28/12/2025
मुघल साम्राज्यात, विशेषतः अकबर बादशहाच्या काळापासून, मुघल राजकन्यांचे (बादशहाच्या मुलींचे) लग्न न करण्याची एक प्रथा पडली होती. यामागे कोणतेही धार्मिक कारण नसून प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक कारणे होती.
या प्रथेमागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रतिष्ठेचा प्रश्न (Status and Prestige)
मुघल स्वतःला 'तैमूर' वंशाचे आणि सर्वोच्च मानत असत. त्यांच्या मते, भारतात त्या काळात त्यांच्या तोडीचे किंवा त्यांच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही राजघराणे नव्हते. मुघल बादशहाला आपल्या मुलीचे लग्न आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या सरदाराशी किंवा राजाशी करणे प्रतिष्ठेच्या विरोधात (कमीपणाचे) वाटत असे. ज्याला आपण 'कुलीनता' म्हणतो, तो अभिमान यामध्ये आड येत असे.
२. राजकीय धोका (Political Threat)
हे सर्वात महत्त्वाचे कारण होते.
* जावयाचा धोका: जर राजकन्येचे लग्न झाले, तर तिचा पती (बादशहाचा जावई) हा राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे भविष्यात मुघल सिंहासनावर हक्क सांगू शकतो किंवा बंड करू शकतो.
* भाच्यांचा धोका: राजकन्येला होणारी मुले (बादशहाचे भाचे) देखील मामाच्या (म्हणजेच भविष्यातील बादशहाच्या) सत्तेला आव्हान देऊ शकतात.
सत्तेसाठी होणारे हे संभाव्य गृहयुद्ध टाळण्यासाठी मुघल बादशहांनी मुलींचे लग्न न करणेच पसंत केले.
३. अकबराचे धोरण
असे मानले जाते की अकबर बादशहाने ही प्रथा सुरू केली. त्याने असा विचार केला की, जर मुलींचे लग्न केले नाही तर जावई आणि त्यांच्या वंशजांकडून होणारा धोका कायमचा संपेल. त्यामुळे अकबरानंतरच्या काळात जहाँगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या मुलींची लग्ने झाली नाहीत.
उदाहरणे:
या प्रथेमुळे शहाजहानच्या प्रसिद्ध मुली जहाँआरा बेगम आणि रोशनआरा बेगम या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. तरीही, त्या काळात त्या अत्यंत श्रीमंत, शक्तिशाली आणि राजकारणात सक्रिय होत्या. जहाँआरा बेगम तर त्या काळातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होत्या.
अपवाद:
सुरुवातीच्या काळात (बाबर आणि हुमायूनच्या वेळी) मुघल मुलींची लग्ने होत असत. तसेच, नंतरच्या काळात अत्यंत क्वचित प्रसंगी काही अपवाद आढळतात, परंतु सर्वसाधारणपणे ही प्रथा १८ व्या शतकापर्यंत पाळली गेली.
27/12/2025
जगात ११ व्या शतकापासून अफू ही औषध म्हणून ओळखली जात होती. भारतात अफू १६ व्या शतकात लोकप्रिय झाली. सम्राट अकबराच्या (१५४३–१६०५) काळात माळवा (मध्यप्रदेश) आणि मेवाड (राजस्थान) या भागांत अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती. ‘आइन-ए-अकबरी’ नुसार त्याकाळी उत्तर भारतात सुमारे एक दशलक्ष चौरस कि.मी. क्षेत्रात अफूचे पीक घेतले जात होते.
पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांचा काळ
सुरुवातीला पोर्तुगीज व डच व्यापाऱ्यांनी भारतात अफूचा व्यापार सुरू केला. १७७३ मध्ये प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अफू व्यापारावर मक्तेदारी मिळवली आणि पुढील शतकात अफू ही सर्वाधिक नफा देणारी वस्तू ठरली. त्याकाळात कोलकाता (कलकत्ता) हे अफू व्यापाराचे मुख्य बंदर बनले.
भारतातील अफू उत्पादनासाठी ब्रिटिश काळातील प्रसिद्ध प्रदेश
१. बिहार (पाटणा) — ब्रिटिशांनी बिहारमधील सुपीक भागांत शेतकऱ्यांना जबरदस्तीने अफू पिकवायला भाग पाडले. पाटण्याचा अफू चीनमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध होता.
२. बंगाल (कोलकाता) — कोलकाता बंदर हे अफू व्यापाराचे मुख्य केंद्र होते.
३. माळवा, निमाड (मध्यप्रदेश) — या भागातील अफूला अधिक मागणी होती. भारतीय व्यापारी चीनमध्ये तस्करी करत.
४. ओरिसा — ब्रिटिशांच्या नियंत्रणाखालील महत्त्वाचा अफू उत्पादक प्रदेश.
५. आग्रा, अवध, अलाहाबाद (उत्तरप्रदेश) — अकबराच्या काळात येथे अफूची लागवड होत असे आणि ब्रिटिश काळातही ती सुरू राहिली.
६. मेवाड (राजस्थान) — अफूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे.
७. गाझीपूर (उत्तरप्रदेश) — येथे मोठे अफू प्रक्रिया केंद्र होते.
८. वाराणसी (उत्तरप्रदेश) — शेतकऱ्यांना अफू पिकवण्यासाठी अफू एजन्सीकडे नोंदणी करावी लागत असे.
ब्रिटिश धोरण आणि शेतकऱ्यांची परिस्थिती
ब्रिटिशांनी विविध भागांतील शेतकऱ्यांना जबरदस्तीने अफूचे उत्पादन घ्यायला लावले. अफू उत्पादनाचे प्रमाण, किंमत आणि विक्रीवर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवले. शेतकऱ्यांच्या इतर पिकांचे उत्पादन नष्ट करणे, तुरुंगात टाकण्याची धमकी देणे, माल जप्त करणे असे उपाय केले जात. परिणामी पारंपरिक शेतीचे रूपांतर अफूच्या शेतीत झाले. अफूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, तर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून भारतावर आपले नियंत्रण घट्ट केले.
27/12/2025
या एकाच घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आसाम , इराण, अफगाणिस्तान मध्ये गेले. ती घटना म्हणजे अफजलखान च वध. असा हा अफजल खान स्वार्थी, धर्मवेड्य ,क्रूर, कपटी असला तरी तो महापराक्रमी होता , ही बाब विसरून चालणार नाही. अफजलखान हा सुलतानी सत्तेचे दाहक प्रतिक आहे.अफजलखान इतका पराक्रमी होता की औरंझेबाला नुसते हरवले नाही तर औरंगझेब मरता मरता वाचला होता.
मराठ्यांच्या पराक्रमाची मुघलांना दहशत बसली म्हणून पुढे दुसरा अफजल झाला नाही आणि दुसऱ्या औरंग्या तयार झाला नाही. मुघल आक्रमकता फक्त मराठ्यांनी च संपवली हे त्रिवार सत्य आहे.
अफजलखान ही खरी तर एक पदवी आहे ह्याचे खरे नाव अब्दुल्लाखान असे होते.विजापूरच्या दरबारातील मुदपाकखान्यात असणाऱ्या भटारणीचा हा पुत्र असावा असे लिहला गेले . पोवाड्यात आणि संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्यात शिवाजीराजांच्या तोंडी जी वाक्ये दिली आहेत त्यावरून हे समजते की हा सामान्य कुळातला भटारी असावा .जवळ-जवळ सर्वच समकालीन मराठी व अमराठी साधने अफजलखानाला अब्दुल भटारी किंवा अफजल भटारी म्हणतात.
आज याच्या नावाने विजापूर जील्हात एक शहर ही आहे अफझलपूर .(अर्थात हे नाव खुप आधी दिले आहे).
रणदुलाखान हे विजापूर मध्ये आतीशय गाजलेले नाव. मराठ्यांचा विशेष connection कारण छत्रपती शहाजी महाराजांचे खुप जिवलग मित्र. याच रणदुलाखानाचा शिष्य किंवा चेला अफजलखान होता. रणदुलाखानाचा काही गुण घेतले पण काही चांगले गुण घेतले नाहीत. एकेकाळी अफजलखान आणि शहाजी महाराज रणदुलाखाना साठी लढले. पण नंतर रणदुलाखानाचा मृत्यू झाला आणि शहाजी महाराज आणि अफजलखान हेच दोन खंदे वीर राहिले.त्या दोघात खूप मत्सर द्वेष होता. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी महाराज सुद्धा याच अफजलखानाने कपटाने मारले.
#शिवाजीमहाराज #मराठी
26/12/2025
शहाजी राजांचे वडील (मालोजीराजे भोसले) हे त्यांच्या लहानपणीच युद्धात मरण पावले. पुढे शहाजी राजांनी आपल्या काकांच्या अनुसरणाखाली निजामशाह ची सुभेदारी पत्करली. पुढे त्यांचा विवाह जिजाबाईसाहेबांसह झाला. जिजाबाईसाहेब ह्यांना स्वराज्य स्थापने ची उत्कट इच्छा होती. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्या नंतर त्यांच्या लहानपणी शहाजी महाराजांनी कमजोर झालेल्या निजामशाहीत शेवटल्या उत्तराधिकारी "मूर्तिजा निजामशाहास" मांडी वर घेऊन निजामशाही चालवायचा प्रयत्न केला, पण मोंगल आणि आदिलशाही च्या कचाट्यात सापडून तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही.
पुढे शहाजीराजांनी आदिलशाहीत सरदारी घेतली व त्यांना सध्याचे बेंगलोर ह्या सुभ्याचे नेतृत्व मिळाले. तेथे देखील शहाजीराजांची छाप एक स्वतंत्र राजासारखीच होती. जेव्हा ह्या गोष्टी आदिलशहा परंत पोचल्या, तेव्हा त्यांनी दगाफटका करून मुस्तफाखान, बाजी घोरपडे आणि अफजलखान ह्या सरदारांद्वारे शहाजीराजांना कैद केले आणि तसेच विजापुरास आणले.
पण शिवाजी राजांच्या अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी डावपेचांमुळे, आदिलशाहला शहाजीराजांना स-सम्मान बहाल करावे लागले.
मला असं वाटत कि शिवाजी राजांचे गुण त्यांच्या शहाजी राजांनी लहानपणीच ओळखून त्या आईलेकांना पुण्यात ठेवले जेथे, शिवाजी राजांनी आईसाहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम असे "नेटवर्क" तयार केले. त्याभागातल्या सर्व मराठा लोकांना एकत्रित, संगठीत केले. शिवाजीराजांचे त्यावेळी वय लहान असल्यामुळे व ते आदिलशाहीत सरदार नसल्यामुळे, कोणीही त्यांच्यावर सतत पाळत ठेऊन न्हवते, व जोवर आदिलशहाची नजर शिवाजीराजांपर्यंत गेली, तोवर शिवाजीराजे शहाच्या कल्पनेहूनही १० पट पुढे गेले होते.
#शिवाजीमहाराज
26/12/2025
मराठ्यांनी धान्य पिकवून देश जगवला, हाती शस्त्र घेऊन, प्रसंगी बलिदान देऊन देश वाचवला, आपल्या हजारो एकर जमिनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी दिल्या, सिलिंग कायद्याअंतर्गत हजारो एकर जमिनी मराठ्यांना सोडाव्या लागल्या, मंदिरे, सामाजिक कार्यासाठी, धर्मादाय संस्थांसाठी जमिनी दान केल्या. हे सर्व करून मराठ्यांच्या पदरी काय आले याचे वास्तव मांडणारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे व मालक खिलारे पाटील यांची पोस्ट..
परवा अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडली, त्यात हॉस्पिटलची चूक की त्या पेशंटच्या कुटुंबाची असो, खूपच हळहळ झाली. परंतु त्यातून लोकांनी "चुकीचे मालक" म्हणुन फेसबुक, व्हाट्सअपवर पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासुन गाजत असलेले दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल प्रकरणामुळे पुन्हा पुन्हा मी इतिहासामधे जात आहे.
पुन्हा इतिहासामधे जाऊन "पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर?" हा विचार त्रास देतोय!!!
दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या जागेसोबत आमच्या लहानपणच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. एक भावनिक नातं आहे त्या जागेसोबत माझ्या घरच्या सर्वांचच.
