Aatmabal Mahotsav

Aatmabal Mahotsav We, the students of all batches of Aatmabal, Celebrate the past 13 years on the 5th and 6th of Nov Give happiness !!

Hari Om,

Its been 13 Years since the day Param Pujya Bapu and Nandaai initiated the Aatmabal Class for ladies. The aatmabal class has made a huge difference in the lives of all the students right through the 13 years, teaching us to become a wholesome and successful person in all walks of Life. This Year We, the students of all batches of Aatmabal, Celebrate the past 13 years on the

5th and 6th of November, in the AATMABAL MAHOTSAV, 2011. Our dearest Nanda Aai's words ---" अवघाचि संसार सुखाचा करीन "
Get Happiness !! Spread happiness !!" are the foundation stone of the Aatmabal Mahotsav and it is entirely due to the love, strength and hard work of Param Pujya Nandaai that this Aatmabal Mahotsav was possible. She gave us the motto 'आनंदाचा उत्सव व उत्सवाचा आनंद.' and we shall endeavor to live up to that very motto. An event like never before, an event featuring over a thousand Aatmabal Sakhis across all ages, languages and hometowns will unfold soon. We the daughters of Nandaai are geared up for it......... Are You ??????

18/04/2026

आत्मबल २०२५-२६ कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय

आत्मबल स्नेहसंमेलन २०२६ !!

सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट आणि श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने, परमपूज्य नंदाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या स्त्रियांच्या आत्मबल वर्गाच्या तेविसाव्या पुष्पाचे स्नेहसंमेलन रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत जल्लोषात पार पडले. दरवर्षीप्रमाणेच या सोहळ्याने प्रेक्षकांच्या ओंजळीत आनंदाची उधळण केली.

नुकत्याच स्थापन झालेल्या श्री अनिरुद्ध प्रथम पुरुषार्थ धाम येथे विराजमान असलेल्या श्री पराम्बा देवीच्या चरणी वंदन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. तिच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण सोहळा एका विशेष आध्यात्मिक उंचीवर जाऊन पोहोचला.

आजच्या काळातील सर्वाधिक प्रकर्षाने जाणवणारा प्रश्न म्हणजे आजची Gen Z पिढी आणि तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी आधीची पिढी यांच्यातील सूक्ष्म द्वंद्व !! या प्रश्नाला समर्थपणे भिडणारं ' ए आई ' हे नाटक पुढे सादर करण्यात आलं. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सुद्धा निर्विवाद असणाऱ्या आईच्या संस्कारांचे आणि तिच्या मायेच्या शिकवणीचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष ठसा तर उमटवलाच पण जाता जाता अगदी हळुवारपणे नव्या पिढीच्या डोळ्यांत अंजन सुद्धा घातले .

पुढे इतिहासाची सांगड घालण्यासाठी हा सोहळा पुढे सरकला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांच्या प्रभावी नाट्यरूप सादरीकरणातून अधिकच उजळून निघाला.

मंडळी, आपल्या आयुष्यात ,आपल्या आजूबाजूला ,आपले नातेवाईक, मित्रपरिवार असे अनेक जण असतात पण तरीही या माणसांच्या गर्दीत खऱ्या अर्थाने आपल्याला जीव लावणारं, आपल्या सुखदुःखात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहणारं असं कोणी असतं का हो ? मनापासून विचार केला, तर उत्तर बहुधा ‘नाही’ असंच येतं , हो ना? खरी गरज असते तेव्हा आपल्या सोबतीला असतो तो फक्त एकाकीपणा.

परंतु बापू आयुष्यात आल्यानंतर मात्र अशी कोणतीही एकाकीपणाची पोकळी उरत नाही आणि याची प्रचिती आपण प्रत्येक क्षणी अनुभवत असतो , नाही का! याच बापूंच्या सख्यत्वाची आणि त्यांच्या अखंड सोबतीची जाणीव करून देणारा ' सोबत ' हा एक हृदयस्पर्शी नाट्यप्रयोग या सोहळ्यात सादर करण्यात आला.

आपल्या आयुष्यात सद्गुरुतत्त्वाच्या अस्तित्वामुळे घडणारे आमूलाग्र आणि सकारात्मक परिवर्तन या नाटिकेने अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे अधोरेखित केले. या सादरीकरणाने प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श केला आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील बापूंची सोबत नव्याने जाणवली.

मंडळी, या दर्जेदार नाट्यसादरीकरणांसह आपल्या भारतवर्षातील प्रमुख राज्य असलेल्या गोव्याच्या समृद्ध संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या लोकनृत्यावर ठेका धरायची संधीही या सोहळ्याने दिली. ' विविधतेत एकता ' या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राला साजेसा हा नृत्याविष्कार वातावरण अधिकच खुलवत गेला .

