Maratha Vidya Prasarak Samaj

Maratha Vidya Prasarak Samaj

Share

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
बहुजन हिताय, बहुजन सुखाय .

04/05/2023

मविप्र मध्ये आता प्रत्यक्ष निरीक्षण, नवे अनुभव आणि ज्येष्ठांकडून थेट मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर काम सुरु झाले आहे. लॉ कॉलेजचा हा अभ्यासदौरा या कामाचाच एक भाग आहे.
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक

03/05/2023

मविप्र संस्थेच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आज आयोजित करण्यात आला. मविप्रच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या लायब्ररीलाही भेट दिली. या दौऱ्याचे नेतृत्व संस्थेचे प्रा. स्वप्नील पवार व प्रा. गीतांजली चौधरी यांनी केले. या दौऱ्याचे नियोजन सध्या सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या ॲड. सानिका ठाकरे यांनी केले.

03/05/2023

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालकपदी विजयी झालेल्या मविप्र परिवारातील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

03/05/2023

दाभाडी ता.मालेगाव, येथे महिला मेळावा , प्रमाणपत्र वितरण व यशस्वी लाभार्थी सत्कार सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र व मराठा विद्या प्रसारक संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने दाभाडी येथे महिलांसाठी ब्युटीशियन आणि फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र वितरण आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ,माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे म्हणाले 'महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे ,प्रशिक्षण देऊन महिलांना जास्त प्रमाणात वाव देण्याचे काम जन शिक्षण संस्थान नासिक करत आहे तसेच तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग महत्त्वाचे आहे,

ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिला सक्षमीकरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे कौटुंबिक गरज भागविणे त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे महिलांना मुख्य प्रवाहात व प्रशिक्षण देण्याचे काम विविध प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे

प्रास्ताविकात सौ ज्योती लांडगे संचालक जन शिक्षण संस्थान नाशिक ह्या म्हणाल्या की महिलांनी आपला वेळ वाया न घालवता विविध व्यवसायाभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा महिलांनी आता उद्योजक होवून आर्थकदृष्टया स्वावलंबी होणे गरजेचे आहे
सदर कार्यक्रमांमध्ये ब्युटीशियन व बेकिंग कुकिंग फूड प्रोसेसिंग कोर्स केलेला यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले व यशस्वी लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले,

सदर कार्यक्रमास उपस्थित माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र समाज ,शालन सोनवणे संचालक मविप्र ,श्री अरुण देवरे माजी संचालक श्री प्रमोद निकम सरपंच, ग्रामपंचायत दाभाडी, श्री अभिजीत निकम उपसरपंच प्राचार्य किशोर भामरे सर आयटीआय सटाणा, प्राचार्य बच्छाव सर आयटीआय मालेगाव, शिल्पा देशमुख जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत दाभाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते,
सूत्रसंचालन अमोल निकम यांनी केले, आभार प्रा. पाटील सर यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थांचे कार्यक्रमाधिकारी संदीप शिंदे, दत्तात्रेय भोकनळ मार्गदर्शक शिक्षिका कविता देवरे मोहिनी निकम , सविता निकम उपस्थित सर्व महिलांनी परिश्रम घेतले.

02/05/2023

जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतचे संपूर्ण जीवन ही शिकण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणाला अंत नाही.

02/05/2023

सद्गुरू प.पू. मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू प.पू.दादांनी १९७८ पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. १९७८ पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू प.पू. मोरेदादा यांनी सेवामार्गात कुणाचेही गुरुपद न घेता थेट “श्री स्वामी समर्थ” महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या नीरअहंकाराची परमोच्च साक्ष आहे. आज पुण्यतिथीनिमित्तानं सद्गुरुंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

02/05/2023

मित्रहो, नमस्कार 🙏🏻शुभप्रभात
आज सकाळीच एक पॉझिटिव्ह बातमी शेअर करतो.
महाराष्ट्र शासनाचा 2022- 23 जिल्हा क्रीडा पुरस्कार के. टी. एच एम. महाविद्यालयाचा बोट क्लबचा रोईंग खेळाडू निलेश धनंजय धोंडगे व कोमल बोडके या दोघांना जाहीर झाला असून दिनांक 1 मे 2023 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. रु 10,000/- व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रोंईंग या खेळाच्या कामगिरी ची दखल घेऊन जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंचे माझ्यासह म.वि.प्र.समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर,शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,महाविद्यालयीन स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, जिमखाना प्रमुख प्रा. सोपान जाधव, बोटक्लब सेक्रेटरी डॉ.योगेश गांगुर्डे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या दोन्ही रोईंग खेळाडूंना रोईंग प्रशिक्षक श्री.समाधान गवळी, आप्पा पिंगळे, सचिन भंबारे,रोशन ढिकले, विलास लोखंडे, दौलत बेंडकुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
-ॲड.नितीन बाबुराव ठाकरे,
सरचिटणीस, मविप्र नाशिक

01/05/2023

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दिंडोरी विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ.मंगला दामोदर बागुल यांची कोरिया येथे सेऊल शहरात होणाऱ्या आशिया पॅसिफिक मास्टर गेममध्ये १००, २००, ४०० व ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी भारतातर्फे निवड झाली असून त्या दहा मे रोजी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. त्यांच्या यशासाठी संस्थेतर्फे खूपखूप शुभेच्छा !
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

01/05/2023

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व बंधुभगिनींना मनपूर्वक शुभेच्छा !

