Amdar Shashikant Shinde Mahavidyalay Medha

Amdar Shashikant Shinde Mahavidyalay Medha To explore the hidden intelligence and potential among the students of hilly area for smooth functioning of the society.

मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत “ एकदिवसीय परिषद दिनांक - १३ फेब्रुवारी २०२६'मराठी साहित...
14/02/2026

मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत “ एकदिवसीय परिषद
दिनांक - १३ फेब्रुवारी २०२६
'मराठी साहित्यातील भटक्या विमुक्त जातीजमातींचे चित्रण' हे १९२० ते १९६० पर्यंत आणि १९६० नंतरच्या साठोत्तरी मराठी साहित्यात भटक्या-विमुक्त जातीजमातींचे चित्रण झालेले आहे, त्याचा शोध घ्यावायचा असल्यास या कालखंडातील कथा, कादंबरी, चरित्रे, आत्मचरित्रे व आत्मकथन या वाङ्मय प्रकारांचा आधार घ्यावा लागतो.
१९६० पर्यंतचे जे साहित्यिक आहेत. त्या साहित्यिकांमध्ये वा.म. जोशी, श्री.म. माटे, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर व शंकर पाटील या साहित्यिकांच्या कृर्तीचा तर १९६० नंतरच्या साहित्यिकांमध्ये महादेव मोरे, चारूता सागर, रणजीत देसाई, दया पवार, लक्ष्मण माने, दादासाहेब मोरे, शंकरराव खरात, लक्ष्मण गायकवाड, गुलाब वाघमोडे,किशोर शांताबाई काळे, शिवाजी राठोड, अजित मिणेकर, रावजी राठोड, सौ. विमल मोरे, के.ओ.गिडे, आणि सौ.जनाबाई गिऱ्हे
या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा व त्यात आलेल्या भटक्या विमुक्तांच्या चित्रणांचा परामर्श घ्यावा लागतो." असे प्रतिपादन
एल. बी.एस.कॉलेज साताराचे उपप्रचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अशोक तवर यांनी केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत " प्रमुख अग्रणी महाविद्यालय व मराठी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब व त्यांची स्थिती " याविषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अशोक तवर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी सर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार व समाजसेवक विजय मांडके, प्रा.शेलार प्रा.अवघडे व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवडच्या प्राचार्य मंजुश्री बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.तवर सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले," या चित्रणात त्यांच्या जीवनपध्दती, समजुती, रूढी, परंपरा, त्यांची सुख दुःखे, विसंगती त्यांच्यावरील अन्याय अत्याचार आणि त्यांची भाषा यांचा परिचय मराठी साहित्याला आणि वाचकांना करून दिला व येथूनच खऱ्या अर्थान वास्तववादी साहित्याची निर्मिती सुरू झाली.आधुनिक मराठी वाङ्‌मयाच्या पार्श्वभूमीचा विचार करता,१९२० नंतरच्या साहित्यिकांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून दलित, ग्रामीण आणि भटक्या-विमुक्त जातीजमार्तीचे चित्रण केले. भटक्या विमुक्तांच्या चित्रणात कैकाडी, वडार, कंजारभाट, भामटा, रामोशी, बेरड या महत्त्वाच्या विमुक्त व भटक्या जातीजमाती साहित्यात आल्या."
त्यानंतर विजय मांडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले, "विमुक्त व भटक्या जातीजमाती वर्षानुवर्षे गावकुसाच्या बाहेर, गावात जिथे प्रातर्विधी करतात, त्या ठिकाणी समूहासमूहाने राहत होत्या. यांचा हजारो लोकांचा समूह गाढवांच्या, घोड्यांच्या, गायी बैलांच्या पाठीवर बिन्हाडे टाकून 'आज इथं तर उद्या तिथं' असे जगत होता. अशा या भटकंती करणाऱ्या समाजाचे आधुनिक मराठी साहित्यातील साहित्यिकांना जसे त्यांचे दर्शन घडले, तसे त्यांनी साहित्यात मांडले. आणि येथूनच मराठी साहित्यात जातीजमातींचे चित्रण आले आहे परंतू हे चित्रण दुसरे तिसरे कुणी नाही तर भटक्या जमातितील लेखकांनीच केले आहे “
यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व त्यानीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते म्हणाले “ श्री.म. माटे यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथांपैकी त्यांची 'कृष्णाकाठचा रामवंशी' ही कथा विमुक्त जातीतील 'रामोशी' समाजाचे चित्रण करणारी आहे. 'कृष्णाकाठचा रामवंशी' ही कथा 'उपेक्षितांचे अंतरंग' या कथासंग्रहातील असून या कथासंग्रहातील इतर कथा उपेक्षित जीवन जगणाऱ्या समाजाच्या आहेत. आपल्या कथांमधून माटे यांनी जे चित्रण केले ते वास्तव असून तत्कालीन समाजातील उपेक्षितांवर प्रकाश टाकणारे आहे. मराठी साहित्यातील 'अपेक्षितांचे अंतरंग' हा एकमेव आणि पहिला कथासंग्रह आहे की जो उपेक्षितांना, दलितांना आणि भटक्या-विमुक्तांना न्याय देणारा आहे. अशा या कथासंग्रहांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश कुंभार म्हणतात, "दलित साहित्याची बीजे श्री. म. माटे यांच्या कथांमध्ये आढळतात.
दलितांच्या, शोषितांच्या आणि विमुक्त जातींच्या अनुषंगाने येणाऱ्या कथा 'उपेक्षितांचे अंतरंग' या कथासंग्रहात आलेल्या ओहत. तसेच १९६० नंतर उदयास आलेल्या दलित साहित्यिकांनीही हे मान्य केलेले आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे शुभहस्ते दिपज्वलन करून परिषदेचे उदघाट्न करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा व सर्व कलाकारांचा शॉल व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
समन्वयक प्रा. सुनील केमदारने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर सहसमन्वयक डॉ.राजेंद्र ननावरे यांनी प्रास्ताविक केले.मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांनी बिजभाषण केले.प्रा.गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले.शेवटी पहिल्या सत्राचे आभार प्रा.डॉ. प्रमोद चव्हाण यांनी मानले.
यानंतर मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांच्या " कर्मयोगी संत गाडगे महाराज " या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
द्वितीय सत्रात लोककलेचे उपासक सातारा जिल्ह्यातील लोककलाकार श्री.राजकुमार रामचंद्र धोत्रे ( भारूड ),शाहीर श्रीरंग रणदिवे ( पोवाडा )
प्रेरणा गवई ( लावणी नृत्य) तुकाराम मोहिते ( भविष्यवेत्ता ) मिलिंद भोसले ( बहुरूपी ) अशोक गायकवाड व विठ्ठल भिंगारदिवे ( पोतराज ) विठ्ठल महाराज काटेकर ( आराधी ) व तृप्ती मोहिते ( देवीचे गाणे ) या विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे निवेदन प्रा.आनंद साठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रविंद्र ओंबळे तृप्ती पवार, हर्षदा कराळे,साक्षी जंगम,मधुरा शेलार व वैष्णवी धनावडे या विध्यार्थ्यांनीतसेच विविध समितीचे प्राध्यापक सदस्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूपच परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्युनियर व सिनियर विभागाचे सर्व प्रद्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी प्रा डॉ.संजय धोंडे यांनी आभार मानले व ही परिषद आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ''खाद्य महोत्सवा'चे" थाटात आयोजन:गावठी पोपटी आणि पिठलं-भाकरीवर खवय्यांची तावआमदार शशिक...
05/02/2026

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ''खाद्य महोत्सवा'चे" थाटात आयोजन:
गावठी पोपटी आणि पिठलं-भाकरीवर खवय्यांची ताव
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आज दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'खाद्य महोत्सवात' विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी यशस्वी उद्योजक बनण्याचा अनुभव घेतला. चविष्ट पदार्थांची विक्री आणि त्यातून मिळवलेला 'नफा' या आगळ्यावेगळ्या निकषावर या महोत्सवाचे विजेते घोषित करण्यात आले. यामध्ये अनुष्का गायकवाड हिने सर्वाधिक नफा कमवत प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र विभाग आणि प्लेसमेंट सेल यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
चिकन बिर्याणी ते अस्सल गावरान मेनू
महोत्सवात अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये खवय्यांसाठी विविध पदार्थांची रेलचेल होती. विद्यार्थ्यांनी बनवलेली चिकन बिर्याणी, चिकन पुलाव, गरमागरम भुर्जी-पाव यांसारख्या पदार्थांनी उपस्थितांच्या जिभेचे चोचले पुरवले. मात्र, विशेष आकर्षण ठरले ते 'गावठी पोपटी' आणि 'अस्सल गावरान पिठलं-भाकरी आणि चटणी'. या ग्रामीण आणि पारंपारिक चवीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती.
प्राध्यापकांचा पुढाकार आणि प्रोत्साहन
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला दाद देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी स्वतः विविध स्टॉल्सवरून पदार्थ विकत घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. शिक्षकांनी केलेल्या खरेदीमुळे विद्यार्थ्यांचा गल्ला आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले.
नफ्याच्या गणितावर ठरले 'मानकरी'
साधारणतः पाककला स्पर्धेत केवळ चवीला महत्त्व असते, पण विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे मिळावेत म्हणून या स्पर्धेत 'एकूण मिळालेला नफा' (Total Profit) हा निकष लावण्यात आला होता. ज्यांनी सर्वाधिक नफा कमावला, त्यांनाच विजेते घोषित करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल:
• प्रथम क्रमांक: अनुष्का गायकवाड
• द्वितीय क्रमांक: पायल सावंत
• तृतीय क्रमांक: आकांक्षा चव्हाण
• उत्तेजनार्थ: वैभवी सुर्वे
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे (डॉ. ओमकार यादव, डॉ. उदय पवार, श्रीमती धनश्री देशमुख, डॉ. अमेय देसाई) महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल शिक्षकांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील खाद्य संस्कृती ही विविधतेने अतिशय संपन्न असून याद्वारे सुद्धा अर्थाजन करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा व्यावसायिक दृष्ट्या कसा वापर करता येईल याचा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थांनी आवर्जून विचार करावा असे प्रतिपादन केले व या अभिनव उपक्रम आयोजन करण्यात आल्याबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील रसायनशास्त्र व सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रात्य...
04/02/2026

