26/11/2016
आज साद प्रकाशनाचे चालू घडामोडी हे पुस्तक प्रकाशित झाले
We also publish study material for competitive exams and books on patriotic heroes and freedom fight
26/11/2016
आज साद प्रकाशनाचे चालू घडामोडी हे पुस्तक प्रकाशित झाले
03/11/2016
STI जाहिरात:-१८१जागा
28/10/2016
जी सॅट-१८-
----------------------------
* भारताच्या जीसॅट-18 या उपग्रहाचे फ्रान्समधील कैरो येथून उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
* जीसॅट-18 इस्रोकडून अवकाशात सोडला गेलेला विसावा उपग्रह आहे.
* एरियन 5 व्हीएन 231 या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-18चे प्रक्षेपण झाले
* जी सॅट-१८-बरोबर ऑस्ट्रेलियाचा मस्टर हा उपग्रहही अवकाशात सोडण्यात आला.
* वजन 3404 किलो आहे व त्यात 48 संदेशवहन ट्रान्सपॉंडर आहेत. एरियनस्पेससाठी ही 280वी मोहीम होती.
* या उपग्रहाचा उपयोग भारताच्या माहिती दूरसंचार सेवेला होणार आहे.
सर्जिकल स्ट्राईक;-
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारतीय लष्कराने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. पाकिस्तानी दहशतवादी �एलओसी� पार करुन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने �सर्जिकल स्ट्राईक� केले.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमके काय ?
सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणचीच शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही.
पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले जाते. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई. सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठे नुकसान होऊ नये असा प्रयत्न असतो. हव्या असलेल्या ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच �सर्जिकल स्ट्राईक� होय.
साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणार्या बॉम्बहल्ल्यात अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराची मोठी हानी होते. भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत �सर्जिकल स्ट्राईक� केले.
जपानी शास्त्रज्ञ ओहसुमी यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल:-
--------------------------------------------------------
* जपानमधील शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळविला आहे. जिवाणूंमध्ये वाढणाऱ्या परावलंबी विषाणूंवर (ऑटोफाजी) केलेल्या संशोधनाबद्दल ओहसुमी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ऑटोफाजी ही पेशी जैवशास्त्रातील एक मूलभूत प्रक्रिया आहे. मानवी आरोग्य आणि रोगांशी त्याचा निकटचा संबंध आहे.
ज्या पेशी विस्कळीत झाल्याने कंपवात आणि मधुमेह होऊ शकतो अशा पेशींना त्याच प्रकारच्या पेशी खातात, त्यांच्याशी संबंधित ही प्रक्रिया आहे.
साद प्रकाशनाकडून
लवकरच प्रकाशित होत असलेल्या चालू घडामोडी २०१७ या पुस्तकातून साभार:-
------------------------
* भारतात कर्नाटक राज्यात पहिले आरोग्य न्यायालय जुलै 2016 मध्ये स्थापन करण्यात आले. आरोग्य न्यायालयांची सर्व प्रथम स्थापना न्यूझीलँड येथ मांडली गेली
* जळगावची केळी,मराठवाड्यातील केसर आंबा,भिवापूर (नंदुरबार) मिरची,डहाणू घोलवड चा (पालघर) चिकूआणि आंबेमोर (पुणे) तांदूळ या पाच शेतमालाना भौगोलीक निर्देशक चिन्ह मिळाले.यापूर्वी महाराष्ट्रातील १८ शेतमालास जीआय मिळाले असून एकून २३ जीआय मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले
* मार्च २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली . या योजनेनुसार सन २०२२ पर्यंत देशात ५० कोटी कुशल मनष्यबळ तयार करण्याचे लक्ष निश्चित केले
* अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील ‘कस्र-ए-स्तोर’ या नूतनीकृत राजवाडय़ाचे मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी संयुक्तरीत्या उद्घाटन केले.
* महाराणा प्रताप यांच्या ४७५ व्या जन्मदिनी महाराणा इंडिया रिझर्व बटालियन अशी नवी फलटण स्थापन करण्यात आली
* भारतातील इंटरनेटच्या वापराने अमेरिकेला मागे टाकले असून दुसर्या स्थानावर झेप घेतली. सध्या भारतात 35 कोटी लोक इंटरनेट वापरतात. चीननंतर भारताचा इंटरनेट वापरात दुसरा क्रमांक लागतो भारत ही इंटरनेटची जगातील सर्वात जलदीने वाढणारी बाजारपेठ आहे
* एखादी व्यक्ती ,कुटुंब,वर सामाजिक बहिष्कार टाकणे किवांवाळीत टाकणे या प्रकारांनारोखण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेत महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे सरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले.अशा प्रकारचा कायदा आणून सामाजिक बहिष्कार हा प्रकार गुन्हा ठरविणारे महाराष्ट्र हे देशांतील पहिले राज्य ठरले .या कायद्यातील तरतुदीनुसार संबधीत गुन्हेगारांना ३ वर्ष तुरुंवास आणि १ लाख रु.दंड अशी तरतूद
* देशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्राचा नववा क्रमांक लागतो. परंतु परदेशी पर्यटकांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन्ही श्रेणीत तमिळनाडू प्रथम क्रमांकावर
* स्वच्छ भारत अभियानां‘तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर राज्यात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला
* डेंगी या आजारावीरोधातील जगातील पहिली सार्वजनिक लसीकरण मोहीम फीलीपाईन्समध्ये सुरु करण्यात आली
* डीसीबी बँकेने आधार सक्षम एटीएम बंगळूर येथे सुरु केले.हे एटीएम मशीन आधारकार्डवर कार्यान्वीत होईल.या एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाटी एटीएम कार्डची आवश्कता असणार नाही
* जगातील पहिले ई टॉयलेट तिरुअनंतपुरममधील पुल्लूविला या गावात उभारण्यात आले
* 105 वर्षांच्या कुंवरबाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’च्या अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. कुंवरबाई यांनी आपल्या घरात शौचालय बांधण्यासाठी आपल्या बकरी विकल्या होत्या.
* स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केल्यापासून निर्माण झालेली पश्चिम बंगा या राज्याचे अधिकृत नाव "बंगाल‘ असे करण्यात आले. मंजूर झालेल्या ठरावानुसार, "पश्चिम बंगाल‘चे नाव आता बंगाली भाषेत "बांगला‘, इंग्रजीमध्ये "बेंगाल‘ आणि हिंदीमध्ये "बंगाल‘ असे असणार आहे.
* ओडीशातील राष्ट्रीय भात संशोधन संस्था , कटक येथे सीआर तांदूळ ३१० ही भाताची नवीन जात विकसित केली .या प्रजातीमध्ये ११% प्रधीने आहेत
* पर्यटन प्रोत्साहनासाठी 2014-15 चा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला