18/07/2026
अहवाल
विषय : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आयोजित चित्रकला, निबंध लेखन व पथनाट्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे यश
दि. १७ जुलै २०२६ रोजी भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे, पुणे मंडळ यांच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत बारामती रेल्वे स्टेशन येथे "माझे शहर, माझे विकसित स्टेशन कसे असेल?" तसेच "विकसित भारत बनविण्यासाठी मी काय करेन?" या विषयांवर चित्रकला व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम गटामध्ये शौर्य रोहित कुंभार याने प्रथम, स्वराज युवराज भांडवलकर याने द्वितीय तर आदित्य जालंदर गीते याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या द्वितीय गटामध्ये कार्तिक महामुनी याने प्रथम क्रमांक अनिरुद्ध दुरुगकर याने द्वितीय क्रमांक तर सार्थक नागराळे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या प्रथम गटात रुद्रा गडकर हिने प्रथम क्रमांक आर्या काजळे हिने द्वितीय क्रमांक काव्यंजली फडतरे हिने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या द्वितीय गटात केतकी पिंगळे हिने प्रथम, गौरांगी भिसे हिने द्वितीय तर शिवानी बारटक्के हिने तृतीय क्रमांक मिळविला.
निबंध लेखन स्पर्धेत प्रथम गटामध्ये माऊली अंकुश राठोड
याने द्वितीय क्रमांक साहिल सचिन सस्ते तर तृतीय क्रमांक
सोहम पवार याने मिळविला. द्वितीय गटामध्ये अवधूत बजरंग बाबर याने प्रथम, स्वरूप शशिकांत भापकर याने द्वितीय तर प्रद्युत शैलेन्द्र गडकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या प्रथम गटात संस्कृती घोरपडे हे प्रथम क्रमांक शिवन्या तनपुरे तिने द्वितीय क्रमांक तर स्वरा निकाळजे हिने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या द्वितीय गटात नंदिनी दीक्षित ने प्रथम क्रमांक हर्षाली जाधव ने द्वितीय क्रमांक तर ईश्वरी शेलार ने तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाचा गौरव वाढविला. सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना रवींद्र गडकर, भारत काळे, विनोद पारे, रेखा कुंभार नीता पवार, आम्रपाली घोरपडे, सुनील खोमणे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी "पाणी वाचवा, जीवन वाचवा" या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात अनुराज कुंभार,आर्यन टिंगरे, सिद्धेश कापसे , लोकेश सोनवणे, तन्वीर शिंदे, वेदांत भागवत, प्रज्वल शिंदे, ओम जगताप, सिद्धेश सपकळ, अद्वैत सोनवणे आणि आदित्य काशीद या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन श्री. रवींद्र गडकर यांनी केले. तसचे श्री. विनोद पारे यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यांचे जोश पूर्ण वाद्यकाम केले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल व प्रभावी सादरीकरणाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा जोग, उपमुख्याध्यापिका सविता हिले, पर्यवेक्षक शाम नांगरे , संदीप पवार पर्यवेक्षिका सुजाता पांडकर व सर्व शिक्षकवृंद, पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या या सहभागाबद्दल व सहकार्याबद्दल रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन प्रशालेचा गौरव करण्यात आला. प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष अजयजी पुरोहित , महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले