14/04/2023
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकत.
स्वातंत्र्य पूर्व काळ असा होता जिथे जात आणि धर्माचा पगडा मानवी मनावर धर्ममार्तंड लोकांनीं खोल बिंबविला होता.
जिथे माणूस माणसाकडे तुच्छतेने पाहायचा .
माणसाचा माणसाला विटाळ व्हायचा .
धर्मपुरोहितांचा शब्द हाच प्रमाण .
दलित आणि वंचित यांची सावली अंगावर पडली तरी विटाळ. तर स्पर्श झाल्याने काय होईल याचा विचार न च केलेला बरा.
वेद मंत्रोच्चार चा ध्वनी चुकून कानावर पडला तर कानात तप्त शिसे ओतले जायचं .
समाजात विषमतेचे बीजे पिढ्यानपिढ्या खोल रुजवली गेली होती .
चार वेद, सहा शास्त्र ,अठरा पुराण यातील लिखाण मानवी मनात सामाजिक विषमता निर्माण करणारे ,पिढ्यानपिढ्या रुजविणारे ग्रंथ.
आणि या सामाजिक विषमतेला तडा देण्याचं ,सामाजीक विषमतेचे साखळदंड तोडण्याचे काम केले ते फक्त एका संविधानाने .
ज्यात लिहिले गेले
माणूस हा एक च आहे .
सर्व समान आहेत .
तो धर्मनिरपेक्ष आहे .
तो जातीविरहित आहे
स्त्री आणि पुरुष हीच जात आहे
तो फक्त आणि फक्त भारतीय आहे .
जिथे सर्व एकत्र येऊ शकतात,
एकत्र नांदू शकतात ,
प्रत्येकास समान हक्क आणि अधिकार
दिले गेले
एकाच संविधानाने .
मानवी मनावर खोलवर रुजविलेली विषमता दूर केली
एका संविधानाने
स्त्री पुरुष एक केला
एका संविधानाने
माणूस एक केला
एका संविधानाने
जातीविरहित समाज निर्माण केला
एका संविधानाने
देशाच्या सर्वोच्च पदी दलितास बसविले
एका संविधानाने
जिथे सावलीचा विटाळ होत होता तो दूर केला
एका संविधानाने
डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितच मानले जायचे आणि त्यांना तसे बनवून त्यांची उंची कमी करण्याचे काम जाणीवपूर्वक केले गेले .पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार एवढे महान होते की धर्मपुरोहित लोकांचे विचार शेवटी ठेंगणें पडले.
आज सर्व जाती धर्मातील लोक बाबासाहेबांना वंदन करतात
त्यांच्या विचारांना अभिवादन करतात .
त्यांच्या विचारांचे स्टेटस ठेवतात त्यांची महती सांगतात ज्यात त्यांना कमीपणा वाटत नाही तर गौरव वाटतो .
धर्मपुरोहितांनी ज्यांना अस्पृश्य मानले त्यांच्या विचारांची जयंती सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येऊन साजरी करतात .
जगाला दाखवून देतात की आम्ही धार्मिक नाही तर भारतीय आहोत .
हाच खरा संविधानाचा विजय
हीच खरी संविधानाची टाकत .
जयभीम जय भारत
✍️रवींद्र सूर्यवंशी
प्राचार्य
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड .