17/04/2022
"आस्था केशवराज संकुल"येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित एकदिवसीय युवक कार्यशाळा संपन्न लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला अतिशय उत्स्फूर्तपणे ही कार्यशाळा संपन्न झाली विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभले उदघाटन सत्र : विवेकानंद रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन चे अध्यक्ष आनीलजी आंधोरीकर ,स्था. स. समिती कार्यवाह जितेशजी चापसी ,महात्मा बसवेश्वर महा.समाजकार्य विभाग प्रमुख दिनेशजी मौने, केंद्रप्रमुख उमेशजी गाडे जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती सत्र दुसरे:प्रमुख वक्ते प्राचार्य कमलाकर कांबळे, अध्यक्ष:प्राचार्य अझहर शेख सत्र तिसरे: प्रमुख मार्गदर्शक:प्रा गिरजाप्पा मुचाटे ,सत्र चोथें:प्रमुख वक्ते उद्धवजी फड,अध्यक्ष प्रा.दिनेशजी मौने, सत्र पाचवे: प्रमुख वक्ते :प्रा संजयजी गवई ,अध्यक्ष :सुनीलजी वसमतकर मुख्यध्यापक केशवराज मा.शाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सत्र सहावे:प्रमुख उपस्थिती:सुनीलजी वसमतकर,प्रा.संजयजी गवई ,प्रा.नागेशजी जाधव, ऍड.धम्मपाल कांबळे ,उमेशजी गाडे अनीलजी गायकवाड प्रकल्प समन्वयक, राहुल गायकवाड, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .विशेष सहकार्य:सुकेश सोनकांबळे,सुयोग जोगदंड, आदर्श गिरी, व समाजकार्य विभागाचे विद्यार्थी यांनी या कार्यशाळे साठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक राहुल गायकवाड यांनी केले भारतीय युवकानी डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.आजचा युवक समाजामध्ये आपले स्थान टीकवण्यासाठी धडपडत आहे समाजमान्य जीवनात जगण्यासाठी अनेक समस्या त्याच्यासमोर उभ्या आहेत अनेक आव्हाने आहेत त्यांना सामोरे जाण्याची ताकद भारतीय संविधान देते संविधान हे भारताची ताकद आहे.संविधान व युवक यांचा मेळ घालण्याची व भारतीय संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाज जीवनात रुजवण्यासाठी आपण सर्व युवकानी एकत्रित येऊन विचारमंथन करण्याची गरज आहे असे विविध मान्यवरांनी मते व्यक्त केली युवक हा भारतीय समाजमनाचा आरसा आहे. असे प्रतिपादन या कार्यशाळेतुन विविध मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यशाळेत निबंध स्पर्धेतील स्पर्धकाना प्रमाणपत्र व विजय चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच विवेकानंद रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन चे अध्यक्ष आनीलजी आंधोरीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आस्था संकुल मार्फत विशेष सन्मान करण्यात आला व या कार्यशाळे मध्ये एकूण 145 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.