17/04/2021
"आठवणी आणि अश्रू"
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकवले जाते मात्र भारतात ते दुर्लक्षिले गेले आहे! बाबासाहेबांचे १९३५-३६ मध्ये लिहिलेले "वेटिंग फॉर ए वीजा" हे इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र अमेरिका आणि इतर देशात प्रचंड आदराने वाचले जाते. एवढेच नव्हे तर ते कोलंबिया विद्यापीठात शिकविले जाते आणि भारतात मात्र अनेकांना याबद्दल माहितीही नाही, याचे आश्चर्य वाटते! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके जगभरात आदर्शवत आणि महत्त्वपूर्ण पुस्तके म्हणून प्रसिद्ध असली तरी आजही भारतात ती दुर्लक्षित आहेत. असेच एक पुस्तक म्हणजे 'वेटिंग फॉर व्हिसा', त्यांचे आत्मचरित्र. या पुस्तकाचा मराठी अनुवाद "आठवणी आणि अश्रू" या शीर्षकाने मी केला आहे. औरंगाबाद येथील आंबेडकरी साहित्याचे प्रख्यात प्रकाशक "आनंद प्रकाशन" यांनी ते प्रकाशित करण्याचा संकल्प हाती घेतलेला असून या महिन्यातच हा ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. हे आत्मचरित्र सहा प्रकरणांचे असून त्यामध्ये बाबासाहेबांनी लहानपणी साताऱ्याहून वडिलांना भेटायला कोरेगावला जाताना प्रवासात गाडीवानाने केलेला अपमान, बडोदा सरकाने शिक्षणासाठी केलेल्या अर्थसाह्याची परतफेड करण्यासाठी स्वीकारलेली नोकरी, तेथे सहकार्यांनी केलेला अपमान, बडोद्यात राहण्यासाठी जागा मिळाली नसल्याने पारशी धर्मशाळेत नाव बदलून राहिल्यानंतर पारशांनी जीवे मारण्याची धमकी देऊन खोली रिकामी करण्यास भाग पाडले. या प्रसंगाने व्यथित होऊन बाबासाहेब बडोद्यात ढसढसा रडले होते. हे प्रसंग आणि इतर घटनांचा त्यामध्ये समावेश आहे. या घटनांचा जेव्हा जेव्हा बाबासाहेब उल्लेख करत असत तेव्हा तेव्हा त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. म्हणूनच "आठवणी आणि अश्रू" हे शीर्षक सदर ग्रंथास दिलेले असून वाचकांकडून बाबासाहेबांच्या या आठवणींचा नक्कीच आदर होईल अशी अपेक्षा आहे.
- भीमराव सरवदे
या ग्रंथाचे भाषांतरकार
16/04/2021
*महासतिपठ्ठानसुत्त ध्यान शिबीर*
*दिनांक 20 मे 2021 ते 25 मे 2021*
*स्थळ: दत्तसेवा विद्यालय, तुरुकवाडी, तालुका- शाहूवाडी, जिल्हा- कोल्हापूर.*
साधक नांव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक :
विश्वास कोतोलीकर 9011367422 /
9011139393
आनंद भालेराव 8104692525
(*टीप:* पुरुष साधकांची भोजन व निवासाची सोय उपलब्ध आहे, महिला साधकांची भोजन व्यवस्था आहे मात्र निवासाची सोय करता आलेली नाही. शिबिर साधना वेळेत महिला सहभागी होऊ शकतात. )
नांव नोंदणी कालावधी 30 एप्रिल 2021 पर्यंत.
महासतिपठ्ठानसुत्तामध्ये भगवान बुद्धांची वाणी लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ती केवळ वाणी नसून ते भगवान बुद्धांचे अभूतपूर्व अनुभव आहेत. दुःखमुक्त होऊन निर्वाणाचा साक्षात्कार व बुद्धत्व कसे प्राप्त करता येते हा एकमेव दुःखमुक्ती चा सत्य धम्ममार्ग भगवंतांनी वैज्ञानिक पद्धतीने शोधून काढला आहे आणि त्याच मार्गावर भगवंतांना बुद्धत्व प्राप्त झाले आहे. बुद्ध, बुद्धत्व ही व्यक्ती नसून बुद्धत्व ही एक अवस्था आहे. ती पूर्णतः वैज्ञानिक आहे आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेल्याच मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. सर्वांसाठी तोच एकमेव मार्ग आहे. महासतिपठ्ठानसुत्तामध्ये भगवंतांनी सर्व प्राणिमात्रांच्या दुःख निर्मितीच्या कारणांचा व दुःख निवारणाचा विस्तारित प्रवास अनुभव सांगितला आहे, तो केवळ अनुभवण्यासाठीच आहे. त्यामुळे प्रथमच बुद्ध अनुभवांना आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची जोड देऊन पॉवर पॉईंट पद्धतीने मूळ बुद्धवाणीत कसलीही छेडछाड न करता या शिबिरात सत्य, निर्वाण व दुःखमुक्ती प्रथमच प्रकाशात आणली जात आहे. तेव्हा आपण ध्यान शिबिरात सहभागी होऊन दुःख मुक्तीचा अनुभव घ्यावा. बुद्ध अनुभव स्वयं अनुभवावे व बुद्धत्वाच्या मार्गावर आरूढ व्हावे.
🙏 भवतु सब्ब मंगलम 🙏
06/04/2021
"एका दहा वर्षांच्या मुलीने खालच्या फोटोत दिसणारी सर्व पुस्तके वाचली आहेत" ह्यावर आपला विश्वास बसेल का?
श्री. प्रवीण क्षीरसागर ह्यांनी नुकतीच एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीच्या खोलीचा फोटो शेअर केला. बेडच्या मागे ठेवलेली एवढी पुस्तके पाहून अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही. केवळ दहा वर्षांची मुलगी एवढं वाचन कसं करू शकते? हा प्रश्न विचारून लोकांनी श्री. प्रवीण ह्यांना हैराण करून सोडलं.
त्यावर अतिशय नम्र भाषेत श्री. प्रवीण क्षीरसागर ह्यांनी उत्तर दिले. जे प्रत्येकाने वाचावं असं आहे. प्रेरक आणि आपल्या वाचन संस्कृतीबद्दल विचार करायला भाग पाडेल असे आहे.
श्री. प्रवीण क्षीरसागर ह्यांचे उत्तर:
तुम्हा प्रत्येकाच्या हरएकप्रकारच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!! 💐💐💐
अन्वी तिच्या जन्मापासून अमेरिकेत राहते। अन्वीने पहिलीत गेल्यावर म्हणजे सहा वर्षांची असताना वाचायला सुरुवात केली... त्याअगोदर घरात आम्ही तिला जमेल तसं पुस्तके वाचून दाखवायचो. मला स्वतःला आवड असल्याने घरात मी मराठी पुस्तके वाचताना तिने बघितले होते।
पहिलीत गेल्यावर तिला वाचायला येऊ लागले आणि शाळेत तसे पोषक वातावरण मिळाले. तिच्या क्लास मध्ये फक्त सोळा ते अठरा मुले असायची आणि क्लासरूम मध्येच भरपूर पुस्तके, शाळेच्या लायब्ररी मधून सुद्धा पुस्तके मिळायची. तिची वाचनाची आवड बघून शिक्षक सुद्धा तिला ज्यादा पुस्तके देत.
भारतातल्या बऱ्याच लोकांना तिने इतकी पुस्तके वाचल्याचे पटले नाही म्हणून वातावरणातला थोडा फरक सांगतो..
१. तिला होमवर्क असा नसतोच, आत्ता पाचवीत सुद्धा तिला फक्त पंधरा ते वीस मिनिटांत पूर्ण होईल इतकाच होमवर्क असतो, मग लहान असताना किती असेल विचार करा।
२. तिला आम्ही कोणत्याही ट्युशनला घातलेले नाही, त्यामुळे तो ही अभ्यास नाही
३. इथे शाळेला जवळपास तीन महिन्यांची उन्हाळी सुट्टी असते आणि भारतासारखे पाहुणे येणे-जाणे अजिबात नसल्याने बराच मोकळा वेळ मिळतो
४. घरात एकही व्हिडीओ गेम नाही.
