Exam Points

Exam Points Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Exam Points, nandura, Nandura.

Railways (JE, NTPC, ALP, RPF & Group D), CET New Pattern, SSC CGL (Tier-1 & Tier-2), SSC CPO (SIs in Delhi Police, CAPFs and ASIs in CISF), SSC CHSL (10+2), SSC MTS, SSC Constable GD, BANK (PO/Clerk), State PSC, & All State & Central Government Exam

मेजर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह (२९ सप्टेंबर, इ.स. १७२५:स्टिश हॉल, मार्केट ड्रेटन, श्रॉपशायर, इंग्लंड - २२ नोव्हेंबर, इ.स. १७७...
13/09/2025

मेजर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह (२९ सप्टेंबर, इ.स. १७२५:स्टिश हॉल, मार्केट ड्रेटन, श्रॉपशायर, इंग्लंड - २२ नोव्हेंबर, इ.स. १७७४:बर्कली स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू करण्यात क्लाइव्हने वॉरन हेस्टिंग्ससह सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

भारतात ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश राजवट आणल्यावर त्याने येथील अमाप संपत्ती लुटून ब्रिटिश राजवटीस दिली. याबद्दल त्याला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले परंतु त्याचबरोबर स्वतःची तुंबडीही भरून घेतल्याबद्दल त्याच्यावर ब्रिटिश संसदेत खटलाही चालविण्यात आला.

आपल्या अंमलादरम्यान क्लाइव्हने बंगालमध्ये अतोनात अत्याचार करविले. त्याने लादलेले अचाट कर आणि शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ आणि इतर रोख पिके लावण्यास भाग पाडल्यामुळे तेथील दुष्काळास भयानक परिमाण मिळाले व त्यात लाखो भारतीय लोक मृत्यू पावले.

नीरद सी. चौधरी या इतिहाससंशोधकाच्या मते बंगालमध्ये आधीच मोगल, मराठे आणि अफगाणी राज्यकर्त्यांनी अत्याचार चालविलेले होते त्यात उच्चवर्णीय हिंदूंच्या लोभीपणाने इतरेजनांची आधीच धूळधाण उडालेली होती आणि क्लाइव्हने त्यास आळा घातला.

ईस्ट इंडिया कंपनी कायदा (ईआयसी कायदा१७८४), ज्याला पिटचा भारत कायदा म्हणून ओळखले जाते, हा ब्रिटनच्या संसदेचा कायदा होता ज...
10/09/2025

ईस्ट इंडिया कंपनी कायदा (ईआयसी कायदा१७८४), ज्याला पिटचा भारत कायदा म्हणून ओळखले जाते, हा ब्रिटनच्या संसदेचा कायदा होता जो १७७३ च्या नियमन कायद्यातील उणीवा दूर करण्याचा इरादा होता ज्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलबजावणीला सामोरे जावे लागले.

ब्रिटिश सरकारचे ब्रिटनचे पंतप्रधान विल्यम पिट यंगर यांच्या नावावर नामांकित या कायद्यात नियंत्रण मंडळाच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली असून या कंपनीने ब्रिटिश भारताचे संयुक्त सरकार आणि क्राउन यांनी अंतिम अधिकार असलेल्या सरकारकडे तरतूद केली आहे.

राजकीय क्रियाकलाप व आर्थिक/व्यावसायिक कामांसाठी न्यायालय संचालक मंडळासाठी सहा सदस्य नियंत्रण मंडळ स्थापन केले गेले. नियामक कायद्यात बरेच दोष असल्याने हे दोष दूर करण्यासाठी आणखी एक कायदा करणे आवश्यक होते.

आझाद हिंद फौज (Indian National Army) ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना ...
05/09/2025

आझाद हिंद फौज (Indian National Army) ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते

एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला...
04/09/2025

एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 400 लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे.

१८ जून १५७६ रोजी महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखालील मेवाड सैन्य आणि अंबरचा मानसिंग पहिला यांच्या नेतृत्वाखालील मुघल सै...
03/09/2025

१८ जून १५७६ रोजी महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखालील मेवाड सैन्य आणि अंबरचा मानसिंग पहिला यांच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्य यांच्यात हल्दीघाटीची लढाई झाली .

१५६८ मध्ये चित्तोडगडच्या वेढ्यामुळे मेवाडचा सुपीक पूर्वेकडील पट्टा मुघलांच्या हाती गेला. तथापि, उर्वरित जंगली आणि डोंगराळ राज्य अजूनही सिसोदियाच्या ताब्यात होते .

अकबर मेवाडमधून गुजरातला जाणारा एक स्थिर मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करत होता; १५७२ मध्ये जेव्हा प्रताप सिंहला राजा (राणा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला, तेव्हा अकबरने अनेक दूत पाठवून राणाला या प्रदेशातील इतर अनेक राजपूत नेत्यांप्रमाणे दास बनण्याची विनंती केली. तथापि, प्रतापने करार करण्यास नकार दिला, ज्यामुळे युद्ध झाले..

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या ल...
01/09/2025

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती.

१७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौलाची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती.

त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले.

मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली ...
31/08/2025

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली.

अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

30/08/2025

संपूर्ण मार्च महिना चालू घडामोडी.

पानीपत की दूसरी लड़ाई 5 नवंबर, 1556 को मुग़ल सम्राट अकबर और हेमू विक्रमादित्य के बीच लड़ी गई थी, जिसमें अकबर की सेना ने ...
30/08/2025

पानीपत की दूसरी लड़ाई 5 नवंबर, 1556 को मुग़ल सम्राट अकबर और हेमू विक्रमादित्य के बीच लड़ी गई थी, जिसमें अकबर की सेना ने बैराम खान और खान जमान के नेतृत्व में निर्णायक जीत हासिल की. हेमू को युद्ध में घायल होने के बाद पकड़ लिया गया और मार दिया गया, जिससे मुग़ल शासन की स्थापना हुई.

30/08/2025

संपूर्ण फेब्रुवारी 2025 महिना चालू घडामोडी.

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ साली झाले, ज्यात मुघल शासक बाबर याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव केला. या लढाईत ब...
29/08/2025

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ साली झाले, ज्यात मुघल शासक बाबर याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव केला. या लढाईत बाबरने तोफा आणि शिस्तबद्ध सैन्याचा वापर केला, ज्यामुळे मुघल साम्राज्याचा भारतात पाया रचला गेला.

Address

Nandura
Nandura
443404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Exam Points posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Exam Points:

Shortcuts

Share