Creative Learning Hub

Creative Learning Hub learning platform

08/05/2022
दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07:00 वाजता नवोदयमध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्रयाविषयावर live चर्चा करणार आहोत.आपणास ...
27/08/2021

दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07:00 वाजता
नवोदयमध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र
याविषयावर live चर्चा करणार आहोत.

आपणास यामध्ये काय मिळेलं......!
● नवोदयमध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र
● शून्य ते नवोदय प्रवेश प्रवास
● नवोदयची तयारी कशी करावी?
● नवोदय साठी कोणते पुस्तके वापराल?
● किती वेळ अभ्यास करावा?
● विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी द्यावी?
● आणि बरंच काही.......

https://chat.whatsapp.com/HLIBWHyV6os2FO1Kkq3RQZ

11/06/2021

करोनाच्या काळात जीवाची बाजी लावून
लढणारे
डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासन
यांना आपण "करोना वॉरियर" चा सन्मानही दिला,खरचं अभिनंदनीय आहेच हे एक माणूस म्हणून माणुसकी जपण्यासाठी,
पण.....
एकदोन महत्वाच्या घटकांकडे म्हणावं तितकं
लक्ष दिलं गेलं नाही !
(काही अपवादही असतील)
त्यातला एक घटक.......

तुम्ही स्वतःच पहा !

खास बालदोस्तांसाठी........मोरी गाय"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय द...
11/06/2021

खास बालदोस्तांसाठी........

मोरी गाय

"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला.

"तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे.' शिवा म्हणाला.

श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, 'बारकू! तू मला आवडतोस, म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे.'

श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहात होती. श्यामने सुरूवात केली:

"आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळयासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे.'

माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठयात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंडदेखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुस-याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.

माझी आई मधून गोठयात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मो-या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी, तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मो-या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुस-या कोणाला काढू देत नसे.

ज्याने द्यावे त्याने घ्यावे, असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. 'गंधेन गाव: पश्यन्ति.' गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱयाला ती लाथ मारी. 'पाप्या! माझ्या कासेला तू हात लावू नकोस; माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, 'असे जणू ती सांगत असे.

ती मोरी गाय भाग्यवान होती, असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात. एक दोन दिवसांत ढोर मरते.

मो-या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले; परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले; परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु:ख कळते! इतरांस काय समज? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात असे.

कधी कधी बोलताना आई म्हणे, 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली. ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दु:ख, रोग, दारिद्रय, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱयाला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'

#साने_गुरुजी

विचारांमधील कृतज्ञता.........!
09/06/2021

विचारांमधील कृतज्ञता.........!

केन्या के दान की कहानी जो सोच बदल देगी :) Kenya’s 12 tonne food relief for India and the story of 14 cows donated by Kenyan Masai tribes people to US.

*📗 वाईज अँड अदरवाईज*✒️ सुधा मूर्ती*🔖भाग : २**कसा हा मनुष्यस्वभाव..!*खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी चीफ सिस्ट...
07/06/2021

*📗 वाईज अँड अदरवाईज*
✒️ सुधा मूर्ती

*🔖भाग : २*
*कसा हा मनुष्यस्वभाव..!*

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी चीफ सिस्टिम अनलिस्ट म्हणून काम करत होते. कामानिमित्त, प्रोजेक्टसाठी तेव्हा खूप फिरावं लागे. कधी जवळपासच्या एखाद्या शहरात नाही तर एखाद्या लहानशा खेड्यात जावं लागे. अनेकदा तर या कामासाठी मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रवास करावा लागे.
असाच एक शुक्रवार होता. या वेळी मोठा वीकएंड मिळणार म्हणून मी खुष होते. येत्या सोमवारी कसल्याशा सणानिमित्त सुट्टी होती. या तीन दिवसांच्या
सुट्टीचा फायदा घेऊन आम्ही बहिणींनी शिग्गावला आमच्या आजोळच्या घरी एकत्र
भेटायचं ठरवलं होतं.
हा शुक्रवार कधी एकदा संपतो असं मला झालं होतं. रविवारी पौर्णिमा
होती. मुद्दाम चांदण्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखलेला होता. उत्तर कर्नाटकमधल्या लोकांना या चांदण्यातल्या भोजनाचं फार कौतुक. आम्हाला सर्वांनाच काम संपवून निघण्याची घाई झाली होती, एवढ्यात कोणाचीतरी हाक आली. 'जरा माझ्या ऑफिसात येता का?'
माझ्या पोटात मोठा गोळा आला. ते आमचे साहेब होते. (माझ्या माहेरच्या नावाने त्यांनी हाक मारली होती.) त्यांच्या आवाजावरून काम तसं महत्त्वाचं
असणार, हे उघडच होतं. मी खरं तर निघालेच होते पण मग वाटेत त्यांच्या
ऑफिसपाशी थांबले.
'तुम्हाला असा त्रास द्यायला बरं वाटत नाही. पण तुमची आता तातडीने
गरज आहे,' असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पत्र ठेवलं. येत्या दोन दिवसांच्या आत एका विशिष्ट प्रोजेक्टच्या स्थळी जाऊन मी भेट दिली पाहिजे, असं
त्यात नमूद केलं होतं.
'काही हरकत नाही, सर. मी जाऊन काय ते बघते,' मी म्हणाले. दिवसभर, आठवडाभर अविरत काम करत राहण्याची मला सवयच होती, त्यामुळे गावी
जाण्याचा बेत रद्द करावा लागला, तरी त्याचं विशेष काही वाटलं नाही मला. नाही
तरी कोणत्याही सणाउत्सवापेक्षा, संमेलनापेक्षा माझ्या कामातच मला जास्त आनंद मिळायचा.
दुसऱ्याच दिवशी मी त्या प्रोजेक्टच्या गावाला जायला निघाले. मी
जाऊन पोचले तेव्हा मध्यान्ह झाली होती, पण त्या गावात मात्र दिवस नुकताच सुरू
झाल्यासारखं भासत होतं. गाव तसं लहानच होतं. दुकानं नुकती उघडत होती,
लोक कामाला निघाले होते.
मी बसस्टँडवर उतरले आणि गावाच्या दिशेने चालत निघाले. इतक्यात
एक पोरसवदा तरुण धावतपळत माझ्यापाशी आला आणि म्हणाला : 'सॉरी मॅडम,
मला यायला उशीर झाला. मी तुम्हाला आणायला बसस्टँडवर येणार होतो.'
आमच्या क्लाएंटचा तो प्रतिनिधी होता. तो मला त्यांच्या ऑफिसात नेण्यासाठी
आला होता.
तेथून चालत काही मिनिटांतच आम्ही त्यांच्या ऑफिसात पोचलो. ऑफिस
तसं लहानच होतं. ते काही अत्याधुनिक वगैरे नव्हतं. जुन्या, दुरुस्त केलेल्या फर्निचरने ते सजवलेलं होतं. मात्र टापटिपीत ठेवलेलं होत. सगळे जण माझीच
वाट पाहत होते. मला बरं वाटलं, मी बसले. त्यांनी मला प्यायला गार ताक आणलं. ते पिऊन एकदम ताजंतवानं वाटलं. कामाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एका नीटनेटक्या तरुणाशी ओळख करून देण्यात आली.
मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. तो चांगला तरतरीत होता. आत्मविश्वासाने बोलत होता. हुशार वाटला. त्याचं कामही चांगल्या दर्जाचं होतं. ते पाहून नाही म्हटलं तरी मला जरा आश्चर्यच वाटलं. त्याच्या काम करण्यातून
त्याची व्यावसायिकता जाणवत होती. मला लोकांनी त्याच्याविषयी असंही सांगितलं,
की त्याचं वाचन भरपूर होतं, किंबहुना त्यांच्या गावात त्याच्याइतकं वाचन कोणाचंही
नव्हतं.
त्यानं कामाची कागदपत्रं पण अगदी शिस्तशीर, नीटनेटकेपणे ठेवलेली
होती. त्यामुळेच आमचं काम फारच लवकर आटपलं. मी जायला निघाले. जाण्याआधी
आवर्जून त्याचं कौतुक केलं. त्यावर तो लाजला. मग त्याने मला चहासाठी घरी
येण्याचा खूप आग्रह केला. त्याचं घर जवळच होतं. त्याचं घरही फार नीटनेटकं ठेवलेलं होतं. चहा पिता पिता आमच्या गप्पा
सुरू झाल्या. आता गप्पा जरा वैयक्तिक पातळीवर आल्या होत्या. त्याने त्याच्या आईवडिलांविषयी सांगितलं. त्याच्या याआधीच्या नोकरीविषयी सांगितलं. मग त्याने पत्नीची आणि दोन वर्षांच्या मुलाची ओळख करून दिली. आपल्या पत्नीचं पाककौशल्य, तिचं गाणं, तिनं शाळेत असताना प्राप्त केलेलं यश, या सर्वांविषयी
तो कौतुकाने बोलत होता. मग त्याने आपल्या मुलाला हाक मारली. तोही लगेच
आला, आणि हाताची घडी घालून माझ्या बाजूला उभा राहिला. जणू काही त्याला
तसं उभं राहायला शिकवलं असावं, असा. मग त्याच्या वडिलांनी त्याला कविता
म्हणून दाखवायला सांगितली. त्यानेही आपल्या बोबड्या आवाजात लगेच कविता
म्हणून दाखवली.
मीही मान हलवून त्याचं कौतुक केलं. पण आपल्या मुलाचं फक्त एवढंसं
कौतुक झालं, ही गोष्ट त्या वडिलांना काही फारशी रुचली नसावी. तिथे समोरच
मुळाक्षरांचा जुना तक्ता टांगलेला होता. मग वडिलांनी आपल्या मुलाला त्यातील
सर्व मुळाक्षरे ओळखायला लावली. खरं तर या अशा गोष्टी करायला मुलांना मुळात
आवडत नाहीत, पण पालक नेहमीच आपल्या मुलांवर बळजबरी करतात. बिचारी
मुलं !
आमच्या यजमानांनी आपल्या घरात चालवलेला तो प्रकार आणखी अर्धा
तास तसाच चालू होता. शेवटी ते मूलही कंटाळलं, अस्वस्थ झालं. चिडलं.
त्याच्या आईच्या ते लक्षात आलं आणि ती त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली.
बहुधा त्याला चॉकलेट नाही तर बिस्किटाचा खाऊ बक्षीस म्हणून मिळाला असावा.
आपल्या मुलाची काहीतरी तारीफ ऐकण्याची त्या वडिलांची माझ्याकडून
अपेक्षा असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी म्हटलं, 'तुमचा मुलगा त्याच्या
वयाच्या मानाने फारच हुशार आहे हं !'
'असणारच ! मी लहानपणापासूनच त्याला तशा पद्धतीनं वाढवलं आहे
ना!' तो माणूस अभिमानानं म्हणाला. आपल्या या दोन वर्षांच्या बाळाला याने
जन्मल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली होती की काय, असं मला वाटलं.
'अच्छा ! म्हणजे मूल केवळ शिकवल्यामुळे इतकं हुशार होऊ शकतं ?'
मी विचारलं.
