15/08/2026
# ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सु. पे. ह. हायस्कूल, बोर्डी येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती प्रकाश सावे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सुंदर व शिस्तबद्ध कवायत संचलन तसेच देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या शानदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्या सौ. स्वाती प्रकाश सावे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत.” देशाच्या प्रगतीची आणि उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, वेळेचे नियोजन आणि सतत नवनवीन ज्ञान मिळविण्याची सवय अंगीकारावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच मोबाईल व तंत्रज्ञानाचा योग्य व विधायक वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि संविधानातील मूल्यांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले. “चांगले नागरिक घडणे हीच खरी देशसेवा आहे,”असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला. तसेच स्वतः व्यसन करणार नाही आणि इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणार, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, आत्मसंयम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाली.
शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद, पालघर संरक्षण मंत्रालय यांच्या ‘My Gov आणि My Bharat या पोर्टलवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील कु.नेहा पाटील व अक्षरा मुळे दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तेची व उत्कृष्ट सहभागाची दखल घेत लाल किल्ला नवी दिल्ली येथे होणाऱ्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी ई-पासद्वारे त्यांची निवड करण्यात आली. ही बाब शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद ठरली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांची बोर्डी गावाच्या दिशेने प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा व घोषवाक्ये देत संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि देशभक्तीची भावना विशेष उल्लेखनीय होती.
त्यानंतर बोर्डी ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदन कार्यक्रमासही उपस्थिती लावण्यात आली. ग्रामपंचायतीचा ध्वजवंदन कार्यक्रमही उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.जिल्हा परिषद, माध्यमिक विभाग, पालघर यांच्या ‘माय गव्हर्मेंट’ या पोर्टलवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील कु.नेहा पाटील व अक्षरा मुळे दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तेची व उत्कृष्ट सहभागाची दखल घेत लाल किल्ला नवी दिल्ली होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळा 2016 मध्ये सहभागी होण्यासाठी ही निमंत्रण पत्र मिळण्या साठी निवड करण्यात आली.ही बाब शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद ठरली. बोर्डी ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एकूणच,८० व्या स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा ठरला. सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी आणि इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहपूर्ण व अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.