Maharashtra Rajya Prathamik shikshak Sangha Amravati

Maharashtra Rajya Prathamik shikshak Sangha Amravati महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील प्रणित जिल्हा शाखा अमरावती

 #माझं मूल 🌈जर माझं मूल मला घडवण्याची संधी पुन्हा मिळाली तर ,मी त्याला बोटाने चुप करण्याचे कमी करीन आणि भिंतीवर रेघोट्या...
14/11/2020

#माझं मूल 🌈
जर माझं मूल मला घडवण्याची संधी पुन्हा मिळाली तर ,मी त्याला बोटाने चुप करण्याचे कमी करीन आणि भिंतीवर रेघोट्या भरण्यास भरपूर वाव देईल .
त्याला सुधारण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा नवनवीन छंदात गुंतवण्याचा विचार करीन ,नजरेने धाकात ठेवण्या पेक्षा डोळसपणे त्यांचे निरीक्षण करील .
का? कशाला ,याची चिंता न करता त्याची आस्थापूर्वक चौकशी करीन, त्याला मनसोक्त हिंडण्यास वाव देईन व कल्पनेचे पतंग स्वैरपणे उडवण्यास प्रोत्साहन देईल. गंभीर होण्याचा वाव कमी आणि त्याच्याशी मूल होऊन खेळण्यांमध्ये रममान होईल त्याला रानमाळ
भटकण्यास संधी देईल वेळोवेळी त्याला नाउमेद करण्याएवजी प्रेमाने आपुलकी निर्माण करेल .त्याच्याबाबत कठोरपणा सोडून देईल ,मनमिळाऊ पूर्वक एकरूप होईल दिखाऊ व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या आधी त्याची स्वयम् प्रतिमा उज्वल करील.
सत्ता ,सामर्थ्या पेक्षा प्रेमाच्या सामर्थ्याची ओळख त्याला करून देईल. पंखाखाली घेण्याऐवजी त्याच्या पंखांमध्ये बळ निर्माण करील...
डायन लूमान्स 🙏

बालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।।
🏵🏵🏵

09/10/2020
आदरणीय श्री सुरेंद्र मेटे अध्यक्ष महा. राज्य प्राथ. शिक्षक संघ अमरावती आपली जि,प. शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून नि...
10/09/2020

आदरणीय श्री सुरेंद्र मेटे अध्यक्ष महा. राज्य प्राथ. शिक्षक संघ अमरावती आपली जि,प. शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ..
🌹🌹🌹🌹🌹

