18/07/2022
ज्येष्ठ राष्ट्रीय विचारवंत, भारत विकास संगम चे संस्थापक तथा भा. ज.पा.चे राष्ट्रीय महासचिव मा. गोविंदाचार्य जी यांना संस्था कुटुंब प्रमुख श्री प्रमोद देशमुख यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल, माहिती देऊन संस्था भेटीचे निमंत्रण दिले.
"भारत विकास संगम" च्या खजुराहो येथील दोन दिवसीय कार्यशाळेत मा. गोविंद जी पूर्णवेळ उपस्थित होते.
"समाज आगे, सत्ता पीछे" असा विचार घेऊन भा. वि. संघ गेल्या २० वर्षांपासून देशभर काम करत आहे.
BJP Maharashtra Bharat Vikas Sangam
03/04/2022
*गावच्या सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘ग्राम विकास आराखडा’ संदर्भातील यशदा पुणे मार्फत देण्यात येणारे क्षमता बांधणीचे प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यातील 253 सरपंचांनी केले पूर्ण.*
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत ही महत्त्वाची संस्था आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यात येतो. गावच्या नागरिकांच्या नागरी सुविधांपासून सुदृढ आरोग्यांचा भार ग्रामपंचायतींच्या खांद्यावर असतो. यामुळेच ग्रामपंचायतीना विविध माध्यमातून भरीव निधी देण्यात येतो. यापैकीच वित्त आयोग हा महत्वाचा निधीस्त्रोत आहे. सध्या पंधराव्या वित्त आयोगाचा थेट ऐंशी टक्के निधी ग्रा. पं. च्या खात्यावर दिला जात आहे. या निधीचा विनियोग करताना गावच्या गरजांचा प्राधान्याक्रम ठरवावा तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करावा असा दंडक आहे. यासाठी ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्राम विकास आराखडा (जीपीडीपी ) तयार करणे गरजेचे आहे. व हा सर्व विनीयोग करण्यासाठी नवनिर्वाचित सरपंचांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा),पुणे यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील एकूण 253 नवनिर्वाचित सरपंचांना कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे दि.२५ फेब्रु ते २६ मार्च दरम्यान एकूण ५ सञात हे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थांना से..नि.शिक्षण उपसंचालक श्री.गोविंद नांदेडे यांच्यासह तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.
05/02/2022
Sanskriti Samvardhan Mandal | Nurturing Plants and Children with Equal Concern
Sanskriti Samvardhan Mandal (SSM) has been active in integrated rural development since 1959. Started with a small school, SSM has now grown into a 200 acres development hub. The focus of its activities has always been on the deprived rural communities, especially women and girls.
04/02/2022
*शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाचे कौशल्य आत्मसात केले तर उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादनासह गुणवत्ता पूर्ण बियाणे निर्मिती सहज शक्य ....*
दि.2 फेब्रुवारी रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जारीकोट
ता.धर्माबाद येथील सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर
कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडी कडे असणारा कल लक्षात घेता दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी करावयाच्या उपाय योजना,
माती परिक्षणावर आधारित खताचे व्यवस्थापन,सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, एकात्मिक कीड नियंत्रण व कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी यावर प्रा.वेंकट शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
तर धर्माबाद तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री.सुरेंद्र पवार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व याचा लाभ घेण्याचे आवाहन केले, या वेळी कृषी विभागा मार्फत सुरक्षित कीटकनाशके फवारणी साठीच्या किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी घरच्या घरी सुरक्षित किट तयार करण्याचे प्रात्यक्षिक ही शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले.
उत्कर्ष लर्निंग सेंटर,कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण विभागाचे श्री.संतोष उलगडे यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत चालणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली.या दरम्यान सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या प्रक्षेत्राची पाहणी केली गेली.
30/01/2022
Sanskriti Samvardhan Mandal | Nurturing Plants and Children with Equal Concern
Sanskriti Samvardhan Mandal (SSM) has been active in integrated rural development since 1959. Started with a small school, SSM has now grown into a 200 acres development hub. The focus of its activities has always been on the deprived rural communities, especially women and girls.