नाटक आणि नृत्य यांच्या सुरेख संगमातून रंगतदार बनलेला हा सोहळा अखेरीस येऊन विसावला तो विठ्ठलाच्या वारीच्या भक्तिरसात. टाळ-मृदुंगाच्या निनादात वारीची अनुभूती घेत, अखेरीस ' नारदाच्या गावाला ' जाण्याचा भावमय क्षण अवतरला - तोही एकमेकांच्या सहवासात.

नेहमीप्रमाणेच अभंगांच्या तालावर साऱ्यांचीच पावले नकळत थिरकली आणि समस्त वातावरण भक्तीभावचैतन्यात ओथंबून गेलं .

या सगळ्यावर कळस चढवावा , तसे , चटकदार सामोसे, मऊ लुसलुशीत केक आणि सोबत फक्कड चहा-कॉफी या साऱ्यांनी सोहळ्याची रंगत आणि लज्जत दोन्हीही द्विगुणित केली.

मंडळी , आपण उपासना करतो , प्रार्थना करतो , बापू जे काही पितृवचनात सांगतात ते सगळं आपापल्या परीने चुकत माकत आचरणात आणण्याचा प्रयास करतो , पण तरीही या व्यवहारी जगात कधीतरी अडखळायला होतं , काहीतरी चुकतंय असं वाटतं , जग ज्या वेगाने चहूबाजूंनी आमूलाग्र बदलांना सामोरं जात पुढे सरकत आहे, त्या गतीशी जुळवून घेता न येण्याचं शल्य मनाला सतत कुरतडत राहतं , भक्तीसेवेतही अपेक्षित प्रगती साधता येत नाही याची बोचणी अंतर्मनाला स्पर्शून जाते आणि मग नकळतच स्वतःलाच प्रश्न पडतो - ' मीच उभा का बाहेर? ' पण अभंगातून मिळालेलं या प्रश्नाचं साधं, सरळ आणि सार्थ उत्तर म्हणजे ' फक्त अनिरुद्ध गावें ' . पण ' फक्त अनिरुद्ध गावें ' म्हणजे नेमकं काय ? तर मंडळी, याचं जिवंत उत्तर म्हणजे हा आत्मबल स्नेहसंमेलनाचा संपूर्ण सोहळा. अक्षरशः ‘अथ’ पासून ‘इति’ पर्यंत या सोहळ्याने याच भावनेचा प्रत्यय देत, याच सत्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजवली. प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हा सोहळा बापूंशी, त्यांच्या कार्याशी आणि बापूभक्त म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांशी नव्याने जोडून गेला. खरं तर केवळ यंदाच नव्हे तर प्रत्येक वर्षीच हा सोहळा आपल्याला नव्या ऊर्जेने नारदाच्या गावाकडे घेऊन जातो आणि सदैव भक्तिभावचैतन्यात राहण्यासाठी आवश्यक ते बळ प्रदान करतो.

प्रत्यक्ष नंदाई , बापू आणि दादा यांच्या सहवासात हा सोहळा अनुभवता येतो म्हणून प्रत्येकासाठीच तो खूप खास ठरतो , पण आत्मबल पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्री साठी तर हा सोहळा म्हणजे स्वतःला आरशात बघावं तसा अनुभव असतो. मैदानात उभारलेलं स्टेज , त्यावर लावलेला आत्मबल स्नेहसंमेलनाचा फलक (बॅनर ), खुर्च्यांवर बसलेला प्रेक्षकवर्ग , स्टेज वर दिसणारे अनेक माईक, या स्नेहसंमेलनाची केलेली तयारी, ' मोठ्या आवाजात बॊलायचंय ' हा टीचर्स चा सातत्याने मिळणारा सल्ला , त्या एका महिन्यातल्या तयारीत मैत्रिणींबरोबर घालवलेले गोड क्षण , एक ना अनेक..... प्रत्येकीच्या मनात दाटून येणाऱ्या असंख्य आठवणी आणि स्टेज च्या समोर बसून झालेली त्यांची उजळणी ...हे सगळं मनाला इतकं भरून टाकतं की, त्याची उब पुढच्या कार्यक्रमापर्यंत सहज साथ देत राहते.

तर असा हा सोहळा - नंदाईच्या प्रत्येक लेकीच्या सक्षमपणाचा आनंदोत्सव साजरा करणारा, स्त्रीशक्तीप्रती खरा आदरभाव जागवणारा, निराशेकडून आशेकडे वाटचाल करण्याची दिशा दाखवणारा आणि ' अवघाचि संसार सुखाचा करीन ' या बापूंच्या संकल्पाला साकार रूप देत स्त्रीशक्तीला सबळ करणारा.

हा सोहळा म्हणजे खरं तर आई बापू दादा आणि मोठी आई यांच्या आशीर्वादासह स्त्रीच्या सक्षमतेच्या प्रवासाची पहिली ठाम पायरी - आत्मविश्वास, स्वाभिमान आणि अंतर्बळ यांच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल ! या वाटेवर प्रत्येक लेकीला दृढपणे उभं करण्यासाठी, तिच्यातील सामर्थ्य जागं करण्यासाठी आणि तिला योग्य दिशा देण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या ,आत्मबल शिबीराच्या सर्वेसर्वा असणाऱ्या परमपूज्य नंदाईला मानाचा मुजरा.

त्याचबरोबर, आईच्या या उदात्त आणि विधायक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या आत्मबल पुष्प २३ मधील सर्व वीरांचे त्याचबरोबर आत्मबलच्या सगळ्या टीचर्सचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हे स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या कार्यात आपापल्या परीने खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा कृतज्ञतापूर्वक आभार.

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध

श्वेतावीरा लोटलीकर, आत्मबल पुष्प २०.

18/04/2026

आत्मबल २०२५-२६ कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय

“आत्मबल – स्त्री, कुटुंब आणि समाजासाठी प्रेरणा” ✨

आजचा दिवस फक्त एक कार्यक्रम नाही…आजचा दिवस खास आहे आत्मबल जागवण्याचा.घरातली एक साधी स्त्री…जिच्या हातात रोजच्या संसाराची जबाबदारी असते,
जिचं आयुष्य स्वयंपाकघर, मुलं, कुटुंब आणि कर्तव्य याभोवती फिरत असतं…
तीच जेव्हा आत्मबलाने उभी राहते,
तेव्हा फक्त तीच नाही, तर संपूर्ण कुटुंब उभं राहतं…आणि कुटुंब उभं राहिलं की समाज, आणि समाज उभा राहिला की देशही बळकट होतो.
ही गोष्ट शब्दात मांडणं सोपं नाही…
कारण एका स्त्रीने शून्यातून अनेक स्त्रियांना घडवणं ही फक्त गोष्ट नाही, ती एक अनुभूती आहे .…ती आपल्या घरातलीच एक आईच आहे…जी स्वतःच्या कामातून वेळ काढून इतरांना घडवते, उभी करते, आणि पुढे नेते…तो सहा महिन्यांचा प्रवास… शून्यातून सुरुवात…
आणि आज हजारो लोकांसमोर उभं राहण्याची ताकद…ज्यांना नाचता येत नव्हतं, ते आज नाचनार आहेत…
ज्यांना बोलता येत नव्हतं, ते आज आत्मविश्वासाने बोलणार आहेत…ही जादू नाही…ही आहे आईच्या मायेची ताकद
आज प्रत्येक घरात एकच वातावरण आहे. उत्साह, धडपड, आणि प्रेम हा कार्यक्रम पाहण्यासाठी इच्छा आहे त्या मित्रपरिवार ने केलेली धडपड
“तुला तिकीट मिळालं का?”
“थांब, मी बघतो…”ही फक्त वाक्यं नाहीत…ही आहे कौटुंबिक भावना, जी एकमेकांना जोडते.
आज या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट सारखीच आहे घर सांभाळून, जबाबदाऱ्या पूर्ण करून,
तिने स्वतःसाठी आणि इतरांसाठी वेळ काढला…आणि आज ती हजारो लोकांसमोर उभी राहणार आहे आत्मविश्वासाने, अभिमानाने कारण तिच्या मागे आहे बाबांचं प्रेम, दादाचा आशीर्वाद,आणि तिच्या आत आहे त्या एका आईचं अपार सामर्थ्य.

🌸आत्मबल म्हणजे फक्त स्वतः मजबूत होणं नाही तर इतरांनाही मजबूत बनवणं आहे…
आत्मबल म्हणजे घरात आनंद निर्माण करणं नात्यांमध्ये प्रेम वाढवणं आणि जीवनात समाधान मिळवणं हीच त्रिविक्रम परिवाराची ताकद आहे.
आज त्रिविक्रम परिवार फक्त एक ग्रुप नाही…तो एक कुटुंब आहे जिथे प्रत्येक जण एकमेकांसाठी उभा असतो…जिथे प्रत्येकाच्या आनंदात सगळ्यांचा आनंद असतो…आणि हीच खरी ताकद आहे.
आजचा हा “आत्मबल” कार्यक्रम फक्त एक इव्हेंट नाही…तो आहे आईच्या प्रेमाची, स्त्रीच्या जिद्दीची,आणि कुटुंबाच्या एकतेची जिवंत साक्ष ✨

“कोणताही कार्यक्रम एका व्यक्तीचा नसतो… तो सर्वांच्या सहभागातून घडतो.आणि त्या प्रत्येकाला "सामर्थ्य देणारा तो एकच"

त्रिविक्रम टूर्स परिवाराकडून
सर्वांना अनिरुद्ध शुभेच्छा
श्री राम🙏✨”
प्रविणसिंह पोवाळकर ✍️

18/04/2026

आत्मबल २०२५-२६ कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय

SHEETALVEERA S.MAHADIK,
PUSHAPA 21, YEAR 2023

हरि ॐ आई!
हरि ॐ मैत्रिणींनो!

It is truly difficult to put into words the experience of the 23rd Atmabal Snehasammelan held on 5th April, 2026. It was not just an event, but a beautiful confluence of devotion, joy, संस्कार (values), and meaningful learning.

The program began with Aai’s sweet and loving words, “Hari Om Baalanno,” which instantly touched every heart. Each performance reflected the dedication, hard work, and love of Aai’s daughters.

The play “Ae Aai!” delivered a powerful message to today’s generation — use AI, but preserve your own creativity.
The historical presentation on Punyashlok Lokmata Ahilyabai Holkar beautifully showcased courage, compassion, and selfless service.
The play “Sobat” deeply portrayed loneliness in modern life and reminded us of the constant presence and support of Bapu in our lives.

The picnic act reminded us of a simple yet profound truth:
“Happiness is not at the end of the journey, but along the journey.”

And finally, the Harinaam Gajar filled the entire वातावरण with devotion and divine energy.

This entire experience reinforced one feeling —
Aai’s grace and Bapu’s and Suchit Dada’s presence are the true strength of our lives.

Heartfelt pranam to Aai and all her daughters for their tireless efforts

Hari Om! Shri Ram! Ambadnya!
Nathsavidha! Nathsavidha!! Nathsavidha!!!

— Sheetalveera Mahadik

18/04/2026

आत्मबल २०२५-२६ कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय : -

।।हरि ॐ श्रीराम अंबज्ञ।।
।। नाथसंविध् ।।

आत्मबल- स्नेहसंमेलन २०२६

आत्मबल- स्नेह संमेलन
म्हणजे आनंदोत्सव,आनंददायी कार्यक्रम.

आज आत्मबल पुष्प २३ वे स्नेहसंमेलन कार्यक्रम आनंदाने पाहिला.

कार्यक्रम Solid Superb Superb Superb.....
नंदाई तूसी GREAT GREAT GREATTT हो.
नंदाईचे अथक परिश्रम, खूप खूप मेहनत,तळमळ सारे काही शब्दातीत व गुणातीत आहे.

नंदाई काय वानू तुझी महती ।
वर्णू जाता न पुरे सीमा

सर्व कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण , उत्कृष्ट नियोजन, नृत्य ,नाटके अतिशय उत्तम, उत्तम दिग्दर्शन, नेपथ्य,संगीत sound effects, उत्तम वेशभूषा , व प्रेक्षकांचा आनंद-उत्साह पाहून मंत्रमुग्ध झाले. आत्मबलवर्गात नंदाईमुळेच लेकींच्या कलागुणांना वाव मिळतो व आत्मविश्वास उमलतो..... आत्मबलवर्गातील सगळ्या वीरांनी अगदी पट्टीच्या कसलेल्या कलाकारांसारखी आपापली भूमिका चोख पार पाडली. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत पूर्ण शिरून सहजतेने आपले पात्र सादर करत होते. प्रत्येकीच्या सादरीकरणात सहजता,आत्मविश्वास होता..perfect timing,कुठेही चूक नाही. गोंधळ नाही. solid 👌👌
खरंच वर्णन करण्यास शब्दच नाही.
Danceपण सगळ्याजणी perfect steps , मस्त जोशमध्ये ,हसतमुख आनंदाने नृत्य सादर करत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य नंदाईने विजयमंत्राने केली.
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी आरती....अतिशय सुंदर... परमपूज्य बापू आदिमातेस प्रेमाने नमस्कार करत आहे,श्रीपुरूषार्थधाम, सती - रक्तमुख कथा,रक्तबीज - कालीमाता ...खूपच छान सादर केले.कमळ सुध्दा खूप सुंदर केले.
ए आई नाटक....AI,chatgpt,Gelexa इ.नवीन तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा परंतु स्वतःच्या मेंदूचा वापर करावा तसेच माणसाच्या भावना व प्रेमाचा विसर पडू देऊ नका....छान संदेश मिळाला.
अहिल्यादेवी होळकर....मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेचा वापर करून ऐतिहासिक विषय खूप छान मांडला.पडद्यावरील द्दश्ये, तसेच लढाई चे प्रशिक्षण, लढाई खूप छान👌👌
विधवा स्त्री मूल दत्तक घेऊ शकते,स्त्रीला मानाने जगता आले पाहिजे तसेच अहिल्यादेवी राज्यकारभार उत्कृष्टरित्या सांभाळते तसेच भिल्लांची वेशभूषा व नृत्य superb...
गोवाची picnic ,dance ,cruise ship छान enjoy केले.
सोबत ..... नाटकाचा विषय खूप सुंदर पद्धतीने सादर केला.बापूभक्त पेईंगगेस्ट मुली मुळे जीवन बदलून गेले.बापूंची भक्ती व सेवा करत दिवस चांगला जाऊ लागला व सुख शांती समाधान लाभले.श्रद्धाहिन व श्रद्धावानांचे जीवन जगण्याची पद्धत,एकदा का बापूंची सोबत लाभली की दुसऱ्या कोणाच्याही सोबतीची गरज भासत नाही... बापूभक्ती आणि बापूकार्य... बापूपरिवार यामुळे जीवन रसरशीत होऊन जातं.. १०८% आपला भक्कम आधार परमपूज्य बापू नंदाई सुचितदादाच आहेत.
🙏🙏 🙏
वारी तर खूप छान झाली. स्टेजवर एवढ्या कलाकारांचा सहभाग होता....वारकरी,भक्तमंडळी,ADM चे volunteers ...तरीदेखील किंचितही गोंधळ न होता प्रत्येकाने आपापली भूमिका चोख पार पाडली.
चलचल जाऊ नारदाच्या गावा....
तेथे माझा अनिरुद्ध ऊभा......
अतिसुंदर👌👌👌