01/08/2020

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने इंग्रजी खजिना लुटला होता .फकीरा हा खजिना गोरगरिबांना
वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना पहिली जन्म घुटी पाजण्यात आली .
फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.
अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या वर्षी अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई
प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे लागले भायखळा चाळीत मजुराची संख्या मोठ्या प्रमाणात होती ,त्यामुळे मजुराचे प्रश्न ,त्यांचे आंदोलन जवळून पाहता आली ..भायखळा चाळमध्ये राहतांना अण्णाभाऊ कडे यांच्याकडे पुनवत व्यापारी राहायला आले .मुंबईमध्ये कपडे विकण्याचा व्यवसाय होता गायकवाड फिरणारा माणूस तो अण्णाभाऊ साठे च्या रूपाने मिळाला कपड्याचे गाठोडे मुंबई तून लागले मराठी पाट्या वाचू लागले त्यांना जवळून परिचय होऊ लागला. भायखळा चाडी मध्ये अनेक गोष्टी शिकवल्या स्वातंत्र्य पूर्वीचा असल्यामुळे कामगारांचे संप स्वातंत्र्यासाठी होणारे विविध प्रकारचे आंदोलन पाहू शकले
सत्ता अनिल चळवळ अण्णाभाऊंना आकर्षित करू लागली, कामगार चळवळीच्या संपर्क आल्यानं कर ,अण्णाभाऊ त्याकडे वळले उपाशी माणसांना तांबे वाली विचार रुसतात बाईक बनतो अण्णाभाऊ च्या बाबतीत आला १९४२ च्या नंतर कमुनिस्त पक्षा मध्ये काम करत असताना अण्णाभाऊ पुण्यात दिवसांमध्ये ते यशस्वी शाहीर . “१९४५पर्यंत अण्णाभाऊंनी विविध प्रकारची कामे केली शोधु त्यांनी भविष्याची स्वप्न रंगवली वाटेगाव ते मुंबई हा प्रवास करणारे अण्णाभाऊ पुढे १९६१ मध्ये प्रवास करतात रशियाचा प्रवास म्हणजे अण्णाभाऊंच्या जीवनातील अत्यंत आनंद होय .
अण्णाभाऊ हे लोककलावंत आहे त्यांच्याकडे मानवी जीवन समजून घेण्याची विशाल दृष्टी होती माणूस आणि माणसाचे प्रश्नत्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. या माणसाच्या जीवनात बद्दल “बरबांद्या कंजारी” कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात...
माझी फार निष्ठा असून फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ते जगतात, जगाला जगवतात.
त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज न त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रूप करणं मला मात्र आवडत नाही. नवे मला भीती वाटते. हे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांना आपल्या तळहातावर असं मी म्हणतो अशा माणसांना
वैफल्याच्या नावाखाली विद्रूप करू नये माझं मत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य लेखनाला शायरी
सुरुवात झाली सुरुवातीच्या काळातील लावण्या, पोवाडे ,तमाशे लिहीत असत शायरी ऑन माय आत्या
नंतर निवडले कथालेखन आकडे वडले गार्डन की च्या अनुवादित कथा वाचून अण्णा भाऊंना
कथा लेखनाची प्रेरणा मिळाली १९४९ मध्ये त्यांनी प्रथम कथा लिहिली आणि त्याच वर्षी प्रकाशित झाली पुढे
१९५७मध्ये त्यांचा खुळंवाडी हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दरम्यानच्या काळात अण्णाभाऊ कथाकार
म्हणून नावारूपास आले ,त्यांच्या अनेक कथांनी वाचकांचे अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले
उपकाराची फेड ही अण्णाभाऊ साठे यांची कथा भारतीय समाजव्यवस्थेतील व्यवस्थेतील एक भयान वास्तव
अधोरेखित होते , धार्मिक अस्पृश्य जातीचा एक वर्ग या देशात मध्ये अस्तित्वात आला ज्या वर्गाला वैदिक
धर्माच्या परिभाषेत जाते गेलेल्या अस्पृश्य जातीतील उपकाराची फेड या कथेतून त्यात अण्णाभाऊंनी चित्रित केले आहे मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिलेले योगदान आनंद साधारण आहे. माकली ची माळ ,वारणेचा वाघ, एकापेक्षा एक सरस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या अण्णाभाऊ साठे यांना मोठ्याप्रमाणात कादंबरी त्यांच्या कादंबरीतून व्यक्त होणाऱ्या जाणिवांचे स्वरूप वागण्यातून व्यक्त झालेल्या जाणिवांचे स्वरूप अधिक स्पष्ट होऊ शकते. विद्रोही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे कादंबरी म्हणून विचार होऊ शकतो .फकीरा ही सर्वोत्तम समजली जाते ,कादंबरीच्या अर्पण पत्रिकेतून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी अर्पण केली आहे. त्या सुरुवातीलाच कैफियत मधून एक मधील लक्ष दुष्काळाने आणि आर्थिक मागासलेपणामुळे खचलेल्या लोकांना जिवंत ठेवण्यासाठी फकीरा बेडस गावचा खजिना ताब्यात घेतो ,त्यामुळे फकिराला पकडण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत चर्चा केली जाते ,फकीरा सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर इंग्रजांकडून मांगाची दारकुंडे केला जातो फकीरा हा उपेक्षित लढ्याचा फकीरा विद्रोह आणि पेटलेला तयार असणारा न्याय माणुसकी हे त्यांचे सूत्र आहे, माणसावर होणारा अन्याय अत्याचार त्याला सहन होत नाही .