५. इथे town ची पब्लिक लायब्ररी तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला मोफत असते आणि एका वेळी पंचवीस-तीस पुस्तके आरामात आणू शकतो.
लायब्ररीचे उन्हाळ्यात पुस्तक वाचण्याचे बरेच प्रोग्रॅम्स असतात
६ इंग्लिश भाषेत मुलांसाठी खूप पुस्तके आहेत. आत्ता आम्ही राहतो तिथे दोन मजली लायब्ररी आहे. त्यातला एक आख्खा मजला फक्त आणि फक्त मुलांच्या पुस्तकांचा आहे
७. बाहेरगावी, जिम्नॅस्टिक प्रॅक्टिसला प्रवास करताना गाडीत नेहमी पुस्तके असतात. तो वेळ ती वाचण्यात घालवते.
८. इथे वर्षात सात महीने कडक हिवाळा असतो ज्यावेळी बाहेर खेळायला जाता येत नाही. घरी बसून पुस्तके वाचायला खूप वेळ मिळतो ..
९. मे महिन्याच्या अखेरीस ती अकरा वर्षांची होईल
.. म्हणजे अलमोस्ट पाच वर्षे ती वाचते आहे. आठवड्याला एक पुस्तक वाचलं असं मानलं तरी 250 पुस्तके होतात 😊😊😊
- - - - - - -
आपल्याकडे अश्या प्रकारची वाचन संस्कृती कधी रुजली जाणार हाच प्रश्न ह्या पोस्टद्वारे अनाहूतपणे मांडला गेलाय.
'पालकांनी आणि शिक्षकांनी चिमुकल्यांना पुस्तकांवर प्रेम करायला शिकवणं' व 'उद्याच्या भारताला प्रगतीपथावर नेणं' ह्या दोन्ही एकच गोष्टी नाहीत का?
आपण पालक, शिक्षक किंवा पुस्तकप्रेमी असाल तर चिमुकल्या अन्वीचं उदाहरण नक्की लक्षात ठेवा. आपल्या आसपासच्या मुलांना पुस्तकं वाचायला प्रेरणा द्या.
तोपर्यंत छोट्या अन्वीचं खुपखूप कौतुक.❤️
#प्रेरणादायी
अजिंठा
फोटो सौजन्य: श्री. प्रवीण क्षीरसागर
03/04/2021
#अर्थतज्ञ_बाबासाहेब
ब्रिटिश काळात,भारतातील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी "Administration of Expenditure Of India" Royal Commission ची स्थापना करण्यात आली होती, याला वेलबी कमिशन असे ही म्हणतात, या कमिशनच्या सदस्यांमध्ये लॉर्ड वेलबी,लॉर्ड चॅमन,तसेच संसदेसचे प्रतिनिधी म्हणून टी.आर.बुचनन आणि विल्यम वेदरबर्न, दादाभाई नौरोजी, विल्यम एस,केन यांनी भारतीय हितसंबंधांचे प्रतिनिधी म्हणून काम केले,खर्च कमी करून भारताची आर्थिक स्थिती कशी सुधारेल हे या कमिशनचे मुख्य कार्य होते.
एकदा असेच, रूपयाच्या विनिमयाचा दर ठरविण्यासाठी हे कमिशम इंग्लंडहून भारतात आले होते,यासाठी जगभरातील अर्थतज्ञाना निमंत्रित केले होते,आणि त्यांची या रुपयाच्या विनिमया बद्दल मते ऐकली,बाबासाहेबानी अजून त्यांचं मत मांडले नव्हते.बाबासाहेब त्यांचे मत मांडणार होते,इतक्यात वेलबी म्हणाले की, डॉ.आंबेडकर, जगातील प्रसिद्ध विद्वान अर्थतज्ञांची मते व संदर्भ मी ऐकली आहेत,त्यामुळे आता तुमचे मत ऐकायची मला गरज वाटत नाही, यावर नम्र व शांतपणे बाबासाहेब म्हणाले की, डॉ.वेलबी,तुम्ही ज्या जगातील प्रसिद्ध आणि विद्वान अर्थतज्ञांची मते व संदर्भ ऐकलेत,त्या विद्वान व प्रसिद्ध अर्थतज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या #पुस्तकाचा_लेखक_मी_आहे आणि या पुस्तकातील काही भाग लिहिणे अजून शिल्लक आहे,तो मीच पूर्ण करू शकतो.