नंदाई किती किती काय काय लिहू असे झाले......

२५०/३०० स्त्रियांचा एकत्र असा सुंदर कार्यक्रम नंदाई फक्त तूच करू शकते.
एकाही नाटकात कुठेही संवाद कुणीही विसरले नाही, अडखळले नाही...
खरंच कौतुक करावे तेवढे थोडेच... शब्दच नाही...
कार्यक्रमातून खूप संदेश, बोध,शिकवण मिळाली.
सर्व टिचर ताईंचे व आत्मवर्गातील सख्यांचे खूप खूप कौतुक व अभिनंदन.

कार्यक्रम अवर्णनीय, अनिर्वचनीय,अप्रतिम.... SOLID SUPERB...👌
आई खूप खूप अंबज्ञ 🙏
आई तूसी GREATहो .
आई i LOVE YOU SO MUCH FOREVER......

काही चुकले असल्यास आई क्षमा कर🙏

तुझी लेक
अंबज्ञ डॉ. ज्योतीविरा मोहन
आत्मबलवर्ग पुष्प ९ वे
२००६-२००७

Dr.Jyotiveera Mohan

आत्मबल २०२५-२६ - एक अभूतपूर्व कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आत्मबलचे स्नेहसम्मेलन अतिशय उत्कृष्टरीत्या पार पडले. ...
18/04/2026

आत्मबल २०२५-२६ - एक अभूतपूर्व कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आत्मबलचे स्नेहसम्मेलन अतिशय उत्कृष्टरीत्या पार पडले. त्याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

07/11/2020

Rashmi Kulkarni
is feeling happy with Meenal Kulkarni
and 8 others
YlteoaSspooatehrehedladynsr oactoa 1mre:d2gaSn6 SPM ·
ओम् श्री आल्हादिन्यै नंदायै सन्धिन्यै नमो नमः।
माझ्या आईचा, नंदाईचा आत्मबल महोत्सव म्हणजे आम्हा सख्यांसाठी आनंदाची पर्वणी च होती.
खरोखरच मंतरलेले दिवस होते ते !
आधी आत्मबल आणि नंतर हा महोत्सव. इथून ( पुण्याहून) दर रविवारी। प्रक्टिससाठी हरिगुरुग्रामला जाणे, तेथील वातावरण, सर्व सख्यांची व तायान्ची लगबग, खाण्यापिण्याची व्यवस्था, कार्यक्रमांचे नियोजन सगळे च अप्रतिम!
विशेषतः कार्यक्रमांची वर्गवारी, सर्व सख्यांच्या क्षमतेनुसार त्यांना सुयोग्य कार्यक्रमात टाकणे, व त्यानंतर त्यान्चेकडून तो कार्यक्रम बसवून घेणे सगळेच अनाकलनीय होते. आम्ही एका वेगळ्या च विश्वात वावरत होतो.
हे दैवी कार्य ती आल्हादिनीच करू जाणे ! त्या साठी आईने घेतलेली मेहनत कल्पनातीत होती. आईची पारख, दूरद्रुष्टी, कल्पना शक्ति, संयोजन दद सारच अशक्य! एया सर्वापलिकडे अत्यंत आनंददायी म्हणजे आईचे होणारे रोजचे दर्शन, तिचे सामीप्य, तिचे अम्रुतबोल, सगळे च स्वर्गीय. एक दिवस तर आईच्या प्रत्यक्ष प्रसादाचा ही लाभ आम्हाला झाला. यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते! खरेच मंतरलेले दिवस होते ते. मनःसामर्थ्यदाता आमचा प. पू. बापू आणि आत्मबल देणारी आई लाभणे ह्यापेक्षाआनंददायी काय असू शकते ?
आणि ५ व ६ नोव्हेंबर चा कार्यक्रम तर Marvellous झाला. . आईचे ते आगळे वेगळे रूप, प पू बापूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेक्षकांनी दिलेली दाद सारेच अविस्मरणीय. आजही त्यास्म्रुतींमध्ये मन रंगून जाते. आणि म्हणावेसे वाटते, आई, अबलतेला नारिजनांच्या आत्मबल देसी, बनवुनी त्याना सबल सक्षम, स्वयं सिध्द करिसी. रमता तुझिया सेवा कार्यी नैराश्य विरे अवकाशात, अन् स्वत्वाचा, सामर्थ्याचा सूर्य उगवे आकाशात ।।
हरिओम्, श्रीराम, अंबद्न्य, नाथसंविध्.
सरलवीरा शहाणे, पुणे.

