातून आपण आपले लेखन समृद्ध करावे. असे मत व्यक्त केले.
या सत्राचा अध्यक्षीय समारोप इंद्रराज महाविद्यालय, सिल्लोड येथील मराठी विभागप्रमुख, डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी केला.
कार्यशाळेच्या समारोप सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना डॉ. ज्ञानेश्वर शेजूळ यांनी साहित्य लेखन तंत्र आणि साहित्याची भाषा या अनुषंगाने आपले विचार व्यक्त केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले यांनी केला.
एकूणच कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीन माळेगावकर, प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी केले. कार्यशाळेसाठी उपस्थिती सर्व मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील एकूण ६५ विद्यार्थी, सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

25/03/2022

पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचालित,
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री
“सद्यस्थितीत संत साहित्याची प्रासंगिकता”
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
(दिनांक-२५ व २६ मार्च २०२२)
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित दिनांक २५ आणि २६ मार्च २०२२ या दोन दिवसांत पार पडणाऱ्या “सद्यस्थितीत संत साहित्याची प्रासंगिकता” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दिनांक २५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता होत आहे. ही राष्ट्रीय परिषद दोन दिवसांत एकूण चार सत्रात संपन्न होईल.
या परिषदेत होणाऱ्या चिंतन / मंथनाचा आस्वाद घेवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व संशोधक/ अभ्यासकांचे पंडित दीनदयाळ शिक्षण संस्था व श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत...!
या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला उघडून (क्लिक करून) सहभागी व्हावे. असे अवाहन करत आहोत.

https://us02web.zoom.us/j/5867502505?pwd=GeMfguZUC5nwEdtZolxVNtZo8YgpnE.1
Meeting ID: 586 750 2505
Passcode: marathi

विनीत,
प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले
प्रा. डॉ. राजश्री पवार (मराठी विभागप्रमुख)
प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ (सहय्यक प्राध्यापक)

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

श्री संत सावता माळी महाविद्यालयात वाचन दिन साजरा.फुलंब्री दिनांक १९ जून २०२१ रोजी शासन परिपत्रकानुसार ‘’राष्ट्रीय वाचन द...
19/06/2021

श्री संत सावता माळी महाविद्यालयात वाचन दिन साजरा.

फुलंब्री दिनांक १९ जून २०२१ रोजी शासन परिपत्रकानुसार ‘’राष्ट्रीय वाचन दिन’’ कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीनुसार नियमांचे पालन करून महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी. एन. पनिकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘’वाचन दिन’’ साजरा करण्यात आला. पी. एन. पनिकर हे केरळ मधील ग्रंथालयाच्या चळवळीस प्रारंभ करणारे शिक्षक व समाजसेवक होते. त्यांनी केरळमध्ये १९२६ मध्ये आपल्या गावी ‘’सधनधर्म’’ ग्रंथालय स्थापन करून ग्रंथालय चळवळीस प्रारंभ केला. १९४५ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली ४७ ग्रामीण ग्रंथालये स्थापन झाली. या संस्थेचा नारा होता, वाचन करा आणि ज्ञान वाढवा. पनिकर यांनी गागोगावी जावून वाचनाचे महत्त्व व शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली.

त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘’वाचन दिवस प्रतिज्ञा’’ घेवून ‘’वाचन दिन’’ साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले, ग्रंथपाल, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. संजीवकुमार पांचाळ, डॉ. सुरेश मुंढे, श्री दयानंद कांबळे, श्री प्रेम चव्हाण, श्रीं विनोद तुपे, श्री जयराम जाधव, श्री रत्नाकर जाधव, श्री साईनाथ भालेराव व विध्यर्थी कोव्हीड-१९ नियमांच्या अधीन राहून उपस्थित होते.--
Dr. Sanjivkumar Suryakant Panchal,
Dept. of Marathi,
Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalay,
Phulambri Dist. Aurangabad 431111
Mobile 9890628061

Address

Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya, Phulambri
Phulambri
431111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Dept. Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya, Phulambri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Marathi Dept. Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya, Phulambri:

Shortcuts

Share

Category