ती ६ एकर जागा आणि त्याच्या बाजूच्या हिमाली आणी संकुल सोसायटी हा पूर्णं पट्टा आमची (खिलारे कुटुंबाची) शेती होती. होय, मला आजही आठवतय आमचे काका कै.पै.काशिश्वर ऊर्फ अण्णासाहेब खिलारे व वडिल श्री बाळासाहेब ऊर्फ अप्पासाहेब खिलारे-पाटील हे तिथे १९८६ पर्यंत शेती करत होते. मोठे काका कै.भाऊसाहेब हे राजकारणात असल्यामुळे वेळे अभावी त्यांनी फक्त शेती केली नाही.
आम्ही भावंडे तसे लहान होतो. तिथे काळ्या मातीतील फ्लॉवर, कोबी, काकडी, गहु,भले मोठे ऊसाचे वावर, तिथली विहीर आणि तिथला जागरूक म्हसोबा जिथे आजही आमचे बंधू मंदार आणि युवराज वेळोवेळी जावून स्वच्छता करून नेवैद्य दाखवतात.
परंतु आठवणी ताज्या आहेत आणि आता अजून ताज्या झाल्या.
माझ्या माहिती नुसार आमची साधारण ३४ एकर एकूण शेती होती. ती त्या काळात म्हणजेच १९८७ साली सिलींडर कायदा आला किंवा येणार होता. त्याच दरम्यान, लता मंगेशकर या पुणे शहरामधे हाॅस्पीटलसाठी जागा शोधत होत्या. तशी इच्छा त्यांनी शरद पवार यांना बोलून दाखवली.
मा.शरद पवार, मा.विलासराव देशमुख हे आमचे काका माजी महापौर कै.दि.ज.खिलारे ऊर्फ भाऊसाहेब यांचे मित्र होते. त्यांचे नेहमीच घरी येण जाण होते. या सर्व गोष्टींची आमचे अनेक नातेवाईक, हितचिंतक, सर्वं खिलारे परिवार साक्षीदारआहेत- शरद पवार यांचा भाऊसाहेब यांना फोन आला की, खिलारे साहेब कर्वेरोड डेक्कन काॅर्नर ते पौडफाट्याच्या पुढेपर्यंत सर्वं तुमच्या परिवाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या जागा आहेत. त्या पैकी गरवारे काॅलेज, नळस्टाॅपचं चर्च, महिलाश्रम, अग्निशामक दल, शासकीय दवाखाना आताचा (थरकुडे दवाखाना) अश्या जवळपास १५ एकर जागा तुमच्या वडिलांनी (जयसिंगराव खिलारे-पाटील) यांनी विनामोबदला दिल्या आहेत. लतादीदी धर्मादाय हाॅस्पिटलसाठी जागेच्या शोधात आहेत. एरंडवण्यामधे तुमची शेती आहे. त्यातला ६ एकर जागेचा पट्टा दिदींना धर्मादाय हाॅस्पीटलसाठी द्यावा.
शरद पवार साहेबांनी जाता जाता एक गोष्ट कानावर घातली जी हसत हसत कदाचित विनंती कम धमकी होती.. खिलारेसाहेब कर्वेरोडच्या अर्ध्या जमिनींचे मालक तुम्ही आहात. पण सिलींगचा कायदा आलेला आहे. जमिनी सिलींगमधे जातील. त्यापेक्षा धर्मादाय हाॅस्पीटलसाठी ती जागा द्यावी. गरवारे काॅलेज, महिलाश्रम, चर्च अशा कितीतरी जागा सिलींगचा कायदा नसताना दान केल्या गेल्या होत्या.
माझ्या धाकट्या आत्याचे आणि मोठ्या बहिणीचे सासरे, मुळशीचे आमदार नामदेवराव मते, आमच्या दुसर्या बहिणीचे सासरे मा.खासदार विठ्ठलराव तुपे तसेच अनेक नातेवाईक आणि हितचिंतक यांनी भाऊसाहेब आणि आमच्या वडील आणि पहिलवान काका यांना पुन्हा-पुन्हा सांगीतल की तुम्ही खिलारे कुटुंबाने स्वतः तिथे काॅलेज किंवा हाॅस्पिटल बांधा. पण आमच्या खिलारे कुटुंबातील सर्वांनी संमतीने ही जागा विनामोबदला देण्याचे ठरवले आणि तसा शब्द शरदरावांना दिला.
