19/11/2025
[11/19, 20:09] dhnanjaykulkarni: https://youtu.be/8LE8hKeHp7E?si=6WHf2rT_uRFJMlnT
[11/19, 20:09] dhnanjaykulkarni: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक २०२१ चे प्रत्यक्ष वृत्त चित्र .
संस्था अध्यक्ष रावसाहेब कसबे यांचे विधान २ वर्षात निवडणुका न झाल्यास मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन . ती त्यांची नैतिक जबादारी आहे असे त्यांनी घोषित केले होते .
प्रत्यक्षात रावसाहेब कसबे यांनी दोन वर्षात निवडणुका न होऊन सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही . हे त्यांचे दांभिक निवडणूक व संस्था घटना प्रेम उघड झाले आहे .
तर कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणतात , संस्थेची सर्वसाधारण सभा सर्वोच्च आहे . परंतु या सर्वोच्च सभेला घटनेचा मर्यादेत राहूनच निर्णय घेण्याचे बंधन आहे . जर वेगळे निर्णय करायचे असतील तर आधी घटनेत बदल करणे कायद्याने गरजेचे .
हाच निवडणूक न झाल्याचा ठोस पुरावा.
धनंजय कुलकर्णी
कार्याध्यक्ष
शशांक महाजन
निमंत्रक
महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती , पुणे
१९ नोव्हेंबर २०२५
Pune Rada In Maharashtra Sahitya Parishad Meeting Update
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.comफेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taasट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnewsbatmya, marathi news...
01/03/2024
३ मिनिटात ३.५% ब्राह्मण संपऊन टाकू
अशी समाज माध्यमातून दिलेली धमकी हे गेली काही वर्षे महाराष्ट्रात पेरलेले जातीयतेचे विषाचा परिणाम आहे . यास राष्ट्रवादी ( शरद पवार) यांचा पक्ष जबाबदार आहे हे वस्तुस्थिती लक्षात घेता कडे नाकारत येईल ?
25/12/2023
पुणे पुस्तक प्रदर्शन राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी माध्यम
राष्ट्रीय पुस्तक न्यास द्वारा आयोजित पुस्तक प्रदर्शन भव्य स्वरूपात योजले गेले . जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . कार्यक्रम उत्तम झाले . साहित्य चळवळ गतिमान करण्याचा एक प्रभावी कार्यक्रम जनतेने स्वीकारला आहे . या साहित्य चळवळीतून भाषिक ऐक्य राष्ट्रीय स्तरावरच्या येईल असा विश्वास वाटतो. बहुभाषिक साहित्य संगमातून एक राष्ट्रीय एकतेचा धागा अधिक सक्षम होईल . यातून भाषांतर साहित्य उपक्रम गतिमान होईल . यातून बहुभाषिक भारतीयांचे भावनिक ऐक्य होईल यासाठी या ग्रंथ प्रदर्शन उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ अधिक गतीमान होईल . या साठी पुढील प्रयत्न होईल असा आश्वासक उपक्रम योजला गेला. सर्व आयोजक कार्यकर्ते यांना धन्यवाद
धनंजय कुलकर्णी , पुणे
10/11/2023
प्रकाश पर्व , दिपोत्सव
तेजाचे अंधारावर अधिराज्य
नकारात्मकते कडून सकारात्मकते कडे प्रवास
दिव्यत्व , सत्यत्व , बंधुत्व , ममत्व , प्रेमत्वाचा
मंगलमय , तेजोमय , मनोमय , जीवनमय अविष्कार
या प्रकाश पर्वाचे आपण अनुभव यात्री
या दिपोत्सव पर्वाच्या शुभंकर शुभेच्छा .
धनंजय कुलकर्णी
पुणे
प्रकाश पर्व , दिपोत्सव
नोव्हेंबर २०२३
09/11/2023
९ नोहेंबर ,भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मृती दिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली . थोर समाज सुधारक , स्त्री शिक्षण कार्याचे प्रवर्तक , ऋषितुल्य व्यक्तिमत्वास नमन .
08/11/2023
राष्ट्रीय महत्त्व असलेल्या , राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला बळकटी देणार उपक्रम ' मेरी मांटी मेरा देश ' हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संक्पनेतून साकारलेला हा उपक्रम .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या उपक्रम अंतर्गत १० लक्षहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या गावाच्या मातीसह आपले छायाचित्र पाठून एक सांख्यिकी विक्रम केला आहे .याची नोंद ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड या जागतिक दर्जाच्या संस्थेने घेतली याचा अभिमान वाटतो .या उपक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संकल्प पूर्वक सध्या केला या बद्दल या उपक्रमात सहभागी सर्वांचे अभिनंदन .