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील रसायनशास्त्र व सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व व्यावहारिक ज्ञानासाठी सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास दिनांक 29/01/2026 रोजी अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीचा उद्देश साखर कारखान्यातील विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी उसाच्या रसावर होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिल्या. यामध्ये प्रामुख्याने रसाचे शुद्धीकरण (Clarification), सल्फर आणि चुन्याचा वापर, तसेच स्फटिकीकरण (Crystallization) या प्रक्रियांचा अभ्यास करण्यात आला. तसेच औद्योगिक स्तरावरील रासायनिक प्रक्रियांचे सखोल ज्ञान मिळाले. तसेच Alcohol distillation plant ला भेट देता आली. भविष्यातही अशा पद्धतीच्या अभ्यास भेटी व्हाव्या अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. ही अभ्यास भेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. प्रमोद घाटगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनिल केमदारने, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.धनश्री देशमुख, प्रा. अतुल तिडके आणि प्रा. बापू पाटील यांचे सहकार्य लाभले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा वनस्पतीशास्त्र विभागामार्फत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. अतीत येथील भलरी...
04/02/2026

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा वनस्पतीशास्त्र विभागामार्फत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. अतीत येथील भलरी रोपवाटिका आणि बोरगाव येथील स्वराज रोज नर्सरी या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. भलरी रोपवाटिकेचे संस्थापक श्री शुभम यादव यांनी विद्यार्थ्यांना रोप तयार करताना लागणाऱ्या तसेच बियांपासून ते शेतापर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टींचे व सर्व प्रक्रियांचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. त्याचबरोबर मुलांनी या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
बोरगाव स्वराज नर्सरीचे संस्थापक श्री पंडित यांनी त्यांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नर्सरी मध्ये विविध प्रकारची फुलांची, फुलांची रोपे, बोनसाई, कॅक्टस, याच प्रमाणे हँगिंग बास्केट, ऑर्किड यांचे नियोजन उत्पादन आणि पुनरुत्पादन कशाप्रकारे करावे याचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. याचबरोबर यासाठी लागणारे साहित्य तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे घ्यावे याचेही मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. ही सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी सहमती देताना मुलांच्या मध्ये व्यावसायिक दृष्टिकोन जागावा तसेच बाह्य जगातील ज्ञान त्यांना व्हावे असे सांगितले. या सहली के नियोजन करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. उदय पवार, श्री. प्रवीण जाधव, डॉ. बाळासाहेब उघडे आणि श्रीमती. धनश्री देशमुख यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले

Address

Amdar Shashikant Shinde Mahavidyalay, Medha Tal/Jawali, Dist/Satara, Pin/415 012
Medha
415012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amdar Shashikant Shinde Mahavidyalay Medha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share