'नाही, नाही तसं नाही. आनुवंशिकतेचाही त्यात भाग असतोच. माझा
मुलगा माझ्यावर पडलाय.' त्या माणसाचा चेहरा अभिमानाने नुसता फुलून आला
होता. आता मला त्याच्याकडून आणखी ऐकायची इच्छा झाली. शिवाय माझी बस
सुटायला अजून तासभर अवकाश होता.
'तुम्ही कॉलेजात असताना फार हुशार विद्यार्थी असणार !' मी उगीचच खोदून चौकशी केली.
'हो, तर. मी शाळेत आणि कॉलेजात असताना नेहमीच पहिला क्रमांक
पटकावायचो,' त्याने उत्तर दिलं. तो स्वत:वर चांगलाच प्रसन्न दिसत होता.
'तुम्ही कुठल्या कॉलेजातून पदवी घेतली ?' मला बरीच उत्सुकता वाटू
लागली होती.
'मी बी व्ही बी इंजिनीअरिंग कॉलेजात होतो, हुबळीला.'
आता मी चमकले. हुबळी, ते इंजिनीअरिंग कॉलेज, सगळंच माझ्या परिचयाचं होतं. 'कुठल्या वर्षी ?' मी विचारलं.
'१९७२ साली मी पहिल्या क्रमांकानं इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालो.'
'मग... तुम्हाला सुवर्णपदक मिळालंच असेल, नाही ?" मी मुद्दाम विचारलं.
'हो ना... त्या वर्षीचं सुवर्णपदक मलाच मिळालं होतं, तो स्वत:वर खूश
होऊन म्हणाला.
आता मात्र तो काय प्रकारचा माणूस आहे. हे माझ्या चांगलंच लक्षात आलं. ते पाहून मात्र मला वाईट वाटलं.
'मला जरा तुमचं सुवर्णपदक बघायला मिळेल का?' मी विचारलं,
अचानक माझ्या त्या प्रश्नानंतर खोलीतील वातावरण बदललं. 'का बरं?
तुमचा माझ्यावर विश्वास नाही ?' आता त्याच्या आवाजात अनिश्चितता डोकवत होती.
'तसं नाही. तुम्ही १९७२ साली जे सुवर्णपदक मिळवलंत ते मला पाहायचंय.'
मी परत म्हणाले.
'ते फार बहुमोल आहे माझ्या दृष्टीने... म्हणून ते मी बँकेच्या लॉकरमधे
ठेवलंय,' तो म्हणाला.
'कोणती बँक ?' मी पण त्याचा पाठपुरावा केला.
'हा सगळा तपशील मी तुम्हाला का म्हणून द्यावा ?' त्याने चिडून विचारलं.
आता सगळं काही स्पष्ट झालं होतं. मला वाटतं, त्यालासुद्धा काय समजायचं ते समजलं असावं. त्याची अगत्यशीलता संपुष्टात आली होती. माझ्याही बसची
वेळ झाली होती. मलाही निघायला हवं होतं.
दाराकडे जाता जाता मी त्याला म्हटलं, 'तुमच्या बँकेचे किंवा तुमच्या
सुवर्णपदकाचे कोणतेही तपशील मला नकोत. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही. फक्त ते सुवर्णपदक तुम्हाला मिळालं असणं शक्य नाही, याची मात्र मला
खात्री आहे.'
'तुम्ही इतकं खात्रीशीर रीत्या असं कसं काय म्हणू शकता?' आता तो
चांगलाच संतापला होता.
'कारण...' मी त्याला म्हणाले. ते बोलतानासुद्धा मला दु:ख होत होतं,
१९७२ सालचं सुवर्णपदक मला मिळालं होतं, आणि दर वर्षी फक्त एकच
सुवर्ण-पदक देण्यात येतं.'
माझ्या तोंडचे हे शब्द ऐकून तो आश्चर्याने थक्क झाला आणि माझ्याकडे एकटक पाहातच राहिला, काही न उमगल्यासारखा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला हळूच विचारलं, 'तुम्ही इतके बुद्धिमान आहात. तुमच्या कामात वाकबगार
आहात. तुम्हाला खोटं बोलायची काय गरज आहे ? त्यानं काय साध्य होणार
आहे ?' एवढं बोलून मी वळले आणि पाठीमागे दार बंद झाल्याचा आवाज झाला.
हे एवढंच उत्तर मला मिळालं.