यातून विद्यापीठाचा नाव लौकीक जागतीक स्तरावर नोंदला जाणार आहे या बदल सर्व संबंधितांचे पुन :श्च अभिनदन
धनंजय कुळकर्णी
पुणे
11/07/2023
महाराष्ट्रात ' कलंक शोभा '
खेळ चालू आहे . उबाठा नेते आपला राजकीय पक्ष फुटला हे सत्य स्वीकारीत नाहीत व परिणामी मुखातून रोज शिव्यांची लखोली वाहत आहेत . रोज शिमगा आहे हे खरे .
09/07/2023
अभाविप ७५ ,
परिवर्तनाच्या चळवळीचा एक संघटनात्मक आविष्कार .
कार्यकर्ता निर्मितीचा एक अखंड प्रवाह .
राष्ट्रहीत केंद्रस्थानी ठेऊन विद्यार्थी चळवळ देशव्यापी करणाऱ्या संघटनेचा विस्तरणार , विकासणारा आलेख .
सामाजिक , राजकीय , शैक्षणिक प्रश्ना साठी लढणारी विद्यार्थी शक्ती
महाविद्यालयीन तरुणांचे संघटन , येथे तरुणाईचा आवेश , उत्साह आहे , समर्पणाची जिद्द आहे , संस्काराची मशागत आहे .
येथे प्रस्थापित व्यवस्थेवरोधात संघर्षाची धग आहे पण संयमित शक्तीची जाणीव आहे .
येथे नेतृत्वाची संधी आहे , समाजाचे भान आहे , समस्यांची जाण आहे , अभ्यासाचा आधार आहे . उथळ , अनावश्यक नेतृत्वाला वेसण आहे .
येथे निर्मितीक्षम , सृजनशील संकल्पनांचा आविष्कार आहे त्याला परिश्रमांची जोड आहे , सतात्याची आस आहे , मांगल्याची जडण आहे .
येथे मैत्रीचा आधार आहे , सुख दुःखातील साथ आहे . प्रेमाचा आधार आहे , कौतुकाची थाप आहे , मनाची जोडणी आहे , मनाची मशागत आहे .
संस्काराचा ठेवा आहे . माणसांची पारख आहे .
कधी मानवी विषण्णता , विखार , विद्वेष ,स्पर्धा , गट टाटांच्या भिंती आहेत पण त्याला सांधणाऱ्या संवाद वाटही आहे .
विद्यार्थी परिषदेत या प्रवासात आयुष्यातील ४६ वर्षांची वाटचाल करता आली हे भाग्य पूर्व पुण्याईचे फलित वा आई वडलांचे आशीर्वाद आहे .याची जाणीव असणे हेच आयुष्याचे संचित आहे.
धनंजय कुलकर्णी
पुणे
९ जुलै ,२०२३
02/07/2023
महाराष्ट्रातील राजकीय भूकंप
शरद पवार , उद्धव ठाकरे यांचा राजकीय अंत . जातीयवाद ,राजकीय गड्डारी याचा शेवट व्हावा हीच जनतेची अपेक्षा
07/12/2022
छत्रपती शिवाजी महाराज बदनामीचे राजकारण
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असा आरोप करून समाज माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणे , राजकीय वैमनस्य वाढवणे , समाजमन कलुशीत करणे असा प्रयत्न दूरदर्शन वाहिन्या , विरोधी पक्ष , शिवाजी महाराजांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या संघटना यांनी चालवला आहे . यात राजकीय हेतू आहेच . सत्ताधरी पक्षाची राजकीय कोंडी करणे , बदनामी करणे असा हा विरोधी पक्षाला अनुकूल असणाऱ्या खासगी वाहिन्या व विरोधी पक्ष यांचा हा संयुक्त उपक्रम आहे . यात कोणतीही शंका नाही .
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे दैवत आहेत. जनता महाराजांची दैवी व्यक्तिमत्त्व म्हणून पूजन करते . आपल्या माता पित्या पेक्षा महाराजांचा सन्मान येथील जनता करते . हे सर्व श्रुत आहे .
जसे जनता आपल्या वडलांना प्रेमाने आदराने , श्रध्देने एकेरी हाक मारते , जशी आपली दैवत असलेले राम , कृष्ण यांचाही उल्लेख भक्त एकेरीनेच करतात . विठ्ठल भक्ती मध्ये सुद्धा वारकरी विठ्लाचा उल्लेख एकेरी होतो . येथे आईचा,देवतांचा एकेरी उल्लेख करणे हा आईचा , दैवतांचा अपमान नसतो तसेच शिवाजी महाराजांन बाबत आहे .
जसे समाजात नव दाम्पत्य असेल तर त्यांचा उल्लेख लक्ष्मी नारायण सारखा जोडा दिसतो असा उल्लेख केला जातो या तुलनेत लक्ष्मी नारायण या दैवतांचा अपमान करण्याचा हेतू नसतो . त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांचा उल्लेख करून काही तुलना सदृश टीपणी करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही . या तुलनेत आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मानच होतो .