07/11/2020

Jyoti Barbhai
Aatmabal Mahotsav
YlteoaSspooatehrehedladynsr oactoa 6mre:d3gaSn6 SPM ·
हरी ओम
2007 साली पुण्यात आत्मबल कोर्स झाला।त्यावेळी आईने आम्हला मुंबईला बोलवले होते त्या वेळी मुंबई च्या सख्या चा सुंदरसा कार्यक्रम पाहून खूपच मस्त वाटले,मला ही अश्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होता येईल हे वाटलेच नाही,पण आईनेच ही संधी दिली।
आई प्रत्यक्ष पुण्यात आली ऑडिशन घेतली,आणि सगळ्या सख्याना पास करून आत्मबल mohstvat सहभागी करून घेतले
सगळं कसं झटपट तरीही अगदी नियोजनबद्ध,
मुंबई येथे practic च्या वेळी आईचा। खूप जवळून सहवास मिळाला, आई लेकींची काळजी कशी आणि किती घेते हे तेव्हा समजले
5 /6 नोव्हेंबर ला तर
धमलाच आली प्रत्यक्ष program सुरू झाला आणि प्रत्येक क्षण नवीन उत्साह घेऊनच येत होता, कार्निवल पासून ते शेवटच्या क्षणा पर्यन्त अलौकिक अशी ऊर्जा सर्व सख्या मध्ये दिसत होती ,16 वर्षाची मुलगी ते 75 वर्षाची आजी सगळ्या जणू विविध रंगी फुलपाखरे।
कोणी लहान नाही कोणी मोठे नाही कोणालाही कसलाच गर्व नाही ध्येय एकच आईचा आनंद ,
या सर्वावर कडी म्हणजे
आई, बापू दादांचा अतिशय आनंदी ,प्रेमळ चेहरा। प्रत्येक गाण्याला, नाटकाला दाद देताना आईचा आनंद खूपच जास्त सुंदर होत,या 3 माउलींनी प्रत्येक लेकीचे खूप कौतुक केले
शेवटी आईने हतावर दिलेले दही साखर आणि मायेचा पदर याला तोड नाही, शब्दच अपुरे पडतील मला इथे 1 जुनी म्हण आठवते "लेकी ला महेर मिळावं म्हणून माय सासरी नांदते ," बापू आणि आई प्रत्येक लेकीचे मायबाप च आहेत हे त्यांचे डोळेच सांगत होते ,तो क्षण ज्यांनी अनुभवला त्या सर्व लेकी खूप नशीबवान। इतके प्रेम फक्त आई बापू दादा च करू शकतात।
प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट ला सुध्दा लाजवेल असा सुंदर अभूतपूर्व मोहस्तव झाला।सगळे कसे अनोखे आणि
नियोजनबद्ध, न भूतो न भविष्य ती
शेवटी 1 सांगावेसे वाटते असा कार्यक्रम परत व्हावा आणि ज्या सख्याना तेव्हा जमले नाही त्यांना आणि नवीन सख्याना पण यात सहभागी होता यावे।
आई तुझ्या सहवासात परत यायला मिळावे हीच प्रार्थना।
मी अंबद्न्य आहे,
ज्योती वीरा बारभाई
पुष्प 3 रे —