हे ऐकून,डॉ.वेलबी खाली उतरले व बाबासाहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रुपयाच्या विनिमयाचा दर ठरविण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले, असे होते आपले बाबासाहेब,बाबासाहेबांची बॅरिस्टर ही पदवी बाजूला ठेवली तर त्यांच्या सगळ्या पदव्या या अर्थशास्त्रात आहेत,डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्राची सर्वोच्च पदवी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मिळविणारे आपले बाबासाहेबच होते.
#बाप
#जयंती_महामानवाच्या_विचारांची
........jay
01/04/2021
#रिजर्वबँक_आणि__बाबासाहेब_आंबेडकर
आज आपण भारतीय चलनात "रिजर्व बँक ऑफ इंडिया" हे जे नाव वाचतो,त्याची मूळ संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आहे, त्यांनी हिलटन कमिशनला सादर केलेल्या रिपोर्टचा आधार रिजर्व बँक स्थापन करताना घेण्यात आला आहे, देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या शोधनिबंधात रिजर्व बँकेची कल्पना केली होती, आज आपण वित्त आयोग,केंद्रातील संपत्तीची वाटणी राज्यांमध्ये कशी असावी,केंद्रीय क्षेत्राबद्दल बोलतो याचा सखोल अभ्यास व विश्लेषण बाबासाहेबांनी केले आहे.
रिजर्व बँक ही १ एप्रिल १९३५ रोजी, ब्रिटिशकाळात स्थापन झाली, बाबासाहेबानी प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये केलेले विश्लेषण इतकं जबरदस्त होतं की, ब्रिटिश सरकारने भारतातील परंपरागत व्यवसायांचे केलेले शोषण संपूर्ण जगासमोर आले, आणि त्याचवेळी तत्कालीन काँग्रेसने बाबासाहेबांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या मांडणीला उचलून,ब्रिटिशांना कैचीत पकडलं,याचाच परिणाम असा झाला की,हे एकूण प्रकरण तपासण्यासाठी लंडनहून रॉयल कमिशनची स्थापना झाली.
भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या महायुद्धाची जास्त झळ न पोहचता अर्थव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून,रिजर्व बँकेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले, जी भारतातील इतर बँका व वित्तीय संस्था यांवर अंकुश ठेवून अर्थव्यवस्था सुरळीत ठेवेल,यासाठी बाबासाहेबानी लिहिलेल्या तीन आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून रिजर्व बँकेची सुरुवात करण्यात आली, आज रिजर्व बँक ही केंद्रीय बँकिंग संस्था आहे,जी भारतातील चलन नियमावली व आर्थिक बाबींवर,भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते,
रिजर्व बँकेची स्थापना जरी १९३५ रोजी झाली असली तरी,१९४९ रोजी रिजर्व बँक ही अधिकृत आणि भारत सरकारच्या अमलात आणण्यात आली.
इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, १९३५ साल फार महत्वाचे आणि कायम स्मृतीत राहील असे आहे, कारण बाबासाहेबांसमोरील आव्हान दुहेरी होते, एकीकडे ब्रिटिशांशी सनदशीर आपल्या हक्कांची मागणी करणे व दुसरीकडे आपल्या समाजाच्या लोकांचा उद्धार करणे, १९३५ साली जेव्हा रिजर्व बँक स्थापन झाली तेव्हाही बाबासाहेबांचे मोर्चे,आंदोलने,पक्ष बांधणी,न्याय हक्क,लिखाण हे सर्व सुरूच होते तसेच याच वर्षी त्यांची विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली,याच वर्षी बाबासाहेबानी नाशिक मध्ये येवला ठिकाणी सभा घेऊन मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली,आणि याच वर्षी बाबासाहेबांची लाडकी रामू आणि सकळ बहुजनांची माय, रमामाई यांनी जगाचा निरोप घेतला.