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व मागील काळात आदर्श होते असे म्हणणे म्हणजे ते आज आदर्श नाही असे मत मांडणाऱ्याचे मत आहे दे गृहीत धरून टिकेची झोड उठवणे हा उठवलं पणा आहे . जे विधान केलेच अंही , त्या विधान वरून गदारोळ माजवायचा व राजकीय पोळी भाजून घेण्याचा हिन प्रयत्न करायचा हे राजकारण चालू आहे हे सूज्ञ जनता जाणते .
बरे जे राजकीय पक्ष आज छत्रपती शिवाजी महाराज बदनामी या विषयावर राजकारण करत आहेत त्यांनी या पूर्वी शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे . जर त्यांचे बदनामीचे आजचे निकष लावयाचे झाले तर .या बाबत वाहिन्या , महाराजांचे वंशज , विरोधी नेते या महाराजांच्या बदनामी बाबत मौन बाळगून आहेत . हे त्यांचा व्यवहार दुटप्पी असल्याचे सिद्ध करणारे आहे .
प्रामुख्याने गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक , शिवाजी अंडर ग्राउंड इन मुस्लिम मोहल्ला हे नाटक , शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही हे शरद पवार यांचे विधान , भारत की रक खोज या नेहरूंच्या पुस्तकात व या वर आधारीत दूरदर्शन मालिकेत शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख , नेहरूंनी शिवाजी महाराजांचा अवमानकारक उल्लेख करून नंतर मागितलेली माफी या विषयात विरोधी नेते व समाज माध्यमे मौन बाळगतात .
महाराजांचे वंशज अवाक्षरही बोलत नाहीत , संताप व्यक्त करत नाहीत , रायगडावर जाऊन धरणे धरत नाहीत . हा दुटप्पी पण कुणास शोभून दिसतो ?
बरे काँग्रेस राजवटीत उत्पादीत होणारी शिवाजी बिडी , संभाजी बिडी , उद्धव सरकारने सुरू केलेला शिव वडा पाव , शिव थाळी या नमो उल्लेखाने महाराजांचा सन्मान होतो काय ?
स्वतः नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाचे नाव शिवाजीच्या नावाने ठेवायचे व शिवाजीच्या शत्रूचा , औरंगजेब यांचा सन्मान करणाऱ्या राजकीय व्यक्ती बरोबर सत्ता मिळवायची हे कोणत्या नीतीचे राजकारण हा प्रश्न जनतेच्या मनात आहेतच .
सबब हे शिवाजी महाराज बदनामी राजकारण त्वरीत थांबणे हे समाज हिताचे आहे .
शेवटी महाराजांची बदनामी म्हणजे नेमके काय ? महाराजांची बदनामी करणारा काँग्रेसी , डावे विचार मानणारे वगळता यअन्य कोणी भारतात सापडणे शक्य नाही . तसेच ज्यांनी नुकतीच काँग्रेस व डाव्यांची साथ घेऊन महाराजांच्या हिंदुत्व विरोधी राजकारणाची कास धरली आहे ते आज शिवाजी महाराज बदनामी विषयात उर बडवे राजकारण करत आहेत . हे समाज स्वास्थ्याच्या विरोधात आहे . समाजातील सामंजस्य सलोखा मातीत मिळवणारे आहे . याचे समाज भान जागृत करण्याची गरज आहे . ही काळाची गरज आहे . नाही तर दुभंगलेली समाज मने जोडणे अवघड जाईल हे नक्की . याचा समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे नाहीतर त्यांना इतिहास माफ करणार नाही .
धनंजय कुलकर्णी
पुणे
७ डिसेंबर २०२२ .
28/11/2022
जनहो
अथर्वशीर्ष आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केला . . हा विषयावर जातीय दृष्टीकोण ठेऊन केलेली टीका आहे . हे स्पष्ट मांडले अहिजे .
रामायण , महाभारत , गीता , ज्ञानेश्वरी , पसायदान , गाथा , ऋग्वेद , अथर्ववेद , सामवेद अशा भारतीय साहित्यावर संशोधन केले जाते . विद्यार्थ्यांना संशोधन पदवी मिळते . अथर्वशीर्ष हे या साहित्य परंपरेतील आहे . त्याचे कोट्यवधी लोक पठण करतात . अध्ययन चिंतन करतात . यात आक्षेप घेण्या सारखे काय ?
याच साहित्य प्रकारात दासबोध , मनाचे श्लोक , हरिपाठ , रामरक्षा आदी साहित्य प्रकार मोडतात.
तुलसी रामायण , गीत रामायण आदी विषयही प्रा हरी नरके यांच्या तर्काने आक्षेप सदरात मोडतात . ही विचारधारा विकृत व जातीयवादी आहे .
मी कुलगुरू डॉ कारभारी काळे यांचे अभिनंदन करतो . ज्यांनी प्रा हरी नरके यांचा आक्षेप फेटाळून लावला . या जातीयवादी प्रवृत्तीच्या दबावाला बळी न पडता विद्यापीठाचा निर्णय कायम ठेवला . हे अभिनंदनीय आहे .
धनंजय कुलकर्णी
पुणे
२८ नोहेंबर २०२२ .