अनुवादक : लीना सोहोनी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

भारतातून लंडनला बसने जाता येत होते? जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता. कलकत्ता ते  लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्त...
09/04/2021

भारतातून लंडनला बसने जाता येत होते?

जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता.
कलकत्ता ते लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण(अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया,
आॅस्ट्रीया,जर्मनी,बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती.

भारतात हि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस करीत कलकत्ता येथे जात.

अल्बर्ट ट्रैवलची हि बस लंडन येथून 15 एप्रिल 1957 रोजी सुरु झाली ती भारतात कलकत्ता येथे 5 जून रोजी पोहचली होती. तेव्हा बसभाडे होते 85 पौंड.( आत्ताचे साधारण 8019 रु.) ही बस 1973 पर्यंत सुरु होती.

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ / टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते.फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती.
शॉपिंग साठी काही दिवस राखीव होते, त्यात तुम्ही दिल्ली, तेहरान, काबुल,इस्तांबुल ,साल्जबर्ग, विएन्ना येथे ती करु शकत होते.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?या ‘ स्क्रीन ‘ युगामध्ये आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतात...
27/01/2021

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

या ‘ स्क्रीन ‘ युगामध्ये आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतातच. टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन, मोबाईल फोनचा स्क्रीन अश्या अनेक स्क्रीन्सवर दिवसभर आपले डोळे लागून राहिलेले असतात. काही वेळा दिवसभराच्या कामानंतर डोळे पार थकून जातात, त्यानंतर डोळे दुखणे, लाल होणे, डोळ्यांची आग होणे, त्यांतून सतत पाणी येणे अश्या तक्रारी सातत्याने सुरु होतात. कधी कधी कमी दिसू लागल्याची भावना देखील होते. अश्या वेळी काही घरगुती उपायांनी आपल्या डोळ्यांची निगा राखता येऊ शकते.

सकाळी उठल्यानंतर स्वछ पाण्याने चुळा भरून डोळे स्वच्छ धुण्याची शिकवण प्रत्येक लहान मुलाला अगदी लहानपणापासून दिली जाते. या उपायाने श्वासाची दुर्गंधी जाऊन डोळे स्वछ होतातच, पण त्याशिवाय तोंडामध्ये पाणी भरून घेऊन, डोळे उघडे ठेऊन त्यांच्यावर पाणी मारल्याने दृष्टीदोष कमी होतो. जर एखाद्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर त्यांनी हा उपाय अवलंबून पाहावा. दृष्टीदोष कमी करण्यासाठी पायांच्या तळव्यांना मोहोरीच्या तेलाने दररोज मालिश करावी. तसेच स्नानापूर्वी पायांच्या अंगठ्यांना मोहोरीचे तेल चोळावे. यामुळे दृष्टीदोष सुधारतो आणि पुन्हा उद्भविण्याची शक्यता कमी होते.

डोळ्यांना आवश्यक ते पोषण मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये पालक, पालक, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, आणि गडद रंगाची फळे समाविष्ट करावीत. या फळांमध्ये अ, क आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. याशिवाय पपई, संत्री, लिंबू, गाजरे या पदार्थांचा समावेशही आपल्या आहारामध्ये असावा. दररोज सकाळी उठल्यानंतर ताजे लोणी, अर्धा लहान चमचा बारीक दळलेली खडीसाखर, आणि चार- पाच काळी मिरी असे एकत्र करून खावे. त्यानंतर त्वरित ओल्या नारळाचे दोन लहान तुकडे चावून खावेत, व बडीशेप खावी. त्यानंतर दोन तासांपर्यंत काहीही खाऊ नये. ज्या व्यक्तींना दृष्टीदोष जास्त असेल, त्यांनी या उपायाचा दोन ते तीन महिन्यांपर्यंत अवलंब करावा.

गाजराचा रस डोळ्यांसाठी अतिशय गुणकारी आहे. गाजराच्या रसाचे सेवन दुपारच्या जेवणानंतर तासाभराने करावे. जर गाजर खाण्यास आवडत असेल, तर दररोज दोन गाजरे खावीत. दृष्टीदोष सुधारण्यासाठी दहा ग्राम वेलची आणि वीस ग्राम बडीशेप एकत्र करून याची बारीक पूड करावी. दररोज एक लहान चमचा भरून ही पूड दुधाबरोबर घ्यावी. कांदे आणि लसू दोन्ही डोळ्यांच्या आरोग्याकरिता चांगले आहेत. यांचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावा.

भारतीय प्रजासत्ताक जगात भारी व्हावा.......!
26/01/2021

भारतीय प्रजासत्ताक जगात भारी व्हावा.......!

भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय...
25/01/2021

भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.

भारताच्या राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो......!