Photos from Maratha Vidya Prasarak Samaj's post 30/04/2023

महाराष्ट्र दिनामागचा इतिहास आणि १०८ हुतात्म्यांची नावे आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नव्या पिढीला कळावा म्हणून मुद्दाम शेअर करतोय .
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे , सरचिटणीस, मविप्र समाज नाशिक

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषतः नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.
दार कमिशन व जे.व्ही.पी कमिटी
डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

फाजलअली आयोग
डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.
चळवळीस सुरुवात

महाराष्ट्र राज्य
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.
हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५चे हुतात्मे[३]

१] सिताराम बनाजी पवार
२] जोसेफ डेव्हिड पेजारकर
३] चिमणलाल डी. शेठ
४] भास्कर नारायण कामतेकर
५] रामचंद्र सेवाराम
६] शंकर खोटे
७] धर्माजी गंगाराम नागवेकर
८] रामचंद्र लक्ष्मण जाधव
९] के. जे. झेवियर
१०] पी. एस. जॉन
११] शरद जी. वाणी
१२] वेदीसिंग
१३] रामचंद्र भाटीया
१४] गंगाराम गुणाजी
१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६] निवृत्ती विठोबा मोरे
१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८] बालप्पा मुतण्णा कामाठी
१९] धोंडू लक्ष्मण पारडूले
२०] भाऊ सखाराम कदम
२१] यशवंत बाबाजी भगत
२२] गोविंद बाबूराव जोगल
२३] पांडूरंग धोंडू धाडवे
२४] गोपाळ चिमाजी कोरडे
२५] पांडूरंग बाबाजी जाधव
२६] बाबू हरी दाते
२७] अनुप माहावीर
२८] विनायक पांचाळ
२९] सिताराम गणपत म्हादे
३०] सुभाष भिवा बोरकर
३१] गणपत रामा तानकर
३२] सिताराम गयादीन
३३] गोरखनाथ रावजी जगताप
३४] महमद अली
३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६] देवाजी सखाराम पाटील
३७] शामलाल जेठानंद
३८] सदाशिव महादेव भोसले
३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१] भिकाजी बाबू बांबरकर
४२] सखाराम श्रीपत ढमाले
४३] नरेंद्र नारायण प्रधान
४४] शंकर गोपाल कुष्टे
४५] दत्ताराम कृष्णा सावंत
४६] बबन बापू भरगुडे
४७] विष्णू सखाराम बने
४८] सिताराम धोंडू राडये
४९] तुकाराम धोंडू शिंदे
५०] विठ्ठल गंगाराम मोरे
५१] रामा लखन विंदा
५२] एडविन आमब्रोझ साळवी
५३] बाबा महादू सावंत
५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५] विठ्ठल दौलत साळुंखे
५६] रामनाथ पांडूरंग अमृते
५७] परशुराम अंबाजी देसाई
५८] घनश्याम बाबू कोलार
५९] धोंडू रामकृष्ण सुतार
६०] मुनीमजी बलदेव पांडे
६१] मारुती विठोबा म्हस्के
६२] भाऊ कोंडीबा भास्कर
६३] धोंडो राघो पुजारी
६४] हृदयसिंग दारजेसिंग
६५] पांडू माहादू अवरीरकर
६६] शंकर विठोबा राणे
६७] विजयकुमार सदाशिव भडेकर
६८] कृष्णाजी गणू शिंदे
६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०] धोंडू भागू जाधव
७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३] करपैया किरमल देवेंद्र
७४] चुलाराम मुंबराज
७५] बालमोहन
७६] अनंता
७७] गंगाराम विष्णू गुरव
७८] रत्नू गोंदिवरे
७९] सय्यद कासम
८०] भिकाजी दाजी
८१] अनंत गोलतकर
८२] किसन वीरकर
८३] सुखलाल रामलाल बंसकर
८४] पांडूरंग विष्णू वाळके
८५] फुलवरी मगरू
८६] गुलाब कृष्णा खवळे
८७] बाबूराव देवदास पाटील
८८] लक्ष्मण नरहरी थोरात
८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०] गणपत रामा भुते
९१] मुनशी वझीऱअली
९२] दौलतराम मथुरादास
९३] विठ्ठल नारायण चव्हाण
९४] देवजी शिवन राठोड
९५] रावजीभाई डोसाभाई पटेल
९६] होरमसजी करसेटजी
९७] गिरधर हेमचंद लोहार
९८] सत्तू खंडू वाईकर
९९] गणपत श्रीधर जोशी, नाशिक
१००] माधव राजाराम तुरे(बेलदार) नाशिक
१०१] मारुती बेन्नाळकर, बेळगांव
१०२] मधूकर बापू बांदेकर, बेळगांव
१०३] लक्ष्मण गोविंद गावडे, बेळगांव
१०४] महादेव बारीगडी, बेळगांव
१०५] कमलाबाई मोहिते, निपाणी
१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर, मुंबई
१०७] शंकरराव तोरस्कर, मुंबई
१०८] बंडु गोखले, मुंबई

