Avinash Kalkekar-अविनाश कळकेकर

Avinash Kalkekar-अविनाश कळकेकर This page shows the common thread in our lives.

नाती बदलली… माणूसही बदलला!रक्ताचं नातं टिकेनासं झालंय.जवळचे नातेवाईक दुरावलेत, आणि अनेक वर्षांपासून जपलेली मैत्रीही आता ...
06/10/2025

नाती बदलली… माणूसही बदलला!

रक्ताचं नातं टिकेनासं झालंय.
जवळचे नातेवाईक दुरावलेत, आणि अनेक वर्षांपासून जपलेली मैत्रीही आता श्वास गमावत चालली आहे.
पंचवीस–तीस वर्षांचा विश्वास, समजूत आणि आपुलकी एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर कोसळते.
माणसानं माणसाशी कसं वागावं, हेच आता कळेनासं झालंय!

एक काळ होता — माणसं एकमेकांना समजून घ्यायची.
भौतिक सुखं कमी होती, पण मनं समाधानात होती.
साखर कमी पडली की शेजाऱ्यांकडून मागायला कुणाला लाज वाटत नसे.
दूध, पीठ, साडी–चोळी — सगळं शेअर करायचं, कारण आपलेपणाचं नातं होतं.
गरीब–श्रीमंत असा भेद नव्हता, “अडीनडीला एकमेकांच्या पडलं पाहिजे” ही समाजाची धारणा होती.

पण काळ बदलला…
सुखसोयी वाढल्या, पैसा वाढला, आणि त्याचबरोबर माणसांमधला दुरावा पण वाढला.
प्रत्येक जण स्वावलंबी झाला, पण आत्मकेंद्रीही झाला.
आता कोणावाचून कोणाचं काही अडत नाही — हीच खरी शोकांतिका आहे.
आई–वडिलांची, भावंडांची, अगदी जवळच्या मित्रांचीही गरज कुणाला राहिलेली नाही.

मोबाईलच्या स्क्रीनने घरातली माणसं दूर केलीत.
स्मार्टफोन आले, पण संवाद गेला.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप हेच आता माणसांचे नवे “नातेवाईक” झालेत.
डिजिटल जगात नाती जुळतात, पण मनं मात्र रिकामी राहतात.
भावनांचा कोंडमारा वाढतोय… आणि आपण सगळेच त्यात हळूहळू गुदमरतो आहोत.

भौतिक प्रगतीच्या या चकचकीत युगात,
मनुष्याकडे सर्व काही आहे. फक्त “माणूसपण” मात्र उरलंच नाही.

जेव्हा आपण प्रवासी विमानात बसतो, तेव्हा ते साधारणपणे १० ते १२ किलोमीटर (३५,००० ते ४०,००० फूट) उंचीवर उडत असते. या उंचीला...
29/09/2025

जेव्हा आपण प्रवासी विमानात बसतो, तेव्हा ते साधारणपणे १० ते १२ किलोमीटर (३५,००० ते ४०,००० फूट) उंचीवर उडत असते. या उंचीला क्रूझिंग आल्टिट्यूड म्हटले जाते. अशा उंचीवर हवेचा दाब जमिनीवरील तुलनेत खूप कमी असतो. त्यामुळे विमानात प्रवाशांना आरामदायक श्वास घेता यावा यासाठी केबिन प्रेशर नियंत्रित केलेले असते.

हवेची घनता कमी असल्यामुळे विमानाच्या पंखांवर लागणारा रेसिस्टन्स (विरोध) कमी होतो, ज्यामुळे विमान सहज आणि स्थिर गतीने उडू शकते. कमी हवेच्या प्रतिकारामुळे इंधनाचा वापरही कमी होतो, त्यामुळे विमान आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्ट्या अधिक कार्यक्षम बनते.

विमानाचे इंजिन आणि एरोडायनॅमिक डिझाईन यामध्ये हवेची घनता आणि दाब यांचा विचार करून बनवलेले असल्यामुळे, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास मिळतो.

एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.'' वैतागलेल...
10/09/2025

एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.'' वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''..म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...
'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

क्वांटम विश्व !
13/08/2025

क्वांटम विश्व !

05/07/2025
खरंच.. आयुष्य किती क्षणभंगुर आहे ना!!एक विमान अवकाशात झेपावलं…खिडकीबाहेरचं शहर क्षणाक्षणाला लहान होत गेलं,आणि आत, त्या ब...
13/06/2025

खरंच.. आयुष्य किती क्षणभंगुर आहे ना!!
एक विमान अवकाशात झेपावलं…
खिडकीबाहेरचं शहर क्षणाक्षणाला लहान होत गेलं,
आणि आत, त्या बंद दरवाज्याआड अनेक स्वप्नं, आठवणी, आणि अपेक्षा उंचीवर झेप घेत होत्या…

कोणी पहिल्यांदा आकाशात जात होतं,
तर कोणी रोजच्या प्रवासातही मनात एक प्रार्थना बाळगत होतं —
"सगळं ठिक होऊ दे."

कोणीतरी आईला टेक्स्ट केला असेल,
कोणी मुलाला मिठी घालतानाचा क्षण पुन्हा डोळ्यांत साठवला असेल…
कोणी “Take off ✈️” म्हणत शेवटचा मेसेज पाठवला असेल,
आणि कोणीतरी मनातल्या मनात म्हटलं असेल —
"पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस."

पण त्या आकाशात एक भयाण क्षण लपला होता…
एक आवाज, एक प्रकाशझोत, एक थरकाप…
आणि एका क्षणात सगळं शांत… स्थिर… आणि पोकळीने भरलेलं.

घड्याळं चालू होती, मोबाईल्समध्ये नेटवर्क होतं,
पण जे गेले, ते परत आले नाहीत…
राहिल्या फक्त आठवणी, उरलेले अर्धवट संवाद, आणि थांबून राहिलेली वाट पाहणारी नजर.

> “Call me when you land...”
“Miss you already...”
“Take care...”

हे संदेश आता न वाचले गेलेले शेवटचे शब्द बनले.
त्या फोनचं स्क्रीन अजूनही उजळतं, पण आता उचलणारा कोणी उरलेलं नाही…

शेवटचा टेक्स्ट कोणता असेल हे आपण ठरवत नाही.
शेवटचा क्षण केव्हा येईल, याची कुणालाच कल्पना नसते.
म्हणूनच,
प्रत्येक क्षण प्रेमाने जगा,
प्रत्येक भेट अगदी मनापासून घ्या,
आणि क्षमाशील राहा… कारण आयुष्य खूप अल्प आहे.

🙏🏽 नम्र श्रद्धांजली त्या सर्वांना –
जे अनपेक्षितपणे काळाच्या सावलीत हरवले.
ते गेले असले, तरी त्यांचे स्वप्नं, स्मितहास्य, आणि अस्तित्व अजूनही आपल्या आठवणीत श्वास घेत आहे. 😔🙏🏽

#अहमदाबाददुर्घटना

छत्रपती शाहू महाराज कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार !  महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात ...
07/05/2025

छत्रपती शाहू महाराज कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे.
स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत !"
महाराजांनी बस म्हटलं की बसायचं ! कुठे जायचंय ? कधी परत यायचं ? असलं काही विचारायचं नाही....
सोनतळीहून फोर्ड निघाली. स्वतः महाराज गाडी चालवत होते.
गाडीमध्ये महाराज, डाकवे मेस्त्री, अरबशा, रसूल व मोहिद्दिन टकले असे पाचजण होते. गाडी शहरात आली. पोलिस स्टेशनजवळ गाडी थांबवून महाराजांनी म्हैसकर फौजदारांना गाडीत घेतले. त्यानंतर पापा परदेशी व आबालाल रहिमानला गाडीत घेतले.
गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन राजवाड्याच्या दिशेने निघाली.
वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते.
त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली.
महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले.
जहागिरदार पळतच बाहेर आला.
महाराज म्हणाले, "बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला.
गाडीत कुठे बसावे बाबाला कळेना. महाराजांनी गाडी सुरु केली.
बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला.
गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.
तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले, "आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
आप्पालाही काही कळेना.
दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.
असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर सर्व गरीब व खालच्या समाजातील, फाटकातुटका पोषाख केलेली मंडळी.
गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.
अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला. गंमत म्हणजे, त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली.

जनता कमी दर्जाची नाही !

मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले...

- स्व.मानस पगार यांची पोस्ट

20/04/2025
नक्की पहा 👇🏻
17/04/2025

नक्की पहा 👇🏻

भौतिकशास्त्र म्हणजे केवळ समीकरणे, सूत्रे आणि प्रयोग नाहीत; ते आहे एका अद्भुत विश्वाची कथा—कणांच्या सूक्ष्म दुनि....

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Kalkekar-अविनाश कळकेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Avinash Kalkekar-अविनाश कळकेकर:

Shortcuts

Share

Category