07/11/2020

Shubhada Kavathekar
is with Sharmila Kotenkar
rt2Sfpo2cnsorehdd ·
आत्मबल महोत्सव
जल्लोषाचा उत्सव कि उत्सवाचा जल्लोष हेच कळत नव्हतं.
खरोखरच आईच्या सर्व लेकींचा हा तिच्या सर्व लेकींसाठी अविस्मरणीय ठरला. कसा तर असा!
खर तर महोत्सवाला हो म्हणलं तेव्हाच आईला सांगितलं की आता तूच हे अठरा रविवार पूर्ण करून घे. खरंच सांगते आई च्या कृपेने अठरा रविवार कसे गेले ते कळलेच नाही. खूप दंगामस्ती मजा केली. खरंच आई तू खूप खूपच प्रेमळ आहेस मी अंबज्ञ आहे; कारण तू आम्हाला महोत्सवात सामील करून घेतलेस. तुझ्याच लेखी असल्याने आमच्यासाठी तो महोत्सव खरच तुझ्या वात्सल्याचा, प्रेमाचा जलाशय होता.
आई, मला अजून आठवतंय तो मोराचा ड्रेस, तुझी हेअर स्टाईल ,खूप सुंदर दिसत होतीस तू जेव्हा माझ्या जवळून गेलीस तेव्हा मी तुला म्हटले पण की आई खुप गोड दिसतेस तेव्हा तू गोड हसलीस😍😍😍
अठरा रविवार मुंबईला तुझ्याजवळ आलो की की तू आमचे एवढे लाड करायची जणू काही माहेरपणालाच आलो आहोत. तिथे आलो कि आनंदाला पारावारच नसायचा. तू आमच्यातले सुप्त गुण ओळखून त्या अनुषंगाने प्रत्येकीला वाव दिला.
आम्ही पुण्याहून यायचो त्यामुळे आमचा पाहूनच जंगी असायचा. त्या दिवसांमध्ये आई वरून नजर कधी बाजूला झालीच नाही. तिचं बोलणं चालणं वागणं समजाऊन सांगणं सगळं सगळं डोळ्यांच्या कॅमेराने टिपले आहे जे आजही नजरेसमोर अगदी ताजं आहे.
आईने लेकींसाठी अगदी जय्यत तयारी केली होती कुठेही काहीही कमी पडू दिले नाही.
तसं तर पाच आणि सहा तारखेला आत्मबल महोत्सव साजरा झाला पण माझ्यासाठी त्याआधी आई बरोबर घालविलेले अठरा रविवार हे महोत्सवा इतकेच किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी जास्त आनंदाचे मौजेचे मस्ती चे आणि समाधानाचे होते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र कंठ दाटून आला होता. प्रत्येकीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. डोळ्यात पाणी आणि मनात आठवणी साठवून आईचा निरोप घ्यायचा होता. प्रेमाने आईचा सहवास तिची प्रेमळ नजर तिच्या वाचल्याची ऊब हे सर्व आता आठवणींच्या पेटीत जाणार होते. आईने सर्व लेकिन चे गोड आणि प्रेमळ आवाजात सांत्वन केले. तिचा तो गोड आणि प्रेमळ आवाज कानात आणि मनात भरून घेतला आणि पुन्हा एकदा तिचे गोंडस रूप डोळ्यात भरून घेतले.
खरंच आई तू खूपच प्रेमळ आहेस मी अंबज्ञ आहे. तू आमच्याबरोबर कायमच आहेस.
अंबज्ञ आई, बाबा आणि दादा
सौ.शुभदावीरा कवठेकर पुणे

07/11/2020

Swati Bankapure
is with Sharmila Kotenkar
2tSponoSsior0ehedt ·
हरि ॐ आई , आत्मबल महोत्सवासाठी सख्यांच्या सिलेक्शनला तू पुण्यात आली होतीस तेव्हा माझ्या महद भाग्याने तुझ्यासाठीच्या जेवण आणि नाश्ता बनवण्यासाठीच्या सेवेची संधी प्रवीणसिंहानी मला व प्रमोदसिंहाना दिली
तुला मी बनवलेली शेवयाची खीर खूप आवडली आणि तुझ्या प्रेमळ स्वभावानुसार तु त्याचे खूप कौतुक केलेस
तुझा वाढदिवसहोता म्हणून मी तुझ्यासाठी केक बनवून आणला होता तो तु बापूंच्या सोबत खाण्यासाठी म्हणून मुंबईला घेउन गेलीस केव्हढे हे माझे परम भाग्य दुग्धशर्करा योगच हा खूप खूप अंबज्ञ 🙏🏻
सध्याच्या या करोनाग्रस्त कठीण परिस्थितीत निभावून नेण्यासाठी आवश्यक असलेले आत्मबल आई तू व बापू आणि मामांच्या कडूनच आम्हाला मिळाले आहे आणि मिळत आहे तुमच्या प्रेमाचा वर्षाव असाच होत राहो हीच मोठ्या आईच्या चरणी अंबज्ञ प्रार्थना
आई तुझी आणि तुझीच लेक
मुग्धावीरा बंकापुरे
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