संदर्भ : विकिपीडिया

30/04/2023

आपल्या दिसण्या-असण्याचा न्यूनगंड कोणी बाळगू नये,बाहेरील सौंदर्य निसर्गदत्त आहे. माणूस आतून सुंदर असला पाहिजे. जगात आपल्यावर निखळ प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपले आईवडील असतात . प्रत्येक मुल हे आपला आईवडीलांसाठी हिरो असतं. जगाची समाजसेवा करता नाही आली तर चालेल पण आपल्या आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे. आई नऊ महिन्याचा त्रास सहन करून आपल्याला पोटात वाढवते. तिचे कष्ट, त्याग,तिच्या जीवघेण्या कळा अश्या . प्रत्येकाचे पहिले प्रेम ही त्याची आई असते. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी श्री अनंत राऊत यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वार्षिक गुणगौरव समारंभ (शुक्रवार दि.२१ एप्रिल) प्रसंगी त्ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री विश्वासराव मोरे, उपसभापती श्री देवराम मोगल, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, प्राचार्य डॉ दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा दिलीप माळोदे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे श्री सतीश देशमाने, भीमराव मोरे, गुलाबराव मोरे, जयंवत निरगुडे, भाऊसाहेब गवळी, साहेबराव देशमाने, पुंडलिकराव निरगुडे, दिलीपराव बोरस्ते, श्री.शंकरराव रसाळ, विष्णू थोरे, लक्ष्मण महाडिक ,चंद्रकांत कुशारे क्रीडाधिकारी प्रा हेमंत पाटील आदि उपस्थित होते
अनंत राऊत पुढे म्हणाले की, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. ‘कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने’ या कवितेतून त्यांनी एक वेगळा विचार सांगून बाबा आमटे यांच्याकडून बाळकडू घेऊन प्रकाश आमटे यांनी एक वेगळी दिशा आपल्या जीवनाला दिली. त्यांना साथ देणाऱ्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचेही कौतुक करणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन करून निर्मितीचे कार्य करावे, करियरसाठी विविध संधी उपलब्ध असून स्वतःला सिद्ध करावे. राजकारणाच्या घसरणाऱ्या दर्जावर त्यांनी ‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’ ही कविता सादर करून भाष्य केले. अनेक उत्कृष्ट रचना सादर करून विद्यार्थ्यांचे मनमुराद करमणूक केली. ते म्हणाले की कविता सादर करताना झालर जरी मनोरंजनाची असली तर आतला गाभा हा प्रबोधनाचा ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
‘दुख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ ही सुप्रसिद्ध कविता सांगून त्यांनी मैत्रीवर भाष्य केले. प्रत्येकाला आयुष्यात एक तरी जिवाभावाचा मित्र असला पहिजे.कोरोनाच्या काळात आपल्या मित्रांनी- केलेले कामाला जगात तोड नाही. मित्रांमुळेच महामारीचा मुकाबला करू शकलो. मित्र गरीब असतो, मंद असतो, कारीत्तो जोपर्यंत सोबत असतो तो पर्यंत दुखां साठी काळजाचा रस्ता बंद असतो.प्रत्येकाने एक तरी जिवाभावाचा मित्र जोपासावा. चांगली मैत्री करण्यासाठी अहंकार सोडवा लागतो आणि माफ करण्याची क्षमता असावी. असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,वार्षिक गुणगौरव समारंभा निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो .भविष्यात विद्यार्थी शिक्षणाबरोबर सुप्त कलागुणांमुळे विद्यार्थी त्या त्या क्षेत्रात जाऊन आपले जीवन चांगले घडू शकतो. या संदर्भात येणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात वर्षभरामध्ये महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा यावेळी घेतला. यावेळी वर्षभर झालेल्या उपक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि वार्षिक गुणगौरव समारंभ निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यां विद्यर्त्याना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले.पारितोषिकांचे वाचन प्रा हेमंत पाटील, प्रा सागर कडलग प्रा पंकजकुमार गांगुर्डे यांनी केले
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रारंभ केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य दिलीप माळोदे यांनी मानले.

30/04/2023

महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ही मोठ्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एक भाग असली तरी शिक्षणाची भाषा, अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती, सांस्कृतिक फरक आणि परीक्षा पद्धती या संदर्भात दोघांमध्ये काही गुणात्मक फरक आहेत. हे फरक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यावर परिणाम करीत आले आहेत. हे शैक्षणिक चित्र बदलण्यासाठी सध्या मविप्र मध्ये काम सुरु असून लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

M. V. P. Campus, Gangapur Road
Nashik
422002