चला तर आज जाणून घेऊया नारळ खाण्याचे फायदे आणि नारळाचे सेवन केल्याने आपण कोणकोणत्या शारीरिक समस्यांपासून स्वत:चा बचाव करू...
24/01/2021

चला तर आज जाणून घेऊया नारळ खाण्याचे फायदे आणि नारळाचे सेवन केल्याने आपण कोणकोणत्या शारीरिक समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकतो.

थायरॉइड फंक्शन ठीक करतं

थायरॉइड फंक्शन जर योग्य पद्धतीने काम करत नसेल तर आपल्या गळ्यात अनेक प्रकारचे रोग सुद्धा निर्माण होऊ शकतात. काही लोकांना थायरॉइड रोग सुद्धा होतो जो थायरॉइड फंक्शन च्या योग्य रीतीने काम न केल्याने उद्भवतो. एका वैज्ञानिक संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की जे लोक नारळाचे जास्त सेवन करतात त्यांच्यात थायरॉइड फंक्शनची कोणतीच समस्या दिसून येत नाही. त्यांचे थायरॉइड फंक्शन अगदी योग्य पद्धतीने कार्यरत असते. तर मंडळी हा फायदा लक्षात घेता तुम्ही नारळाचे शक्य तितके सेवन करून आपल्या थायरॉइड फंक्शनचे कार्य उत्तम राखले पाहिजे.

मेंदूची कार्यक्षमता वाढते

हि गोष्ट वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हि गोष्ट खरी आहे कि नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. हे यामुळे शक्य होतं कारण नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. ज्यातील पौष्टिक तत्व तुमच्या ब्रेन सेल्सना सक्रीय करतात आणि तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. तुमची बुद्धी तल्लख होते. याचा थेट प्रभाव मेंदूवर होतो आणि ज्यांच्या मेंदूंची कार्यक्षमता कमी आहे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढते

वजन नियंत्रित करण्यासाठी

वाढतं वजन ही तर आज कित्येकांना भेडसावणारी सामान्य समस्या झाली आहे. मग हे वजन कमी करावं म्हणून लोक काय काय करत नाहीत. पण आम्ही तुम्हाला सांगतो, हे सगळं करण्यापेक्षा नारळ खा. अहो खरंच, नारळाचे सेवन केल्यास तुमचे वजन नियंत्रित राहू शकते. एका वैज्ञानिक संशोधनानुसार हि गोष्ट सिद्ध झाली आहे कि नारळाचे सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते. तर मंडळी अजूनही तुम्ही तुमच्या आहारात नारळाचे सेवेन करत नसाल तर आवर्जुन करा आणि वाढते वजन नियंत्रणात ठेवा.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

रोगप्रतिकार शक्ती ही आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची असते, कारण हीच रोगप्रतिकार शक्ती आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवते आणि शरीराला त्यांच्याशी लढण्यासाठी ताकद देते. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तो व्यक्ती फार कमी आजारांना बळी पडतो आणि नेहमी निरोगी राहतो. जर तुम्हालाही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राखायची असेल तर आवर्जून नारळाचे सेवन करा कारण नारळामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी

नारळाचे सेवन करण्याचा हा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल. हृदय हे आपल्या शरीराचे इंजिन आहे, या इंजिनाला धोका निर्माण झाला तर आपल्या शरीरालाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून हृदय हे नेहमी निरोगी राहिले पाहिजे. नारळामध्ये असणारा विशिष्ट गुण तुमच्या हृदयाला सुरक्षित आणि सक्षम ठेवतो. यासाठी डॉक्टर सुद्धा हृदयरोगींना नारळाशी निगडीत पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. तर मंडळी असा आहे हा सर्वगुणसंपन्न नारळ, ज्याचे इतके फायदे असतात आणि सर्व शरीरासाठी महत्त्वपूर्ण फायदे आहेत. काय मग? आतापासून तुम्हीही सुरु करणार ना नारळाचे सेवन? तुम्ही सुद्धा करा आणि मित्र मंडळींपर्यंत शेअर करून त्यांना सुद्धा नारळाचे फायदे कळवा व निरोगी राहण्यास मदत करा.

Address

Basmat
431512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creative Learning Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category