28/01/2022
60 दिवसात घडवा स्वतःचे करियर आपल्याला स्वतःचे व्यवसाय करण्यास सुवर्ण संधी .
workers training -manpower # # responsibility
28/01/2022
*मौ.तळणी ता.बिलोली येथे कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.*
दि.२१ जानेवारी २०२२ रोजी बिलोली तालुक्यातील मौ.तळणी येथे कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व कृषि विभाग आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी बिलोली तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री.पवार यांनी उन्हाळी सोयाबीन चे दर्जेदार बिजोत्पादन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले,
कृषि विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण विभाग चे प्रमुख प्रा.व्यंकट शिंदे यांनी कृषि विभागाच्या योजना,एकात्मिक पिक पद्धतीचा अवलंब करुन गटशेतीच्या माध्यमातून शेतकय्रांनी आपले आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
कृषि किटकशास्ञज्ञ डॉ.कृष्णा अंभुरे यांनी हरभरा व सोयाबीन पिकातील एकात्मिक किड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तसेच सुमीटोमो कंपनीचे श्री.आवळके सर यांनी किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास सरपंच,कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांसह,50 शेतकरी उपस्थित होते.
24/01/2022
*उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन बिजोत्पादनाला प्राधान्य देऊन येत्या खरीप हंगामाची सोयाबीन बियाण्यांची गरज घरच्या बियाण्यांतून भागवावी.*
- श्री.रविशंकर चलवदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नांदेड.
यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीपेक्षा अधिक राहीले त्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी क्षेञावर पेरणी झाली आहे त्याच बरोबर अती पावसामुळे तूर आणि हरभरा पिकातील मर रोगाचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी हंगामात सोयाबीन बिजोत्पादनास प्राधान्य देत आहेत, त्यांनी त्याची व्यवस्थित काळजी घेतल्यास खरिपास नवीन वाणाचे दर्जेदार असे सोयाबीन बियाणे घरच्या घरी उपलब्ध होईल असे श्री.रविशंकर चलवदे यांनी कृषि विभाग आत्मा व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कासराळी येथे आयोजित कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले.
या प्रसंगी उपस्थित शेतकय्रांना उपसंचालिका सौ.माधुरी सोनवणे यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढवण्यासोबतच कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासंबंधी आवाहन केले....
या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र सगरोळीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा.व्यंकट शिंदे यांनी उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केलं तर कृषि किटकशास्ञ विभागाचे विषय विशेषज्ञ डाॅ.कृष्णा अंभुरे यांनी सोयाबीन व हरभरा पिकातील किडींच्या व्यवस्थापना विषयी माहिती दिली.यावेळी बायर या कंपनीचे व्यवस्थापक श्री विठ्ठल माने यांनी कीटकनाशकांच्या सुरक्षित फवारणी विषयी माहिती दिली.करोना च्या सर्व निर्बंधांची काळजी घेऊन कार्यक्रम घेण्यात आले,यावेळी 50 शेतकरी उपस्थिती होते.
10/01/2022
*संस्कृति संवर्धन मंडळ,उत्कर्ष लर्निंग सेंटर,सगरोळी व ब्ल्यु स्टार इंडिया लि.यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या प्लंबिंग अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी ब्ल्यु स्टार इंडियाच्या हैद्राबाद येथील बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी पुढील १५ ते २० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी आज पाठविण्यात आले आहे.*
06/01/2022
*विषमुक्त शेती काळाची गरज- श्री.ज्ञानेश्वर बोडखे*
कृषि विभाग आत्मा नांदेड व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन व संवादाचे आयोजन पंचायत समिती देगलुर येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिनव फार्मस क्लब पुणे चे प्रवर्तक श्री.ज्ञानेश्वर बोडखे व जलसाक्षरता केंद्र यशदा चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक श्री.सुमंत पांडे हे होते.
आपल्या मनोगतात श्री.बोडखे यांनी शेतकय्रांना कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा विषमुक्त शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वळण्यासंबंधी आवाहन केले.
तसेच एक बातमी वाचली आणि नोकरी सोडून दहा लाख कर्ज काढून शेती करण्याचा निर्णय घेतल्यापासून ते कोट्यवधींची उलाढाल कशी झाली हा प्रवास त्यांनी सर्वांना सांगितला. या प्रवासात त्यांनी एकट्याने शेती न करता सामूहिक शेतीचा मार्ग निवडला तर यशस्वी होता येत यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी यशदा चे सेवा निवृत्त कार्यकारी संचालक श्री.सुमंत पांडे,संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीचे चेअरमन श्री.प्रमोद देशमुख,के.व्ही.के.सगरोळी शिक्षण व प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा.व्यंकट शिंदे,तहसीलदार श्री.नरवाडे साहेब,उपविभागीय कृषि अधिकारी श्री.सोनटक्के साहेब व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.