त्या विरोधात बंड पुकारतो लाचार माणसे पाहून फकिराचे मस्तक विरहाने पेटून उठते म्हणून त्यांना वाचवण्यासाठी फकीरा खजिन्यावर स्वारी करतो त्या तिजोरीतील सर्व वस्तूंची संपत्तीची समप्रमाणात वाटणी करतो फकीरा हा समतावादी व स्वातंत्र्यप्रिय न्याय्य वाटतो. अण्णाभाऊ साठे ते प्रथम लोककलावंत आहे१९३०मध्ये त्यांनी पानिपत चा नवा छोटा पोवाडा रचला .कामाच्या शोधात मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊ चा कामगार चळवळीशी संबंध येऊ लागला त्यामुळेच आण्णाभाऊ साठे ,अमर शेख आणि शाहीर द विचारी कलावंत मित्रांनी लाल बावटा कलापथक स्थापन केले .१९४१ ते १९४२अखेर मुंबई शहरातील संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी एक प्रभावी शाहीर आणि कामगार क्रांतीला अधिक धारदार बनविले त्यांनी १९४२ मध्ये ग्राउंड चा पोवाडा दिला.
तमाशा अण्णाभाऊंचा आवडता कलाप्रकार त्यामुळे त्यात सुधारणा झाली पाहिजे असे त्यांना वाटत असे .परंपरागत तमाशातून शृंगार रस आला नाच्या -नाची ला महत्त्व दिल्यामुळे तो स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांना आवडत नाही. तमाशा म्हणजे अडाणी लोकांचा कलाप्रकार अशी गैरसमजुती झाली अशा परिस्थितीतून तमाशाला बाहेर काढतील आवश्यक होते .बदनाम झालेला तमाशा मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार ने १९४८ मध्ये तमाशा सुधार समिती नेमली . अण्णाभाऊ साठे हे लोकनाट्य या शब्दाचे जनक मानले जातात त्याचे कारण म्हणजे त्यांनी तमाशाचे लोकनाट्यात रुपांतरण केले , लोकनाट्य या शब्दाचे श्रेय अण्णाभाऊ कडे योगायोगाने आले .संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे आधीचे दिवस महाराष्ट्रापासून मुंबई तोडून ते गुजरातमध्ये टाकण्यासाठी महाराष्ट्र दृष्ट्या राजकीय राजकारण्यांची तेव्हा जोरात खटपट चालली होती अण्णाभाऊ तेव्हा लाल बावटा कलापथकाद्वारे फडाद्वारे भोंदू ,वस्ताद, राजकारणावर व मुंबई शासनावर टर उडवली होती.
त्यांनी माझी मुंबई हा वग लाखो कामगारांसमोर सादर केला आणि स्टेजवरून जाहीर केले की मायबाप सरकारने आहे म्हणून आम्ही आपल्यासमोर लोकनाट्य माझी मुंबई सादर करीत आहोत .
मुंबईतील कामगारांचे शोषण मुक्तीच्या लढ्यात अनेक कामगारवर केसेस दाखल झाल्या , परंतु
सरकारला किंवा भांडवलदारांना काहीच वाटत नव्हते ,कामगारांना पोटभर भाकर मिळत नाही
१४-१४ तास राबवून घेतले जाते , काम नाकारला जाते ,कामगार आपल्या मागग्या साठी संप पुकारतो ,
मोर्चे काढतो पण सरकार सत्ताधीश याचेवर काहीही परिणाम होत नाही, उलट सरकार दडपशाही करून
गोळीबार करून संप मोडून काढतात ,अनेक कामगार शहीद होतात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
अशा वेळी अण्णा भाऊनी अनेक पोवाडे रचले , कामगारांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे,
सन्मानाने जगायचे असेल तर, स्वतःचे जीवन बदलण्याची क्षमता यावी असे त्याना वाटायचे ,क्रांती गीते ,
पोवाड्यातून अण्णाभाऊंनी विद्रोही आशावाद व्यक्त केला.
लावणीतून अण्णा भाऊ विविध प्रकारचे अनुभव व्यक्त .आशावादी विविधता आणि नाविन्यपूर्ण जाणीव हे
त्यांची लावणीचे विशेष आहेत .वर्गवादि आणि परिवर्तनवादी समाज जाणीवा घेऊन या लावण्या रसिकांसमोर
आल्या ,याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईची लावणी ,,
मुबईत उचावारी ,मलबार हिल इंद्रपुरी !
कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती !
परळात राहणारे ,रातदिन राबणारे !
मिळल ते खाउन घाम गाळती !!
मुंबईच्या समाज जीवनातील भीषण वास्तव्यच अण्णाभाऊनी या लावणीतून व्यक्त केले आहे .

जग बदल घालुनी घाव! सांगून गेले मला भीमराव!
गुलामगिरीच्या या चिखलात! रुतून बसला का एरावत!!
वैदिक धर्म व्यवस्थेमध्ये सुद्धा कामगारांना त्यांच्या हक्क अधिकारापासून हजारो वर्ष वंचित ठेवण्यात
आले ,या गुलामगिरीच्या अंधारातून धनवंतांच्या आणि धर्मांधांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी एकत्र
येऊन विद्रोह केला पाहिजे ,तरच सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकते.


मनोज चौरपगार
अमरावती ९४०३६१८९९१

Address

Amravati
444606

Telephone

+19403618991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Rajya Prathamik shikshak Sangha Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Maharashtra Rajya Prathamik shikshak Sangha Amravati:

Shortcuts

Share