त्यावेळे रोज कोणाचे ना कोणाचे घरी फोन यायचे. एवढी मोठी सोन्यासारखी जागा नका देऊ मंगेशकरांना. धर्मादायी हाॅस्पिटलच्या नावाने आज तुम्ही जागा द्याल पण भविष्यात तिथे पैशांचा कारखाना सुरू होईल.. आणि तीच भविष्यवाणी नंतर वेळोवेळी अनुभवास आली.
खिलारे यांचे नाव हाॅस्पीटलला द्यावे किंवा एक पूर्ण मजला तुमच्या कुटुंबासाठी नेहमी रिझर्वं ठेवावा असही बरेच जणांनी सुचवल होत. पण दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलच्या सुरवाती पासुन शेवटपर्यंतच्या ६ एकर परीसरातील अगदी एखाद्या फरशीवरही आम्हा खिलारेंचे नाव लावून घेतलं नाही. परंतू "गोर-गरीब पेशंटला ट्रिटमेंटवर ३०% सुट देण्यात यावी" ही इच्छा आम्ही बोलून दाखवली होती. याच गोष्टीमुळे मनापासुन वाईट वाटत जेव्हा या वास्तूमधे पुन्हा पुन्हा पैशांसाठी उपचारांअभावी रूग्णांचे बळी जातात आणि इथे रुग्णांकडून अवाच्यासव्वा दर आकारले जातात.
आमची बहिण वर्षा हिच्या लग्नामधे विस-एक हजार लोकांच्या साक्षीने त्या जमिनीतील काळी माती चांदीच्या कलशा मध्ये घालून ३० एप्रिल १९८९ रोजी लता मंगेशकर यांच्या हातात तो कळश देऊन त्यांनच्या कुटुंबाला जमीन देतानाच्या आठवणी आणि फोटो फक्त राहिले आहेत.
हाॅस्पिटल बांधलं गेल आणि काही वर्षातच हाॅस्पिटल मॅनेजमेंट त्या प्रत्येक घटनेची साक्षीदार मी आहे याची खंत वाटते जेव्हा इथे कोणाचा नाहक बळी जातो.
मा.शरद पवारजी यांच्या विनंतीवरून पुणे शहरातील एरंडवणे येथील कोट्यावधी रूपयांची ६ एकर जागा मंगेशकर हाॅस्पीटलसाठी देताना माजी महापौर दि.ज.उर्फ भाऊसाहेब खिलारे यांच्या एकत्र कुटुंबाने गरिबांसाठी आपल्या भागामधे एक मोठं हाॅस्पिटल बनेल या भावनेतून ही जागा स्वखुशीने कोणत्याही अटी न ठेवता दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलसाठी दान दिली होती. माजी महापैार भाऊसाहेब खिलारे यांनी चांदीच्या कलशात जागे वरील माती भरुन ही जागा दान केली होती. तरी पण भाऊसाहेब खिलारे यांचे बायपास ऑपरेशनचे दहा लाख रुपये मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने घेतले हेाते. एवढेच नाही तर ज्यांनी ही जागा दान केली आहे ते आपल्या हाॅस्पीटलमधे एडमीट आहेत म्हणुन डाॅ. केळकर यांनी रूममधे येऊन भाऊसाहेबांची भेट घेतली होती. या भेटीचेही व्हिजीट चार्जॅस बिलामधे लावले होते. ते पाहुन भाऊसाहेब हसत बोलले होते की या हाताच दान त्या हाताला समजू द्यायच नसत ही आपली नियत आणि ती त्यांची नियत.
25/12/2025
माधवरावांच्या मृत्यूनंतर सती जाऊ नये म्हणून अनेकांनी रमाबाईंना विनविले. त्या सर्वाना, 'ईश्वरी सत्ता प्रमाण सती जाणे हा धर्म आपला आम्हास चवदा इंद्र होईजोपर्यंत स्वर्गवास लाभ होतो' एवढेच रमाबाईंनी सांगितले.