07/11/2020

Manjusha Tappu
is with Sharmila Kotenkar
1tSponoSsior9ehedt ·
हरि ओम
5 ,6 November 2011 हे दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहेत ! अत्यंत अद्भूत , दिव्य, अलौकिक , अविस्मरणीय असा स्वर्गीय सोहळा या दिवशी आईच्या लेकींनी अनुभवला !
कारणही तसेच होते "* आत्मबल महोत्सव *"
*
" उत्सव आनंदाचा व आनंदाचा उत्सव "*
ज्यांनी ज्यांनी म्हणुन हा सोहळा अनुभवला , प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्या क्षणांचे साक्षीदार झाले ते खरोखरच भाग्यवंत !
एवढया आत्मबल बॅचेसला एकत्र आणणे त्यांच्याकडून perform करुन घेणे ही सोप्पी गोष्ट नव्हतीच मुळी !
परंतु नंदाईने ते सहजगत्या , लीलया केले ! आई रात्रंदिवस तिच्या लेकींसाठी झटत होती ! तिचा उत्साह ओसंडून वाहात होता ! तिचे तिच्या लेकींवर असलेले अद्भत व विलक्षण प्रेम!
सगळ्या लेकी आईच्या लिलांचा, तिच्या वात्सल्याचा , तिच्या आत्यंतिक प्रेमाचा पदोपदी अनुभव घेत होत्या !
आईचा सळसळता उत्साह , तिची काम करण्याची लगबग , लेकींचे सुप्त गुण ओळखून त्यांना वाव देणारी , confidence देणारी आई ! आई हा सोहळा बापूंना , सुचितदादांना किती कौतुकाने दाखवत होती व बापू व दादाही ह्या विलक्षण सोहळ्याचे , मनापासून कौतुक करत होते , दाद देत होते !
आईच्या कृपेने 6 th Nov च्या संपूर्ण सोहळ्याचा आनंद लुटण्याचे भाग्य मिळाले ! तेव्हा आत्मबल कोर्स झालेला नव्हता, पण तो सोहळा पाहून आत्मबल कोर्स करण्याची प्रचंड ओढ मनात निर्माण झाली आणि 2015 ला आईने मुंबईला कोर्स करून घेतला !
आईने तिच्या लेकींना जगायचं कसं हे शिकवलं , स्वतः आनंदी राहून इतरांना कसं आनंदी ठेवायचं हे शिकवलं , जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहून इतरांना मदत करायला शिकवलं ! सतत active राहायला शिकवलं ! Time management शिकवली ! कुठलंही क्षेत्र असू देत job करणारी सखी असू देत की home maker नंदाईची लेक ही चार चौघीत उठूनच दिसते !
हे सगळे बदल घडवणारी आई ! शक्तीचा स्रोत अखंडपणे लेकींना पुरवणारी आई ! आल्हादिनी राधा ! आत्मबल ते आत्म बदल हा प्रवास लीलया घडवणारी आई ! संसार व परमार्थ सहजगत्या साधला जातो , तो केवळ आईच्या कृपेनेच !!!
आई हा सोहळा , महोत्सव कायमचा मनात , हृदयात कोरला गेलाय गं ! ह्या आठवणी सदैव मनात असतात आणि जगण्याचं बळ देतात ही तुझी कृपा ! वत्सल्ये तुझी कृपा अपरंपार !
आई परत एकदा असा महोत्सव व्हावा ही मोठया आई चरणी व तुझ्या चरणी प्रार्थना ! जय जगदंब जय दुर्गे !
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
मंजुषा वीरा टप्पू
शिवाजीनगर केंद्र पुणे !

Rashmi Guravहरि ॐ मैत्रिणीनो         आत्मबल महोत्सवला ९ वर्षे पूर्ण झाली अस खरच वाटत नाही त्याच्या आठवणी अजून ही मनात घर...
07/11/2020

Rashmi Gurav

हरि ॐ मैत्रिणीनो
आत्मबल महोत्सवला ९ वर्षे पूर्ण झाली अस खरच वाटत नाही त्याच्या आठवणी अजून ही मनात घर करून आहेत. ते आईच आपला लेकींच्या प्रेमापोटी श्रीहरि गुरुग्रामला येऊन रात्री उशीरा पर्यंत थांबून मार्गदर्शन करण, तसेच कार्यक्रम जास्तीत जास्त कसा बहरेल या साठी धडपड, तळमळ यासाऱ्या अथक परिश्रमाचे झालेल चीज आपण या महोत्सवामध्ये अनुभवलच आहे या महोत्सवाचे आपण सगळे साक्षीदार झालो यासाठी मोठी आई, आई ,बापू ,मामा यांना खूप खूप अंबज्ञ🙏🙏
आईच मार्गदर्शन, तिचे बोल , तिच अस्तित्व आठवल तरी आजही मनाला नवी उमेद देऊन जाते महोत्सवा बददलचे सुखद अनुभव सांगायला खरच शब्द अपुरे पडत आहे. काय सांगू आणि किती सांगू अस झाल आहे. हा सगळा मौलवान खजिना आपल्याला आयुष्य भराची शिदोरी आहे
हे सगळे फक्त आईमुळेच शक्य झाले. सर्व सामान्य जीवन जगणाऱ्या स्त्रीला परमपूज्य आईने राजहंसा प्रमाणे मुक्त भरारी घ्यायला शिकवले.
आई पुन्हा हे सगळ अनुभवायची खरचं खूप खूप इच्छा वजा हट्ट आहे
!! हरि ॐ !! श्रीराम !! अंबज्ञ !!
रश्मीवीरा गुरव

Address

Happy Home , Plot NO. 551, TPS III, 8th Road, Old Khar, Khar(w)
Mumbai
400052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aatmabal Mahotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aatmabal Mahotsav:

Shortcuts

Share