Hon.Balasaheb Jadhav Arts,Commerce & Science College Ale

  • Home
  • India
  • Junnar
  • Hon.Balasaheb Jadhav Arts,Commerce & Science College Ale
आळे, संतवाडी, कोळवाडी, वडगांवआनंद व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना तसेच  सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात आनंद वाटतो ...
07/08/2026

आळे, संतवाडी, कोळवाडी, वडगांवआनंद व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात आनंद वाटतो की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आदर्श शिक्षक
आदरणीय जी.एल गुंजाळ सर..
🥇 शिक्षक सेवकाळ - सन 1963 ते सन 2003 ,40 वर्ष सेवा,शैक्षणिक संस्था -ज्ञानेश्वर ग्रामोनती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी
🥇 आळे सहकारी दूध उत्पादक संस्था-संचालक - सन 1976 ते 1990.
🥇 ग्रामपंचायत आळे मा. उपसरपंच/सदस्य - सन 1991 ते 1996, सन 2000 ते 2007.
🥇 संस्थापक -महात्मा फुले पतसंस्था आळे.
🥇 मा.आदर्श तंटामुक्ती पारितोषक विजेते अध्यक्ष आळे -सन २००८ ते सन २०१३
🥇 ज्ञानेश्वर ग्रामोनती मंडळ आळे , संतवाडी, कोळवाडी मा.सेक्रेटरी/संचालक - सन 2007 ते सन 2012, सन 2017 ते 2022.
🥇 पंचायत समिती जुन्नर -मा. उपसभापती /सदस्य -सन 2007 ते सन 2012.

यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा कार्यक्रम (81 वा वाढदिवस) गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होत आहे..
तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे..

आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती! धन्यवाद!!🙏🙏

स्थळ- सौभद्र मंगल कार्यालय (बँक ऑफ महाराष्ट्र पाठीमागे) आळेफाटा

निमंत्रक - समस्थ ग्रामस्थ आळे, संतवाडी, कोळवाडी, व पंचक्रोशी,सर्व संस्था, सर्व संस्थेचे आजी, माजी पदाधिकारी व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी 🙏🙏

लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व ...
01/08/2026

लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथील अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरुणा वाघोले यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील कार्याचा आढावा घेताना सांगितले की, "लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जातात. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा त्यांचा घोष आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्य चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आणि काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व हे भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदान आहे."

यावेळी त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, "अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. महान व्यक्तिमत्त्वाला परिस्थिती घडवते आणि त्या व्यक्ती आपल्या जिद्द, कष्ट व संघर्षातून समाजपरिवर्तन घडवून आणतात. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याकडे केवळ विद्रोही किंवा मार्क्सवादी लेखक म्हणून न पाहता, माणुसकीचा विचार करणारा आणि संघर्षशील सामान्य माणसाच्या वेदना शब्दबद्ध करणारा साहित्यिक म्हणून पाहणे आवश्यक आहे." त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामागील मानवतावादी दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचारांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी सांगितले की, "अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेची संकल्पना मांडत सामाजिक समतेचा विचार दृढ केला. त्यांच्या लेखनामध्ये ग्रामीण जीवनातील वास्तव, शहरातील कष्टकरी वर्गाचा संघर्ष आणि माणुसकीचे मूल्य प्रभावीपणे प्रतिबिंबित झाले आहे. त्यांनी जात, धर्म किंवा वर्ग यापलीकडे जाऊन 'माणूस' हा केंद्रबिंदू ठेवून साहित्यनिर्मिती केली. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही समाजाला दिशा देणारे ठरते."

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाच्या समन्वयक डॉ. सुषमा कदम यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सुंदरताई कुऱ्हाडे, वैशाली देवकर, मंगल कांकरिया, अनिता कोकाटे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. सीमा औटी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोमनाथ तितर, श्री. गाढवे गोविंद व श्री. शिंदे जितेंद्र यांनी केले, तर विकास साळवे, राजेंद्र पाडेकर, सागर भुजबळ व शुभम गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान संपन्नआळे, दि. १ ऑगस्ट २०२६ : मा. बाळासाहेब...
01/08/2026

मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान संपन्न

आळे, दि. १ ऑगस्ट २०२६ : मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे आळेफाटा पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षा जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित डिजिटल व्यवहाराची सवय रुजविणे तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक घंटे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुंदरताई कुऱ्हाडे, वैशालीताई देवकर, अनिता कोकाटे , मंगल काकंरिया ताई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल पेमेंटची सुरक्षितता तसेच सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी युवकांनी अमली पदार्थ, तंबाखू, मद्य व इतर व्यसनांपासून दूर राहून निरोगी, शिस्तबद्ध व जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान द्यावे, असे आवाहन करत व्यसनमुक्ती अभियानाचे महत्त्वही स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियाचा गैरवापर आणि आर्थिक सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले.

महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व उपस्थितांकडून सायबर सुरक्षा प्रतिज्ञेबरोबरच व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञाही करून घेतली.

याप्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रा. संजय वाकचौरे, शारीरिक शिक्षण संचालक कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड व एनसीसी कॅडेट्स यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एएनओ लेफ्टनंट शशिकांत भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन एएनओ मेजर डॉ. सुषमा कदम यांनी केले.

आळे महाविद्यालयात कारगिल विजय दिन व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरीमा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळ...
01/08/2026

आळे महाविद्यालयात कारगिल विजय दिन व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी कारगिल विजय दिन व गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रसेवेप्रती असलेल्या सर्वोच्च समर्पणाला आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांचे शौर्य, त्याग, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रेरणास्थान असून ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गुरुचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. अरुणा वाघोले यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना गुरु-शिष्य नाते हे विश्वास, आदर, संस्कार आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर आधारित असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅडेट्सच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कॅडेट्सनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही गुरुजनांच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅडेट्स, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत देशभक्ती आणि गुरुजनांप्रती आदराची भावना अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एएनओ मेजर डॉ. सुषमा कदम, एएनओ लेफ्टनंट शशिकांत भगत, कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड , प्रा. संजय वाकचौरे, प्रा. संतोष राठोड (विद्यार्थी विकास अधिकारी), राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. जयसिंग गाडेकर तसेच प्रा. विकास पुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे ,बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ .अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कु-हाडे,भाउशेठ कु-हाडे, बबन सहाणे , उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ , जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके , प्रदिपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी कारगिल विजय दिनानिमित्त व गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या खुटाळ हिने केले, तर आभार प्रदर्शन वैशाली राठोड हिने केले.

स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना महाविद्यालयात अभिवादनआळे, दि. २३ जुलै : ज्ञानेश्वर...
23/07/2026

स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना महाविद्यालयात अभिवादन

आळे, दि. २३ जुलै : ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे केंद्रीय ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इतिहास विभागप्रमुख डॉ. अरुणा वाघोले यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीच्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करत त्यांनी भारतीय संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जोपासणारी शिक्षणव्यवस्था उभारण्याचा आग्रह धरला. स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार हे आर्थिक स्वातंत्र्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी समाजाला पटवून दिले. स्वदेशी उद्योगांना चालना देत आत्मनिर्भर भारताची संकल्पना त्यांनी त्या काळातच मांडली.

डॉ. वाघोले पुढे म्हणाल्या की, ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून टिळकांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर निर्भीडपणे टीका केली. ‘केसरी’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर जनजागृती, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम ठरले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” हा त्यांचा घोष भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी भारतीय समाजात स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची चेतना जागविली. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा पुरस्कार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान, चारित्र्य आणि राष्ट्रसेवा ही जीवनाची ध्येये स्वीकारावीत. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण गुळवे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयसिंग गाडेकर, बी.बी.ए. व बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. एस. एस. थोरात, प्रा. टी. एस. गायकवाड, प्रा. ए. पी. वामन, प्रा. एस. ए. शिंदे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री. विकास साळवे, श्री. राजेंद्र पाडेकर, श्री. शुभम गुंजाळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. सीमा औटी यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोमनाथ तितर, श्री. गोविंद गाढवे आणि श्री. जितेंद्र शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा युवकांसमोर आदर्शज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञ...
22/07/2026

अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा युवकांसमोर आदर्श

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव यांनी दिली.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. अरुणा वाघोले यांनी आपल्या मनोगतातून अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला. त्यांनी अजितदादांच्या शिस्तप्रिय स्वभाव, वेळेचे काटेकोर नियोजन, निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड आणि कामाचा विलक्षण उरक या गुणांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, अभ्यास आणि कार्यक्षमता यांचा सुंदर मिलाफ आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनातील प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असून कोणतेही काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास राहिला आहे. त्यामुळे ते प्रशासनातील प्रभावी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी अजितदादा पवार यांच्यासारखी शिस्त, सातत्य, अभ्यासू वृत्ती आणि कार्यतत्परता आत्मसात करणे आवश्यक आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय धाडसाने घेतले. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, योग्य नियोजन आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन यांच्या बळावर त्यांनी विकासकामांना गती दिली. त्यांच्या कार्यशैलीत वेळेचे महत्त्व, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि काम पूर्ण करण्याची जिद्द स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श युवकांसह सर्वांनी समोर ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एस. डी. वाकचौरे, डॉ. रावसाहेब गरड, आय.क्यू.ए.सी. समन्वयक मेजर डॉ. सुषमा कदम, डॉ. आर. सी. भुजबळ, बी.बी.ए. व बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. एस. एस. थोरात, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. एस. बी. राठोड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संगीता भारती यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात ग्रंथपाल प्रा. सीमा औटी तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोमनाथ तितर, श्री. गोविंद गाढवे आणि श्री. जितेंद्र शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

16/07/2026
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा...
01/07/2026

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा

आळे, दि. १ जुलै २०२६ : ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे बुधवार (दि. १ जुलै) रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव होते, तर इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरुणा वाघोले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मार्गदर्शनपर मनोगतात डॉ. अरुणा वाघोले यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेत शेतीसमोरील आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकला. वाढता उत्पादन खर्च, हवामानातील बदल तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्या म्हणाल्या की, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्यामागे रासायनिक शेतीतून उत्पादित अन्नधान्याचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शाश्वत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, स्थानिक संसाधनांचा उपयोग करून कमी खर्चात सेंद्रिय शेती करावी आणि भावी पिढीच्या आरोग्यासाठी सुरक्षित अन्ननिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी कृषी दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शेतीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून सेंद्रिय शेती, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास आय.क्यू.ए.सी. समन्वयक मेजर डॉ. सुषमा कदम, डॉ. सविता रहांगडाले, लेफ्टनंट शशीकांत भगत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल प्रा. सीमा औटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारी @श्री. सोमनाथ तितर, श्री. गाढवे गोविंद आणि श्री. शिंदे जितेंद्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांनी सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त हार्दिक अभिवादन!"समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी ...
26/06/2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त हार्दिक अभिवादन!

"समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया."

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

A/P-Ale, Tal-Junnar, Dist-Pune
Junnar
412411

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Telephone

02132262522

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hon.Balasaheb Jadhav Arts,Commerce & Science College Ale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Hon.Balasaheb Jadhav Arts,Commerce & Science College Ale:

Shortcuts

Share