महायात्रेला निघाल्यावर त्यांनी स्वतःचे दागिने व मोहोरा दान केल्या. सामान्य चाकरांनासुद्धा किमान एक मोहोर दान केली. नंतर धर्मशास्त्रानुसार विधिपूर्वक सती गेल्या. उभयता पतीपत्नींच्या उत्तरकार्याचा खर्च १२८ - रोख रु. ५८, ५१६ आ. ६ आणि जामदारखान्यापैकी १२,५२४ रुपयांचे कापड मिळून ७१,०४० रु. ६ आणे. सुमारे १ लाख रु. रमाबाईंनी सती जाताना दानधर्म केला. तो ६०,६५० रु. धर्मादाय, २१,९५० रु. बक्षीस, १६,७८० रु. इनाम व देणगी, ६२० रु. धर्मादाय इनाम. याखेरीज गजदानार्थ आंबारीसुद्धा भवानी नावाचा हत्ती दिला.
रमाबाईंच्या सहगमनावर लिहिलेल्या पोवाड्याचा काही भाग अॅक्वर्थ व शाळीग्राम यांच्या 'ऐतिहासिक पोवाडे' मध्ये उपलब्ध आहे. सहगमनाबद्दल जेम्स फोर्बस म्हणतो. 'आपली सारी धनदौलत आणि जडजवाहीर तिने आपल्या नाते-वाईकांना वाटून टाकले आणि माधवरावांच्या शवाबरोबर ती स्मशानात गेली. तेथे सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर मोठ्या आश्चर्यकारक संथपणे आणि धैर्याने ती चितेवर चढली आणि स्वतःच्या हाताने तिने त्या चंदनाच्या चितेला अग्नी लावला नंतर ब्राह्मणांनी चितेत तूप व सुगंधी तेले ओतली.'
- पेशवे घराण्याचा इतिहास, प्रमोद ओक
25/12/2025
महाराणा प्रताप हे मेवाडचे महान राजपूत योद्धे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी अखेरपर्यंत लढणारे म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. अकबरासारख्या बलाढ्य मुघल सम्राटास शरण न जाता त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष चालू ठेवला. १५७६ मधील हल्दीघाटीच्या युद्धात संख्येने आणि साधनांनी कमी असूनही महाराणा प्रतापांनी अद्वितीय शौर्य दाखवले; त्यांच्या चेतक या अश्वाने प्राणांतिक जखमा होईपर्यंत स्वामीचे रक्षण केले. जंगलात, डोंगरात हालअपेष्टा सहन करत, कुटुंबासह साधे जीवन जगूनही त्यांनी मेवाडचा आत्मसन्मान टिकवून ठेवला. सत्ता, वैभव किंवा सुखासाठी नव्हे तर स्वातंत्र्यासाठी लढणारा हा पराक्रम महाराणा प्रतापांना भारतीय इतिहासातील स्वाभिमानाचे प्रतीक बनवतो.
25/12/2025
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजसदर (दरबार) ही अत्यंत शिस्तबद्ध, धर्मनिरपेक्ष आणि कार्यक्षम प्रशासकीय केंद्र होती. राजसदरेत अष्टप्रधान मंडळातील मंत्री, सरदार, मुत्सद्दी, किल्लेदार व दूत उपस्थित असत आणि निर्णय लेखी पुराव्यांसह घेतले जात. राज्यव्यवहारकोश, आज्ञापत्र व सभासद बखर यांसारख्या ऐतिहासिक साधनांमध्ये राजसदरेतील व्यवहार, हुकूमनामे, इनामपत्रे व न्यायनिवाड्यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. महाराज स्वतः सामान्य मावळ्यापासून मोठ्या सरदारांपर्यंत सर्वांचे म्हणणे ऐकत, जात-धर्म न पाहता गुण व निष्ठेला प्राधान्य देत आणि अन्यायाविरुद्ध तत्काळ निर्णय देत असत—यामुळेच शिवाजी महाराजांची राजसदर ही केवळ राजेशाही नव्हे तर लोककल्याणकारी आणि उत्तरदायी शासनव्यवस्थेचा ठोस ऐतिहासिक पुरावा ठरते.