बाबासाहेबानी रिजर्व बँकेसाठी आणि आर्थिक व्यवस्थेसाठी सुचविलेले मार्गदर्शक तत्वे,नियम आणि कार्यप्रणाली आज ही ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम करतात, पण त्याचा वापर योग्य हाताने व्हायला हवे..अशा या ज्ञानाच्या महामेरुस,निष्णात अर्थतज्ञास विनम्र अभिवादन..
#बाप
....... Jay
17/10/2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार
(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
(२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.
(३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
(४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
(५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
(६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.
(७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे.
(८) मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.
(९) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
(१०) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
(११) स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
(१२) सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततः ही भारतीय ही भूमिका घ्यावी.
(१३) चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
(१४) उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
(१५) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
(१६) करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो.
(१७) शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
(१८) पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
(१९) ग्रंथ हेच गुरू.
(२०) वाचाल तर वाचाल.
(२१) इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
(२२) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
(२३) तिरस्कार माणसाचा नाश करतो.
(२४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.
(२५) एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
(२६) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
(२७) धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.
(२८) लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
(२९) द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
(३०) बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
(३१) बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.
(३२) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
(३३) मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
(३४) शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
(३५) सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.
(३६) शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
(३७) विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.
(३८) सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.
(३९) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
(४०) अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
(४१) मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
(४२) जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.
(४३) ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.
(४४) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.
(४५) भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
(४६) सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.
(४७) बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.
(४८) बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
(४९)शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
(५०) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.
(५१) शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.
(५२) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
(५३) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
(५४) नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
(५५) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
(५६)वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
(५७) मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
(५८) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
(५९) पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
(६०) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
(६१) शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
(६२) तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
(६३) मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.
(६४) जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.
(६५) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
(६६) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
(६७) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
(६८) सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.
(६९) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
(७०) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
(७१) माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
(७२) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.
(७३) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
(७४) एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
(७५) शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
17/10/2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( lebour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)
२२. विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
२३. राज्य विभागणी आयोग (state division commission)
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२५. अर्थव्यवस्थेची तरतूद (provision of finance commission)
२६. नदी जोड प्रकल्प
२७. दामोदर खोरे प्रकल्प
२८. हिराकुंड धरण
२९. भाक्रा-नांगल धरण
३०. सोनेक नदी प्रकल्प
३१. भारतीय रिझर्व्ह बँक
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे संविधान.
17/10/2020
The main objective of this movement is to inculcate a reading culture as mentioned earlier.The role of women in this movement is more important because children imitate a lot from their mothers.
04/10/2020
🔷 राज्यघटनेतील भाग (Parts) 🔷
भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग दूसरा – नागरिकत्व
भाग तिसरा – मूलभूत हक्क
भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
भाग पाचवा – संघ
भाग सहावा – राज्य
भाग सातवा – रद्द
भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
भाग नववा – पंचायत
भाग नऊ ‘अ’ – महापालिका
भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
भाग पंधरावा – निवडणुका
भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
भाग सतरावा – भाषा
भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
भाग एकोणीसवा – संकीर्ण
भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
26/09/2020
Music teachers and students fall for music-related neuromyths – German study
The left and right hemispheres of the brain.
-By Christian Jarrett
One day neuroscience might revolutionise education, but for now the scientific findings most relevant to teaching and learning come from psychology. In fact, many popular claims about the brain and learning are neuromyths – unsubstantiated or plain wrong ideas, such as that we only use ten per cent of our brains, that some of us are left-brained, others right-brained, or that we learn best when taught via our preferred “learning style”.
Unfortunately and often with the best of intentions, surveys have shown that a lot of teachers believe these myths (for instance, one survey published in 2012 found that British and Dutch teachers believed around half of the 15 neuromyths they were tested on). Now a study in Frontiers in Psychology has focused on German music teachers and students to see how vulnerable they are to brain myths pertaining specifically to music. Although the participants showed some ability to distinguish between true facts and myths, they still endorsed around 40 per cent of the myths, especially those that contained neuroscientific jargon.
Nina Düvel and her colleagues at the Hanover Music Lab asked four experts in the fields of the neuroscience of music or the neuroscience of music education to agree on seven music-related brain facts, and seven music-related brain myths. Among the facts: the idea that music education can benefit language skills and that the anatomy of the brain can change in response to musical training. Among the myths: that right handers process music in the right hemisphere and that musical education boosts children’s intelligence.
The researchers challenged 91 music teachers from a random selection of state schools in Germany and 125 students studying to be music teachers at German universities to read through a list of the 14 myths and facts presented in random order and identify which were scientifically substantiated and which unsubstantiated. To avoid raising undue suspicion, there was no mention of “neuromyths” in the survey.
Although statistically speaking the participants were able to distinguish facts from myths better than if they’d simply been guessing, it remained the case that the teachers and students endorsed, on average, around 40 per cent of the myths, mistakenly believing them to be scientifically supported facts. The myths that contained neuroscientific jargon (referencing “brain hemispheres” and “cognitive abilities”) were the most widely believed. On the plus side, the more books, magazines and websites that participants said they had read in relation to psychology and neuroscience, the less vulnerable they were to the myths (this is in contrast to the 2012 survey of school teachers where greater general knowledge about the brain correlated with more belief in neuromyths).
Düvel and her team said “the present study shows that there is a gap between the state of research in neuroscience related to music education and the knowledge of current and future music teachers about these findings and neuromyths”. This is worrying, they added, in the sense that time could be wasted on harmful, ineffective practices. The researchers concluded that perhaps “a lack of communication between scientists and music educators is to blame.”
—Neuromyths in Music Education: Prevalence and Predictors of Misconceptions among Teachers and Students
Christian Jarrett () is Editor of BPS Research Digest
07/09/2020
📚 पुस्तक वाचनाची आवड ही असायलच हवी, वाचनाचे कितीतरी असंख्य फायदे आहेत.
मोबाईल इंटरनेट च्या या आधुनिक जगात पुस्तक वाचनाची आवड कुठेतरी लुप्त होत चालली आहे. परंतु पुस्तके वाचण्याचे फायदे खूप आहेत. ते काय आहे पहा.
1.शब्दसंग्रह वाढविण्यास मदत करते.
2.आत्मविश्वास वाढवते.
3.लोकांशी संप्रेषण करण्यास मदत करते.
4.ताण कमी होतो.
5.स्मृती आणि विचार विकसित करतो.
6.अल्झायमरच्या विरोधात संरक्षण
7.झोप सुधारण्यासाठी मदत करते
8.एक व्यक्ती अधिक सर्जनशील बनवते.
9. एकाग्रता सुधारते.
10.नवनवीन गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.
🧠 वाचनाने मेंदूला एकप्रकारे चालना मिळते
📖 मेंदूसाठी पुस्तके वाचणे किती उपयुक्त आहे हे प्रत्येकाला चांगले माहिती नसते.
📖 अलीकडील संशोधन हे दर्शविते की वाचन करताना, मेंदूचे क्षेत्रे सहभागी आहेत जे टीव्ही पाहताना किंवा संगणक गेमच्या प्रक्रियेत कार्य करत नाहीत.
📖 जेव्हा एखादी व्यक्ती वाचते, तेव्हा पुस्तकाच्या कल्पनेत एक प्रकारचे बुडवणे असते, नंतर कल्पनाशक्ती चालू होते.
📖 पुस्तकाच्या पृष्ठामध्ये जे काही सांगितलेले आहे ते व्हिज्युअल प्रतिमांद्वारे जीवन जगतात.
📖 वाचन केल्यावर हा अनोखा परिणाम शक्य आहे, म्हणूनच प्रत्येकाला वाचनाची गोडी हि असायलाच हवी