25/12/2025
𝐉𝐢𝐫𝐞𝐭𝐨𝐩 ( जिरेटोप ) - 𝐒𝐲𝐦𝐛𝐨𝐥 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫
जिरे (जरी) म्हणजे सोन्या-चांदीच्या तंतुमय ताऱ्यांपासून बनवलेली कापडासारखी कलाकृती. ही जरी राजवस्त्रे, मानपानाची वस्त्रे, शिरस्त्राण व चिलखत यासाठी वापरली जात असे.
चिलखत व शिरस्त्राणांतील जिरे हे Chain Mail Armor प्रकारातील असून, अत्यंत बारीक वर्तुळाकार रिंगांनी बनवलेले असे. राजाचे ऐश्वर्य व सामर्थ्य यांचे ते प्रतीक मानले जाई.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे जिरे टोप हे ऑटोमन पद्धतीचे होते. शिखेकडे मागे वळणाऱ्या रचनेमुळे शत्रूचा आघात झाला तरी टोप स्थिर राहात असे—हे मराठा शैलीचे वैशिष्ट्य होते.
युद्धात स्वार होताना महाराजांचा पेहराव म्हणजे चिलखत, जिरे शिरस्त्राण व त्यावर जरीचा मंदील. जिरे टोप हा मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि पगडीच्या मानाचे प्रतीक होता.
शिवराय असे शक्तीदाता… 🚩
#शिवाजीमहाराज #मराठी
24/12/2025
इ.स. १६५९ मध्ये अफझलखान स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाकडे जाण्यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठलाला मनोभावे स्मरून निघाले, असा उल्लेख परंपरागत साधनांत आढळतो.
या प्रसंगी महाराजांनी “पराक्रमापेक्षा धर्म आणि न्याय महत्त्वाचा” हा भाव मनाशी धरला—विठ्ठलाच्या चरणी नम्रता, आणि रणांगणात धैर्य. पुढे अफझलखानाशी भेटीआधी त्यांनी आपल्या सैनिकांना अनावश्यक हिंसा टाळण्याची, स्त्रिया-साधू-देवस्थाने यांना अभय देण्याची सक्त सूचना दिली.
हा प्रसंग दाखवतो की विठ्ठलभक्ती ही महाराजांची रणनिती नव्हे, तर नैतिक आधार होती—ज्याच्या बळावर त्यांनी अफझलखानासारख्या बलाढ्य शत्रूला सामोरे गेले.
#विठ्ठल #शिवाजीमहाराज
24/12/2025
१६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामजी अनंत यांस हे पत्र महाराजांनी लिहिले होते. त्यात महाराज म्हणतात, ""मुलकात बटाईचा तह चालत आहे. परंतु रयतेवर जाल, रयतेचा वाटा रयतेस मिळेल आणि राजभाग आपणास येईल ते करणे. रयतेला काडीइतकाही उपद्रव देण्याची गरज नाही. असे झाले तर साहेब (महाराज) तुजवर राजी राहणार नाहीत येसे बरे समजणे. रयतेकडून काहीही जिनस घ्यायचे नाही, असा हुकूम आहे. कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात तेथील कुणबी किती आहेत हे गोळा करावे. ज्याकडे सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि ज्याला जोतास बैल, नांगर, पोटास दाणे नाही, त्याविणा तो आडोन निकामी झाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोनचार बैलाचे पैसे द्यावे. बैल घेवावे आणि पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. नंतर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैसे वाढीदिढीचे व्याज न घेता फक्त मुद्दलच हळूहळू शेतकऱ्याच्या तवानगी माफीक घेत जावे.''
महाराजांनी फक्त स्वराज्यातील शेतकऱ्यांची काळजी घेतली होती असे नाही, तर जिथे जिथे महाराजांच्या सैन्याचा तळ पडत असे, तिथल्या सैन्यालाही 'रयतेस काडीचा अजार द्यावयाची गरज नाही. असे झाले तर मराठियांची तो इज्जत वाचणार नाही. जाजती केल्या वेगळे सोडणार नाही हे बरे म्हणून वर्तणूक करणे,'' असे ते स्पष्टपणे बजावतात. सैन्याला लागणारी रसद ही "म्हणजे दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो, अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावयास येईल ते रास घ्यावे. कोण्हावरही जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही,' असा कडक हुकूम असायचा.
#शिवाजीमहाराज #मराठी